Saturday, February 28, 2015

माझाये नवे ई-बुक - " स्नेहबंध - चारोळी संग्रह.


नमस्कार रसिक मित्र हो-
माझ्या या नव्या ई-बुक- "स्नेहबंध -चारोळी संग्रह -Free Copy साठी कृपया तुम्ही तुमचा Email id प्रकाशकांना कळवावा .- netbhaari@gmail.com या मेल आयडी वर.
स्नेहबंध आज येतोय भेटीला
आपली प्रत राखून ठेवा
स्नेहबंध : ई चारोळी संग्रह
कवी : श्री. अरूण देशपांडे ...
See More

Wednesday, February 25, 2015

कविता - जितुके- तितुके ...!

कविता - जितुके- तितुके …!
-अरुण वि. देशपांडे -पुणे
-------------------------------------------
सामोरे जाणे भिडणे प्रश्नाला
हेच खरे आव्हान रे मनाला
तू सारे टाळशील  हे जितुके
दूर पळणे सोपे नसे तितुके ….!

भाबड्या मनाने नसते कधी
 लढायची जिंदगीची लढाई
आपली वाटतील जे जितुके
होती  क्षणात परके तितुके ….!

संस्कार जरी देती आपणासी 
भान जीवन  जगण्याचे सदा
अवडंबर नसावे याचे कधी
आचरणी जितक्यास तितुके …!

मिळे आयुष्य एकदाच हे
मनापासुनी ते जगूनी घ्यावे
मिळे रे आपणासी जे जितुके
आनंद देण्या पुरेसे तितुके …!
-------------------------------------------------------------------
कविता - जितुके- तितुके …!
-अरुण वि. देशपांडे -पुणे
-------------------------------------------------------------------------

Friday, February 13, 2015

३६-व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष्य-श्री.लक्ष्मीकांत देशमुख यांचा परिचय.

आपल्यासाठी एक गौरवपूर्ण असा दिन-विशेष आहे..
त्या निमित्ताने-
३६-व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष्य-श्री.लक्ष्मीकांत देशमुख
यांचा परिचय.
--------------------------------------------------------------------------------------------------
स्नेहश्रीमंत "- श्री.लक्ष्मीकांत देशमुख.- लेखक आणि प्रशासक -अधिकारी.
----------------------------------------------------------------------------------------------
माणसांच्या नशिबात काही श्रेष्ठ असे भाग्यकारक -योग असतात ,ज्यांचा परिणाम आपल्या वैयक्तिक आयुष्यावार आणि जीवनावर होत असतो. असाच एक श्रेष्ठ -भाग्यकारक योग ", माझ्या वाट्यास १९९३ ते १९९६ या तीन-साडेतीन वर्षाच्या काळात आला . परभणीच्या साहित्यिक मित्रांच्या जडण-घडणीला अतिशय महत्वपूर्ण असा हा कालखंड होता. याच दरम्यान श्री.लक्ष्मीकांत देशमुख परभणीला डे.कलेक्टर या पदावर बदलून आले , मसाप -परभणी च्या विविध -कार्याक्रम्न्च्या निमित्ताने त्यांच्याशी परिचय झाला ,ओळख दृढ होत गेली ,आणि आज २२ वर्षे झाली असतील ,त्यांच्याशी असलेल्या स्नेह्बंधाला अधिकच खुमारी आलेली आहे.
परभणीच्या वास्तव्यात देशमुखांनी साहित्यिकांना एकत्र जमवले , कार्याकामंची रेलचेल सुरु झाली होती. शासकीय अधिकारी असलेल्या व्यक्तीचा सहवास लाभण्याचा माझ्या वाट्यास आलेला हा पहिलाच प्रसंग होता.त्यामुळे देशमुख हे "साहेब" आहेत ही संकोची भावना त्यावेळी होती आणि आज ही ती तसीच आहे. मला वाटायचे -त्यांना त्यांचा हा मोकळेपानाचा -दिलदारपणाचा स्वभाव शोभून दिसणारा आहे ", याचा अर्थ असा नाही की- आपण अघळ-पघळपणा दाखवून त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचे प्रदर्शन करीत फिरावे. देशमुख तसे मोठे "मनकवडे -मित्र आहेत" ,ते अनेकदा म्हणायचे "अहो आपण मित्र आहोत ,इतके भीडस्तपणे वागू नका " ,पण इतक्या मैत्रीत ही आमच्यात एक "निदान-रेषा ", निदान मी स्वताःपुरती आखून घेतलेली होती .
खूप वर्षांपूर्वी -साहित्य-सूची अंकात -मी त्यंच्यावर एक लेख लिहिला होता "द्वारकेचा राणा "- त्यातल्या प्रमणे ते "कृष्ण -आणि आम्ही सुदामा - अशी माझी स्नेह -भावना व्यक्त केली होती.आजही अशीच भावना माझ्या मनात आहे
नवे-नवे उपक्रम सुचणे आणि ते अंमलात आणल्याशिवाय स्वस्थ न बसणारे देशमुख - इतरांना आपल्या बरोबर कायम कार्यरत ठेवतात "हा त्यांचा " गुण-विशेष " मला फार प्रभावित करून गेलेला आहे. त्यांच्या कार्यकालात त्यांनी -परभणी जिल्हा साक्षरता अभियान समितीची स्थापना केली.. आणि या समितीत लेखक-आणि कलावंत यांना सदस्य म्हून सहभागी करून घेतले , आम्ही नोकरदार -लेखक या बहुमानाने मोहरून गेलो. त्यांनी आम्हा सगळ्या लेखक -मित्रांना साक्षरता -अभियाना साठी लेखन करायला लावले ..
देशमुख साहेब्न्च्या स्वभावात असलेल्या - निर्मल भावनेचा आणि निरपेक्ष -कार्य-पूर्ततेचा " हा आनंद होता , ज्यात आम्ही सहभागी होतो.
खर तर याही पेक्षा खूप अविस्मरणीय असा अनुभव -१९९५ सालचा आहे - ६८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन - अध्यक्ष्य होते कविवर्य -नारायण सुर्वे . साहित्य संमेलनाच्या आयोजन-इतिहासात परभणीच्या या साहित्य -संमेलनाची एक यशस्वी -संमेलन म्हणून आज ही उल्लेख केला जातो. लक्ष्मीकांत देशमुख या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष्य होते.. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीम-मध्ये .."बाल-मेळावा -कार्यवाह "म्हणून मला कार्य करण्याची संधी मिळाली , आणि आज साहित्यिक म्हणून आणि मराठवाड्यातील बाल-साहित्यात कार्यकर्ता -म्हणून माझी जी ओळख आहे -त्याचे सगळे श्रेय या माझ्या स्नेह्यास आहे..
२००७ ते २००९ या दरम्यान लक्ष्मीकांत देशमुख यांनी "क्रीडा -आयुक्त -पुणे" या पदावर कार्य केले आणि त्यांच्या कार्य-कुशल प्रवासातला एक यशस्वी अध्याल लिहिला गेला. त्यांच्या या कार्यकालात - १. १३ वा - राष्टीर्य युव-महोत्सव आयोजित केला गेला, आणि २००८ मध्ये - "राष्ट्रकुल युवा -क्रीडा स्पर्धा "संपन्न झाल्या , या साठीचे
बालेवाडी -पुणे येथे अद्यावत असे क्रीडा संकुल - एप्रिल -२००७ पासून केवळ २० महिन्यात उभारले गेले
हा कालखंड त्यांच्या साठी मोलाचा ठरावा असाच होता.
१९९६ नंतर परभणीच्या आणि मराठवाड्याच्या बाहेर ही , देशमुखसाहेब्न्च्या भेटी अनेक ठिकाणी अनेक प्रसंगात होत असतात , त्यात त्यांच्या अनेक महत्वाच्या कार्यक्रमास मी आवर्जून हाजीर राहिलो आहे. उदा- साहीर लुधियानवी -बलराज सहानी फाउंडेशन- पुणे यांचा पुरस्कार -त्यांना जाहीर झाला तो कार्यक्रम , ३-रे शाशकीय साहित्य सम्मेलन ऑक्टोबर -२०११ मध्ये पुण्यात झाले - लक्ष्मीकांत देशमुख या साहित्य- संमेलनाचे अध्याक्ष्य होते.
शासकीय सेवेत असतांना कोल्हापूर यथे त्यांनी "बेटी बचाव " हा उपक्रम राबवला ,या उपक्रमाने देशमुख यांच्या सामाजिक -विचारांची आणि जाणीवेच्या कार्याची देशभरातून दाखल घेतली गेली आहे.या उपक्रमाने देशमुखांना एक ओळख मिळाली .त्यांच्या या गौरवपूर्ण कार्याचा एक मित्र म्हणून खूप अभिमान वाटतो.
कलेक्टर - कमिशनर " या खुर्च्या जबाबदारीच्या असतात पण लेखक -,देशमुखांनी या सर्व धबडग्यात - आपले लेखन थांबवलेले नाही .ते सातत्याने विविध आणि विपुल लेखन करीत आहेत .नजीकच्या काळात त्यांचे हे साहित्य पुस्तक - रूपाने येतच रहाणार आहे.
लेखक- कादंबरीकार -कथाकार -म्हणून लेखक- लक्ष्मीकांत देशमुख यांना साहित्यातील प्रतिष्ठा-प्राप्त असे साहित्य -पुरस्कार आणि मान-सन्मान प्राप्त झाले आहेत
त्यांच्या प्रकाशित साहित्याची ही एक झलक -खालील प्रमाणे.-
-------------------------------------------------------------------------------------------------
१. इन्किलाब विरुध्द जिहाद - (२००४ ) राज्यपुरस्कार आणि इतर पुरस्कार प्राप्त कादंबरी
अंधेरनगरी - कादंबरी ( १९९४ ) , ऑकटोपस -(२००६ ) , बखर -(२०११ ) या त्यांच्या बहुचर्चित कादंबर्या आहेत.
२. पाणी .! पाणी ! (२००३ -दु.आ. ) , अग्निपथ -(२०१०) , नंबर वन ( २००८) , अंतरीच्या गूढ गर्भी -(१९९५) , ही त्यांच्या काही कथा- संग्रहाची नावं.आहेत
अशा या माझ्या मित्राच्या साहित्यिक जीवनात एक गौरवाचा क्षण आलेला आहे . १४-१५ फेब्रुवारी- २०१५ , नांदेड येथे संपन्न होणार्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष " म्हणून श्री .लक्ष्मीकांत देशमुख यांची एकमताने निवड झालेली आहे.या बहुमांच्या निमित्ताने आपल्या मित्राबद्दल व्यक्त होण्याची संधी मला मिळते आहे.
श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांचे मन:पूर्वक अभिनंदन.आणि साहित्य संमेलनास शुभेच्छा .
स्नेहांकित -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
arunvdeshpande@gmail.com
mo- 9850177342
-----------------------------------------------------------------------------------------------------
Like ·
·