Monday, May 18, 2015

कविता- जीवनातले ऋतुचक्र हे रोज नव्याने येते ..!

कविता -  जीवनातले ऋतुचक्र हे रोज नव्याने येते ..!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------------------------
जीवनातले ऋतुचक्र हे रोज नव्याने येते
दिवस ढळतो असाच  ,रात्र तशीच सरते …!

मुक्त हस्ते अमापसे निसर्गाचे देणे असते
माणूस हावरट  ,ओरबाडणे चालू असते
जीवनातले ऋतुचक्र हे रोज नव्याने येते …
दिवस ढळतो असाच ,रात्र तशीच सरते …!

अंदाधुंद कारभार ,व्यवहार फसवे सारे ते
फायद्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार ते
भान विसरुनी जाते यात सारे ,काही न कळते
दिवस ढळतो  असाच  ,रात्र तशीच सरते …!

लाभले  आयुष्य कशासाठी ?, काय आपण करतो ,?
विचार कुणी याचा करता , वेडा तो मग ठरतो
सुखाच्या कल्पना भ्रामक , मनात कुणी रंगवतो
मन रमते यात सहज  ,बाकी सारे विसरते ।!

जीवनातले ऋतुचक्र हे रोज नव्याने येते
दिवस ढळतो असाच  ,रात्र तशीच सरते …!
------------------------------------------------------------------------------------------------------------
कविता - जीवनातले ऋतुचक्र हे रोज नव्याने येते ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, May 15, 2015

कविता - माणसाची ...!

कविता - माणसाची …!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------------------------------
माणसे भेटती रोजला  नित्य नव्या रुपात इथे
नाना कळा त्यांच्यात , आहेत तऱ्हा तितक्याच इथे ..।। १ ।।

कुणी भोळा-कुणी गाभोळा, हर गोष्टीवरती डोळा
धेपी गुळाच्या पाहुनी ,लगेच होती हे सारे गोळा  ।। २ ।।

सफाईदार बोलणे , रुबाबदार यांचे दिसणे
क्षणात भुलती भोळे जन , पाहुनी  रूप देखणे   ।। ३ ।।

साध्या मनाच्या माणसाची इथे हो असते परीक्षा
सराईत सदा सलामत , साध्याच्या नशिबी शिक्षा  ।।४ ।।

स्वार्थात गोडी असे मोठी ,माणसा आंधळा करते
चांगले तर कधी घडत नाही , वाईट ते सारे घडते   ।। ५ ।।
---------------------------------------------------------------------------------------
कविता - माणसाची …!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------------------------------------------------

Thursday, May 14, 2015

लेख- मन-मित्र आपुला.

लेख -
मन एक मित्र आपुला ..!
(मनाच्या अंगणात -लेख-संग्रहातून )
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------------------------------------
"आपले मन "- आपला मित्र असते .त्याच्या बरोबरच संवाद  आपल्यासाठी हितकारक असतो. यालाच मनाचा -"आतला आवाज " म्हणतात . "मनाचा कौल घेऊन निर्णय घेणारी मंडळी घाई-घाईने निर्णय घेतातच असे नाही . "निर्णयक्षमता " ही बुद्धी आणि भावना "यांचे मिश्रण असते.  म्हणजेच -"मन" या दोन्हीवर अवलंबून असते का ? हा कुतूहलाचा प्रश्न आहे.

आपल्या मनास समजावणे , त्याला जे-जे  वाटते ", सगळेच काही नेहमी बरोबर असते असेही नाही, मग अशा वेळी मनास खरेच काही समजत नाही .पण, अशा वेळी " "मन रे , तू काहे ना धीर धरे ?..!  असे त्याला विचारून अगर समजावून काही उपयोग होत नाही ,याचे कारण -"चंचल मन" ,त्याची अवस्था पाहून ,आपली अवस्था मोठी विचित्र झालेली असते.

"सांगू की नको ? ", बोलू की नको ? " , "मला नाही जमले तर ?" , मला लोक हसले तर ? ", याला काय वाटेल ? ", त्याला काय वाटेल ? " , अशा नकारात्मक गोष्टीत अडकून बसण्य पेक्षा हाती घेतलेले कार्य पूर्ण करावी हेच उत्तम असते. जास्तीत जास्त काय होईल ? - आपले कार्य पूर्ण होईल--किंवा होणार नाही., ते चांगले जमेल किंवा जमणार नाही ", याशिवाय वेगळे असे दुसरे काही होणार नाही . तेंव्हा मनापासून परिश्रम करणे हेच आपले काम असते,त्या साठी आपण मनाला आणि स्वतःला कार्यरत ठेवणे उत्तम.

आपले मन -एक साक्षीदार असते. आपण कधी त्याच्या कला -कलाने वागतो, कधी त्याच्या विरुद्ध वागतो "- अशा वेळी आपल्या मनात द्वंद्व  सुरु होते  "ऐकावे जनांचे- करावे मनाचे "- असे असले तरी ,आपल्याच मनापासून आपण काही लपवू नये . मनाला फसवले नाही या प्रामणिकपणाचा आनंद तर घेता येतो आयुष्यभर .
"गाठणे तळ मनाचा
  कार्य अवघे कठीण
   निर्धार अंतरी माझ्या
   शोधात निघालो माझ्या ...!

संतसंग आणि सत्संग " या दोन गोष्टींचा लाभ झाला तर आपल्या मनाचा कायापालट होऊन जातो .त्यासाठी आपल्याला "श्रीगुरू " भेटावा लागतो. श्री सद्गुरू चरणी निष्ठा ठेवून कार्य करीत राहावे.. मित्र हो- "मन समजून घेणे - ते उमजणे " म्हणजेच आपल्या भवतालीच्या - सहवासातील माणसांची खरी ओळख  पटण्यासारखे  आहे. माणसातला माणूस समजून घेण्यात आयुष्याचे सार्थक असते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख -
मन एक मित्र आपुला ..!
(मनाच्या अंगणात -लेख-संग्रहातून )
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, May 8, 2015

ढाळू नकोस ….!

कुसुमाकर मासिक -मे-२०१५ अंकात प्रकाशित कविता
-----------------------------------------------------------------------------
ढाळू नकोस ….!
----------------------------------------
ढाळू नकोस अनमोल आसवांना अशी
आठवेल तुला ,तुझे चुकले काय ,नि कधी ?

ये भानावर तर जराशी तुही आता
स्वतःचा विचार करणार कधी ?
ढाळू नकोस अनमोल आसवांना अशी
आठवेल तुला ,तुझे चुकले काय ,नि कधी ?
फसवणे हा एक खेळ सोपा इथला
कोण तरला ,कोण बुडला ,हिशेब ना कधी
ढाळू नकोस अनमोल आसवांना अशी
आठवेल तुला ,तुझे चुकले काय ,नि कधी ?
केले प्रेम मनापासुनी ज्याच्यावरती
त्याचेच नव्हते प्रेम तुझ्यावरती
बहारीचा वसंत गेला ,उजाड झाले कधी ?
जगणे आहे तुजला ,चुकणार नाही कधी ।
ढाळू नकोस अनमोल आसवांना अशी
आठवेल तुला ,तुझे चुकले काय ,नि कधी ?
-------------------------------------------------------
कविता -ढाळू नकोस …!
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२
------------------------------------------------------

संदुक आणि गाठोडे ...!

संदुक आणि गाठोडे ......!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------
पाण्यात साखर टाकली की ..ती हळुवारपणे विरघळून जाते..अगदी तसेच ..जुन्या  आठवणीत आपले मन अलगदपणे विरघळून जाते...ते हळवे क्षण , आठवणीत घट्ट रुतून बसलेली वर्ष ..त्या वर्षातले दिवस , हे सगळे आपण अगदी जीवापाड सांभाळून ठेवलेले असते ..मनाच्या संदुकात ..

.सन्दुक ...! जुन्या  पिढीने आणि आता जेष्ठ झालेल्या मंडळींनी पाहिलेली  एक उपयोगी वस्तू.. दर्शनी स्वरूप - धातूची एक मजबूत पेटी ..पण आपले मन यात इतके गुंतून गेलेले असते की ..या संदुकात ..असंख्य बहुमोल आठवणी ..साठवलेल्या असतात .कधी मोकळ्या तर कधी कुलुपबंद,कधी सगळ्यांशी शेअर करण्या सारख्या तर कधी एकांती - एकटयाने..हळुवार मनाने .डोळ्यातील थेंबांनी ,मनाशी साधलेला संवाद ...या आठवणीशी निगडीत असतो.

तसेच हे ओबडधोबड वाटणारे "गाठोडे ".. यात साठवलेले असते आपले व्याकूळ असे भावविश्व , आयुष्याचचे उन्हाळे-पावसाळे ..मोर पिसा सारखे या गाठोड्या तील .महावास्त्रात निगुतीने घडीत घडी करून ठेवलेल्या असतात. एकेक घडी म्हणजे आपल्या जीवन अनुभवाची कहाणी असते ..एकेक चिंधी .करून कहाणी असते, कधी ती कमावलेल्या क्षणांची असते तर कधी हातातून निसटून गेलेल्या संधीची असते..

निरुपयोगी झालेल्या गोष्टी "आपण टाकून देण्याची तयारी सहजतेने करतो ,पण या सन्दुक ला आणि या गाठोड्याला ", टाकून देण्याचा विचार सुद्धा मनात येणार नाही हे नक्की. काय ?, बरोबर ना ?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदुक आणि गाठोडे ......!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------------------------

Sunday, May 3, 2015

बाल -कविता - बाहुली कित्ती छानसी ...!

दै .देशोन्नत्ती --०३मे-१५, रविवार पुरवणीत प्रकाशित
------------------------------------------------------------------
बाहुली कित्ती छानसी …
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------------------------------
आईची असे लाडकी
म्हणते ती सारखी
परी ग माझी गोड ही
बाहुली कित्ती छानसी ...!

दादू भारी लाड करी
काही तरी आणतो तो
कामावरून जेव्न्हा
रोज येतो तो घरी ...!

पिंक पिंक ड्रेस माझा
बाबांना आवडे भारी
पाहून मला म्हणती
बाहुली कित्ती छानसी ...!

आजीच्या गावी जाता
गळ्यात तिच्या पडते
आजीच्या डोळ्यातली
माया सारी ती दिसते ...!

फिरायला जाते मी ही
असतात आबा सोबत
त्यांचे मित्र विचारतात
बाहुली कोण छानसी .?...!
-----------------------------------------------------------------------
बाल-कविता -
बाहुली कित्ती छानसी ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------