लेखमाला - आठवणीतलं गावं परभणी
-लेख- ९ वा - हैद्राबाद बँक ..कृषी विकास शाखा .!
------------------------------ ------------------------------ --------
मित्र हो , प्रस्तुत लेखमालेसाठी लेखन करीत असतांना जुन्या दिवसांच्या आठवणी मनात गर्दी करतात , ते दिवस ,ती वर्ष , सहवासात आलेल्या लहान-मोठ्या व्यक्ती , त्यांच्या मैत्रीचा माझ्या आयुष्यावर असलेला प्रगाढ अस प्रभाव ,
हजारो क्षणचित्र मनासमोर येऊ लागतात , काय सांगू , किती सांगू अशी अवस्था माझ्या मनाची होऊन जाते ,
आणि जाणवत राहत परभणीने मला खूप खूप दिलाय ,जे आठवणे सुद्धा खूप सुखद असते.
वाचकांचे आलेले फोन, आणि फेसबुकवर लेख पोस्त केल्यावर मित्रांच्या अभिप्राय -प्रतिक्रिया ..या गोष्टी भरभरून मिळत आहेत आणि नव्या लेखनास मी आठवणीचे मखमली गाठोडे सोडून बसतो आणि मग जे हाताला लागेल त्यावर छानसे सुचू लागते आणि आठवणीचा एक लेख पाहता पाहता तयार होऊन जातो ..ग्रेट परभणी -ग्रेट दोस्त.
आज थोडे सांगतो ते मी नोकरी केली त्या हैद्राबाद बँके विषयीच्या आठवणी -
आता तर स्टेट बँक ऑफ हैद्राबाद " ही बँक आणि हे नाव इतिहासाचे सोनेरी पान झाले आहे .. इंडिया बँकेत विलीन झाल्या नंतर ..मराठवाड्यात तरी गावो गावी परिचित असलेली हैद्राबाद बँक दिसणार नाही याचे नक्कीच वाईट वाटावे कारण .निजाम काळातील .हैद्राबाद संस्थानातील ही बँक मराठवाडा इलाख्यात जवळपास ७५ वर्ष एक प्रमुख बँक म्हणून कार्यरत तर होतीच ..पण या हैद्राबाद बँकेला " जनसामान्य मनात खूप आपुलकीचे आणि विस्वसाचे स्थान होते हे कुणीच अमान्य करणार नाही.
हैद्राबाद बँकेच्या सुरुवातीला ज्या शाखा उघडल्या गेल्या त्यात परभणी शाखेचा समावेश होता .कालांतराने परभणी शहरात इतर ३ मोठ्या शाखा सुरु झाल्या ..या एकूण चार शाखे पैकी ..जेल रोडवर असलेली शाखा ..बँकेच्या स्वतःच्या इमारतीत शिफ्ट झाली ..स्टेशन रोडवर .सरकारी शाळेच्या समोर अगदी मोक्याच्या चौकातील ही शाखा ..मुख्य शाखा म्हणून कार्यरत होती .. नानलपेठ शाखा , कृषी विद्यापीठ शाखा , आणि नवा मोंढा परिसरात -कृषी उत्पन्न बाजार समिती समोरची .कृषी विकास शाखा ..जिला एडीबी म्हणत ..
पुढे २००० नंतरच्या दशकात आणखी काही शाखा सुरु झाल्या होत्या ..असो ..
१९८६ या वर्षी परतूर येथून माझी बदली एडीबी -शाखेत झाली .आणि मला माझ्या गावी ..परभणीला येण्याची संधी मिळाली ..कारण परभणीला बदली मागणारे इच्छुक नेहमीच प्रचंड असायचे ..मग या यादीत आपला नंबर लागणे, नंबर लावणे ..असे सर्व सोपस्कार होत असत ..गम्मत म्हणजे .बदलून जाणारे - बदलून येणारे .दोन्ही आपलेच मित्र ..त्यामुळे देऊ साथ एकमेका " अशा राजी -खुशीने ..सगळी काम होत असत .
त्यावेळच्या सिनियर लिस्ट प्रमाणे .. टायपिंग येणारा -( मी टायपिस्त क्लार्क म्हणून बेन्केत लागलो होतो ) हेड-क्लार्क असा मी एकटाच होतो .जो परभणी बाहेर होता ..या प्लस बाजूमुळे ..माझा नंबर लागला ,आणि मी परभणी -एडीबी -शाखेत रुजू झालो .
त्यावेळी एकूणच हैद्राबाद बँकेत जितक्या एडीबी शाखा होत्या ..त्यात परभणी एडीबी शाखा एकदम टोप ला होती ..
परभणी जिल्ह्यातील आजूबाजूची सर्व महत्वाची गाव या शाखेची दत्तक -गावं होती ..शेतकऱ्यांची सर्व प्रकारच्या शेतीविषयक कर्जांची गरज एडीबी शाखेमार्फत भागवली जात असे ..
इतर शाखेत असणारी असे बँक -व्यवहार -ज्याला आपण कमर्शियल -व्यवहार " म्हणतो .ते या एडीबी शाखेत होत नसत ..ही शाखा म्हणजे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या शेती विषयक अडी-अडचणी सोडवणारी शाखा " अशी ओळख या शाखेची होती .
मी इथे येण्या अगोदर तालुका ब्रांचला आणि औरंगाबाद सारख्या शहरी शाखेत काम केलेला ..या एडीबी शाखेत मात्र असे माझ्या परिचयाचे काम नव्हते ..या शाखेतील अधिकारी " फील्ड-ऑफिसर , टेक्निकल ऑफिसर असे " पोस्टिंग असलेले , आणि जी "बाबू मंडळी होती ..ते सगळे ..कायम शेतकऱ्यांच्या कोंडाळ्यात अडकलेली असायची ..
मला अजून ही १९८७ चा पावसाला आठवतो ..जो आजच्या पावसाळ्या सारखा ..कोरडा ठप्प झालेला नव्हता ..
एप्रिल -मे आणि कडक उन्हाळा ..परभणी शहरात जाणवत असे ,पण एडीबी ज्या बिल्डींगमध्ये होती त्याला भवताली खुप्मोठे अंगण होते आणि मोकळी जागा होती ..
या अंगणात मोठी मोठी झाडं होती ..त्यांच्या सावलीमुळे ..बँकेत एसी नसतांना एसी पेक्षा बेस्ट थंडावा मिळायचा ..आणि या दिवसात एडीबी शाखेत फारशी चेहाल -पेहल नसायची .. एक-प्रकारचा आरामशीर असा सुस्तपणा एडीबी शाखेत असायचा ..फक्त उन्हाळ्याच्या थोड्या दिवसापुरता .
आणि अशातच जून उजाडायचा ..आणि अर्धा जून संपत संपता - ज्या -ज्या गावात पाउस झाला .त्याच्या , दुसरे दिवशी त्या-त्या गावचे समदे शेतकरी .त्यांच्या गावी थांबलेल्या मुक्कामच्या एसटी ने तडक परभणीला निघत .आणि सकाळ पासूनच मोंढ्यातल्या बँकेत येऊन ..भल्या मोठ्या अंगणात झाडाखाली बसून राहायचे ..बँक कदी उगडते की बापा ..असे म्हणत फराकतपणे बसून रहात ,
माझ्या साठी हे दृश्य नवीन होते ..अकरा -बारा च्या सुमारास तर पंचक्रोशीतल्या गावातून आलेले शेतकरी बंधू .. सोबतच्या पिवशीत शेतीचे कागदं घेऊन आलेले असायचे ..जसा जसा पाउस वाढे तास तशी बँकेतली गर्दी वाढत जायची ,"गेल्या साला पेक्षा ,यंदा पाउस कृपा कशी असेल "हा हवामानाचा अंदाज गाव-गावातून आलेल्या त्या शेतकरी बंधूच्या चेहेर्याकडे बघून कळत असे.
पीक कर्ज , कमी मुदितीचे आणि दीर्घ मुदत कर्ज , शेतीसाठी आवश्यक असणारे मशीन .एक न अनेक मागण्या घेऊन एकच गर्दी आणि कर्ज वाटप हंगाम म्हणजे पावसाला सिझन ..या दिवसात फिल्ड ऑफिसर आणि त्याच्या टीम मधले क्लार्क ,हे त्यांच्या एरियात असलेल्या गावातील शेतकऱ्यांशी बोलण्यात ,कर्जखाते कागदपत्र तयार करण्यांत अगदी व्यग्र आणि व्यस्त होऊन जायचे ..पाठ -मान एक करून .काम करीत राहणाऱ्या माझ्या या सहकारी मित्रांचे मला नेहमीच कौतुक वाटायचे .. " डोक्यावर बर्फ का गोला - हाथ मे चाय का प्याला " अन गोड गोड बोला .हे सूत्र वापरीत पब्लिक ने भरलेल्या एडीबी मध्ये रेनी-सिझन फुल वर्क लोड संपत असायचा ..इतका की प्रसंगी घड्याळे निरोपयोगी होऊन जायची , आणि रविवार सुद्धा कामाचा दिवस होऊन जायचा .
सकाळी सकाळी गाव सोडून बँकेत आपले काम होईल आणि पीक -कर्ज मिळेल या आशेने आलेला भाऊ .संध्याकाळी नाराज होऊन परत जाता कामा नये ",
हा मोठ्या साहेबांचा आदेश अमलात आणला जायचा ..या कामाच्या पद्धतीमुळे ..इतक्या वर्ष नंतर ही ..काम झाल्याचा खुशीत घरी जाणरे समाधानी चेहरे मला आठवतात .
या एडीबी शाखेत मी १९८६ ते १९९६ अशी तब्बल दहा वर्ष काम केले ..कर्ज वितरण ,कर्ज खात्याचे कागदपत्र भरणे ",ही किचकट आणि महत्वाची कामे मी भले ही केली नसतील ..पण या कामात गुंतलेल्या सहकारी मित्रांच्या इतर रुटीन कामाचा बोजा .मी एकट्याने सांभाळत असे ..असे असले तरी या सर्वांच्या कामाच्या मनाने मी त्यंच्या कामाचा बोजा हलका करणे ..ही फार किरकोळ गोष्ट होती पण मला यात मोठा आनंद मिळायचा .
तसे पाहिले तर इतरबँकेच्या इतर शाखांचे कार्य स्वरूप वेगळे होते आणि कृषी विकास शाखेचे काम खूप वेगळे होते ,
माझ्या आठवणी प्रमाणे १९८० ते १९९० या दशकात १०० च्या वर दत्तक गावं होती .ती नंतर आजूबाजूच्या गावी बँक -शाखा उघडली तेंव्हा त्या शाखेकडे वर्ग करण्यात आली ..तरी पण कृषी विकास शाखेचा कार्यभार आणि कार्यविस्तार खूपच मोठा होता ..आणि शेती आणि शेतकरी ..यांच्या साठी खरोखरच सामाजिक दृष्टीकोनातून बँकेने नेहमीच कार्य केले " हे मोठ्या अभिमानाने सांगण्यास मला आनंद वाटतो.
एडीबी मध्ये फिल्ड ऑफिसर म्हणून येणारे अधिकारी अन्य गावाहून बदलून आलेले असायचे ..कारण बँकेच्या नियमानुसार ऑफिसरची बदली दर तीन वर्षांनी होतच असे .. यामुळे कृषी विकास शाखेत फार जुने न झालेले आणि एकदम नवीन बदलून आलेले असे दोन्ही प्रकारचे ऑफिसर असायचे ..बीड ,उस्मानाबाद ,लातूर , नांदेड , औरंगाबाद या जिल्ह्यातले ऑफिसर या एडीबी शाखेत असायचे .. इथे आल्यावर त्याचे नव्याचे नौ दिवस संपले की त्याचे आणि दत्तक गावाचे छान जमायचे ..हसून खेळून .सगळ्यांशी जुळवून घेत ३ वर्षे पार पडायची या ध्येयाने हर एक जन आपला कार्यकाळ पार पाडून स्व-गावी किंवा इच्छा असलेल्या गावी बदली झाल्याच्या खुशीत एडीबी ला राम राम करीत असे.
कर्जवसुली मेळावे , ठेवी संकलन मेळावे , कापूस आणि उस या पिकांच्या वेळी कार्ड वर बँकेच्या कार्च्जाची नोंद करणे , कर्ज याद्या करणे आणि त्या साठी सकाळी बँकेच्या जीपने ठरलेल्या दिवशी दौरे करणे ..हे वेळापत्रक प्रत्येक ऑफिसर ला कसोसीने पाळावे लागायचे ..अशावेळी सोबतीला टीम मधला एखादा क्लार्क -भाऊ असे...दौरा करून परत आलेकी रोजची ड्युटी ,ती पण करायची ..या दौर्यांचे टीए बील मात्र मिळायचे ..हा सहारा पुरेसा होता.
हे ऑफिसर जरी बाहेरगावचे असले तरी कारकून -मंडळी लोकल परभणी ... आणि ही सगळी मंडळी कृषी विकास शाखेतल्या कार्य्पाध्तीत प्रवीण होती ...
मी ज्यांच्या बरोबर काम केले त्यातले .सुधाकर दुब्बेवर , अभय कोकीळ , प्रकाश द्न्नक , मधुकर बोरीकर , गणेश वाघ , कोल्हेकर ,उत्तम त्रीनागरे ,सूर्यवंशी ,अमीर आली , हकीम फारुखी , एस.के. जाधव , डी.जी .दुब्बेवार ,नंदकिशोर रोप्लेकर ,गोपाल साळुंके , कमलाकर उन्हाळे , प्रकाश बीडकर ,सुधाकर वळसे , अब्दुल कदर , असे अनेक नावे आठवतात ,
मला लाभलेले मनेजर - बी.डी.भोपे , एल.एस.पाचपोल , बी.एस.तिवारी , एस.टी.जोशी , ए.वाय .सोमवंशी ,एस.एम.दरक
आणि अकौंटंट म्हणून लाभलेले अधिकारी ..भास्करराव गंगाखेडकर , बी.एन.पाठक ,डी.डी.आडिवरेकर , डी.डी.महाले
अशी काही नावं आठवतात
.फिल्ड ऑफिसर सोबत मी अधुन्म्मधून दत्तक गावी जात असे ..अशा वेळी कर्ज मेळाव्यात "कर्ज परतफेडीचे महत्व "या विषयी प्रबोधनपर बोलत असे ..आणि बचत मेळावा असे त्यावेळी ..बचत महत्व , ठेवीचे पायदे यावर बोलत असे ..
परभणी शहरापासून ३०-४० कि.मी अंतरावर असलेल्या अनेक दत्तक गावी मी ऑफिसर बरोबर जाऊन समाजिक दृष्टीकोनातून जन-जागृती करू शकलो याचे मोठे समाधान आहे . काही गाव ज्या ठिकाणी मी गेल्याचे आठवते ..
एरंडेश्वर , नांदगाव , आडगाव -रंजेबुवा , दैठणा , ब्राम्हणगाव , अजन्सोंडा ,हट्टा, जवळाबाजार ..
झिरो फाटा- एरंडेश्वर या मध्ये जी मूक-बधीर मुलांची शाळा आहे ..या शाळेचे मुख्याधापक नियमित एडीबी शाखेत येत , त्यांच्या सोबत मी अनेकदा या शाळेत जाऊन मुलांना आवर्जून भेटत असे. बँकेने सुद्धा या शाळेला उपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या .
बँक के कामकाज मी हिंदी का प्रयोग " या उपक्रमात मी आणि सहकारी मित्रांनी मिळून इतके जोदार काम केले की
१९९० -९२ (बहुदा ) या वर्षात एकूण (त्यावेळच्या ) ७५० शाखे मधून आमच्या एडीबी शाखेचा २ रा क्रमांक आला आणि एडीबी ब्रांच ला द्वितीय क्रमांकाची : राजभाषा शिल्ड " मिळाली .याच उपक्रमात माझे सहकरी मित्र श्री.राजेंद्र कोल्हेकर यांचे मदतीने मी वर्षभर .पाक्षिक स्वरूपाचे "हिंदी वर्धन "हे भित्ती पत्रक हस्तलिखित स्वरूपात प्रकाशित केले जे आम्ही बँकेच्या ४ ही शाखेत लावीत असू ..या हिंदी-वर्धन हस्तलिखित उपक्रमाला बँकेत आलेल्या कस्टमर नी सुद्धा छान प्रतिसाद देऊन आमचे कौतुक केले .
मित्र हो - एडीबी चे १९८६ ते १९९६ हे दशक सर्वार्थाने "सुवर्णक्षण असलेले " आहे. या काळात मला सहवास लाभलेल्या सर्व सहकारी मित्रांचे मन:पूर्वक आभार मानतो.
पुढच्या लेखात आजून असेच काही .....!
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------
लेखमाला - आठवणीतलं गावं परभणी
-लेख- ९ वा - हैद्राबाद बँक ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342