Wednesday, July 12, 2017

लेखमाला -हितगुज - लेख- जिद्द -कठोर -परिश्रम ..वगेरे ..

साप्ता-पथदर्शन अंकात प्रकाशित लेख-( मे- २०१७ )



लेखमाला - हितगुज
लेख-
जिद्द ,कठोर परिश्रम . वगेरे .....!
-------------------------------------------------------------------
मित्र हो- नमस्कार..
तसे पाहिले तर आपण सामान्य माणसे आहोत ,साधे सरळ असे जगणे आपल्या वाट्याला आलेले  असते, ते स्वीकारून आपल्या जीवनाचे रहाट-गाडगे अगदी सामन्या -पणे चालू असते ,अशा परिस्थतीत सगळेच एकाच भावनेने जगत असतात असे मात्र मुळीच नसते ,कारण सगळेच काही सामान्यपणे जगणारे नसतात ,
असे खुपजण असतात की त्यांच्या मनात नव्या नव्या कल्पनांचे अंकुर रुजत असतात ,  मनात खोल रुजून बसलेल्या स्वप्नांचे  निखारे धगधगत असतात . अशा जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी मनाच्या व्यक्तींना गरज असते ती योग्य वेळी योग्य दिशा देणाऱ्या जाणत्या आणि जबादार अशा मार्गदर्शकाची.

आपल्याकडे खुपजण असे आहेत की ..त्यांच्या मनात स्वप्नवत कल्पना असतात ..पण..त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी परिश्रम करायचे असतात ",हे त्यांच्या गावी नसते ..सगळ्या गोष्टी आयत्या मिळाव्यात अशी यांची धारणा असते.
आता तुम्हीच सांगा.."दे रे हरी पलंगावरी "..असे वागून काही मिळवता येईल का.
जो मेहनत करतो ..आणि अशी मेहनत करतांना अपयश आले तरी .त्याने अजिबात खचून न जाता ..नव्या दमाने ,नव्या उमेदीने हाती घेतलेल्या कार्याची पूर्ती होई पर्यंत परिश्रमात कमी पडत नाही.." त्याला त्याच्या कठोर परिश्रमाचे रसाळ असे फल मिळणारच .

मनात जिद्द " नसेल तर .मिळणारे यश सतत हुलकावणी देत असते .कारण..कार्यपूर्ती साठीची वाट पहाणे , त्याची प्रतीक्षा करण्याची तयारी नसणे , या अधीर -वृत्तीमुळे कित्येकजण हाती घेतलेले कार्य पूर्ण न करता मध्येच सोडून परत फिरतात ..अशावेळी धीर देणारे , खचून  गेलेल्या मनास उभारी देणारे मित्र भेटणे फार गरजेचे असते दुर्दैवाने नेमक्या उलट स्वभावाचे मित्र भेटले तर ..कार्य होणे तर दूरच .ते पूर्णपणे भरकटून ..भलतेच काही घडण्याची वेळ येऊ शकते.

जिद्द आणि कणखर मनाच्या जोरावर कठीण कार्य सुद्धा यशस्वीपणे पूर्ण करता येते ..या साठी हाती घेतलेल्या कार्याप्रती मनात आस्था असावी लागते ,त्यात गोडी असेल तरच कामात मन लागेल ना !  इतकेच असून चालणार नाही ..स्वतःच्या कार्यक्षमतेवर विस्वास पण असावा लागतो. आपल्या मर्यादा आपण नेहमीच जाणल्या पाहिजे.
शक्तीच्या बाहेर आणि कुवतीला न झेपणारे काम विचार न करता करणे ..यात हाती निराशा  लागण्याची शक्यता अधिक असते.

मोठी स्वप्ने जरूर पहावीत ..पण ती सत्यात येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीची ,परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे , या ठिकाणी फक्त "स्वप्नाळू -वृत्ती "असून काही उपयोगाचे नाही..तर.. मनाच्या ठायी जिद्द असावी लागते, परिस्थती अनुकूल असो वा प्रतिकूल असो ..यातून मार्ग काढणारा तो खर्या अर्थाने "बाजीगर "असतो, त्याची ओळख "मुकद्दर का सिकंदर "अशी आपोआपच होते.
मनगटाच्या बळावर काय काय करता येते "हे गोष्ट मनात असलेल्या जिद्दीच्या जोरावर या जगाला दाखवून देणारे अनेक जांबाज " आपल्या अवतीभवती असतात . अशा सक्सेसफुल व्यक्तींच्या कहाण्या "आपल्या साठी अचूक अशा मार्गदर्शक असतात.
जीवनात यशस्वी असणार्या व्यक्तींचा मूलमंत्र असतो..परिश्रमाला पर्याय नाही.
------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - हितगुज ....
लेख-
जिद्द ,कठोर परिश्रम . वगेरे .....!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------------

Tuesday, July 11, 2017

लेख- दशकपुर्ती निवृत्त जीवनाची ..

साप्ता.पथदर्शन मध्ये प्रकाशित लेख..

लेखमाला - हितगुज ",
दशकपूर्ती निवृत्त -जीवनाची
---------------------------------------------------
निवृत्ती "एक वृत्ती असते असे म्हटलेले सहजतेने पटेलच असे नाही., मित्र हो- निवृत्ती  नंतरचे जीवन मी माझ्या मते -अगदी आनंदात,सुखात आणि समाधानी मनो- अवस्थेत  घालवतो आहे , मला सेवा-निवृत्त  होऊन थोडेथोडके नाही तर तब्बल ११ वर्षा झालेली आहेत ..थोडक्यात निवृत्तीची दशकपूर्ती माझ्या खात्यात जमा झालेली आहे.या दशक-पूर्तीचे अनुभव मी आवर्जून तुमच्याशी शेअर करतो आहे.

 मी बँकेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झालो ते वर्ष होते २००६ ..आणि मी व्हीआरेस घेतले ..कोणतीही आर्थिक-लाभ योजना नसतांना . मनाची इच्छा झाली आणि मी एका अर्थाने स्वेच्छा-निवृत्ती घेतली. मुलीचे लग्न झाले , मुलाचे लग्न झाले , लौकिक अर्थाने जबाबदारीतून मी मुक्त झालो होतो ,.

नोकरी निमित्ताने मुलांचे वास्तव्य आता  नेहमी  साठी पुण्यातच असणार हे निश्चित होते .
.आमच्या पारिवारिक चर्चेत असा ही एक मुद्दा होता की - रिटायर झाल्यावर  तुम्ही दोघांनी गावाकडे राहण्याचा उगीचच हट्ट करू नये .आणि इथेच पुण्याला शिफ्ट व्हावे ,
तुम्ही इथ आलात म्हणजे .सगळे सण-वार, कुलाचार ,आणि सगळा घरगुती उपक्रम इथे व्यवस्थित होतील असे नाही केले  तर ..या पुढे प्रत्येक लहान सणआणि उत्सव - ,समारंभ  यासाठी आम्ही तिकडे यावे असे तुम्हाला वाटत रहाणार ,आणि या साठी म्हणून दरवेळी सुट्टी काढून येणे आम्हाला बिलकुल शक्य होणार नाही
दरवेळी , १२-१५ तासांचा प्रवास करणे , या  प्रवासा साठीचा खर्च होणार तो वेगळाच .या सर्व गोष्टीने सर्वांनाच शारीरिक आणि मानसिक त्याच बरोबर आर्थिक बाबीचा ताण हा येणार ,हे सर्व टाळणे आपल्या हिताचे असेल.

मुलांचे सांगणे आम्हा दोघांनही पटले आणि त्यावर्षातले सगळे सण गावाकडे साजरे करून .डिसेम्बर -२००६ ला सगळे सामान-सुमान घेऊन .. पुण्यास कायमचे रहाण्यास आलो. तुम्हाला खरेच सांगतो .या एका निर्णयाने  .आमच्या .सगळ्यांच्या मनावरचा एक मोठा ताण नाहीस झाला
 

गेल्या दहा-अकरा वर्षात .लहान-मोठे सगळे सण-आणि-समारंभ आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे साजरे केले आहेत..
एक व्यक्ती आणि एक माणूस म्हणून मी माझ्यापुरते ..आपण सगळ्यांशी कसे वागायचे ? याबद्दल थोडे फार ठरवले होते ..त्याप्रमाणे गेली दहा -अकरा वर्ष झालीत  या फार्मुल्या प्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करतो..यापुढे ही हे प्रयत्न चालूच रहातील.
निवृत्ती नंतर घरातल्या गोष्टींचे निर्णय घेण्याची जबाबदारी " कर्ता-पुरुष म्हणून-मुलावर  सोपवली आहे.
   त्याच्या बरोबरीने सुनबाई या कामात लक्ष घालते ..मार्गदर्शनासाठी जेष्ठाच्या भूमिकेत माझी पत्नी मुलांच्या सोबत प्रत्येक निर्णय-प्रक्रियेत असते. तिच्या अनुभवाचा फायदा या तरुण जोडप्याला निश्चित होत असतो. नंतर , मी काय आणि कसे ठरले ?या बाबतचे अपडेट्स घेत असतो..

या पुढे मुलांनी घरातले बदल कसे करायचे ,, हे मला विचारात घेऊनच केले पाहिजे असे नाही ,फक्त करण्या अगोदर सांगत जावे-कल्पना देत जावे ..म्हणजे या बद्दल कमी-जास्त, चांगले वाईट "काय असेल हे सांगता येते.
सगळ्या गोष्टी मी सांगेल तशा पद्धतीने झाल्या पाहिजेत , मी जसे ठरवलेल्या  वेळेत सगळ्या गोष्टी करीत असे ,अगदी तसेच टाईम-टेबल यापढे पाळला गेला पाहिजे " हा हट्ट मी करीत नाही ,कधी तसा  आग्रह सुद्धा करायचा  नाही असे ठरवले आहे ..त्या प्रमाणे वागण्याचा यथाशक्ती प्रयत्न करीत असतो...

माझ्या कारकिर्दीत मी काय काय "तीर मारले " याचे सुरस कहाण्या ऐकवणे टाळावे असे माझे मत.,त्याऐवजी आता धडपड करणार्या कार्यरत पिढीचे कौतुक करणे ,त्यांना प्रोत्साहन देणे "हे मी आवर्जून करीत असतो.
मी,माझे ,मुझे गिनो ", इतरांना त्रासदायक वाटणारे असे माझे वागणे नाहीये ना ? हे मी स्वतःला तपासून घेत असतो..आपल्यामुळे इतरांच्या दैनदिन जीवनात -वेळा-पत्रकात बदल नाही झाला पाहिजे " असा मी आटोकाट प्रयत्न करीत असतो.
आपल्या आवडीचे छंद - साहित्य -संगीत -कला .मनापासून जोपासावेत .. ताण-तणाव या पासून मुक्त राहू शकतो.

वयपरत्वे .शारीरिक आजार तर होणारच ..ते आटोक्यात राहवेत यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन मनापासून करावे ..तरच आपले जगणे सुसह्य होते आणि आपल्याला होणार्या त्रासाचा घरातील इतरांना त्रास होणार नाही .हे महत्वाचे लक्षात असणे गरजेचे आहे.
मित्र हो .मी  एक सामन्य व्यक्ती आहे.,वयपरत्वे काही अनुभव नक्कीच आलेले आहेत ,त्यातून जे काही सुचले त्या प्रमाणे जगतो आहे .अगदी आनंदाने -समाधानाने हे मात्र नक्की.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - हितगुज ",
दशकपूर्ती निवृत्त -जीवनाची .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------------------

Monday, July 3, 2017

लेखमाला - हितगुज - ले- पथ हा चालतांना ..!

वाचक मित्र हो -
साप्ता.हितगुज अंकामध्ये दि.२० मे- २०१७ पासून दर शनिवारी -माझी लेखमाला - हितगुज "सुरु झाली आहे.
ही लेखमाला सुरु करून माझ्या लेखनास वाचकांच्या पर्यंत पोन्च्ण्याची संधी दिल्या बद्दल ..
संपादक -सौ.उज्वला शेट्ये  व संपादक टीम यांचे मन:पूर्वक आभार..
या लेखमालेतील पहिला लेख -आपल्या अभिप्रायार्थ
------------------------------------------------------------------------------------------------
लेख-१
लेखमाला -
"हितगुज "
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------


लेख-
पथ हा चालतांना ...!
-------------------------------------------------------------------
मित्रांनो, आपल्याला लाभलेले आयुष्य हाच एक प्रवास आहे..प्रत्येकजण आपल्या क्षमतेप्रमाणे  हा प्रवास करीत असतो,या प्रवसात अनेक पाउल -वाटा असतात ,काही पायवाटा असतात ,असतात  रुळलेले रस्ते ,,जे समोर येईल ते स्वीकारून पुढे चालायचे असते हे स्वीकारले की मग पथ कुठला चालणे  आहे ",हे महत्वाचे  नाही.तर आपल्या मनाच्या ठायी असलेला निर्धार महत्वाचा असतो.,स्वतःवर असणारा  विस्वास पथ-क्रमणेस बळ देत असतो.,मग ही मार्गक्रमणा किती खडतर असो..आपण ती पूर्णपणे करू शकतो .

आपली -पथ -यात्रा ,चालणे आपल्या हातात असते ,पण, चालतंना आपल्या मार्गातले रस्ते कसे लागावेत ?हे कुठे आपल्या हातात असते ...कारण ..
"कधी सरळ कधी फाकडा
 कधी तिरका कधी वाकडा
असा हा रस्ता असतो
,आपण सगळा प्रवास एकट्याने करायचा नसतो ,कुणी सोबती असला म्हणजे "काटेरी पथ "चालणे फुलांच्या पायघड्यावरून गेल्या सारखे वाटणारे होईल
 साथ सावली सोबत मिळता
 सुखकर झाला सारा रस्ता ...||
अशी साथ मिळाली तर..कितीही लांबची मजल गाठणे शक्य आहे .

आपल्या आयुष्य-प्रवसात अनेक चढ-उतार ,खांच-खळगे , भूल-भुलावे असतात , अशावेळी पथ-दर्शक लाभणे "यासारखी सुदैवी गोष्ट नाही.कारण मार्ग-दर्शवणारा तो मार्गदर्शक ",  "पथ -कसा आहे.."..त्यातील बारीक-सारीक धोके सांगणारा " तो पथ-दर्शक " ,अशा अनुभवी माणसांनी आयुष्य आणि त्यातील जगणे अनुभवलेले असते , म्हणूनच त्यांचे बोलणे ,त्यांचे सांगणे म्हणजे एक यथार्थ असा जीवनानुभव असतो.

पण असे ही म्हणतात की...ज्याचे डोळे उघडे असून तो पाहू शकत नाही, ज्याला कान आहेत पण त्यात सांगितलेले काही शिरत नाही ,तोंड आहे पण, तो चांगले बोलत नाही " अशा माणसाच्या आयुष्याची वाटचाल किती खडबडीत रस्त्यावरून होणारी असेल .. त्यासाठी आपण आपल्याला बदलायला हवे आहे.

याच्या उलट ,सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा जो असतो तो म्हणतो ..
"बस यही अपराध मै हर बार करता हुं
 आदमी हुं आदमीसे प्यार करता हुं...!
असे असणार्या माणसांना मदत करणार्या सोबत्यांची कधीच कमी पडणार नाही.

प्रवास सारेच करीत असतात ,यात तुम्ही आम्ही सगळेच सामील आहोत ".पथिक "म्हणून आपण हे पथ चालत असतो ..हा प्रवास करीत असतांना आपल्याला पुढचा मार्ग सांगणारे अनेक फलक असतात ..त्यावर अनेक सूचना असतात..आपण बहुसंख्य लोक त्याकडे सर्रास दुर्लक्ष करून पुढे जातात ,हे आपले वागणे किती बेजबाबदापणाचे आहे ", हे कळत  असूनही वळत नाही",हे फार वाईट आहे. पथ-दर्शिका समोर असून आपण त्याकडे लक्षच देत नाही ..मग, या सर्वांचा काय उपयोग ?यातून एकच गोष्ट होते..ती म्हणजे जीवनात असे काही अपघात घडून जातात की,नंतर पश्चाताप करून ही काही उपयोग नसतो  .

आपण सारेजण प्रवासी ..प्रचंड संख्येने आहोत..पण.आपल्याला योग्य ते मार्गदर्शक ,दिशादर्शक , पथ -दर्शक ..सहजासहजी मिळत नसतात ..अगदी दुर्मिळ असते यांचे असणे .आणि म्हणूनच यांचे आपल्या जीवनात असणारे महत्व ओळखता आले पाहिजे , आपण असे करू शकलो तर आपलाच जीवन प्रवास करतांना .आपण कधी भरकटणार नाहीत हे निश्चित .

आपले आयुष्य अनिश्चितपाणाचे असले तरी..आपण निश्चितपणे आपल्या इच्छित गोष्टी साध्य करू शकतो..हे किती छान आहे.
या साठी सकारात्मकता असलेले आपले स्नेहीजन ,गुरुजन ,हे आपले पथ-दर्शक ,मार्गदर्शक आहेत हे लक्षात असू द्यावे.आणि असे ही म्हणतात की .जीवनानुभव हे सुद्धा एक उत्तम मार्गदर्शक असतात ..आपल्यासाठी काय भले आणि काय बुरे ..हे अनुभाव्तून शिकत शिकत आपल्याला हा जीव्नपथ चालायचा असतो.

शेवटीं एकच ..
जीने का अगर अंदाज आये
तो कितनी हसीन है जिंदगी
मरने के लिये जीना है अगर
तो कुछ भी नही है जिंदगी ...!

आपण एक करावे ..माहिती असेल  तेच मार्ग-दर्शन करावे.. माहिती नसेल तर अंदाजे काही बाही सांगून दिशाभूल करणे "असे कधीच करू नये....!
------------------------------------------------------------------------------------------
लेख- पथ हा चालतांना ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------------------

Thursday, March 30, 2017

पुस्तक परिचय - कविता- संग्रह -दरवळ रातराणीचा

पुस्तक परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------

कविता संग्रह -दरवळ रातराणीचा
------------------------------------------------------------------------
सौ.चंदना सोमाणी इंटरनेट आणि फेसबुक्वर नियमितपणे  साहित्य लेखन करणाऱ्या लेखिका आणि कवयित्री आहेत.
२०१६ मध्ये प्रकाशित झालेले  " सुख-दुखांच्या वळणावर ", हे त्यांचे पहिले पुस्तक .  .ललित लेखन सोबत त्यांचे काव्यलेखन ही सहजतेने चालू असते , त्यांच्या गद्य आणि काव्य अशा दोन्ही लेखन प्रकाराला वाचकांनी प्रतिसाद दिला आहे.
सौ.चंदना सोमाणी यांच्या कविता आता संग्रहाच्या स्वरूपात वाचकांना उपलब्ध झाल्या आहेत .६७ कवितांचा समावेश असलेल्या त्यांच्या कविता संग्रहाचे शीर्षक आहे - दरवळ रातराणीचा ". २०१७ म्हणजे या वर्षाच्या आरंभीच या कविता संग्रहाचे आगमन झालेले आहे .
प्रस्तुत परिचय लेखात कवयित्री सौ.चंदना सोमाणी यांच्या कवितांचा हा आस्वादात्मक परामर्श ...
 कवींच्या कविता आपल्याला खर्या अर्थाने "जीवन -अनुभव "देणाऱ्या असतात ". एका अर्थाने कविमन हे प्रतिभा-संपन्न असतेच असते ", ",याची प्रचिती कवयित्री चंदना सोमाणी यांच्या कविता-लेखनात नक्की जाणवते. या कविता छान आशय असणार्या आहेत " आणि या कविता  कवयित्रीच्या पुढील लेखन-प्रवासाची आश्वासक ग्वाही देतात "हे फार छान वाटावे असेच आहे..

"दरवळ रातराणीचा "या संग्रहातील कवितेतून .कवयित्रीच्या कविमनाचे यथार्थ असे दर्शन तर घडते. कवी त्यांच्या भवती असलेल्या हरेक गोष्टीचा साधक -बाधक विचार करतो ..आणि त्याचे हे विचार कवितारुपात आपल्या समोर अतिशय योग्य शब्दातून मांडतो " .कवयित्री चंदना सोमाणी यांच्या कवितेचे स्वरूप हे असे साधे -सरळ आणि निर्मल कविता "असे करता येईल  ".
रातराणी " या कवितेत कवयित्री तिच्या कवितेला उद्देशून म्हणते असेच या ओळीवरून वाटेल -
"खोल श्वासात भरली
 मनात माझ्या उरली
 दरवळ तुझी प्रिय सखी
 माझीच रातराणी गं....(रातराणी ..पृ.८ )

"दरवळ रातराणीचा "संग्रहातील कविता ..परिचित विषय असलेल्या म्हणून फार वेगळ्या आहेत असे मुळीच नाही. पण या कवितेतील त्यांनी व्यक्त केलेला आशय नक्कीच वेगळा आहे "ही आवर्जून सांगावे असे त्यांच्या कवितेचा विशेष गुण आहे. आणि या कवितेतून कवयित्री चंदना सोमाणी यांनी आपल्या वाचकांशी खूप छान असा भाव-संवाद साधला आहे.
कविते विषयीची ही कविता-
" जी ना तुझी  ना माझी
   मी लिहिते म्हणून माझी
   तुम्ही वाचता म्हणून तुमची 
   असते जी सर्वांची ती कविता ....(कविता ..पृ..८१ ),
या संग्रहातील अनेक कविता मधील आशय मनाला खूप भावणारा आहे.म्हणून या कविता वेगळ्या वाटू लागतात ..
ही आणखी एक सुंदर कविता .समाजिक भान देणारी ..
"कालपरत्वे जाण बदल भाऊराया
दे सक्षमतेचा राखीचा नजराणा
कर तिला शिकवून सावरून मोठी
असू दे ती मोठी किंवा छोटी....( राखीचा नजराणा ..पृ..७२ ),

आवडत्या गोष्टीवरची कविता एक वेगळेच भारलेपण घेऊन येते ..
"जीवनात आपल्या मनमोकळे
  खळखळून जागा
  इगतपुरीचा  धबधबा
   शिकवतो पहा कसा ...(इगतपुरी ...पृ.६७ ),,
संदेश देणे, भावना संस्कार करणे .सुविचार असणार्या या कविता ही  कवयित्री समरसून लिहिते ,
एक संकार कविता -
आई सांगे लेकरास ....

पोट भरले असतांना
चव लागत नसते
गरीबाच्या भाकरीला
कष्टाची चव असते ......(फरक दृष्टिकोनाचा ..पृ.५९ ),
लेखक आणि कवी यांच्या लेखनात जेंव्हा आपणास "माणूस "दिसू लागतो,त्याच्या भावना  कवी आपल्या कवितेतून व्यक्त करतो "अशा कवितांना एक मोठे सामुहिकआणि सामाजिक  असे परिमाण लाभत  असते .
कवयित्री चंदना सोमाणी  यांनी .माणसांचे  व्यक्ती -रूप  टिपणार्या अनेक कविता लिहिल्या आहेत..
काही कवितांची शीर्षके -
"माणूस म्हणून पाहू "..(पृ.४२ ), ,"शेतकरी "..(पृ/१०) , "व्यसनांचा बाजार "..(पृ..२७), ,"सुरुवात "..(पृ.४६), ,
"मान -अभिमान "..(पृ.५१ ),,नियतीचे दान "..(पृ..५३ ), "जीवन - मरण "..(पृ..५५ ),
वर उल्लेख केलेले कवितांचे एक समान असे सूत्र आहे ..ते असे - या सगळ्या कवितेतून कवयित्री .माणसाबद्दल ,माणसाविषयी ,आणि माणसांला .त्याचे हित कशात आहे..हे सांगते आहे ..आणि हे सगळे सांगणे उपदेशवजा नसून एक  यात  माणसाविषयी वाटणारा आपलेपणा "ही भावना आहे ..ज्या मुळे या कविता एक वेगळा परिणाम साधून जातात.

बाकी नेहमीच्या ..ती आणि तो -यांच्यातील प्रेम-भावना , समाजिक जाणीव आणि बांधिलकी या दृष्टीकोनातून व्यक्त होतांना झालेल्या कविता , आणि काही चिंतनपर कविता ..वाच्वायास मिळतात.
साधी आणि सुयोग शब्द-योजना , शीर्षक आणि आशयाशी  अनुरूप अशी कविता ,मनाला स्पर्श करून जाणारी भाव-कविता " असे वर्णन कवयित्री चंदना सोमाणी यांच्या कविता-लेखनाचे करता येईल
" दरवळ रातराणीचा " हा त्यांचा पहिला कविता संग्रह  याची प्रचीती वाचकांना नक्कीच देतो.
कवयित्री सौ.चंदना सोमाणी यांचे अभिनंदन व पुढील लेखन-प्रवासासाठी  शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------
कविता संग्रह -
दरवळ रातराणीचा ..
सौ.चंदना सोमाणी -पुणे.
मूल्य-रु.७५ -/ पृ.८२
------------------------------

प्रकाशक -
रसिका प्रकाशन ,कोल्हापूर ,
मो-९८२३३६१९७७ 
-------------------------------------------
पुस्तक परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------

Wednesday, January 25, 2017

लेखमाला - अक्षर-पालखी - लेख-२. पहिले पुस्तक

लेखमाला-
अक्षर-पालखी-
लेख- २
पहिले पुस्तक----
--------------------------
बालसाहित्यातले माझे पहिले पुस्तक कोणते ? या प्रश्नाचे ऊत्तर
मोठे गमतीदार आहे काऱण - माझी गोष्टींची दोन- दोन पुस्तके
एकाच वेळी प्रकाशित झाली.
१.स्वावलंबन व ईतर गोष्टी ,२-
बागुलबुवा व ईतर गोष्टी.
ही ती जुळी- पुस्तके.

स्वावलंबन - यात ५ गोष्टी आहेत.
२.बागुलबुवा- यातही ५ गोष्टी आहेत.
या पहिल्या दोन पुस्तकांचे खुप छान स्वागत झाले.
माझ्या लेखनाची दखल मोठ्या आस्थेने घेतली गेली मग काय
लेखनास मिळालेल्या प्रोत्साहनामुळे मी सातत्याने बालकथा'
लेखन करण्यास सुरूवात केली.
१९९४ या वर्षी- प्रकाशित झालेल्या वरील दोन पुस्तकांच्या निमित्ताने मी
साकेत प्रकाशन - औरंगाबाद या नामवंत प्रकाशनाचा
बालसाहित्याचा लेखक झालो . श्री.बाबा भांडसर त्या वेळी
साकेत प्रकाशनाचा कार्यभार पहात असत.
स्वावलंबन व बागुलबुवा" या दोन्ही पुस्तकातील लेखन सर्वांना आवडले. यातील गोष्टी हा मित्रांना खुप आवडल्या.
८०-९० च्या दशकात मराठवाड्यातील नामवंत बालसाहित्यकारांच्या सोबत माझे बालकथा- लेखन सुरू झाले
.
बालसाहित्याचे लेखन प्राधान्याने करावे" असा सल्ला,व सुचना व मार्गदर्शन माझ्या अनेक जिवलग मित्रांनी केले. ही सुचना
मी आज ही मनापासुन पाळतो आहे.
पहिल्यां- पुस्तकाला साहित्य-लेखन पुरस्कार "
हा आनंद मला " स्वावलंबन" या पुस्तकाने दिला.
सेलू जि.परभणी येथील रा.दा.अंबेकर ग्रंथालयाचा- बालसाहित्याचा प्रथम प्रकाशित पुस्तकासाठीचा
कै.सुमनताई देशपांडे - स्मृती साहित्य- पुरस्कार मला माझ्या
" स्वावलंबन व ईतर गोष्टी" या पुस्तकासाठी मिळाला.
आता या दोन्ही पुस्तकांच्या नव्या स्वरूपातील आवृत्ती यावी
यासाठी प्रयत्न करतो आहे..
पुढच्या भागात. अजुन एका पुस्तका बद्दल सांगेन.
क्रमशः.........
----_---------------------------+----------_----------------------------
लेखमाला-
अक्षर-पालखी
लेख_ २
अरूण वि.देशपांडे
----------------------------------------------------------------------------
LikeShow More Reactions
Comment

Tuesday, January 17, 2017

माझे लेखन- मातृभारती मराठी ई-बुक्स वर जरूर वाचावे.

वाचकमित्रांना नमस्कार- फ्री रीडर अँप डाऊनलोड करून हे ईबुक जरूर वाचावे.
Marathi eBook प्रेम -कहाणी by Arun V Deshpande in Love Stories genre, Matrubharti is biggest source of Indian eBooks available on web, android and iPhone.
matrubharti.com|By Arun V Deshpande

Saturday, December 3, 2016



नमस्कार-मित्र हो-
तरुण-भारत -नागपूर-
आसमंत पुरवणीत प्रकाशित कविता.
--------------------------------------------------------------