Friday, October 13, 2017

लेख- कल्पना आणि अंदाज

लेखमाला -
हितगुज -
लेख- 
कल्पना आणि अंदाज ...!
------------------------------------------------------------------------
 दैनंदिन कार्यक्रमात अनेक वेळा आपण सगळेजण आयोजकाची भूमिका कधी न कधी पार पाडीत असतो..आणि अशा समारंभाचे व्यवस्थित पार पडणे , .  बरेचदा " .अनेक गोष्टींची आपल्याला कल्पना असणे आणि कल्पना नसणे , तसेच आपल्याला  "  एखाद्या गोष्टीचा अंदाज करता न  येणे आणि अंदाज चुकणे .." या दोन गोष्टीवर अवलंबून असते . याचे आणखी एक कारण असते ते म्हणजे - आपल्याला व्यावहारिक अनुभवाची आणि ज्ञानाची असलेली कमतरता ".हे कुणी मुद्दाम करत नसते ,हे ही तितकेच खरे .

आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू, जिन्नस अशा अनेक गोष्टींची कल्पना नसते की ,हे सगळे "की हे कुठे मिळते, कसे मिळते ? कितीला मिळते ? आणि मग कित्येकदा गरज नसतांना "केवळ कल्पना नसल्यामुळे ,माहितीच्या अभावी" आपल्याला आर्थिक नुकसान सोसावे लागते , यात पुन्हा एक गम्मत अशी असते की .आपण कुणाला विचारायला जावे तर .समोरचा खांदे उडवीत म्हणतो .."काय की बुवा ,काही कल्पना नाही ..! " कदाचित असे म्हण्यामागे .अशी एक वृत्ती असू शकते ..जाऊ द्या .कशाला उगीच मागे काही जबाबदारी लावून घ्या ?.

अंदाज असणे आणि अंदाज नसणे ..या दोन्ही गोष्टी या प्रत्यक्ष्य अनुभवावर  आधारित आहेत. अंदाज हा नेहमीच अचूक असयला हवा असा आग्रह नसतो .म्हणून आपण लगेच म्हणतो ..निदान ढोबळमानाने-"  तरी अंदाज करू या ..!
आपल्याला असे अंदाज आपल्याला करायला लागतात- केंव्हा ? जेंव्हा नियोजित कार्यक्रम वा समारंभ हे मोठ्या स्वरूपाचे असतात ,आणि यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या खूप जास्त संख्येची असते.
एवढेच कशाला ..आपण कित्येकदा "घरच्या घरीच कार्यक्रम .ठरवतो  यात अतिशय मर्यादित संख्या असलेले पाहुणे 
येणार असतात " अशा वेळी ..सर्व गोष्टींचे प्रमाण घरातील अनुभवी याक्ती  सांगेल त्याप्रमाणे ..त्याच्या अनुभवी अंदाजानुसार केल्या जातात .ही व्यक्ती सल्ला देते की - " हे बघा ...१०० पाहुणे येणार असतील तर ..७५ मानासंना लागेल इतका केले तरी ..निभून जाईल हो..!
कारण सगळेच्या सगळे पाहुणे येतीलच असे होत नसते " त्याचा हा अंदाज जवळपास अचूक ठरणारा असतो..कारण अनुभवातून त्या व्यक्तीला असलेली नियोजनाची कल्पना आणि त्याला असलेले अंदाज -कौशल्य .

अंदाज करता येणे " तो न चुकणे " या गोष्टी निर्णयक्षमतेवर अवलंबून आहे ..निर्णयक्षमता नसणाऱ्या व्यक्तीने ,काही कल्पना नसतांना त्याच्या अंदाजा प्रमाणे केले तर आणि कार्यक्रमाचा पचका झाला तर  ..त्याला बोलणे खावी लागतील तुला आधीच म्हणालो होतो ..नको करू करूस .तुला न कल्पना आणि  कशाचा अंदाज ! ..अरे बाबा .असे ...अंदाजे पंचे दाहो दर्शे..केल्याने कुठे जमतं असते का ?

एखाद्या विषयाची काहीही माहिती नाही ,तर कल्पना तरी कशी करता येईल ? या साठी प्राथमिक माहिती, जुजबी माहिती , कामापुरती माहिती ,सगळी माहिती , परिपूर्ण माहिती ..एव्हढे सगळे किंवा या पैकी थोडे तरी आपल्याजवळ असेल तर ..काम पूर्ण होईल की नाही ? आपण हे काम करू शकू की नाही ? याची पूर्वकल्पना करता येते आणि मग त्या अनुषंगाने .अंदाज बांधता येणे , थोडाफार अंदाज करणे , असे करीत करीत पुढच्या पायऱ्या चढून जाणे जमायला लागते .

चार माणसाच्या घरात सुद्धा हे तितकेच आवश्यक आहे ..गृहिणी व्यवहार -कशल आहे " असे जर कुणी म्हणत असेल तर खुशाल समजावे की या घरातील गृहिणीला सगळ्या गोष्टींची माहिती आहे , कुठून ,कशी खरेदी करायची याची कल्पना आहे ...तिच्या या सवयीमुळे ..घराचे आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता फारच कमी असते ,

आणि अनुभव हा श्रेष्ठ गुरु"लाभला की ..त्या पाठोपाठ आपल्या व्यक्तीमत्वात अनेक चांगले गुण येऊ लागतात .
सगळी सोंगं करता येतात पण..पैश्याचे सोंग नाही करता येतं ..हे एक सर्वपरिचित सिध्द अशी म्हण प्रचीलीत आहे.
आणि पैश्याचे नियोजन ..हे नेहमीच ..अनुभवी..अंदाजातून तयार करायचे असते ..म्हणून तर याला .."वार्षिक  अंदाज पत्रक " असे ठळक नाव प्राप्त झाले आहे ते किती अचूक आणि संपर्क आहे हे जाणवते .

अंदाज "म्हणजे तरी नेमके काय ? भविष्यात नेमके असेच घडेल ..याची कल्पना आपल्याला नसतेच ..त्यामुळे काय घडू शकेल ? याचा अर्थातच अंदाज करता येत नाही .." असे आहे म्हणून .भविष्यकालीन नियोजन न करून कसे चालेल ? मग, केवळ स्व-अनुभव ,इतरांचे अनुभव ,आणि क्षमता ..यांच्या बळावर आपण ..अनेक गोष्टी ठरवतो ..त्यात आपली कल्पना आणि अंदाज .या दोन्ही गोष्टींची  परीक्षा होत असते .

जीवनाच्या या कठीण परीक्षेत ..ज्याचे ठोकताळे , अंदाज ..अचूक ठरतात ,ज्यांचे अंदाज खूप बरोबर नाही ठरले तरी फार चुकीचे ठरत नाहीत , अशा व्यक्ती ..अपयशी होण्याचे दुखः टाळण्यात नक्कीच यशवी होत असतात. याची कल्पना आपल्याला असयला हवी .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हितगुज-
लेख- कल्पना आणि अंदाज .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Sunday, October 8, 2017

लेख- लेख-आठवणीतली गावं - लेख- क्र-१ अदुगर -परभणी –मग-जर्मनी ..!




लेख-आठवणीतली गावं –
लेख- क्र-१
अदुगर -परभणी –मग-जर्मनी ..!
मित्रहो नमस्कार ,
दैनिक दिलासा ,आणि आदरणीय विजय जोशीसर यांच्याशी अक्षर –नातेबंध जुळून आता ३५ वर्षे होऊन गेली आहेत १९८३-१९८४ साल असावे मी त्यावेळी हैद्राबाद बँकेत गंगाखेडला होतो .१५ ऑगस्ट विशेष अंकात माझी “ काचेचे हिरे “ ही कथा विजय जोशी सरांनी प्रकशित केली प्रकाशित झालेली हे माझे पहिले वाहिले प्रकाशित झालेले साहित्य.  तेंव्हा पासून सुरु झालेला माझा लेखन प्रवास आजही अखंडपणे चालू आहे , आज ही अगदी आपलेपणाने दिलासा साठी मी आनंदाने लेखन करीत असतो.
संपादक आणि मित्र –संतोष धारासूरकर यांच्याशी संवाद –भेटी नेमाने होत असतात .अशाच एका भेटीत ..आठवणीतली गावं “हा माझा लेखन-संकल्प यावर आमचे बोलणे झाले .आणि ते म्हणाले परभणीत तुम्ही खूप वर्ष होता –मग परभणी –आठवणीतले गावं .ही लेखमाला सुरु करा ,रविवार –साहित्य पुरवणीतून क्रमश ..येऊ द्या .
या रविवारपासून आपण नियमित भेटणार आहोत .त्यासाठी आरंभीच दिलासा टीमचे आभार मानतो.
माझ्या आयुष्य- प्रवासातील सर्वात मोठा पर्व-काल मी. परभणीत घालवला  ..,१९८६ ते २००६ अशी वीस वर्ष- दोन दशकं मी फेमस परभणीत होतो . मी तसा ही मुळचा परभणीकर आहे .एक लेखक म्हणून, एक बँक-कर्मचारी म्हणून आणि एक व्यक्ती –एक माणूस म्हणून मी परभणीत वावरलो ..खूप देऊ शकलो तर नाकीच नाही पण पर्भानीने सवयीप्रमाणे भभरभरून दिले आहे ..ते सर्व या लेखमालेतून येईल .ते दिवस, ती वर्षं ती माणसे या सर्वांच्या आठवणींचा –पेमाचा अक्षर जागर तुम्हाला आवडणारा ठरावा हे अपेक्षा करतो .

आजच्या लेखाच्या पहिल्या लेखातून परभणीकर म्हणून माझी पारिवारिक ओळख करून देणे योग्य राहील
१९८६ ते २००६ ही २० वर्ष मी परभणीला होतो . या काळात माझा परिचय गंगाखेडहून आलेला .हैद्राबाद बँकेतील एक कर्मचारी असा होता . माझे वास्तव्य त्यावेळी आरंभी वसमतरोडवरील रामकृष्ण नगर पेट्रोल पंप च्या मागे असलेल्या बँक कॉलनीत होता , नंतर कारेगाव रोड ला –पाण्याच्या टाकी जवळ ..श्रीराम नगरला आमची आणखी एक बँक कोलोनी झाली ,आणि या कॉलोनीत मी माझे घर बांधले ..
४१ - वरदान “ श्रीराम नगर परभणी या वास्तूने मला खूप भरभरून दिले , माझे साहित्य लेखन या वास्तूत झाले आहे .यामुळे एक झाले ..बाहेरगावाहून आलेला मी –परभणीच्या क्रांतीचौकातला आहे ही माझी ओळख नव्या पिढीला झालीच नाही , म्हणून देखील आज हा लेख लिहिवसा वाटला
परभणीच्या वास्तव्यात माझी ओळख लेखन –धडपड करू पाहणारा आणि .मराठवाडा साहित्य परिषद परभणी , अक्षर –प्रतिष्ठा –परभणी .या संस्थेचा एक कार्यकर्ता अशीच होती .. या दोन्ही संस्थात नियमित वावरत असतांना मला अनेक साहित्यिक आणि मित्र –लाभले –या सर्वांच्या सहवासात माझी साहित्यिक म्हणून जडणघडण झाली  साहित्य-नगरी –सम्मेलन नगरीची महती आज मी सर्वत्र मोठ्या अभिमानाने आनंदाने सांगत असतो..

आता परभणी सोडून मला अकरा वर्षे होत आहेत ..सध्या पुण्यात रहात असलो तरी ..मनाने फुल –टू-परभणीत असतो.
आजच्या लेखाचे प्रयोजन .साहित्यिक आठवणीचे नसून.माझ्या पारिवारिक –परभणीकर म्हणून तुमच्याशी शेअर करणे हे आहे. आमची पारिवारिक ओळख – लोहगावकर देशपांडे – क्रांती चौक –परभणी . ज्यांचा सहवास मला लाभला अशा माझ्या परभणीकर-पारिवारिक सदस्यांचा या लेखात उल्लेख करण्याचा प्रयत्न केलाय , अनेक माझ्या माणसांचा उल्लेख स्मरणा -अभावी होणे कठीण आहे .त्यांनी मोठ्या मनाने माझ्या विस्मरण –बुद्धीला क्षमा करावी.
आम्ही लोहगावकर देशपांडे –तसेच ताडलिंबेकर –देशपांडे ,महातपुरीकर –देशपांडे , परभणीकर –देशपांडे ,हे सर्व मंडळी क्रांतीचौकातच वास्तव्यास आहे ..सगळे आडनावंबंधू आणि तसे नातेवाईकच .
परभणीच्या क्रांतीचौकात रंगराव देशपांडे –हे संकुल आहे ते रंगराव गंगाधरराव देशपांडे –लोहगावकर हे माझे चुलत आजोबा ..या संकुलाच्या जागी रंगराव आजोबांचे वास्तव्य असलेला वाडा होता –त्यालाच “गढी “असे म्हटले जात असे रंगराव देशपांडेच्या वाड्यातच मराठीचे श्रेष्ठ –साहित्यकार बी.रघुनाथ शेजारी म्हणून राहत असत .माझे काका श्रीधर देशपांडे ..यांनी बी.रघुनाथ यांच्या अनेक आठवणी गप्पांच्या ओघात सांगितल्या.
रंगराव आजोबांच्या वाड्यात अलीकडच्या काळात –माझे काका श्रीधरराव देशपांडे राहत असत .त्यांच्या परिवारात सामील झालेला किशोर ब्रम्ह्नाथकर –आणि आता माझा बंधू झालेला किशोर देशपांडे –त्याची पत्नी संध्या औरंगाबाद येथे असतात ,शेतीविषय प्रयोगशीलता हा या बंधूचा विशेष आहे.
.त्याच्या बाजूला आहे ते आमच्या परिवाराचे मोठ्ठे घर ..व्यंकटराव उर्फ बालासाहेब काका यांचा वाडा ,या काकांचे चिरंजीव ..सखाराम देशपांडे –लोहगावकर –माझ्या या चुलत बंधूचे अकाली जाणे- आम्हा सर्वासाठी मोठी दुर्दैवी घटना ठरली आहे.आता या घरात आनंदी देशपांडे –लोहगावकर यांचे वास्तव्य असते
या वाड्याच्या मागच्या गल्लीत आमच्या लोहगावकर –देशपांडेच्या मोठ्ठ्या घराचा भाग आहे ,या वाड्यात १९६४ साली परभणीला वडिलांची बदली झाली तेंव्हा आम्ही आमच्या या खानदानी घरात राहिलो. मी त्या वर्षी जिंतूर रोडवरच्या मोठ्या नूतन शाळेत नववीच्या वर्गाचा विद्यार्थी होतो .माझ्या शालेय जीवनाचे एकच वर्ष परभणीला झाले.
माझ्या वडिलांचे नाव. विठ्ठल हनुमंत देशपांडे –लोहगावकर ..माझे वडील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये होते , १९८९ मध्ये ते परभणी मुख्य शाखेत मनेजर होते .माझ्या वडिलांचे लहानपण परभणीतच गेलेले , मला आठवते दीप -प्रभाचे विठ्ठलराव पाठक , राजाभाऊ सुभेदार श्रीनिवासराव राजेंद्र “हे वडिलांचे अतिशय जिवलग मित्र होते
हनुमंतराव देशपांडे -माझे आजोबा “पांडेपण करायचे ..फुलकळस- या गावी त्यांचे वास्तव्य असायचे.या गावी आमचा वाडा आणि शेती होती .
..या गावात माझ्या बळवंत गंगाधरराव देशपांडे या आजोबांनी .श्री बजरंगबली –मारुती ची स्थापना केली ..आज पंचक्रोशीत हे मंदिर – पांड्याचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. देशपांडे परिवारातील नवी पिढी मोठ्या श्रद्धेने फुलकळसला मारुती दर्शनास येत असतात . या गावासाठी बळवंतराव आजोबांचा नातू – नितीन मुरलीधर देशपांडे अनेक सामाजिक स्वरूपाच्या योजना राबवतो आहे
बळवंतराव आजोबांचे थोरले चिरंजीव म्हणजे जुन्या पिढीतील कीर्तिवंत प्राध्यापक – डॉ.के.बी .देशपांडे –केशव बलवंत देशपांडे .उस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद मध्ये कार्यरत असतांना के.बी काकांना .औरंगाबाद  येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापनेच्या वेळी बोलावले गेले ..हे केबी काका –बॉटनी  या विषयाचे प्राध्यापक होते ,मला आठवते शाळेत असतांना आम्हाला .वनस्पती शास्त्र “हे त्यांचे पुस्तक अभ्यासक्रमात होते .हे मोठे लेखक आपले काका आहेत” हे खूप सुखद वाटायचे .
केबी काकांची मोठी कन्या माझी मोठी चुलत बहिण मंगलताई ही -–मराठवाड्यातील पहिली महिला इंजिनियर आहे “ हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
केबी काका परभणीला अगदी नियमित येत असत ,जुनी परभणी त्यांना फार प्रिय होती.

काळाच्या ओघात आता खूप बदल झालेत .जुन्या पिढीतील जेष्ठ-पिढी आता हयात नाहीये . निसर्ग-नियमानुसार होणारी ही गोष्ट आहे...
माझे मोठे काका – दत्तात्रय हनुमंत देशपांडे –लोहगावकर ..यांची आजची पिढी परभणीला आहे- श्री. गुंडेराव दत्तात्रय देशपांडे हे माझे मोठे चुलत बंधू – त्यांच्या परिवारातील दिनेश व त्याची पत्नी. आणि  धाकटे –चिरंजीव -.राजेश देशपांडे –संध्या देशपांडे हे दोघेजण –परभणीतील सार्वजनिक जीवनात सर्व-परिचित जोडपे आहे ..लोहगावकर देशपांडे ही ओळख त्यांनी दमदारपणे चालू ठेवली आहे .याचे मला खूप कौतुक आहे.
दुसरे मोठे चुलतबंधू भीमराव दत्तात्रय देशपांडे .जयश्री हेमाद्री –देशपांडे ,हे जोडपे -
भीमराव देशपांडे यांचे चिरंजीव – राहुल –अरुणा हे जोडपे पुण्यात असते आणि धाकटे चिरंजीव प्रसाद –- अदिती हे जोडपे बडोदा येथे असते.हा प्रसाद उर्फ पप्पू देशपांडे .आता प्रसाद भि.देशपांडे “या नावाने लेखन करणारा इंटरनेट-वरील अतिशय लोकप्रिय असा कथाकार आणि कवी आहे .अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन –मध्ये निमंत्रित कवी “म्हणून त्याचा सहभाग अभिनंदनीय असाच आहे.
भीमरावची कन्या –सौ.रसिका रमण संगमकर –नांदेडला असते
मधुकर देशपांडे- मोहिनी , यांची मुलं -राहुल आणि आरती - म्हणजे क्रांतीचौकातील आमच्या लोहगावकर देशपांडेच्या खानदानी वाड्यात राहणारे आमचे घर एक घर आहे.
भीमराव देशपांडे यांचे साडू –बंधू आणि प्रसिद्ध साहित्यिक-वक्ते – श्री .अनिल रामदासी –विद्या हेमाद्री –रामदासी –माझे पारिवारिक स्नेही आहेत ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
सर्वात मोठे चुलत बंधू लक्ष्मीकांत दत्तत्रय देशपांडे – यांचे चिरंजीव विलास नोकरी निमित्ताने औरंगबादला आहे ..त्याची पत्नी –सौ.संगीता देशपांडे ही उत्तम लेखिका आहे .परभणी-हिंगोली –नांदेड आणि आता औरंगाबाद अशा विविध ठिकाणी राहून ती विविध नियतकालिकातून नियमित लेखन करीत असते , लेखन आता इंटरनेटवर सुद्धा ती एक उत्तम वाचक आणि लेखिका म्हणून कार्यरत आहे.
माझ्या या मोठ्या बंधूंचे जावाई आहेत प्रसिध्द नाट्यकलावंत –श्री किशोर विश्वामित्रे .


माझ्या सर्वात मोठ्या चुलत भगिनी सुशीला –देशपांडे –देशमुख यांचा परिवार – सुधीर-विनोद –बाळू –(आकाशवाणी मधील )ही भाचे मंडळी आणि त्यांचा परिवार परभणीतील सार्वजनिक कार्यात परिचित आहे.
माझी धाकटी चुलत बहिण सौ.विमल –आणि श्री.चंद्रकांतराव सरदेशपांडे –हा परिवार परभणीत असतो .श्री.चंद्रकांतराव सरदेशपांडे –हे वसमतरोड परिसरातील एक सर्वप्रिय व्यक्तिमत्व आहे.
माझ्या वडिलांची मावशी –सुभेदार परिवारातील ..बबनराव सुभेदार हे माझ्या वडिलांचे मावसभाऊ ..या बबनकाकांची नवी पिढी .त्यातला मनोज सुभेदार ..इंटरनेटवर परिचित असलेला एक लोकप्रिय मित्र आहे.
रेणुकादासराव चौधरी –सावरगावकर –हा परिवार म्हणजे वडिलांच्या बहिणीचे –वेणू-आत्याचे घर.
मोठा आतेभाऊ म्हणजे यशवंत चौधरी – म्हणजे य.रे -सर.त्यांची पत्नी –मंगला –पावडे-चौधरी आणि बाल विद्या मंदिर ,उभयतांची अशीच ओळख विद्यार्थ्यात होती . यशवंत चौधरी –माझा मोठा आतेभाऊ ..पण माझ्यासाठी अत्यंत आदरणीय य.रे –सर म्हणूनच अधिक जवळचा होता ..
पुढे निवृत्त झाल्यावर यशवंत चौधरी ..पुण्यात आल्यावर आमच्या नियमित भेटी होत असत ..
..त्याचे बाल-मित्र असलेले सुधाकर पाठक ,गोविंद कात्नेश्वारकर –हे माझे पारिवारिक मित्र म्हणून आज ही माझ्या संपर्कात असलेले परभणीकर मित्र आहेत .यशवंतचा  मुलगा –गणेश चौधरी पुण्याच्या संगीत क्षेत्रात उत्तम तबला –पटू म्हणून परिचित आहे.
माझा धाकटा आतेभाऊ , रविकांत चौधरी – याने आपल्या बहारीच्या काळात रवी टेलर्स “या नावाने परभणी आणि परिसरात आपल्या कार्याची ठळक अशी मुद्रा उमटवली होती...
रवी टेलर्स –कडे शिवलेले कपडे न वापरणारा परभणीकर –आणि कोणत्याही क्षेत्रातील नोकरदार व्यक्ती असो , १९७५- ते २००० अशा जवळपास पंचवीस वर्षांच्या काळात शोधून सापडले नसते ..इतका हा रवी-टेलर्स “चा प्रभाव होता .

आज या चौधरी परीवारतील बहुतेक सदस्य आता परभणीला नाहीत .स्वतः रविकांत चौधरी –सौ.अलका आणि त्याचा मुलगा हरीश , विवाहित मुली –रचना ,आणि रश्मी त्यांच्या परिवारासहित औरंगाबादला आहेत.माझ्या आतेबहिणी–  सौ.शोभा अशोकराव पार्डीकर , सौ.प्रभा सुधाकर जोशी ,या पुण्यातच असतात ,
सौ.सुनिता –कळंब- देशमुख परिवारात ,आणि सौ.मीना –प्रज्ञा प्रशांत आजेगावकर –नवी मुंबई ला असते.
सर्वात धाकटी आतेबहीण – सौ.ज्योती विलास आंबेकर परभणीकर झाली आहे. तिच्या सोबतच परभणीकर असलेली माझी मोठी आतेबहीण –सौ.ताई रमेश मंगरूळकर हा परिवार परभणीला असतो.
भला मोठा असा हा माझा परिवार आहे..आणि असा आहे मी परभणीकर
..बाकी पुढच्या लेखात .....
(क्रमशा ......)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Saturday, September 23, 2017

लेख- बोलावे कुठे -कसे -किती ? ले- अरुण वि.देशपांडे





लेखमाला - हितगुज -
लेख-क्र.१० 
बोलावे- कुठे - कसे-किती  ?
----------------------------------------------------------
आपल्या दिवसभराच्या वेळापत्रकानुसार आपण कधी एखाद्या ठिकाणी आपण जाऊन येतो , कुणाच्या घरी  , एखाद्या कार्यक्रमाला जात असतो , आपल्या सोशल -लाईफ मध्ये तर नेहमीच विविध ठिकाणी आपण हजर रहात असतो .
प्रत्येक ठिकाणी एकाचवेळी अनेक व्यक्तींशी आपण बोलत असतो ..अशावेळी परस्पर सवांद होत असतांना ..त्या त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या -आणि त्यानुसार त्याच्या वागण्याचा आपल्या मनावर थेट मोठा परिणाम होत असतो.  अशा ठिकाणी व्यक्ती--रूपाचे इतके विविध रंगी -विवध ढंगी नमुने एकत्र आलेले असतात की.या सगळ्यांना भेटून .नंतर आपल्या .मनात .मैत्रीभाव ,आदर, सन्मान ,या सोबतच काहीजणांच्या बद्दल मात्र  तिरस्कार , कंटाळा ,वैताग ,अशा अनेक भावना एकाचवेळी निर्माण होतात ..

काहीवेळा एखाद्या ठिकाणी जाऊन येतो ,समारंभ होऊन जातो ,तिथे मत प्रदर्शन करणे बरे नसते या विचाराने गप्प राहून घरी आल्यावर मात्र  आपण स्वतःशीच म्हणून मोकळे होतो - बाप रे -या ठिकाणी गेलो नसतो तर फार बरं झाला असतं ,"
मजा येण्ने तर दूरच , एका पेक्श एक नग भेटले .त्यांना भेटून आणि यांचे  "एकमेकांचे बोलणे .ऐकूनच डोके फिरून गेलयं राव , वैताग...नुसता ...!
मित्रांनो असे होणे हा माझाच नव्हे तर .तुमचाही असाच अनुभव असू शकतो ताची कल्पना आहे.याचे कारण एकच आणि ते म्हणजे - माणसांचा -स्वभाव ".

काही माणसे स्वतःच्याच प्रेमात पडलेली असतात ..मी यंव .आहे..मी त्यंव आहे..."हे कौतुक-गाणे -रेकार्ड " लावून देतात के बस रे बस , " किती बोलावे ? याचे भान विसरून गेलेली अशी माणसे .समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी देत नाहीत ,स्वताच्या असलेल्या आणि नसलेल्या  मोठेपणाची ( ? ), टिमकी वाजवत रहाणे हेच त्यांचे काम असते , शेकडो वेळा आपण या गोष्टी लोकांना सांगितल्या  आहेत ",हे विसरून अशी माणसे ..आपल्या समोरच्या माणसाची संयमाची परीक्षा पहात असतात . 
काहीजणाना आपण कुणाशी बोलत आहोत याचे भान नसते.आणि ते जाणून घेण्याची त्यांची तयारी नसते .."अज्ञानातही  -प्रचंड आत्मविस्वास बाळगून तारे तोडणार्या माणसांना पाहिले की मला त्यांचे कौतुक करवावे वाटते , आपण कोण आहोत ,आपल्या मर्यादांची जाणीव न ठेवता ..एखाद्या विद्वान व्यक्तीला सुद्धा गप्पगार करण्याची यांची क्षमता "पाहून भलेभले चकित होऊन जातात ,आणि कुणीतरी मध्ये हस्तक्षेप करून .या बोलक्या -बाहुल्याच्या तावडीतून  खरोखरच्या ज्ञानी व्यक्तीची सुटका करतो " हे पाहून विचार येतो .बोलणे " म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा घटक आहे.त्याला अजिबात महत्व न देणारी माणसेच माणसे भवताली वावरतांना दिसून येतात.

काही ठिकाणी तर ..- स्वतःच्या वागण्याने .अस्तितवाने .स्वताचे हास्यास्पद -असे फिरते प्रदर्शन घडवणारी माणसे भेटतात ,त्यांचे रहाणे ,त्यामुळे त्यांचे दिसणे ..काहींचे  त्यांच्या वयास न शोभणारे वागणे -वावरणे " हे सगळा पाहून..बघणार्याने लाजावे अशी परिस्थिती असते ...कुठे -किती -कसे ? हे तीनही प्रश्न अशा माणसांना पडत नसतील का कधी ?..माझ्या मते तर.असे कळत असते पण ते काही केल्या वळत नसते .कारण एकच ..मी -आणि मीच " याचा अतिरेक ..सगळ्या ठिकाणी असतो. लोकांच्या चर्चेचा विषय ..मग.त्यासाठी "काहीपण करण्याची अशा माणसांची तयारी असते..म्हणून..आपल्या बोलण्याला .कुणी हसेल का ? हा पोरकटपणा पाहून लोक मनातल्या मनात चिडत असतील ..हे माहिती असून सुद्धा अशी माणसे बिलकुल बदलत नाहीत ..

लहान -थोर, स्त्री-पुरुष , तरुण-तरुणी ..वयोगट कोणताही असो ..लोकांच्या आपल्याकडे बघण्याची एक नजर असते , आपण कसे असुत, कसे बागतो..बोलतो याबद्दल त्यांच्या निश्चित अशी अपेक्षा  असते ..नेमक्या या परीक्षेत आपण नापास होणे .ही खचितच शोभणारी गोष्ट नाही.

ज्या व्यक्तीच्या बोलण्यात सौम्यपणा ,आदर व्यक्त होणारी भाषा , नम्रपणा ,समवयस्कांशी बोलतांना अपेक्षित असणारा समंजसपणा , मृदू आणि कठोर नसणारे शब्द..लहानांशी लहानहोऊन खेळकरपणे वागणारा -बोलणारा  ..मोठ्यांशी तितक्याच आदबशीरपणे ..त्यांचे ऐकून घेत मोजक्याच शब्दात बोलणारा " असे वागणारे नक्कीच आहेत ,अशा व्यक्तींच्या सहवासात रहाणे ..त्यांना अनुभवणे..हे एका अर्थाने एक खरे संस्कार-शिबीर "असेल. आपण मन:पूर्वक ते अनुभवले तर.. कुठे -कसे- आणि किती बोलावे" याचे शिक्षण नक्कीच घेता येईल..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हितगुज-
लेख- बोलावे- कुठे -कसे-किती ?
अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(साप्ता.पथदर्शनी अंक दि.२२ जुलै -२०१७ अंकात प्रकाशित लेख )
(.-सौ.उज्वला शेट्ये ,संपादक यांचे आभार )
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Monday, September 11, 2017

कविता-- नयन

स्टोरी मिरर आयोजित कविता /गझल स्पर्धा
माझी प्रथम पुरस्कार प्राप्त कविता
------------------------------------------------------
नयन
-अरुण वि .देशपांडे
-------------------------------------
नयनात तुझिया सखे
 मी मजला पहातो
चिमुकले जग तुझे माझे
त्यात दिसता जीव हा सुखावतो  ।।

लढाईत या जगण्याच्या
सावलीसोबत तुझी असते
बळ येते लढण्यास मला जेंव्हा
नयनातून बोलक्या तुझ्या धीर देते  ।।

शांत तृप्त नयन तुझे
मज अथांग डोहासम भासती
व्यथा वेदनांचा मज विसर पडे
तुझी सुखद नजर मजवरी पडे     ।।

व्यक्त होण्यास कधी कधी
शब्द बोलके -ते ही तोकडे पडते
सस्मित नयनांनी तू मज बोलता
ओझे मनावरचे हलके हलके होते ।।

एक स्वप्न माझ्या मनीचे सखे
कुशीत असता मी तुझ्या पूर्ण व्हावे
नयनांशी  हितगुज करता करता
भावविश्व सारे भरुनी हे यावे         ।।
----------------------------------------------------------
कविता - नयन
-अरुण वि .देशपांडे.

Thursday, August 24, 2017

लेख ८ वा- हितगुज - ख्याली-खुशाली - अरुण वि.देशपांडे

Friday, August 11, 2017

लेखमाला - हितगुज "-लेख क्र-७ - वेळ कसा घालवायचा ?

लेखमाला - 
हितगुज "-
लेख- वेळ कसा घालवायचा ?
-----------------------------------------------------------

हा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच पडत असतो . जे लोक इतर वेळी आपापल्या कामात असतात , त्यांना काम संपवल्यावर जो रिकामा वेळ असतो ..तो थोडा असो व खूप ..अशावेळी त्यांना एकच चिंता असते - "बापरे ,आता हा वेळ मी कसा घालवू ? 
आणि जे लोक रिकामेच असतात ,त्यांना वेळच वेळ असल्यामुळे ."वेळ कसा घालवू ? हा प्रश्न त्यांना कायमच पडलेला असतो. निवृत्त झालेली माणसे, आणि वृध्द  आणि  "जेष्ठ-नागरिक " यातील सगळ्यांनीच काही -स्वतहाला   कोणत्या न नकोणत्या कामात गुंतवून घेतलेले असते  असे नसते , या वयोगटात सुद्धा अनेकजण असे असतात की ..त्यांना "उगवलेल्या दिवसभरात ..कस वेळ काढायचा ? हा प्रश्न पडलेला असतो.

या "वेळेचे काय करायचे किंवा "मी वेळ कसा घालवू ?" 
मित्रांनो - हा प्रश्न आपल्याला व्यक्तिगत  रूपाने सोडवत येतो ,तसाच तो सामुहिक रूपाने सुद्धा सोडवता येऊ शकतो 
आता हेच पहा .. नेहमी कामात व्यस्त  असलेल्या व्यक्तींनी एक लक्षात ठेवावे की - कामाच्या तणावाने आपले मन थकून  गेलेले असते, आणि आपले शरीरही  तितकेच थकून गेलेले असते.. .पण, या गोष्टीकडे लक्ष देण्याची आपल्याला सवयच नाहीये ,आणि अशा "विश्रांतीचे काय महत्व आहे ? हे सुद्धा  जाणून घेण्याची त्यायारी कधी दाखवत नसतो.

त्यामुळे ..आठवड्याची सुट्टी .मग ती रविवारी असेल, किंवा कार्यालयाच्या नियमाप्रमाणे एखाद्या दुसऱ्या एखाद्या दिवशी असेल , या ऑफ -डे " च्या दिवशी..नेहमीच्या रुटीन कामाला बाजूला सारून .खूप दिवसा पासून न केलेले एखादे आवडते काम हाती घेऊन ते पूर्ण करण्यास आरंभ केला तर " बघा ..तुम्हालाच नंतर जाणवते ..अरेच्च्या - हे काम करतांना मला तर वेळेचे भानच उरले नाही की..या वेळेत काम पूर्ण झाल्याच आनंद तर अधिकच ,मग .कंटाळा आणणारा वेळ अशा सत्कार्यात घालवला तर "वेळ सारथी लावल्याचे समाधान नक्कीच मिळवता येते.

वेळ छान केंव्हा  जातो ? 
या प्रश्नाचे उत्तर आहे ..कामाच्या माणसांचा वेळ कामातच छान जातो आणि ..आळशी माणसांचा वेळ अर्थातच "आळसात-आरामत जात असतो ". पण, मित्रांनो .या दोन्ही प्रकारच्या "वेळ घालवण्यात खूप मोठा फरक आहे , जो नेहमी कार्यरत असतो ,त्यला सारे जग विचारीत असते , आणि जो फक्त आळसात .म्हणजेच "निष्क्रिय -राहून वेळ वाया घालवतो त्याला लोकांच्या दृष्टीने  काही किंमत नसते ..

यावरून एक अनुमान  काढू शकतो की - विधायक कार्य करण्यात वेळ घालवणे -हे व्यक्तीच्या व्यक्तीमत्वात भर टाकणारा गुण आहे ", आणि म्हणून " निष्क्रिय- माणूस " म्हणजेच वेळ वाया घालवणारा माणूस , त्यापासून दूर राहणे बरे ", असे लोक ठरवतात..

प्रत्येक वयोगटातील स्त्री--पुरुषांनी , तरुण -तरुणींनी , मुला-मुलींनी " नेहमीच "वेळेचे नियोजन"करण्यास शिकले पाहिजे ..म्हणजे .जुन्या जमान्यातील सुत्राप्रमाणे ." काळ-काम "यांचे गणित सोडवतांना .लागणाऱ्या वेळेचा योग्यतम उपयोग करता येणे शक्य असते.

आपल्या हाती असलेल्या वेळेत आपण काय करावे याला ही खूप महत्व आहे" त्यामुळेच "आपण वेळेचा सदुपयोग करतोय की वेळेचा अपव्यय करतोय " याचे भान असायला हवे आहे..
योग्य पद्धतीने -नियोजनपूर्वक- आणि दिलेल्या वेळेनुसार कार्यपूर्ती "या परीक्षेत पास होणारी व्यक्ती ..कधी अपयशी झालेली आहे " असे दिसून येणार नाही , सहाजिकच ..फावल्या वेळेत ते त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवू शकतात .अशा वेळी त्यांना कुणी..म्हणणार नाही की- हा फुकटचा वेळ वायाघालवतो आहे "
,
विद्यार्थ्यांनी .अगोदर अभ्यासाचा वेळ, मग, खेळायचा वेळ ..हे दोन नियम पाळले तर .त्यांना बोलणी खाण्याची वेळच येणार नाही.. पण बहुतेक वेळा उलटे होते .कारण अशी मुलं - अभ्यासाच्या वेळेतच - काही न करता बसून राहतात ..,खेळायची वेळ झाली कि मात्र ...वेळ कसा घालवू ? हा प्रश्न नाही पडत.

आपल्या सर्वांचा खुपसा  वेळ "करमणूक "या नावाखाली आपण घालवतो . "मन रमवणे -या साठी आपण .नेहमीच 
टीव्ही  आणि त्यावरच्या मालिका आणि इतर कार्यक्रमा पहाण्यात खूप वेळ  घालवतो , आता तर इंटरनेटवर- फेसबुक आणि  मोबाईल वरचे गप्पा -ग्रुप ", आणि "फ्रेंड बरोबरच्या गप्पा " यात किती वेळ घालवला जातोय  जातोय " हा प्रश्न आता सामाजिक चिंतनाचा विषय बनून राहिलेला आहे.
यात वेळ घालवणारे .याचे समर्थन तितककेच जोरदार करतात , दुसरी बाजू अशी पण आहे की " या सर्व 'गोष्टीत "वेळ वाया घालवला जातोय " असे मत व्यक्त करणारे काही कमी नाहीत 

आजकाल ...असी परिस्थती दिसते आहे की ..घरात माणसे नाहीत .जी आहेत ती .कामाच्या निमित्ताने सतत बाहेर असतात .अशा वेळी जी कुणी व्यक्ती घरात शिल्लक राहते ..तिच्या समोर .. "वेळ कसा घालवू ?,
हा प्रश्न एखाद्या संकटां सारखा भीषण स्वरूपाचा  होऊन बसलेला असतो...
अशा  व्यक्तीला आपण  " वेळ घालवण्यासाठी तू अमके कर, तू हे कर, तू ते कर " सूचना करणे तितकेसे योग्य ठरणार नाही. कदाचित तो वैतागेल आणि रागाने म्हणेल सुद्धा.. आलास मोठा शहाणा ..मला सांगणारा .तू बघ न राहून .अशा बंद घरात .मग कळेल तुला ..माझी व्यथा .." 
मित्रांनो त्याचे दुखः: आणि त्याची व्यथा समजून घेतली पाहिजे .कारण त्याच्यावर जी वेळ "आली आहे ,ती, एक लादलेली अवस्था आहे ..एरव्ही त्याला वेळ कसा घालवू ?" हा प्रश्नच पडला नसता .

थोडक्यात काय तर. "वेळ सगळ्यांनाच सारखा मिळालेला असतो ..त्याचा विनियोग कसा करायचा हे मात्र ज्याचे त्याने ठरवावे "असे असले तरी .."वेळ वाय घालवू नये ये " तो सदा कार्यापुरती असावा " हे कुणी अमान्य करणार नाही.. कार्यमग्न राहावे - "वेळ कसा घालवायचा  ? हा प्रश्न पडणार नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- ७ वा ,
हितगुज -लेखमाला 
लेख- वेळ कसा घालवायचा ?
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
साभार - साप्ता .पथदर्शनी  अंक.दि.८-७-२०१७ अंकात प्रकाशित लेख.

Tuesday, August 1, 2017

लेख-क्र-६ - समारंभ आणि कार्यक्रम .