Thursday, May 25, 2023

श्रीगजानन विजय काव्यांजली-काव्यपुष्प-१

जय गजानन- ।। नव्या लेखन उपक्रमाचा आरंभ श्रीगुरूपुष्य-योगावर " २५-०५-२०२३ करीत आहे- ।। गण गण गणात बोते ।। श्रीगजाननविजय काव्यांजली अध्याय पहिला--काव्यपुष्प-१ ----------------------------------------- श्रीकुलदेवता,कुलदेवी,इष्टदेवतांचे स्मरण श्रीसद्गुरूंना करितो विनम्र अभिवादन ।। श्रीगजानन विजय ग्रंथ हा महान थोर श्रीगजानन लीलांचे आहे प्रासादिक सार यथामती वर्णीन हो मी सारे कवितेतून लेखणी होई धन्य ही,मना आनंद अपार ।। १ ।। श्रीगजानन माऊली चरणी नित्य नमन संतकवी श्रीदासगणूंना मनोभावे स्मरुन श्रीगजानन काव्यांजली काव्यपुष्पे ही नित्य नेमे क्रमशः करीन गुरूचरणी अर्पण ।। २ ।। तेवीस फेब्रुवारी अठराशे अठयाहत्तर साली शके अठराशाभीतरी माघ "वद्य सप्तमी" या दिवशी पहिल्यांदा शेगावात दिसली महापुरुष आधुनिक संत श्रीगजानन माऊली ।।३ ।। आले कुठून हे, असती कोण? करी तर्क नाना शेगावीचे बंकटलाल,कुलकर्णी दामोदर दोघांनी पाहिले योगीपुरुषा- श्रीस्वामीगजाननांना, विप्र देविदासाच्या घरासमोरून जाताना ।। ४ ।। कवी अरुणदासावरी गजानन कृपा झाली सद्गुरूचरणी काव्यसेवा ही सुरू झाली ।। ---------------------------------------- श्रीगजाननविजय काव्यांजली -अध्याय पहिला , -काव्यपुष्प -१ कवी अरुणदास "- अरुण वि.देशपांडे-पुणे 9850177342 -----------------------------------------

Thursday, February 3, 2022

लघुकथा - बस्तान

लघुकथा - बस्तान ले- अरुण वि.देशपांडे-पुणे ------------------------ या ऑफिसची "नवी- बॉस म्हणून "तिच्या प्रवेशाचा पहिला दिवस ", तिला इथे येऊन आता सहा महिने होत आले तरी अजून लख्ख आठवत असतो. प्रमोशन वगैरे चाकोरीतुन ती बॉस झालेली नव्हती, तर आधीच्या जॉबला सोडचिट्ठी देत अधिक पॅकेज देणाऱ्या या कंपनीची ऑफर स्वीकारून ती इथे आली होती. या कंपनीने त्यांच्या ऑल लेडीजस्टाफ असलेल्या ऑफिसयुनिटची बॉस म्हणून नेमणूक करतांना तिला म्हटले- "करिअर चॅलेंज " म्हणून या ऑफिसची जबाबदारी तुम्हास देत आहोत, सो प्रुव्ह ईट ! नव्या दमाच्या उत्साहाने तिने" हसत हसत हे चॅलेंज स्वीकारले , आणि या ऑफिसमध्ये आलेली आतापर्यंतची सर्वात तरुण बॉस" होण्याचा बहुमान पटकावला. अत्याधुनिक कॉर्पोरेट ऑफिस, इथला सारा माहौल भारी होता, चकचकीत ,झगमगीत आणि स्मार्टनेस ठासून भरलेले हे ऑफिस , यापुढे ती बॉस असलेले तिचेऑफिस असणार होते. हे सगळं वातावरण तिच्या मनातल्या करिअरिस्ट बॉसला सुखावणारे होते. दिवसभरातून तीन-चार वेळा केबिनच्या बाहेर येत मोठ्या वर्किंगहॉलमध्ये बसलेल्या शंभरएक स्टाफला नजरेखालून घालत असायची. स्वतःच्या कल्पनेने तिने अनेक बदल घडवून आणले, हे नवे बदल आणतांना कुणी कुरकुर केली नाही की ,दबक्या आवाजात विरोध केला नव्हता. तिने केलेल्या चेंजला मिळालेला रिस्पॉन्स, आणि नव्या बदलांचे" प्लस आऊटपूट"पाहून नव्या बॉसचे कौतुक झाले. स्वतःभवती गिरक्या घेणाऱ्या खुर्चीत बसून ,सगळ्यांच्या नजरा आणि चेहेरे आठवीत ती स्वतःशी म्हणायची- एक ना एक दिवस , या सगळ्यांना मी इझिली पॉकेटमध्ये टाकीन. पण , आता सहा महिने झाले तरी अजून तिच्या मना प्रमाणे ती इथे स्वतःची पकड बसवू शकली नव्हती " याची खंत तिला अस्वस्थ करीत असायची . त्याचे कारण, या ऑफिसमध्ये आल्यापासूनच तिला जाणवले होते. स्टाफबद्दल कळत गेले, या सगळ्यात- तिला एक खटकली, जी खटकली ती या ऑफिसमधील सर्वात सिनियर स्टाफ होती. बॉस म्हणून तिने केलेल्या चेंजेसला यश मिळवून देण्यात याच सिनियर कांचनमॅडमचा मोठा वाटा आहे", ही लपून न राहणारी गोष्ट नव्या बॉसच्या पचनी पडत नव्हती. या कांचनमॅडमबद्दल तिखटमीठ लावून सांगणारा म्हणाला होता- बॉस, ही आपणहून कधी तुमच्याकडे येणार नाही की फिरकणार नाही . तिच्या अनुभवाच्या जोरावर ती सिस्टीम, प्रोसिजर अशा सगळ्या गोष्टी "कम्प्युटर क्लिक "स्पीडने सांगू शकते ",सगळं ऑफिस कोळून प्याली आहे ती. कैक बॉस, उन्हाळे-पावसाळे पहावेत तसे पाहिलेले आहेत हिने "। न्यूकमर बॉसला भारी पडणारी आहे ही". सगळा स्टाफ हिचा खुप रिस्पेक्ट करतो, ती देखील सगळ्यांशी छान वागते हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे बघा. बॉस- बच के रेहना इससे.!" नव्या बॉसला तिच्या नव्या चमच्याने अलर्ट माहिती तत्परतेने केबिनमध्ये येऊन सांगितली होती. याचा परिणाम एकच झाला - नव्या बॉसने तिला न आवडलेल्या या सिनियरलेडी कांचन मॅडमला दूरच ठेवले. या कांचनमॅडम वागण्यात चोख, कामात त्यापेक्षाही अधिक चोख होत्या. त्यांच्याशी पंगा घेणे सोपे नाहीये " ! बॉसला तिच्या इनर-माईंडने सूचक इशारा दिला होता, आणि तो ऐकणे "आपल्याच हिताचे आहे ", हे तिने मान्य केले होते. बॉसने केबिनमध्ये बोलावले तर कांचन मॅडम क्षणात समोर उभ्या असत आणि काम झाले की क्षणात बाहेर पडत. ईतर विषयावर , त्यातल्या त्यात ऑफिस गॉसिपिंग " हे विषय कांचनमॅडमला वर्ज्य होते. एकदा बॉस म्हणालीच- कामा व्यतिरिक्तही तुम्ही माझ्याशी बोलायला हरकत नाही. कांचनमॅडम ,तुम्ही सिनियर आहात, तुमच्या कडून मला ऑफिसमधले अपडेट्स मिळत राहिले तर या पुढे मी माझे काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकेन. स्टाफ रिलेटेड " काही सांगत चला तुम्ही, कोण कसा आहे, काय बोलतो, काय सांगतो", येऊ द्या तुमच्या मार्फत माझ्या पर्यंत ! तुमच्या मदतीचा खूप उपयोग होईल मला. कांचनमॅडमला याचा अंदाजआधीपासूनच आलेला असावा- त्या म्हणाल्या- बॉस, गॉसिप आधारित कोणतीही माहिती, चर्चा, याबद्दल आधीही मी कुणा बॉसला काही शेअरिंग केलेले नाही, आणि आता तुमचीही निराशा करणार, याबद्दल सो सॉरी ! एक सूचना नक्की करीन - "बॉस म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीने स्वतः सगळे जाणवून घ्यावे, किती खरे, किती खोटे पारखून घ्यावे " , कुणाच्या ऐकीव माहितीवरून कुणाबद्दल कधी अनुकूल-प्रतिकूल मत बनवू नये " ! माझ्याबद्दल तुमच्या कानावर आलेले आहेच,त्यावर विश्वास न ठेवता माझ्या कामावर विश्वास ठेवा ! दुसऱ्या क्षणी कांचनमॅडम बाहेर येऊन कामात गढून गेल्या. त्यानंतर बॉसने या सिनियर मॅडम विषयी मनात अढी ठेवीत " तिला नकोशीच्या यादीत टाकून दिले. आताशा केबिनच्या बाहेर उभी रहात बॉस तिच्याकडे काहीच न बोलता पहात रहाते- कांचनमॅडम मात्र त्यांच्या नजरेतून बॉसला शांतपणे म्हणत असतात- बॉस - येऊन काही दिवसच झालेत, आणि तू मला ठरवून दुर्लक्षित करते आहेस . इतकं किरकोळीत नको काढू मला.! तू हुशार, स्मार्ट, बुद्धिमान बॉस नक्कीच आहेस, पण, तितकीच नवखी नि अनुनभवी आहेस. हीच तुझी मोठी मर्यादा आहे, याची जाणीव असू दे. तू आज बॉस आहेस, उद्या नसशील , मी इथेच आहे, इथेच असणार आहे. "अनुभवाचा सन्मान केल्याशिवाय तुझे बस्तान इथेच काय, कुठेच बसणे कठीण आहे. न बोलता खूप सांगणाऱ्या या नजरेचा सामना करणे अशक्य झाले आणि बॉसने आत जात केबिनच्या दरवाजा खाडकन बंद करून घेतला . -------------------------------- लघुकथा- बस्तान ले- अरुण वि.देशपांडे-पुणे 9850177342 ---------------------------------

Sunday, June 14, 2020

लेख -व्यक्ती आणि साहित्यिक -अरुण वि.देशपांडे . परिचय ले- आदित्य अ.जाधव

#शब्दसृष्टी_समीक्षा_व_रसग्रहण
#आदित्य_अ_जाधव
#व्यक्ती_परिचय
#लेखक-कवी-बालसाहित्यिक-समीक्षक
#अरुण_वि_देशपांडे
********

आज आपणा सर्वांस  ज्यांनी इतरांसोबत मला ही मार्गदर्शन केलं, ज्यांनी मला लिहायला शिकवलं. साहित्य प्रकारची अतिशय चांगल्या पद्धतीने ओळख करून देऊन, मला समृद्ध केलं. लेखनशैली उत्तम होण्यासाठी वेळात वेळ काढून कायम तत्परता दर्शवली.
असे जेष्ठ साहित्यिक श्री.अरुण वि.देशपांडे यांच्या बद्दल आणि त्यांच्या दीर्घ लेखन-प्रवासाबद्दलचा हा परिचय लेख.
मूळ परभणीचे असलेले देशपांडेकाका सेवानिवृत्ती नंतर  २००६ पासून आता पुणेकर झाले आहेत, बावधन -पुणे येथे ते वास्तव्यास आहेत.

त्यांचा लेखक परिचय करुन देताना सांगावं वाटतं कि, त्यांचा साहित्यप्रवास हा १९८३-१९८४ पासून सुरु झाला.
आणि आजही तितक्याच उत्स्फूर्ततेने, त्यांचे लेखन सातत्याने चालू आहे. तब्बल 37 वर्षापासून चालू असलेले लेखन, , . असे हे एक प्रेरणादायी लेखक, कवी व्यक्तिमत्व. नवोदितांना कायम मार्गदर्शन करणारे.

नवोदित लेखक वा कवी यांच्या साहित्याला एक मूर्त स्वरूप देऊन, त्यांचं काही साहित्य पुस्तक स्वरूपात आणून ती जनमाणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी अतिशय उत्तमरित्या बजावली आहे. आणि ते बजावत राहतील यात शंकाच नाही. 

आजपावेतो साहित्य सेवा करत असताना त्यांनी कथा, कविता, कादंबरी, चरित्र, अनुवाद अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारात लिखाण करून, एकूण चौपन्न  पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे हे साहित्य प्रिंटपुस्तकं स्वरूपात आणि  ई- बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. 

त्यांनी बालसाहित्यामध्ये 'समीक्षा लेखन' देखील केलं आहे. त्यांच्या या लेखनाविषयी थोडे सविस्तर सांगतो जे महत्वाचे वाटावे असेच आहे.
त्यांच्या समीक्षा ग्रंथाचे -शिर्षक आहे-
" बालसाहित्य मराठवाड्याचे : नवे स्वरूप-नव्या वाटा".
 या ग्रंथास महाराष्ट्र राज्य शासनाचा २००८-२००९ चा 'दि.के.बेडेकर स्मृती-बाल साहित्य समीक्षा ' पुरस्कार देखील प्राप्त आहे जो केवळ बालसाहित्य समीक्षासाठीच दिला जातो.
 १३७ पुस्तकांचा परिचय या संदर्भ ग्रंथात केला आहे. ज्यामध्ये २८ कादंबऱ्या, ३५ बालकथासंग्रह, ४८ बालगीतसंग्रह, १७ बालनाट्य-एकांकिका आणि ९ विज्ञान व ललितविषयक लेखन अशा वेगवेगळ्या तब्बल १३७ पुस्तकांचा परिचय करुन दिला आहे. 
बालसाहित्य अभयसकांसाठी एक उत्तम मार्गदर्शक व संदर्भ ग्रंथ म्हणून याची उपयुक्तता ठरली आहे यात शंकाच नाही. 
अरुण वि.देशपांडे यांचे कथा, कविता, कादंबरी,विनोदी लेखन, ललित लेखन व अध्यात्मिक लेखन
आणि 
बालकथा, बालकवितां, ललित, बालकादंबरी
असे सर्व प्रकारचे लेखन प्रिंट मीडियातून तर होतच असते, त्यांच्याबद्दल विशेष कौतुकाने
सांगेन की-
२०११ पासून त्यांनी इंटरनेटवर लेखन करण्यास सुरुवात केली, आणि त्यांच्या लेखनाची हे दुसरे पर्व अधिक जोमाने सुरू आहे.
ई-पेपर, ई-मासिके, ई-दिवाळी अंकातून त्यांचे साहित्य सतत प्रकाशित होत असते.
फेसबुकवरील नामवंत साहित्यिक समूहात त्यांचा लक्षणीय सहभाग असतो.
ई-साहित्य साठी सध्या आघाडीवर असलेल्या
प्रतिलिपी मराठी, स्टोरी मिरर, मातृभारती मराठी, इन्स्टाग्राम, yourquote .in
या वेबसाईटवर ते निमंत्रित साहित्यिक म्हणून लेखन करीत आहेत.

स्वतःचे लेखन तर ते करतात .त्यात काही विशेष नाही,
विशेष हे आहे की- ते सोबतच्या साहित्यिक मित्रांच्या साहित्या बद्दल मोठ्या आस्थेने लिहीत असतात, 
पुस्तक परिचय-समीक्षण "हा त्यांच्या आवडीचा लेखन प्रकार आहे,  त्यासाठी अक्षरमित्र" हा त्यांचा
पुस्तक-परिचय करून देणारा ब्लॉग आहे.

फेसबुक वरील अनेक कवी-,कवयित्री, लेखक
यांच्या साहित्यकृतींना देशपांडे काकांनी लिहिलेली प्रस्तावना लाभलेली आहे,
मित्रांनो-
 माझ्या आरंभ' या पहिल्या कवितासंग्रहाची 
प्रस्तावना" , अरुण देशपांडे काकांनीच लिहिली आहे.
त्यांच्या सर्वच साहित्यकृतींचे उल्लेख करता येणे शक्य नाही, पण अलीकडच्या वर्षात त्यांचे विपुल असे ई-बुक्स प्रकाशित झालेत त्याबद्दल
सांगतो-
लेखक -कवी-बाल साहित्यिक-समीक्षक-  अरुण वि. देशपांडे यांचे प्रकाशित साहित्य -

--------------------------------------------------
मोठ्यासाठी-     
---------------------------------------- 
१. प्रिंट बुक्स -  १७ 

२. ई-बुक्स -       ९
-------------------------------------
बुक्स -            २६
-----------------------------
बाल मित्रांसाठी -
 -------------------------              
१.प्रिंट -बुक्स = २१ ,                 
२.  ई-बुक्स =     ७ 
---------------------------------------------------बुक्स-              २८
-----------------------------------------------
एकूण बुक्स -प्रिंट बुक्स - ३८
                   ई-बुक्स-    १६
--------------------------------------------
एकूण पुस्तके -               ५४
----------------------------------------------
यातील  - ई बुक स्वरूपातले साहित्य
एक माहिती- 
एकूण ई-बुक्स -१६
----------------------------------
मोठ्यांसाठीची ई बुक्स- ११
बालमित्रांसाठी ई बुक्स - ०९
---------------------------------------
- ई- कथा संग्रह - २.
----------------------------------------------
१. शो पीस , २. झुळूक 
-------------------------------------------------------------------------------
प्रकाशित झालेले
. ई-बुक- कविता -संग्रह - ९
--------------------------------------------------
१.मनभावन- ई- कविता संग्रह,  २०१४
२.स्नेहबंध - ई- चारोळी संग्रह-   २०१५,
३.सहेलीच्या कविता - ई- संग्रह-  २०१६,
४.मानस पूजा - ई- भक्ती कविता  २०१६
५.माझ्या कविता ई-कवितासंग्रह  २०१८
६. हळवी फुंकर
७. ए सुंदर अस्मानी परी (२०१९)
८. नवदुर्गा दर्शन-नवरात्र कविता- २०१९
९.घनमेघ - कविता संग्रह -२०१९
-------------------------------------------------
...२....
 प्रकाशित बाल-साहित्य- ई- बुक्स - ७.
------------------------------------------------
ई-बाल कथा संग्रह - २.
-------------------------------
१. समजुतीच्या गोष्टी ,
 २. निधीची गोष्ट 
--------------------------------------------------
प्रकाशित-
ई-बाल-कविता संग्रह - ५ 
------------------------------------
१.पियुचे स्वप्न - ई- कविता संग्रह- २०१३,
२..टिनु- मिनुच्या कविता- ई-कविता संग्रह- २०१४
३. गोड गोड चिकोबा  -ई-बाल कविता - २०१६ 
४. गाेड गाेड गाणी - कविता ई- कविता संग्रह-२०१६
५.. पिकनिक - ई- बाल कविता - २०१८ 
--------------------------------------------------

असे हे अरुण काका आपल्या पेजसाठी नियमित लेखन सहभाग करणार आहे.

त्यांच्या लेखनास शुभेच्छा देतो.

मित्रांनो तुम्ही त्यांना जरूर बोला

 त्यासाठी संपर्क-

अरुण वि.देशपांडे- पुणे.
संपर्क- मो- ९८५०१७७३४२
emel - arunvdeshpande@gmail.com

------------

परिचय-लेखक-

@आदित्य अ. जाधव,उमरगा;
०९४०४४००००४;
दि-१४-०९-२०१८,पुणे;
वेळ-०२:११मि,दु;
(शब्दसृष्टी समीक्षा व रसग्रहण)

Friday, April 24, 2020

लेखक -कवी-बाल साहित्यिक-समीक्षक- अरुण वि. देशपांडे यांचे प्रकाशित साहित्य - माहिती

रसिक वाचक मित्रहो -
लेखक -कवी-बाल साहित्यिक-समीक्षक-  अरुण वि. देशपांडे यांचे प्रकाशित साहित्य -
 एकूण - ५४ पुस्तके प्रकशित
--------------------------------------------------
मोठ्यासाठी-   
----------------------------------------
१. प्रिंट बुक्स -  १७ 
२. ई-बुक्स -       ९
-------------------------------------
बुक्स -            २६
-----------------------------
बाल मित्रांसाठी -
 -------------------------             
१.प्रिंट -बुक्स = २१ ,               
२.  ई-बुक्स =     ७
---------------------------------------------------बुक्स-              २८
-----------------------------------------------
एकूण बुक्स -प्रिंट बुक्स - ३८
                   ई-बुक्स-    १६
-----------------------------------------------
यात- मोठ्यांसाठी --
प्रिंट -पुस्तके -१७
----------------------------------------------------------
१.कथा-संग्रह   - ७.
----------------------------------
 १. कुरूप रंग , २.रंग तरंग , ३, अनुपमा ,
४. रंग फसवे , ५. रंगपंचीविशी , ६. नवऱ्यांची चाळ- (विनोदी कथा ),
  ७. दिवस बदलतात तेंव्हा ,
ललित लेख संग्रह :  १.
१.  मनाच्या अंगणात
३.नव -साक्षर साठी    - ४ पुस्तके.
४. समीक्षा - २
----------------------------
१. संतकवी दासगणू वांग्मय-दर्शन (आस्वाद- समीक्षा )
२. बाल-साहित्य मराठवाड्याचे - नवे स्वरूप- नव्या वाटा .
(बाल-साहित्याचा २००८-०९ चा बालसाहित्य समीक्षेचा राज्य-पुरस्कार).,
- ई- कथा संग्रह - २.
----------------------------------------------
१. शो पीस , २. झुळूक
-------------------------------------------------------------------------------
प्रकाशित झालेले कविता संग्रह खालील प्रमाणे-  १२
-------------------------------------------------------------
पुस्तक रुपात- कविता संग्रह- ३
------------------------------------------
१.गाणेदिवाणे,-  २००३,
२.मन डाेह -   २०११
३ शरण समर्था जाऊ-  २०१५
--------------------------------------------------
. ई-बुक- कविता -संग्रह - ९
--------------------------------------------------
१.मनभावन- ई- कविता संग्रह,  २०१४
२.स्नेहबंध - ई- चारोळी संग्रह-   २०१५,
३.सहेलीच्या कविता - ई- संग्रह-  २०१६,
४.मानस पूजा - ई- भक्ती कविता  २०१६
५.माझ्या कविता ई-कवितासंग्रह  २०१८
६. हळवी फुंकर
७. ए सुंदर अस्मानी परी (२०१९)
८. नवदुर्गा दर्शन-नवरात्र कविता- २०१९
९.घनमेघ - कविता संग्रह -२०१९
-------------------------------------------------
...२....
 प्रकाशित बाल-साहित्य- पुस्तके - एकूण- २८
प्रिंट बुक्स - २१ , ई- बुक्स - ७.
--------------------------------------------------
१. बाल-कथा - संग्रह - ९
--------------------------------------------------
१.बागुलबुवा , २, स्वाव-लंबन,
३,पप्पू आणि गणु ढोल्या ,
४.सायलीची गोष्ट ,५. बालवीर पप्पू आणि इतर गोष्टी ,६, मोन्या ,
७. गीरीबाबांची गोष्ट. ८, सोहमची  गोष्ट .९. रेणूची गोष्ट.
---------------------------------------------------------------------------
२.बाल- कादंबरी - ४
----------------------------
१. चंदर , २. बंटी ,३. फुलपाखरू ,
४ -पप्पूची पत्र ,
३.व्यक्तिचित्रणे :-    १. पप्पूचा अल्बम .
४.चरित्र : १. संस्कार -मूर्ती - सानेगुरुजी ,

.५  अनुवाद:  १. श्रेष्ठ भारतीय बाल-कथा -(मल्याळी ).
-------------------------------------------------------------------------
६. ई-बाल कथा संग्रह - २.
----------------------------------------------------------------
१. समजुतीच्या गोष्टी ,
 २. निधीची गोष्ट
------------------------------------------------------------------------------------------
प्रकाशित झालेले  बाल-कविता संग्रह खालील प्रमाणे -१०
--------------------------------------------------
प्रकाशित बालकविता संग्रह- ५
------------------------------------------------
१.गोड गाेड चिकोबा-  २००३,
२.माझा तिरंगा प्यारा- २००५,
३.धांगडधिंगा माैजमस्ती- २००९,
४.आली आली परीराणी- २०१४,
५ . मस्त फिरू  रे मस्त फिरू - २०१७
*********
ई-बाल-कविता संग्रह - ५
------------------------------------
१.पियुचे स्वप्न - ई- कविता संग्रह- २०१३,
२..टिनु- मिनुच्या कविता- ई-कविता संग्रह- २०१४
३. गोड गोड चिकोबा  -ई-बाल कविता - २०१६
४. गाेड गाेड गाणी - कविता ई- कविता संग्रह-२०१६
५.. पिकनिक - ई- बाल कविता - २०१८
--------------------------------------------------
अरुण वि.देशपांडे- पुणे.
संपर्क- मो- ९८५०१७७३४२
emel - arunvdeshpande @gmail.com

Wednesday, April 1, 2020

लेख - वाड्यातले दिवस - गहिऱ्या आठवणी ..!

लेख -
वाड्यातले दिवस .
गहिऱ्या  आठवणी  . !
ले- अरुण वि.देशपांडे 
-------------------------------------------------------------------------------------------------
आताचा मी जेष्ठ नागरिक झालो हे सत्य आहेच ,उद्याची सत्तरी खुणावते आहे ,या आधीच्या पिढीतल्या -  सत्तरी "वर्गातल्या 
जेष्ठा इतकी  बेहाल -अवस्था नाहीये.  त्याचे कारण नव्या आणि आधुनिक जीवनशैलीचे राहणे, जे आता अंगात आणि मनात 
भिनले आहे, या फायद्यामुळे शरीर आणि मनाने  यंग-सिनियर्स " हे नवे  गौरव -पीस .मोर-पिसासारखे कौतुकाने मिरवता येते आहे,
अशा अनेकात मी आपण आहे हे नि:संकोचंपणे सांगेन. असो.

तर हे सगळे सांगायचे प्रयोजन आहे -ते म्हणजे ..आताच्या वर्तमानात मी फक्त शरीराने असतो पण ,
मनाने मी कायम ..माझ्या गत-दिनाच्या  वैभवात लोळत असतो ,
, तो काळ ,ते दिवस , ती माणसे ..माझ्या अवती-भवती आहेत असा सतत भास होत असतो ..
चला तर माझ्या सोबत ..आज त्या काळात पुन्हा जाऊन , एक छानशी भ्रमंती करून येऊ ....
अगदी माझ्या लहानपणीच्या दिवसापासून सुरु करू या..

१९५१ ..ऑगस्ट महिन्याची ०८ तारीख ..अस्मादिक या भूतलावर अवतीर्ण झाले , गावाचे नाव ..वसमतनगर ..माझ्या मातोश्रींच्या 
मावशीचे घर , इथेच त्यावेळी मातोश्रींचा मुक्काम होता ..वसमतनगर .. आधीच्या परभणी जिल्ह्यात असलेले ,सध्या हे गाव 
हिंगोली जिल्ह्यातले एक मोठे तालुक्याचे ठिकाण आहे.
त्यावेळच्या वसमत गावात मोठमोठाले वाडे होते , कार्य -प्रसंगाने या वाड्यात जाणे व्हायचे ,जसे मुंज आणि 
लग्न-कार्य . यातली काही नावे अंधुकशी आठवतात - मेथेकरांचा वाडा , आगलावे -वाडा , कुरुंदकर वकिलांचा वाडा , कात्नेश्वारकर -वाडा ,  
 काळ-परत्वे आता सगळेच बदलून गेले असणार .त्यात  आता तिकडे जाणे नसते त्यामुळे अपडेट नाहीयेत.

माझे मामा अंबादासराव लोहरेकार ,यांचा स्वतःचा  भव्य वाडा - लोह्रेकारांचा वाडा म्हणून प्रसिध्द होता . वाडा -संस्कृतीचा  एक लोभस 
गुण-विशेष मला सांगावासा वाटतो की ..भव्य दरवाजे असलेले हे वाडे ,सर्वांसाठी सदा उघडे असायचे .. एवढ्ध्ये मोठे दरवाजे "कधीही कुणी येवो 
मोकळ्या मनाने येणार्याला वाड्यात सामावून घेत असत .हे दरवाजे उघडतांना कधी  कुरकुरले " असे आठवत नाही .

वाड्याचे मालक देखील ..विशाल मनाचे असायचे ,अशी मोठी माणसे आणि त्यांची  मोठी मने " त्यावेळच्या पिढीतील तरुणाईने नक्कीच अनुभवली आहेत.
जो यायचा तो सगळ्या सोबत अलगद मिसळून जाणार .अशी सर्वसमावेशक संस्कार -संकृती ..दयाळू ,कनवाळू मनाच्या त्या त्या -वाडयाच्या मालकांच्या  सोबतच हळू हळू 
अस्तंगत होत गेल्याचे पाहणारे  दुर्दैवी साक्षीदार आहोत , हे वेदना माझ्या सारखी तुमच्या मनात आहे,याची कल्पना आहे मला.

आमच्या लहानपणीच्या आणि पोरसवदा वयाच्या त्या दिवसात ..उन्हाळ्याची सुट्टी ,आणि नातेवाइकाकडे होणारे लग्न-कार्य ,अशी दुहेरी धमाल असायची.
सगळ्याचं मोठ्या माणसांना समोर दिसेल त्या .पोराला , पोरीला ..काम सांगण्याची परवानगी घायची गरज कधी पडली नाही.. 
पोरांचे लाडच करवून घायचे असे नसे, 
प्रसंगी "एखादे आजोबा अगर आज्जी ..थोतरीत ठेवून द्यायचे ", अशा रागाव्ण्याने कधी कुणाच्या भावना दुखावल्याचे पाहिल्याचे आठवत नाही.

डिग्री -होल्डर होईपर्यंत .म्हणजे १९७२ पर्यंत .वसमतच्या या वाड्यात माझे सुट्टीचे दिवस एखाद्या रम्य स्वप्न-दिवसासारखे गेलेले आहेत .
आम्ही पोर-पोरी मिळून २०-२५ जण नक्कीच जमत असुत , सिनेमे पाहणे , पत्ते खेळणे रात्री गच्चीवर सतरंज्या टाकून ,आकाशातील चांदण्या मोजीत 
गाण्याच्या भेंड्या खेळणे असे चालत असे.

यात एक मोठा आणि महत्वाचा कार्यक्रम असायचा ते पाणी भरणे हा ",त्यासाठी थोड्या अंतरावर असलेल्या विहिरीवर जाऊन ,याला आड " पण म्हणायचे .
आडवार जाऊन उभे राहून , हातातल्या पोह्र्याने शेंदून घागरी भरणे  ,हे साधे सुधे काम नाहीये. "पाणी भरणे " म्हणजे काय ? आडावर ज्यांनी पाणी भरले आहे 
त्यांनीच हे सागावे 
 हे आड किंवा विहीर वड्या पासून जवळ नसायचे ..आडावर ..उभे राहून पोहरयाने शेंदून घागर भरून देणारे वेगळे ,आणि
आणि विहीर ते वाड्यात .असे रस्त्यात उभे रहात ,हातातल्या भरल्या घागरी या हातातून -त्या हातात  देत जायचे .आणि तीन-तीन तास ..पाण्याचे हौद, टाक्या भरणे 
असे हे काम हसत -खेळत पार पडायचे . आजच्या भाषेतले  "टीम -वर्क ? आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीच आनंदाने करीत होतो. 

या जमा झालेलेल्या  गोतावळ्यात कोण जवळचे आणि कोण लांबचे ? असे संकुचित विचार कुणाच्या मनात आलेनाहीत , हे सगळे आपलेच आहेत."
असे वाटायचे . आता विचार करतांना एक गोष्ट जाणवते की - नक्कीच 
ही जादू बहुदा ..त्यावेळच्या कर्त्या -स्त्रीच्या मनातली आणि बोटातली असावी.. 

स्वयपाक घरात राबणारे हात अनेक असायचे ..पण या सगळ्यांच्या मनात एकच भावना  असायची . खाणाऱ्याला आनंद झाला पाहिजे.
जेवणात जास्त करून भाकरीच असायची ,तिच्या सोबत ,फोडणीचे खमंग  वरण ,  कांद्याची भरडा भाजी - भाकरी , लोणचे, तक्कू , तेल-चटणी - असे खमंग कालवण 
आलटून पालटून असायचे . शिळ्या भाकरीचा कुस्करा -लोणचे घालून ..दिला जाई ज्याला "पैजणपाल ", म्हणयचे तर शिळ्या पोळीचा खमंग कुस्करा ,तर कधी 
"गुळतूप "घालून केलेला शिळ्या पोळीचा  लाडू दुर्मिळ असला तरी ..अचानकपणे बशीत दिला जात असे.  
तेल-तिखट -मेतकुट -लावून मुरमुरे .असा कच्चा चिवडा ..समोर आला कि बघता बघता फस्त.
आंबे आले की मग या दिवसात ..रस -पोळी .., भज्जी , कुरडई ,असे रसाळ भोजन .
दिल खुश  होण्यास अजून काय हवे असते हो ?

माझे बाल-पण असे अनेक वाड्यात गेलेले आहे .. मानवत , हे गाव परभणी जिल्ह्यातले एक मोठे व्यापरी -गाव म्हणून ओळखले जाते . स्टेट बँक ऑफ हैद्राब्दच्या
मानवत शाखेत  हेड- काशियार म्हणून माझ्या वडिलांनी १९५० ते १९६० असे दहा वर्ष काम केले . व्ही..एच .देशपांडे .या नवा पेक्षा ..बँकेतले "बाप्पा देशपांडे "
याच नावाने त्यांची लाईफ-टाईम सोबत केली.

मानवतच्या वास्तव्यात ली पहिली पाच-सात वर्षे मला आठवत नाहीत .. वयाच्या आठव्या वर्षापासूनच्या त्या आठवणी अजून ही केल्या जातात म्हणून 
त्या बर्यापैकी ताज्या आहेत..
मानवतच्या या वाड्याचे मालक .काटकर नावाचा परिवार होता ..आणि या वाड्यात त्यांचे "बालाजी मंदिर होते " खूप मोठ्या प्रशाष्ट वाड्यात अनेक सख्हे -
शेजारी राहायचे . मानवत शहरात .बालाजी -भक्त खूप असावेत ..सकाळ-संध्याकाळ दर्शनाल लोक सतत येत असत . शुक्रवारी खूप गर्दी असे मंदिरात ,
आम्ही पोरं मंदिरात घुटमळत असायचो ..कारण ..शुक्रवारी बालाजीचे भक्त -लोक पेढ्याचा परसाद वाटीत असायचे , हा पेढा ..नामक गोड दोस्त तेव्हापासून 
माझा अगदी लाडका फ्रेंड आहे . येका डब्यात परसादाचे पेढे जमवून ठेवत ..असे. 
आमच्या घराला माडी होती.. वाड्याच्या  मोठ्या दरवाज्याच्या बरोबरवरच  ही खिडकी होती,तसा न तास बाहेर पाहण्यात वेळ जायचा.
 आईचे महिला मंडळ घरी आले की ,त्या खाली .आणि मी माडीवरच्या खिडकीत बसून राहायचो .किती बोलावले तरी बायकात जाऊन 
बसायचे नाही "असे ठरवलेले असे .., खिडकीत अशावेळी माझ्या सोबत माझा लाडका गोड दोस्त..पेढा , असायचा . वेळ असाच जाई.

शेजार -धर्म , कठीण-प्रसंगी आधार , पैश्यांची मदत , लग्न-कार्य प्रसंगी तन-मन-धन अशा स्वरूपातला सहभाग " हे शब्द ..
वास्तवात वावरतांना दैस्त होते ,
आता पुस्तकातून या सगळ्यांची भेट होण्याचे दिवस आले आहेत.

माझे आजोळ ..मामच्या वकिली व्यवसायामुळे  जिंतूर , पण आज्जी राहायची ते गाव जिंतूर जवळचे ..वसा हे छोटेसे गाव. .
माझे मोठे मामा ..पांडुरंगराव वसेकर ..जिंतूर या गावच्या सार्वजनिक जीवनातले एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते .सत्तर -ऐंशीच्या  दशकात ते सतत 
बारा वर्षे  जिंतूर पालिकेचे अध्यक्ष होते.
पांडुरंगराव वसेकर - बालाजी मंदिरासमोरचा वसेकर वकिलांचा वाडा -जिंतूर ..पोस्टकार्डवरचा पत्ता मला आज ही पाठ आहे.

१९७८ -१९८० ही दोन वर्षे  मी स्टेट बँक हैदराबादच्या जिंतूर शाखेत काम केले . आजोळी -मामाच्या घरीच राहावे अशी मामांची खूप इच्छा होती.
पण नोकरी मुले, येणारे जाणरे , पाह्व्ने -रावले .आले तर " मग मोठ्या ईच्छेने मामच्या परवानगीने समोरच्या गल्लीत असलेल्या ..
यशवंतराव देशपांडे -वकील वाड्यात २ बर्षे राहिलो . मोठ्या दर्वाजात्याच्या पायर्या चढून वाड्याच्या आत आले की .. खाली तीन आणि वर तीन .
असे तीन- तीन खोल्यांचे ब्लॉक होते .. हे सर्व भाडेकरू ..बदली होणार्या नोकरीचे असतील तरच ,या वाड्यातले भाडेकरू होऊ शकायचे.

मी  दुहेरी लाभार्थी ..बदली होणारा ,त्यात ..वसेकर वकिलांचा भाचा ..आणि वाडा -मालक वकीलसाहेब .हे पण नात्याने मामाच होते ",गावातील सगळेच 
मान्यवर .मग मोठे व्यापारी , डॉक्टर , मामांचे इतर सहकारी वकील ,आणि त्यांचे परिवार सुधा ..वसेकर वकील - साहेबांच्या बहिणाबाईचे  भाऊ हे नाते 
मनापासून मानायचे . तळणीकर , चारठाणकर , बामानिकर , जिन्तुरकर या परिवारांचे मोठ मोठे वाडे .आणि या सगळ्या परिवाराचा पाहुणचार 
आजोळची घरे म्हणून मी लहानपणी घेतला , नोकरीच्या निमित्ताने होतो  तेव्हा पुहा घेतला 
जिंतूर देखील .मोठमोठ्या वाड्याचे  गाव ..कोमटी समाज .व्यापार करणारा .त्यांना "सावकार "म्हणायचे- 
कोकडवार , वत्तमवार , चीद्रवार अशा अनेक सावकारांचे मोठे मोठे वाडे जिंतूरचे वैभव आहे.
 . नेमगिरी " हे जैन -धर्मियांचे महताव्चे स्थान जिंतूरच्या अगदी जवळ आहे..

वाडे आणि वाडे अशी ज्याची ओळख आहे अशा गंगाखेड गावात ..मी १९८२ ते १९८५ .अशी तीन वर्ष होतो . संत जनाबाईचे हे गाव गोदावरीच्या 
काठी असलेले क्षेत्र आहे..इथले .बालाजी देवस्थान अतिशय प्रसिध्द आहे. तिरुपती बालाजी ..गोंविंदा  असा जयघोष ..नवरात्री मध्ये गंगाखेडला 
मी सलग तीन वर्षे केला . इथल्या देवस्थानात ..देवीचे नवरात्र आणि बालाजीचे नवरात्र असे मोठा उत्सव योग असतो.

गंगेकाठी ..अरुंद गल्ल्या .आणि मोठ्ठाले वाडे .असे दृश्य दिसते.. गोदा घाट, नदी प्रवाह ..संध्याकळी दिसणारे गंगाखेड खरोखर गंगाकाठचे 
तीर्थ -क्षेत्र वाटते. मी ज्या वकील कोलोनीत राहायचो ..त्याला .बंगला म्हण्यान्या पेक्षा .किशनराव चौधरी वकिलांचा वाडा म्हणत असतो.
एका गल्लीत प्रवेशद्वार , तर , परसदार ..मागच्या दुसर्या गल्लीत .असा हा वाडा ..याच्या  मी आजन्म ऋणाईत आहे.
संत जनाबाईच्या क्षेत्र -गंगाखेडला तर १९८४ मध्ये माझ्या लेखन प्रव्सास सुरुवात झाली 
मालक किशनराव चौधरी अतिशय यशस्वी वकील , रसिक मनाचे वकील साहेब उत्तम साहित्यिक - लेखक होते...ते पण मोठ्या आस्थेने 
आमच्या नव्या साहित्यिकात येऊन बसत ...त्यांच्या वाड्यात त्यांच्या सहवासात सलग दोन -अडीच वर्षे ..मी कथा लेखन केलेलं 
ही आठवण ..कधीच न विसरण्यासाठी आहे.

मित्र हो - वाड्या -त राहिलो ते दिवस .या दिवसात मी -कायम 
शेजार -धर्म , कठीण-प्रसंगी आधार , पैश्यांची मदत , लग्न-कार्य प्रसंगी तन-मन-धन अशा स्वरूपातला सहभाग " हे शब्द ..
वास्तवात वावरतांना पाहिलेले आहेत ,अनुभवलेले आहेत 
आज मात्र  पुस्तकातून या सगळ्यांची भेट होण्याचे दिवस आले आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख-
वाड्यातले दिवस -
गहिऱ्या किती या आठवणी !
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------

Monday, December 9, 2019

कविता -सांगावा सखीचा

कविता - सांगावा सखीचा
-----------------------------------
सांगावा सखे मिळाला
जीव भेटीस आतुरला
वाटे कधी पाहीन तुला
निघालो बघ भेटायला
तू गेलीस तिकडे अन
जीव व्याकुळला इकडे
जो भेटे तो मज विचारे
असे काय झालं रे तुला
दिवस जाई कसा बसा
रात्र एकटी मोठी वाटे
भकास आकाशात या
चंद्र एक अकेला वाटे
आसुसला जीव तुझा
जाणीव मजला आहे
निघालो तुज भेटाया
अधीरता मनी ग दाटे
--------------------------------------
कविता- सांगावा सखीचा
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
--------------------------------------
(प्रकाशित-दै.संचार-सोलापूर)

कविता - कोजागिरी

कोजागिरी
--------------------------
पौर्णिमा अश्विनी
चांदण्या गगनी
चमचमती रात्री
कोजागिरीच्या
मैफिली साजऱ्या
स्वरांत गुंफल्या
मस्त चांदण्यात
कोजागिरीच्या
हळुवार वारे
उल्हासित सारे
चांदण्यात या
कोजागिरीच्या
आकाशी निरभ्र
रात्र रुपेरी असे
पूर्णचंद्र भरात
कोजागिरीचा
---------------------------------
कोजागिरी
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
------------- ------------------

कविता -गाठी भेटी

कविता -गाठी- भेटी ….
--------------------------------------
शब्दरूपात भेटता कुणी
आनंद मनापासूनचा होतो
होत नाहीत भेटी समक्ष फार
असा तर आनंद घेता येतो …
वाढवला आपणच खरे तर
व्याप सारा हा भोवताली
भेटत नाही कुणी आता कसे ?
जीवा कासावीस वरखाली .
वाढली केव्हा कधी कुंपणे
स्व-" ची स्वतःच्या भोवताली
नाही लक्ष दिले याकडे आधी
आता का होतोय जीव वरखाली ?
वेळ आहे हाती अजुनी खूप
खुप काही छान करता येते
हात मैत्रीचा करू या पुन्हा पुढे
छान मैत्री नक्कीच करता येते …
----------------------------------------------
कविता - गाठी- भेटी ….
-अरुण वि. देशपांडे - पुणे .
--------------------------------------------

चारोळी - एकरूप

एकरूप
-----------------------------
राधा झालीसे एकरूप
दिसे डोळा कृष्णरूप
तशीच बासुरी नि सूर
आकारे नादब्रह्मरूप
-----------------------------
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
---------------------------------

कविता - माझे आजोळ

माझे आजोळ
---------------------
माझे आजोळ
माणसे इथली
त्यांचा एकोपा
मायेचा हा खोपा
आजोळी खरा
अखंड आहे
आजी-आबांच्या
मायेचा झरा
सुट्टीचे दिवस
आजोळी जाणे
मौज मजेचे ते
मस्त दिवस
अजुनी वाटे
व्हावे छोटे
जावे पुन्हा
माझ्या आजोळी
------------------------------------
कविता- माझे आजोळ
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
-------------------------------------

कविता - सद्गुरुंचा धावा ||

कविता - सद्गुरूंचा धावा …
------------------------------------
करुणा मनात साठली
चिंता मनात ही दाटली
सावरण्या आता आम्हाला
सद्गुरू धावा हो धावा …
आर्थिक मोहजालात या
मन खोल खोल रुतले
काढा यास बाहेर तुम्ही
सद्गुरू धावा हो धावा …
तुझे माझे ,माझे ना कुणाचे
भांडण हे ऐहिक सुखांचे
गुंता अवघा सोडवण्यास
सद्गुरू धावा हो धावा …
---------------------------------------
कविता - सद्गुरूंचा धावा …
-अरुण वि.देशपांडे - पुणे.

कविता - दिव्य अमृतवाणी - गुरुवाणी ||

दिव्य अमृतवाणी - गुरुवाणी ।।
---------------------------------------------
केली विनवणी । श्री गुरुचरणी ।
दिव्य गुरुवाणी । कानी पडो ।।
उपदेश बोल । आत गेले खोल ।
मन गोल गोल । स्थिरावले। ।।
कान उघाडणी । करी गुरुवाणी ।
ही अमृतवाणी । खरोखरी ।।
घडता दर्शन । हे अंतर मन ।
किती विलक्षण । बदलले ।।
--------------------------------------------------
दिव्य अमृतवाणी -गुरुवाणी ।।
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
-------------------------------------

कविता - दत्त गुरु हो श्रीदत्तगुरू

दत्तगुरु हो श्रीदत्तगुरु
----------------------------
दत्तगुरू हो श्रीदत्तगुरू
नित्य नेमे हे नाम स्मरू ।।
हे करू की ते पण करू
ऐनवेळी काहीच न करू
मनास्थिती अशी नका करू
मनशक्ती द्या तुम्हीच गुरू
दत्तगुरु हो श्रीदत्तगुरु ।।
दत्तगुरु हो श्रीदत्तगुरू
सद्गुरू स्वरूप नित्य स्मरू
स्वामी समर्थरुप दर्शन
दर्शन आम्ही नित्य करू ।।
दत्तगुरू हो श्रीदत्तगुरू
नित्य नेमे तुम्हास स्मरू
दत्तगुरु हो श्रीदत्तगुरु ।।
----------------------------------------
दत्तगुरु हो श्रीदत्तगुरु
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
-----------------------------------------

कविता - एकाकी -एकटे

कविता -एकाकी- एकटे
--------------------------------------
एकाकी -एकटे असे कधी
माणसाने कधीच पडू नये
जोडत राहावीत माणसे सदा
आहेत त्या माणसांना सोडू नये
दिलेत ना शब्द बोलण्यासाठी
मनात कोंडून त्यांना ठेवू नये
क्षण क्षण जगण्यातला,जगावा
जगणे व्यर्थ गेले, असे वाटू नये
खितपत पडलेत भवताली एकटे
स्वतःला एकाकी एकटे समजू नये
आहोत नशीबवान खरेच आपण
करावी सोबत, आनंद घालवू नये
-------------------------------------------
कविता- एकाकी- एकटे
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
--------------------------------------------

Monday, May 20, 2019

फुलांच्या चारोळ्या


फुलांच्या चारोळ्या
---------------------------
१.
गुलाब
----------
रूप रंग छटा ,या किती तरी
लाल, पिवळा, काळा ,केशरी,
पांढरा ,गुलाबी, सारेच गुलाब
बागेत साऱ्या यांचाच रुबाब
--------------------------------------
२.
निशिगंध
--------------
नाजूक आकर्षक
मोहक गंधसुगंध
वाटत फिरे सुगंध
मित्र हा निशिगंध ...।
----------------------------
३.
मोगरा
-----------------
पांढराशुभ्र मोगरा
पाहुनी खुलतो चेहेरा
भुरळ घालीतो रसिका
मोगऱ्याचा सुरेख गजरा...!
-------------------------------------
४.
अबोली
---------------
विविध रंगातली
रंगीबिरंगी बोली
नाजूक पाकळी
गोडुली अबोली
---------------------------------
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
---------------------------------

फुलांच्या चारोळ्या-
१.
गुलमोहर
---------------
कडक उन्हात
उभा दिमाखदार
लालकेशरी फुले
गुलमोहर बहारदार ।
----------------------------
२.
चमेली
-------------
नाजूक नाजूक
अलबेली नवेली
सर्वाची लाडली
आहे ही चमेली
----------------------
३.
पारिजात
---------------
नारंगी देठ सफेद फुल
पाहताक्षणी पडते भूल
अंगणात उभा पारिजात
पहाटे टाकतो फुलांचा सडा
-------------------------------
४.
झेंडू
--------
इटुकले पिटुकले लाल झेंडू
पिवळे धम्मक मोठे झेंडू
सणासुदीला मान यांचा
दारी शोभे माळेतले झेंडू
--------------------------------------
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
-------------------------------------





Tuesday, May 7, 2019

लेख- असं जमलं आमचं


अक्षय -तृतीया -आमच्या लग्नाचा ४3 वा वाढदिवस त्यानिमित्ताने.
लेख-
# असं_  जमलं _ आमचं ..!
-ले- अरुण वि.देशपांडे --पुणे.
-----------------------------------------------------------------
मित्रहो - नमस्कार ,
आज अक्षय-तृतीया ",आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
-आज आमच्या लग्नाचा तिथीनुसार वाढदिवस आहे.
आमच जमल्यानंतर ,लग्न लागले त्यादिवशीची तिथी होती  "अक्षय-तृतीया  -"
..आणि तारीख होती ..०२ मे- १९७६ .
आज अक्षय तृतीया तिथी - दि.०७ मे- -२०१९.. या तिथीनुसार आमचा सहजीवन -प्रवास हा आता ४३वर्षांचा होऊन ४४व्या वर्षाचा शुभारंभ होतो आहे.
मित्र हो - १९७२ साली मी कॉमर्स शाखेचा पदवीधारक झालो .आणि मराठवाड्यात स्टेट  बँक ऑफ हैद्राबाद  शाखा - वजिराबाद  नांदेड येथे- दि. २७ फेब्रुवारी -१९७३ ला टायपिस्ट-क्लर्क म्हणून रुजू झालो. माझे वडील  (कै).विठ्ठलराव -व्ही .एच .देशपांडे -जे अख्या बँकेत "बाप्पा  देशपांडे "या नावाने परिचित होते ..ते या काळात परळी-वैजनाथ शाखेचे मनेजर होते, त्यावेळी बँकेतले वातावरण आणि कार्यालयीन  संबंध अगदी नातेवाईक असल्यासारखे  म्हणजे घरच्या सारखे असायचे.सर्वांना एकमेकांच्या पारिवारिक स्थितीची  आणि परीस्थ्तीची कल्पना असे.फार मोठा मानसिक आधार आणि माणसांची सोबत असण्याचा तो काळ होता.
परळीच्या मनेजर साहेबांचा मुलगा लग्नाळू आहे " ही गोष्ट आजूबाजूच्या शाखांमधून बँकेच्या सर्क्युलर सारखी पसरलेली  होती..त्यामुळे , वडिलांचा , "बँकेतील वेळ बँकेच्या कामाच्या इतकाच -कधी कधी थोडा जास्तच  वेळ -मुलासाठी आलेल्या  -प्रपोजल पहाण्यात जाऊ लागला ..आणि त्या भरात त्यांनी स्वतःचेच एक सर्क्युलर -व ऑफिस ऑर्डर काढली ..
त्यात त्यांच्या कडक वागण्याच्या स्टाईल झटका होता- "आमचे चिरंजीव नुकतेच बंकेत लागले आहेत ..हे जरी खरे असले तरी ..
"लग्नाची जबाबदारी ते सांभळू शकतील असे अजून तरी  " त्यांच्या वागण्यातून आम्हास जाणवत नाही ..सबब- त्यांचे उरकून टाकणे " असे घाई करणे आम्हासी अजिबात मंजूर नाही  त्यांच्या  लग्न-कार्य संबंधी .विचार करणे "तूर्तास ३ वर्षतरी संभवत नाही ..! मध्येच काही ठरल्यास आम्ही आपल्याशी संपर्क साधू.
हा खलिता रीतसर साऱ्या " दख्खनी - इलाख्यात वितरित झाला " आणि जिकडे तिकडे सामसूम झाली.
थोडक्यात  आता थेट -१९७६ पर्यंत ,मी "अभय-अरण्यात" राहणार होतो हे निश्चित झाले. वडिलांच्या या आदेशाने मातोश्री सरकार नाराज झाल्या .पण..बोलून दाखवून उपयोग नाही..हा त्यांचा स्वानुभव गाठीशी होता ..त्यात पुन्हा .."आपले कार्टे -बापाच्या वळणावर गेले आहे ",..एकदा नाही म्हणजे -नाही ..हमारा घोडा ऐसा ही चलेगा "..एकूण ..आमची स्वारी  प्रचंड खुश आणि मातोश्री आणि त्यांचे निकटवर्ती नाराज ..असे चित्र स्पष्ट झाले.
मधली ही दोन -तीन वर्ष फारच झकास गेले बघा ..मी कधी एकटा-आहे " असा  भकास भाव मनात कधी नसे.
बँकेत आणि बँके नंतरचा वेळ मस्त पिक्चर पहाणे ,हॉटेल मध्ये मित्रांच्या सोबत बसून चकाट्या पिटणे अशा गोष्टीत जात असे. माझ्या स्वभावातली एक मायनस बाजू सांगितली पाहिजे .
.मी होतो  दिवसात त्या एक
मस्त मनमौजी -फुल-पाखरू .
कधीच  नाही भिर -भिरलो
इकडे तिकडे शोधीत पाखरू ....||
१९७५ मध्ये वडिलांची बदली -उदगीर ला झाली .आणि हेड ऑफिस मध्यला काळजी-वाहू काकांनी माझी बदली
अंबाजोगाई हुन..उदगीर पासून २० कि,मी असलेल्या .बिदर- जिल्ह्यातल्या .कमालनगर या गावी केली आणि सांगितले .जा तिकडे .आणि उदगीरला राहून अपडाऊन कर...झालं...ओबे द ऑर्डर ...
मी निघालो  नव्या गावी..नाव-
कमाल नगर..-कर्नाटक -महाराष्ट्र - राज्य  बोर्डर वरचे पहिले गाव ..बिदर तिथून ५०-६० कि.मी .असावे.
या कमालनगर गावातले लोक -कर्नाटकी लहेजा मध्ये मराठी बोलत असत ..हिंदी मध्ये पण बोलणे असायचे...मला कानडी भाषेचा ओ की ठो...कळत नाही हे समजल्यावर  .ती प्रेमळ आणि साधी माणसे त्यांच्या कानडी टोनच्या मराठी मध्ये बोलत असतं.
दरम्यान .कमाल नगर शाखेत  .".एक उत्तम स्थळ -आहे सध्याला ,चला  पाहून तर घेऊ, जमलं तर जाऊ पुढे . पोरगा पाहायला -. काय होतंय व्हो ..नशिबाच्या गाठी ..काय माहिती ?  काही सांगता येत असत का? 
असे ठरवून   उत्सुकतेपोटी येणार्या मान्यवरांची संख्या दिवसे दिवस वाढू लागली .
सहाजिकच माझे मनेजर साहेब म्हणाले - देखो बाबू..तुम इन सब को..उदगीर का पता दे दो, फिर बडे लोग .सोचेंगे ..तुम इसमे ना पडो...
"लडकी -वडकी -को देखने के टाईम पर तुम सोचना ..तब तक..इधर काम करो..
.
तरी पण कमाल -नगर मधल्या समाजिक-सेवेकरी मंडळीं मला  मोठ्या चिकाटीने  "बिदर-ला घेऊन जायचे आणि त्यामुळे  अखेर " स्थळ-दर्शन घडण्याचा योग आलाच . गम्मत अशी की-
यातून काहीच निष्पन्न होणार नाही हे  उपवर कन्या आणि वरवरचे वधू - संशोधन मोहिमेवर असलेला मी.. अशा दोघांना याचे काहीच गांभीर्य नव्हते. तिने चहा दिला- तो मी घेतला ",फिनिश.....असे हे ओमफस कांदा-पोहे .प्रोग्राम होत होते...
इकडे मुकामी उदगीर निवासस्थानी ..मातोश्री यांचा मनसुबा मात्र दिवेसेदिवस अधिकच मजबूत होत होता ,त्यांचा हा निर्धार दृढ होण्यास ..कारण झाले ..माझ्या वडिलांच्या माविशींचे येणे ..या आज्जीबाई  आल्या ..आणि मातोश्रींनी त्यांना जे सोयीचे शब्द वाटले.त्या शब्दात ..माझ्या पिताश्री बद्दल आणि माझ्या पोरकटपणाबद्दल ..गाऱ्हाणे" मांडले..
इथेच मातोश्रींनी लढाई जिंकली..
एका रविवारी "  दादीजी की अदालत मध्ये - आम्ही बाप-लेक "उभे राहिलो" आणि आज्जी जे म्हणतील त प्रत्येक शब्दावर मान डोलवत राहिलो. परिणामी.. आज्जींनी त्यांच्या चंची तून एक यादी काढून वडिलांच्या हातात देत म्हटले -- विठ्ठल ..ही  आपल्या परभणीकडची चांगली, माझ्या ओळखीची स्थळं आहेत.
याच्यातून पोरगी पहायची..पसंत पडली की ..या पोराचं उरकून टाकायचं ..समजलं ?
वडीलच ज्यांच्या समोर काही बोलू शकले नाही ..त्या थोर आज्जी-माउलीच्या समोर मी अजाण-पामर काय बोलणार..
दरम्यान १९७६ च्या पहिल्या महिन्यापासून अनेक स्थळं येत होती..पत्रिका जुळत नाहीत म्हणून ..मुलगी पाहायला जाणे "हा योग नव्हता.. आणि कमालनगरकर कडच्या कानडी स्थळांच्या गराड्यातून सुटावे याची धडपड व्यर्थ होत होती..त्यामुळे लागोपाठचे रविवार वाया गेल्या मुळे .आलेला सगळा राग .मी मातोश्री जवळ व्यक्त करीत असे.
.१९७६ -चा मार्च महिना - शनिवारी कमाल-नगर हून मी आलेलो ,आणि मातोश्री म्हणाल्या.. जरा अज्जीशी बोल ..
चहाचा कप हातात .मी आज्जे समोर .
.हे बघ.. उद्या तुला हिंगोलीला जाऊन याचे आहे ..,
आजी पण डायरेक्ट हुकुम..जाऊन येतोस का वगेरे काही नाही..असो.
हिंगोलीचे बसोले घराणे..मोठा परिवार आहे, माणसं माझ्या नात्यातील आहे.. आणि मुलगी आपल्या घराला शोभणारी आहे. आता तू असे कर ..
तू परभणीला जा .वेणूबाई -कडे (माझी आत्या )- तिथे यशवंतला -आणि कांताला सोबत म्हणून घे .आणि हिंगोलीला जाऊन मुलगी पाहून या. बाकीचं आम्ही बघू..-समजला ना ?
आज्जींनी सांगितल्या प्रमाणे -हिंगोलीला अर्जंट कॉल लावला गेला ..रविवार -७ मार्च १९७६ .मुलगी पहाणे "हा कार्यक्रम ठरवला गेला ,या सगळ्या कार्यक्रमाला माझी संमती आहे का ".? . असा प्रश्न माझ्या पालकांना पडण्याचा तो काळ नव्हता हो....
रविवारी सकाळी ६ वाजताच्या उदगीर-जिंतूर बसने मी निघालो..राणी-सावरगाव .हे गाव त्या .रस्त्यातला मोठा स्टोप..
११ वाजता चहासाठी बस थांबली .आणि निघायच्या वेळी पंचर ---झाल्याचे लक्षात आल्यामुळे .तिथेच थांबली..
.४० वर्षापूर्वी..मधल्या आड-मार्गावरून जाणर्या गाड्यांची आणि प्रवाशांची हालत अशावेळी कशी होत असे आता इथे सांगणे शक्य नाही.. असो किमान २ तास इथेच..जाणार हे निश्चित झाले.
राणी-सावरगाव हे गाव   "  माहूरच्या देवीचे एक स्थान -आहे" .इथे देवी दर्शन योग उत्तम असतो. असे सगळ्यांनी सांगितले .इतर पासिंजर सोबत मी पणआमच्या कुल- देवीचे दर्शन घेतले ..
आई- अंबाबाई - "आज संध्याकाळी सुद्धा "देवी-दर्शन योग आहे", कृपा करावी ,अशी आटोपशीर प्राथना आणि साकडे घाऊन झाले.
बहाराल , डायवर साहेबंनी परभणीला गाडी याव्स्थित नेली हे बेस्ट झाले.
आत्याबाईकडे माझ्या येण्याची वाट पहात होते.. वेळेचा पार बोजवारा उडाला होता.आता हिंगोलीला जाऊन पुन्हा परभणीला  रात्री पोंचणे गरजेचे..सोमवारी ज्याचे त्याला ऑफिस होते..आणि त्यावेळी बस खूप कमी होत्या.
निघतांना अत्याबाईने मला .."  वेंधळेपणा करू नको, आणि दाखवू पण नको " ही लक्षवेधी सूचना केली.
माझे दोन्ही आत्येभाऊ म्हणाले .अरे..आपण तिघेच कसे..तीन तिघाडा काम-बिघाडा "असे होईल रे बाबा ..
मनात मी म्हणालो..होऊ  दे ना ..मस्त रविवार सोडून हे काय लागलाय माझ्या मागे.मात्र  उघडपणे ..काहीच म्हणालो नाही.
आत्या म्हणाल्या   जावईबापू पण सोबत असू द्या , जाणता माणूस असलेला बरा  . नाही तर ..ते सोयरे म्हणायचे.पोरांचा कारभार नुसता .असे नको ऐकायला .
अखेरीस ..अस्मादिक  आणि सोबत .२ आत्येभाऊ आणि आत्येबाहीनीचे यजमान ..असे आम्ही चौघेजण हिंगोलीस गमन करिते जाहलो.
त्यावेळी रात्री ९ ची वेळ म्हणजे  शेवटची गाडी सुटण्याची वेळ .नंतर थेट दुसरे दिवशी सकाळी ..नो वे ..
या वेळेत सगळा झालच पाहिजे होते.
आम्ही संध्याकाळचे  ५ वाजता परभणीहून निघालो..साधी लाल डब्बा  बस.. डायवरच्या मर्जीने  ७.३० पर्यंत पोंचली.
हिंगोली माझ्या साठी नवीन होते ..सोबत भावजी होते ..आम्ही जाणार होतो त्या बसोले -परिवारात  त्यांचा जुना परिचय होता ..
पण.या भाऊजींनी .बस मध्ये ..या "मुली बद्दल .काही म्हणजे काही सुद्धा एक शब्दात पण सांगितले नव्हते..!
आम्ही घरात प्रवेशलो.. मुलीचे दोन्ही  आजोबा -"  आईचे वडील, वडिलांचे वडील ." या जेष्ठांनी स्वगत केले ..इतक्या मोठ्या व्यक्ती समोर आम्ही गप्प बसलो."
आजोबांनी मुलीस ..बोलावले... आम्हाला ते म्हणाले.. विचार हो..काय ते..त्या आवाजात "जास्त चौकशी नाय करायची . "असा गर्भित इशारा आहे !असे उगीचच वाटून गेले  ..
माझे लक्ष.. समोरच्या घड्याळाकडे होते ..आमच्या हातात फक्त पाऊण तास वेळ होता ..यात पहाणे ,बोलणे,काही दिल्यास खाणे  नसता ' चहा पिऊन बससाठी पाळणे" असा भरगच्च कार्यक्रम होता.
समोर बसलेल्या मुलीकडे पाहिले ..नाव विचारले ..उत्तर आले..मीनाक्षी...
बस ..त्या नजरेच्या जाळ्यात कसा अडकलो ते त्यादिवसा पासून आज पर्यंत कळालेले नाही.
त्यादिवशी  उधर की हलत"   भी सेम टू सेम झाली होती.. " हे नंतर लिक झाले.. की- या बाईसाहेबांनी डालडा  तुपात करायचा  शिरा. " चुकून .चांगल्या लोणकढी तुपात बनवला होता  "
.असो.. या बाईसाहेबांनी पोटात आणि मनात एकाच वेळी शिरण्यात यश मिळवले हे नक्की.
चांगल्या तुपातला शिरा .भरपेट .मनोसक्त चापून.. आम्ही बससाठी निघालो ..मुलीचे आजोबा आमच्या सोबत येत म्हणत होते ..आता तुमचा निर्णय जो काही असेल  तो..घरी गेल्यावर मोठ्यांना सांगा..म्हणजे कळेल ..उशीर मात्र लावू नका ..म्हणजे .आम्ही मोकळे ....
अहो आजोबा ..मुलगी पसंत आहे.. आत्ताच सांगतो मी ...घरून मोठ्यांचा होकार रीतसर येईल .
आजोबांचा तो समाधानी चेहेरा  आज ही जसाच्या तसा आठवतोय.
घरी गेल्या वर माझ्या होकाराने आनंदी-आनंद झाला  , लगेच ..गुड-फ्राय डे "च्या सुट्टीला मुलगी उदगीरला सर्वांना पाहता यावी म्हणून आली ..तिची चक्कर वाया गेली नाही..त्याच दिवशी..बोलाचाली .आणि शाल-अंगठी .हा कार्यक्रम..
आणि बरोब्बर १ महिन्यांनी ..२ मे-१९७६ रोजी.. हिंगोलीस.. बसोलेची मीनाक्षी.. देशपांडे परिवारातील मीनाक्षी झाली.
आज २०१९ ची अक्षय तृतीया ..४३वर्ष पूर्ण झालीत ..तिच्या समोर पसंती दर्शक मान डोलली .ती आजतागायत तिच्या इशार्या प्रमाणे डोलते आहे  आता सवयीने  यापुढे ती अशीच छान डोलत राहणार आहे हे नक्की.
मी लेखक-कवी  झाल्यापासून म्हणजे  गेली ३५ वर्ष पारिवारिक एरिया तिच्या अधिपत्याखाली  आहे..मी सेवेतून आणि पारिवारिक झ्मेल्यातून  निवृत्त झालोय ..
आता नेत्रा ,यथार्थ आणि अगस्त्य या नातवांची ती लाडकी आज्जी झाली आहे. या बालकांच्या सोबत  आज्जीबाई माझ्या सारख्या अजाण-आबाला तितक्याच मायेने संभाळत असते .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख-
असं_ जमलं _ आमचं
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, March 27, 2019

कविता - तू एक

साभार -
काव्यानंद प्रतिष्ठानच्या - ई-मासिक  काव्यानंद - मार्च-२०१९ च्या अंकात प्रकाशित 



कविता- 
तू एक
----------------------------
छान वाटले 
भेटता तू एक
दूर जाऊ नको
वेगळी तू एक.........  !

भेट तुझी होणे
गोष्ट साधी नाही
भावले मना असे
कुणी आधी नाही..........!

भावना छान ही
आवडते कुणी
मनात घर एक
करे नवे कुणी...........!

अंतर आहेच
खूप गोष्टींचे
नात्यात नको
यामुळे अंतर............!

कल्पनेतले हे
सुंदर जग न्यारे
मनास लागू नये
वास्तवाचे वारे...........!

कवितेने दिली
भेट अचानक
कविता सुरेख
आहे तूच एक...........!
-----------------------------
कविता - तू एक
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
----------------------------------------

Monday, January 14, 2019

नवी लघुकथा - आबा माफ करा हो मला ! ले- अरुण वि.देशपांडे

दै.सत्य -सह्याद्री -सातारा -रविवार साहित्य पुरवणी -दि.१३-०१-२०१९ .अंकात प्रकाशित
-------------------------------------------------------------------------------------------------------
लघुकथा -
आबा माफ करा हो मला ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------
आबा येऊ का आत ?
हो, परवानगी घेऊनच येते आहे पहिल्यांदा ,
तुम्ही म्हणाल , हे काय नवं खूळ परवानगीचं ?
तसे नाही आबा , तुम्ही रागावलात त्या दिवशी माझ्यावर ..
म्हणालात , येऊ नको पुन्हा माझ्याकडे ",
आलीस तर ..परवानगी घेऊनच ये ..मग आज येतांना 
- येऊ का आत ? आबा 
असे विचारले तुम्हाला  ....

त्या दिवशी काय बिनसलं होतं माझं , कुणास ठाऊक ?
सगळा राग मी माझ्या कुहूराणीवर काढला ,
बिचारी एवढी छोटीशी पोरगी - तिला कळेचना .आपली आई 
असे का रागावली आहे अचानक ..
माझा आवाज आणि कुहुराणीचे रडणे तुमच्या कानावर आले  ,
आणि तुम्ही आमच्या घरात आलात ..
कुहुरांणीला जवळ घेतले , तिला शांत करीत समजावले ..
मग मला म्हणलात ..
तुला एक कळतंय का ?
ती केवळ लहान आहे..म्हणून तुला काही प्रतिउत्तर देऊ शकली नाही ,
पण ,तू तर मोठी आहेस, समजदार आहेस , तिची आई आहेस..
मग ..असे वागून ,बोलून तू काय मिळवले ?
मुलीला दुखावलेस ..हे बरोबर नाही..खूप चुकीचे वागलीस ..

तुम्हा आजच्या आई-बाबांना ..धड पालक  होता येत नाही आणि आई-बाबा होणे 
तर मुळीच जमत नाही ..
अगोदर स्वतहा चांगले आई-बाबा होण्याचा प्रयत्न करा ..मग शिकवा पोरांना ..!

डोकं शांत झालं , मन शांत झाल ..मग ,तुमचे बोलणे आठवले ..
आबा ..खूप खजील झाल्या सारख वाट्य मला ..
म्हणून तर ..तुमच्याशी बोलायला आले आहे ..ऐकून घ्या प्लीज...

आबा ..तसे तर आपण एकमेकाचे कुणीच नाही , पण बघा ना ,
शेजारी झालोत ,आणि सहवासाने नाते जुळले ..
माझ्या मुलांनी तुम्हाला प्रेमाने आणि हक्काने ..
ज्या दिवसापासून तुम्हाला  " आमचे आबा " म्हटले ..
त्या दिवसापासून ..तुम्ही सगळ्या सोसायटीचे आबा " झालात ..
लहानच मुलं काय, आम्ही मोठी माणसे सुद्धा तुम्हाला 
"आमचे आबा म्हणू लागलो ..

तुम्ही आपल्या वागण्याने , बोलण्याने सगळ्यांना आपलेसे केले ,
हे नाते प्रेमाचे आहे , मैत्रीचे आहे, विश्वासाचे आहे ..
खरं सांगू का आबा - आमच्यासाठी खूप छान अनुभव आहे हा ..

आम्ही आमच्याच कोशात स्वतःला अडकून घेतलय ..सर्वांची आमचे स्नेह-बंध 
तुटले आहेत , माणसे दुरावली आहेत .आमची .
याचे काहीच दुखः आम्हाला होत नाहीत 
इतके आम्ही कोरड्या मनाची माणसे झालो आहोत ..

पण आमच्या या स्वभावाला , आमच्या वागण्याला तुम्हीच वठणीवर आणण्याचा 
प्रयत्न केलात , आमच्या मुलांना तुम्ही आपले मानलेत  ,आम्हाला आपले मानलेत ",
आपापल्या आई-बाबांना फक्त सुट्टीच्या दिवशी भेटणार्या आमच्या मुलांना तुमच्यासारख्या 
वडीलधार्या माणसाकडून काळजी , माया , म्हणजे काय असते हे कळू लागले ..

आबा तुम्हाला तर माहितीच आहे की -
आजकाल आहे ती नाती ..मानायची नाहीत ,"  नात्यांना जोडून ठेवणे दूरच ,
ती तोडता कशी येतील ?'हे डावपेच लढवण्यात गुंतून गेलीय आजची पिढी ,
आपली माणसे परकी करून टाकायची ..आणि परक्यांना -आपले मानायचे ..!
आजच्या नात्यांची अशी दयनीय अवस्था होऊन बसलीय ...!

अशा वेळी आम्हाला तुम्ही भेटलात आबा ..
तुमची गरज आहे आम्हाला , तुमचा आधार , तुमचे शब्द आम्हाला सैरभैर होऊ देणार नाहीत .
याची खात्री आहे आम्हाला ..
आबा ,तुम्ही जीवन अनुभवलंय , माणसाना आजमावून पाहिलंय ..
आम्ही तर अजून कच्ची मडकी आहोत .. आम्हाला थापट्या मारून पक्के घडवा हो..

मी खूप चुकीचे बोलले ,चुकीचे वागले त्या दिवशी ..मनापासून चूक काबुल करते आबा ..
पुन्हा असे वागणार नाही ..प्रोमीस ..
आबा - माफ करा हो मला  ..!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लघुकथा - आबा -माफ करा हो मला ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, January 2, 2019

#चंदर -(बालकुमार कादंबरी)- अंतिम भाग -12 वा


# चंदर - (बाल-कुमार कादंबरी )- क्रमश 
: " अंतिम - भाग- १२ वा -"
------------------------------------------------------------------------------
नमस्कार वाचक मित्र हो - माझी १९९७ साली प्रकाशित झालेली पहिली बालकुमार कादंबरी , मी क्रमश: सादर केली,
आपण  प्रतिसाद दिलात , खूप धन्यवाद.
ही कादंबरी कशी वाटली ,आपले अभिप्राय जरूर द्यावेत.
सर्वांचे आभार.
अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
# चंदर - (बाल-कुमार कादंबरी )- क्रमश 
: " अंतिम - भाग- १२ वा -"
----------------------------------------------------------------------------
विद्यापीठाचा सारा परिसर माणसांनी नुसता फुलून आलेला दिसत होता . सारे वातावरण कसे भारल्यागत वाटत होते . कोंडाळे जमवून 
कोपऱ्या -कोपऱ्यात बोलत उभे असलेले लोक आणि जमलेले लोक कार्यक्रम केंव्हा सुरु होतोय याचीच वाट पहात होते .
आजचा पदवीदान समारंभ ", "प्रमुख पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहात होता. आयोजकांची घाई चालू होती. या सगळ्या गडबडीकडे 
चंदर पहात होता. कोपऱ्यात उभ्या असलेल्या चंदरकडे पाहण्यास कुणाला वेळ ही नव्हता . प्रत्येकजण आपल्यातच गुंग झालेला आहे ",हे
चंदरला जाणवत होते.
आजच्या पदवीदान समारंभात कुलपतींचे सुवर्णपदक " चंदरला प्रदान करण्यात येणार होते. मिळवलेली पदवी आणि प्राप्त झालेले यश ",
दोन्ही गोष्टी चंदरला सुंदर स्वप्ना सारख्या वाटत होत्या.
या ज्ञान -मंदिरापर्यंत आपली वाटचाल होईल ", याची त्याने कल्पनाही केली नव्हती. "शाळा नसलेल्या वाडीतून पायपीट करून शहरात 
येऊन शिकावे लागले " "कष्ट केल्यावरच काही मिळत असते ", याची जाणीव चंदरला झाली होती.
रहाण्यासाठी ,जेवण्यासाठी ", किती त्रास सहन करावा लागला ", हे आज आठवतहोते. जुन्या गोष्टींच्या आठवणी चंदरला व्यथित करून 
सोडीत होत्या , ते गेलेले दिवस पुन्हा पुन्हा नजरे समोर येत होते . " कठोर परिश्रमाशिवाय काही साध्य होत नसते ", गुरुजींचे शब्द अजूनही 
त्याच्या कानात घुमत होते.
"आई-बापूचे कष्ट आणि त्यांचे आशीर्वाद ,गुरुजींची प्रेरणा , मोठ्या मालकांचा -रावसाहेबांचा आधार ",या साऱ्या गोष्टी आपल्या पाठीशी 
सदैव होत्या म्हणून आपण पुढे पुढे जाऊ शकलो ,
कुठे आपली छोटीशी वाडी  आणि कुठे हे मोठ्ठे शहर  ", फक्त ज्ञान मिळवण्यासाठी आपण इथ पर्यंत आलो . नदी वर जाऊन गाई- म्हशी  धुणारा 
हा चंदर ", आज पदवीधर झालाय ", हे कुणाला खरे वाटेल काय ? चंदर ने स्वतहाला हा प्रश्न विचारला .

एवढ्यात ध्वनिक्षेपकावर कार्यक्रम सुरु होतो आहे ..अशी घोषणा कानावर पडली . उपस्थित मान्यवरांनी व्यासपीठ सुशोभित झालेले होते .
आणि निवेदकांनी  सांगण्यास सुरुवात केली - 
"या वर्षीच्या कुलपती- सुवर्ण-पदकाचा मानकरी - त्याचे नाव आहे..चंदर बापू वाडीकर ",
व्यासपीठाच्या पायऱ्यांना स्पर्श करून .मनातल्या मनात अभिवादन करून चंदर व्यासपीठावर आला . माननीय कुलगुरूंनी चंदरच्या हातात 
पदवी-प्रमाणपत्र दिले आणि मग त्याच्या गळ्यात "सुवर्ण -पदक "घातले ", त्याक्षणी सभा-मंडपात असलेल्या सर्वांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ",
करून गुणवंत चंदरचे अभिनंदन केले.
गौरव -स्वीकारून चंदर व्यासपीठावरून खाली मंडपात येऊ लागला होता , त्याचवेळी पुढच्या रांगेत बसलेल्या रावसाहेब , गुरुजी आणि बापूकडे 
त्याची नजर गेली , त्याने पाहिले ..की..
बापूच्या डोळ्यातून आनंदअश्रू वाहात आहेत "आणि मोठे मालक -रावसाहेब आपल्या बापूच्या पाठीवरून हात फिरवीत आहेत. गुरुजींच्या हातातल्या 
उपरण्याने बापू डोळ्यातील आनंदाश्रूंना थांबवत होते."
गळ्यात सुवर्णपदक आणि हातात पदवी-प्रमाण-पत्र घेऊन येणाऱ्या" आपल्या चंदर कडे  बापू भरल्याडोळ्याने पहात होते . "आपला चंदर एव्हढा 
मोठा आणि शहाणा झाला आहे " हे खरेच वाटत नव्हते .
आकाशाकडे पाहून हात जोडीत बापू म्हणत होता - देवा -परमेश्वरा - तुझ्या क्रुपेन हे घडलं रे बाबा ..!

रावसाहेब आणि गुरुजी  बसले होते त्या खुर्ची जवळ येऊन चंदर थांबला. खाली वाकून त्याने आधी रावसाहेबांना नमस्कार केला .
चंदरला जवळ घेत  रावसाहेब म्हणाले -
"बेटा चंदर , नाव कमावलं तू. आज सगळ्या गावाला अभिमान वाटावा असं यश तू मिळवले आहेस. मला खूप आनंद झालाय.
हे ऐकून चंदरचे मन समाधानाने काठोकाठ भरून आले. आपल्या गुरुजींच्या पायांना स्पर्श करीत तो म्हणाला -
"गुरुजी , हा आनंदाचा दिवस उजाडला आहे तो केवळ तुमच्यामुळे ".
चंदरच्या पाठीवरून हात फिरवीत -काही न बोलता गुरुजींनी आशीर्वाद दिले. त्यांच्या स्पर्शातून चंदरला गुरुजींच्या मनातील भावना समजल्या .

गावाकडे जाणऱ्या गाडीमध्ये सारेजण बसले. खिडकीतून बाहेरच्या देखाव्याकडे चंदर पहात होता. त्याला त्याचे छोटेसे जग आठवत होते, आणि 
आज त्याचे जग किती बदलून गेले होते. आजच्या आनंदाच्या दिवशी चंदरचे मन त्या दिवसांच्या आठवणीनी भरून येत होते. "जणू कालच घडून 
गेल्या असाव्यात "अशा त्या आठवणी चंदरच्या डोळ्यासमोर येत होत्या.अचानक एका वळणावर बस थांबली ,धक्क्याने चंदर भानावर आला.
त्याने खिडकीबाहेर पाहिले ,

त्याची वाडी आता जवळ आलेली होती. शेजारी बसलेल्या बापू, रावसाहेब आणि गुरुजी कडे त्याने पाहिले ",चंदरच्या गौरवाने -यशाने सारेजण आनंदाने 
तृप्त झाले होते.
गाव आल्यावर सारेजण उतरले , समोर आलेल्या काही जणांनी त्यांना सांगितले .अगोदर शाळेत जायचे आणि मग घराकडे ..
रावसाहेबांनी विचारले - "कार्यक्रम ?आहे तरी काय ?
एकजण म्हणाला - मोठे मालक शाळेत तर चला ,मग आपोआप समजेल की ...
ठीक आहे चला , असे म्हणून..
सारेजण शाळेच्या मैदानवर आले. गावकऱ्यांची चंदरचा सत्कार करण्याचे ठरवले आहे",याचा कुणाला पत्ता लागू दिला नव्हता.

समारंभ सुरु झाला. गुरुजींच्या आणि चंदरच्या यशाबद्दल बोलतांना ,आज सगळ्या गावाला खूप आनंद झालाय असे रावसाहेब म्हणाले,.
हातातला हार ते चंदरच्या गळ्यात घालणार ,तेंव्हा चंदरने त्यांना थांबवले ..आणि  म्हणाला -
"मालक - हा हार आणि हे सुवर्ण-पदक ", तुम्ही तुमच्या हाताने माझ्या गिरीजामायच्या गळ्यात घालावा ", अशी माझी इच्छा आहे . माझे हे यश  आहे 
ते "तिच्या त्यागाचे ,तिच्या वेड्या मायेचे आहे ".
चंदरच्या इच्छेप्रमाणे - रावसाहेबांनी मोठा हार आणि सुवर्णपदक ",गिरीजा -माय च्या गळ्यात घातले ", त्यावेळी सर्वांनी आनंदाने टाळ्यांचा कडकडाट केला .
हे पाहतांना गिरीजा आपल्याच मनाला विचारीत होती..
" आपला चंदर एवढा माणूस केवा झाला ?"

गावकर्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल बोलतांना चंदर म्हणाला-
गावकरी मंडळी हो- हे सगळ घडलंय ते फक्त गुरुजींच्या मुळे आणि रावसाहेबांच्या आशीर्वादामुळे ", गुरुजींनी आपल्या वाडीचा कायापालट केलाय आणि 
वाडीला नवे जीवन दिले . त्यांच्या या कार्याची मला परतफेड करायची आहे , तुमच्या साक्षीने ती मी करणार आहे ..ती म्हणजे -
"गुरुजींच्या शाळेतच -शाळेतला गुरुजी होऊन " मी वाडीत रहाणार आहे, कुठेच जाणार नाही.
सारा गाव या शब्दांनी खुश झाला. त्यांचा चंदर "खरोखरी -गुणी चंदर होता.". '
चंदरच्या यशाने सारी वाडी आज मोहरून गेली होती.
--------------------------------------------------------------------------------------------------------------- समाप्त -------------------------------------------------------------------------
# चंदर - (बाल-कुमार कादंबरी )- क्रमश :
: " अंतिम - भाग- १२ वा -"
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------