Thursday, February 15, 2018

लेखमाला - आठवणीतले गाव - परभणी - लेख -१९ वा - पाझरते झरे ..भाग-१ श्रीकांत सदावर्ते .

लेखमाला - आठवणीतले गाव - परभणी - 
लेख -१९ वा - पाझरते झरे ..भाग-१ 
श्रीकांत सदावर्ते .
------------------------------------------------------------------------
आठवणींचा जलाशय ..खोल आणि अथांग ,शांत आणि निशांत ..वार्याच्या झुळुकी येतात नि तरंग -वर्तुळे उठवूनी जातात , मित्रांनो , आठवणींचा असा जलाशय प्रय्त्येकाच्या मनात असतो .. या लाटा उसळून येत नाहीत  इथे 
या आठवणी जिव्हाळ्याच्या , आपलेपणाच्या , मायेच्या , प्रेमाच्या ,स्नेह-भावनेच्या असतात ..याना ओहोटी "नसते ,असते फक्त असोशी.
अखंडपणे आठवणी मनात  असतात , हे झरे अखंडपणे पाझरत असतात ..मन कधीच कोरडे होऊ देत नाहीत हे आठवणींचे झरे.
माझ्या साहित्य प्रवाहाचे उगमस्थान भले ही गंगाखेड हे गाव असेल , पण हा प्रवाह विस्तारित झाला तो परभणीच्या वास्तव्यात .. याचा इथे सन्मानपूर्वक उल्लेख करणे मला गरजेचे वाटते आहे.
माझ्या साहित्य प्रवासाला  ज्यांची साथ-सोबत लाभली , ज्यांच्या सोबतीने माझी वाटचाल झाली आहे .अशा सहप्रवासी मध्येच साथ सोडून कधीचे दूरदेशी मुक्काम्मी निघून गेले गेले आहेत , त्यांच्या आठवणी मनाला मोठ्या व्याकूळ करणार्या आहेत..
साहित्य -लेखन करणाऱ्या एखाद्या नवोदिताला जेव्न्हा जाणत्या साहित्यिकाचा सहवास लाभात असतो ..ते क्षण मोठे भाग्यकारक असतात .. असे दिवस,माझ्या वाट्याला परभणीत असतांना खूप वेळा आले ..त्या पैकी काही आठवणीना आज पुन्हा उजाळा द्यावासा वाटतो..

गेल्या पिढीतील अनेक साहित्यिकांची मराठवाड्यातील साहित्यात आणि .. त्यावेळच्या समकालीन महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात योग्य  ती नोंद झालेली नाहीये ..त्यामुळे त्यांच्या साहित्याची ..कार्याची .दखल घेणे राहूनच गेले असे म्हणावे वाटते.
अशा साहित्यिकात ..एक जेष्ठ लेखक-कवी  श्रीकांत सदावर्ते यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे असे वाटते. माझ्या उमेदवारीच्या काळात ..सदावर्ते यांच्या घरी ..अनेकवेळा साहित्यिक संवाद भेटी होत असत ..त्यांच्या कौतुकास मी पात्र ठरत गेलो ..ही गोष्ट माझ्या मनास नेहमीच आनंद देणारी आहे.

श्रीकांत सदावर्ते आणि   रे.स.चौधरी यांच्या कल्पनेतून  साकार झालेले   कवितेचे व्यासपीठ .." काव्य रजनी मंडळ ", . या उपक्रमामुळे समस्त कवींना या दोन थोर व्यक्तींचे  कधीच विस्मरण होऊ शकणार नाही , परभणीच्या परिसरातील कवींची एक पिढी काव्य -रजनी मंडळ " या माध्यमामुळे साहित्य क्षेत्रात आत्मविस्वास -पूर्वक पुढे आली. काव्य-रजनीचे  कवी-समेलन , वार्षिक -मेळावे असे अनेक उपक्रम मराठवाड्यातील कविता रसिकांना नेहमीच आठवणीत राहतील.

काव्य-रजनी मंडळ आयोजित कवी- संमेलन असले की .एक श्रोता  म्हणून मी आवर्जून हजार असे ..याचे कारण  कवी समेलनसाठीचे "श्रीकांत सदावर्ते यांचा येणारा फोन ..ते म्हणत -
" या बरं का अरुणराव तुम्ही पण ..! , हे निमंत्रण माझ्यासाठी मी नेहमीच एक आदेश मानला होता. ते नेहमी म्हणत .अहो ,आपण साहित्यिक म्हणवतो न स्वतःला ..मग ,अशा ठिकाणी, अशा कार्यक्रमाला आपण  आलं -गेलंच पाहिजे त्याशिवाय आपली बांधिलकी आहे हे लोकांना कसे कळणार ? 

तुम्हे कथा लेखक आहात ..माहिती आहे ..याचा अर्थ तुम्ही या पुढे कविता लिहू नये असा थोडाच आहे ..चला ,तुम्ही पण कविता लिहा , चुकली तर चुकू द्या ..मी आहे ना..,मी शिकवीन तुम्हाला कविता, मग तर झालं ? 
तुमच्या कवितेला हसणार नाही, की तुम्हाला हसणार नाही,
अहो..प्रत्येक कवीला हे असे सहन करावेच लागते ..मी सुद्धा सुटलो नाहीये  या चक्रातून.

अरुणराव ..एक लक्षात असू द्या ..लेखन करा.ते कोणते ही असू द्या ..पण..त्यावर तुमची निष्ठा असू द्या ..मगच लेखन करा , तरच तुमचे लेखन "जान -दार " होईल ..सत्व असेल त्यात ..ते निर्जीव लेखन नसेल ...
मराठी इतकेच त्यांचे उर्दू वर प्रेम होते ,प्रभुत्व होते ..शेरो-शायरी आणि नजाकत "मी नेर्ह्मीच अनुभवलीय त्यांच्या बोलण्यातून .

श्रीकांत सदावर्ते यांचा  बराचसा लेखन काळ हा निझाम -कालीन मराठवाड्यातला , त्यानंतर मराठी-मराठवाड्यातील साहित्य क्षेत्रात त्यांनी कथाकार -आणि कवी म्हणून विपुल लेखन केले .
श्रीकांत सदावर्ते मोठ्या ताकदीचे कथा लेखक होते ..याची प्रचीती त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींनी  वाचकांना आलेलीच आहे . एक कवी म्हणून त्यांनी विपुल कविता लेखन केले ..भाव कविता हा त्यांच्या कवितेचे आकर्षक असे रूप होते ,अनेक कवी- संमेलनातून त्यांच्या कवितांनी रसिकांना आनंद दिला आहे..

मराठवाडा साहित्य परिषद परभणी , अक्षर प्रतिष्ठा परभणी ..या  महत्वाच्या साहित्य संस्थांनी साहित्यिक श्रीकांत सदावर्ते यांच्या साहित्य योगदानाची दखल घेतली .. झरी येथे संपन्न झालेल्या .परभणी जिल्हा साहित्य समेलन चे श्रीकांत सदावर्ते हे अध्यक्ष होते .. या संमेलनात कथा-कथन सत्राचे सूत्र संचलन माझ्या कडे होते - माझ्या आठवणी प्रमाणे - याच संमेलनात एक नवा कथाकार मराठवाड्याला लाभला ..त्या तरुण कथाकाराचे नाव- राजेंद्र गहाळ .

श्रीकांत सदावर्ते सारख्या -  सहृदय मार्गदर्शक आणि एका लिहित्या साहित्यिकाच्या सहवासाचा लाभ मला झाला हे माझ्ये भाग्यच.
 यांच्या प्रेरणेमुळे मी कविता लेखन सुरु केले ..आणि काव्य -रजनी मंडळाने वेळोवेळी मला कविता सादर  करण्याची संधी दिली .केवळ या बळावर .आज इंटरनेटवर मी एक परिचित कवी झालो आहे ..माझ्या कविता आणि बाल-कविता , चारोळ्या , हायकू रचना " असे विपुल काव्य लेखन ई-बुक स्वरूपात ओन-लाईन उपलब्ध आहे. , याचे श्रेय मी श्रीकांत सदावर्ते आणि कवी रजनी मंडळ यांना देईन.

श्रीकांत सदावर्ते यांना माझ्या बद्दल आपुलकी असण्याचे आणखी एक पारिवारिक -भावनिक कारण होते ..ते म्हणजे 
माझे सासरे प्रभाकरराव बसोले -हिंगोली , आणि श्रीकांत सदावर्ते हे नोकरीतले सहकारी-मित्र , या नात्यामुळे सदावर्ते सर माझ्याशी नेहमीच अतिशय आपलेपणाने बोलत असत ..त्यांची कौतुकभरी नजर , आणि शब्द माझ्यासाठी त्यांची शाबासकीची थाप असायची . माझ्या कथा लेखनाचे ते वाचक होते तसेच ते माझे टीकाकार होऊन , माझ्या लेखनात असलेले दोष मोठ्या प्रेमाने दर्शवून देत .."त्यांच्या या दिशा -दर्शनाचा मला माझ्या पुढील लेखन प्रवासात नेहमीच उपयोग होत आलेला आहे.

मराठवाडा साहित्य परिषद परभणी , अक्षर प्रतिष्ठा परभणी ..या  महत्वाच्या साहित्य संस्थांनी साहित्यिक श्रीकांत सदावर्ते यांच्या साहित्य योगदानाची दखल घेतली .. झरी येथे संपन्न झालेल्या .परभणी जिल्हा साहित्य समेलनचे श्रीकांत सदावर्ते हे अध्यक्ष होते .. या संमेलनात कथा-कथन सत्राचे सूत्र संचलन माझ्या कडे होते - माझ्या आठवणी प्रमाणे - याच संमेलनात एक नवा कथाकार मराठवाड्याला लाभला ..त्या तरुण कथाकाराचे नाव- राजेंद्र गहाळ .

परभणीच्या साहित्यिक उपक्रमात श्रीकांत सदावर्ते यांची उपस्थिती नेहमीच प्रेरक असे. समवयस्क असो व माझ्या सारखे नवोदित ..सर्वांशी मोकळेपणाने संवाद साधने हे त्यांच्या वागण्यातला मोठा विशेष गुण होता .सर्वाप्रती स्नेह " हे त्यांची शिकवण मला नेहमीच भावली. या लेखाच्या निमित्ताने या जेष्ठ साहित्यिक स्नेह्याचे हे स्मरण .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - आठवणीतले गाव - परभणी - 
लेख -१९ वा - पाझरते झरे ..भाग-१ 
श्रीकांत सदावर्ते .
--------------------------------------------------
-अरुण वि.देशपांडे - पुणे.
९८५०१७७३४२ 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Monday, February 12, 2018

मिशी "उपक्रमात प्रसिद्ध झालेली कथा - दि-१८-०१-२०१८

मिशीची गोष्ट
लेखक - श्री.अरुण वि.देशपांडे
-------------------
रंगाने गोरेगोमटे, गुळगुळीत चेहेर्याचे ,राजस व्यक्तिमत्व लाभलेले पाहून त्यांना " सेम सिनेमातल्या हिरो सारखा दिसतो " अशी कौतुकाची पावती देतो . एक नूर आदमी- दस नूर-कपडा ", हे अशा माणसांनी सार्थ करून दाखवलेले असते , साधारण व्यक्तिमत्व लाभलेली माणसं.आपण कसे दिसतो या फंदात पडत नसावीत ,त्यांना मनातून हे पक्के समजलेले असते की आपण "हिरो सारखे राहिलो तर अधिकच बावळट दिसुत."
यांच्या उलट दाढी -मिशी ,किंवा नुसती मिशी बाळगून असलेल्या माणसांची मिजास लगेच आपल्या नजरेत पडते ,या माणसांना " आपले जरा हटके असे दिसणे ..ते समोरच्यांना थोडे थोडे का होईना आवडते हे ठाऊक असणे "याची पुरेपूर खात्री असते.
मला माझे लहानपण आठवते ..त्या दिवसातील आठवणीं आता ६० वर्षे इतक्या जुन्या झाल्या आहेत , मराठवाड्यातील ती वर्षे मोगलाई जमान्यातील होती .. मुसलमानी अंमलाखाली असलेल्या या भागात ..दाढी -मिशा , नुसत्या मिशा असणारेच सरसकट दिसत असत . " मिशा नसलेलेला सफाचट चेहेरा दिसला के समजावे ..याच्या घरी काही तरी दुर्दैवी प्रसंग घडला आहे " , कारण, या शिवाय मुंडन आणि मिशा अशा स्थितीत पुरुष मंडळी दिसत नसत , फिरत नसत " अशा अपवादात्मक परिस्थिती व्यतिरिक्त ..मिशा नसलेले चेहेरे अजिबातच दिसत नसत असे म्हटले तरी चालेल .
मिशा आणि त्याचे प्रकार व्यक्ती गणिक वेगवेगळ्या असत ..त्यात ही - पल्लेदार मिशा ,भरघोस मिशा ,तलवार कट मिशा , हिटलरी -मिशा , आणि ओठांवर महिरप वाटावी , रांगोळीची बारीक रेघ वाटावी अशी रेषेदार मिशा , यात एक गोष्ट साध्य होते असे ती म्हणजे ..मिशा नसल्याचा फील , आणि बारीक का होईन पण मिशा आहेत, हे समोरच्याला दिसण्याची खात्री .
नोकरी करणारी माणसे , व्यावसायिक माणसे ..अशी सर्व माणसे निगुतीने मिशा राखीत ...त्यामुळे ..पोरगेल्या वयात जर मिसुरडे फुटायला उशीर होऊ लागला तर तो पोरगा ..भेदरून गेलेल्या अवस्थेत वावरत असे ..असा या मिशांचा सार्वजनिक धाक आणि दरारा होता . आपल्या पोराच्या ओठावर केसाची कोवळी लव..उमटते आहे हे पाहून, " पोरगा हाताला येतय बरं का " याची चाहूल लागल्याने त्या पिढीतले बाप आनंदित होत असत.
श्रमिक -जगतातल्या गडी- माणसांना मिशी नसणे ही कल्पने पलीकडली गोष्ट होती , या मजबूत माणसांचे चेहरे त्यावर असणार्या मिशी मुळे अधिक गूढ -गंभीर वाटत असत.
दिलखुलास स्वभावाची माणसे त्यांच्या मिशी -प्रभावामुळे हसत असत त्यावेळी त्यांच्या मिशा मिश्कील वाटू लागत. तसे तर गालातल्या गालात हसणे " हे नेहमीच दिसणारे दृश्य , पण " हे मिशीतल्या मिशीत हसणे " किती पहानेबल असते , त्यासाठी एखादा मिशाळ -मिशीवाला आपल्या समोर असायला हवा .
आजोळच्या गावी गेल्यावर ..त्या दिवसात .खूप मजा येत असे ..त्या छोट्या खेडेगावात बाहेर पडले की आजूबाजूला अनेक मिशीवाले मामा ,आजोबा ,घर बाहेर असलेल्या ओट्यावर, मंदिराच्या पारावर , आरामात गप्पांचा फड रंगवतांना दिसत, अशा ठिकाणी , तरुण मिशा , अक्कडबाज मिशा , अनुभवी गंभीर मिशा , पिकलेल्या मिशा ..जणू मिशी रुपात जीवन -दर्शन घडत असे.
काल बदलला , पिढी बदलली , माणसे आली -गेली .. खूपशा जुन्या गोष्टी मनाला चटका लावून गेल्या , नव्या वाजत गाजत आल्या , या प्रवाहात मिशा आणि दाढी ..टिकून राहिल्या आहेत ..आपल्या आजूबाजूला ..दाढीवाले -मिशीवाले अगदी सहजतेने वावरतांना दिसतात , आजची युवा -पिढी ..देखील दाढी-मिशा कुरवाळीत विचारमग्न पोझ मध्ये चर्चा -सत्र गंभीरपणे करतांना पाहून खूप छान वाटते .
मी नोकरीच्या निमित्ताने अनेक गावी फिरलो .. अशाच एका गावी असतांनाची ही गोष्ट ..माझा एक सहकारी मित्र ..अव्वल -दर्जाचा मिशीवाला असामी होता , या मिशीवर आशिक झालेल्या त्याच्या प्रेयसीने ..त्याची पत्नी होण्याचे कबूल केले , या मिशी -जादू मुळे साहजिकच ..बायकोवर आणि मिशीवर त्याचे अपार प्रेम होते .. उंचापुरा तगडा गडी ..मिशी मुळे फारच रुबाबदार दिसत असे , कधी कधी वाटायचे ..याच्या मिशीला किती धन्य वाटत असेल .की आपण याच्या ओठावर आहोत ..
एकदा सुट्टी घेऊन मी काही कामा निमित्ताने गावाकडे गेलो होतो ,साधारण दोन-तीन आठवड्याने ..मी परत रुजू झालो .. ऑफिस मध्ये गेलो तर माझा मिशीवाला दोस्त नजरेस पडला नाही .. मी त्याची चौकशी केली .. आणि त्याच्यावार कोसळलेल्या दु:खाची बातमी कळाली ..एकाएकी उद्भवलेल्या आजार झाल्याचे निमित्त होऊन ..त्याची प्रिय पत्नी त्याला कायमची सोडून गेली होती ..
मी संध्याकाळी त्याला भेटण्यासाठी म्हणून गेलो ..त्याचे सांत्वन कोणत्या शब्दात करावे ,कसे करावे ? मोठो नाजूक गंभीर परिस्थिती होती .. काही न बोलता ....आम्ही एकमेकांकडे पहात राहिलो ..जणू त्याला माझ्या धीराच्या भावना समजत होत्या ..मोठ्या जड मनाने तिथून निघालो.
यथावकाश तो सावरला, कामावर आला .त्याच्या बिना -मिशीच्या चेहेरयाकडे पाहवत नव्हते ,न राहवून एकदा मी त्याला सुचवले ही ..त्यावर तो म्हणाला ..
"साहेब , माझ्या मिशीवर जिचे प्रेम होते ..तीच आम्हाला सोडून गेली ..आता मन धजावत नाही माझे .. मी पोरका झालो आणि माझी मिशी पण पोरकी झाली."
-------------------------------------------------------
धन्यवाद - "मिशी " उपक्रम -संयोजक .
कथा प्रसिध्द दिनांक- १८-०१-२०१८ 

मिशीची गोष्ट - जरूर वाचावी .


Shivkanya Shashi is with Vikram Bhagwat and Arun V. Deshpande.
Arun V. Deshpandeसांगताहेत 'मिशीची गोष्ट' उद्या दुपारी २ वाजता मिशी वर... जरूर वाचा.

LikeShow More Reactions
Comment

Monday, February 5, 2018

आठवणीतलं गाव- परभणी - लेख-१८ वा - डॉ. धुंडीराज कहाळेकर - वडिलधारे माणूस .

लेख- १८ वा -  - डॉ. धुंडीराज कहाळेकर - वडिलधारे माणूस .
--------------------------------------------------------------
मनात नवी उमेद , काही तरी करून दाखवण्याची आतुरता , त्या साठी व्यासपीठ मिळवण्याची धडपड आणि खटपट 
सर्व काळातील तरुण पिढीला करावी लागते, करवून दाखवावी लागत असते , कला आणि साहित्य क्षेत्रात व्यासपीठ मिळणे ,ते मिळवणे ..हे लेखनापेक्षा कठीण आहे ..अर्थात "आपल्या कार्याची दाखल घेतली जावी , कवी, लेखक म्हणून लोकांनी ,वाचकांनी आपल्याला ओळखावे हा हेतू या सर्व कार्यामागे असतो ,हे लक्षात घेतले पाहिजे.
वरील प्रकारचे धडपड -कार्य  मी परभणीला आलो त्यावर्षी सुरु झाले .

औरंगाबाद, जालना , सेलू , परभणी , नांदेड ..हा नुसता एक रेल्वे -मार्ग नाही  की रेल्वे -स्टेशनची नावं नाहीत तर या गावांची ओळख खूप वेगळी आहे कारण - मराठवाड्यातील "नामवंत लेखक-कवी -साहित्यिक या गावात वास्तव्यास आहेत , आणि ही सगळी साहित्यिक मंडळी ..सतत लिहिती असणारी आहेत, मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठी साहित्य क्षेत्रात यांच्या साहित्याने नाव-लौकिक मिळवलेला आहे.

तर अशा एक मोठ्या साहित्यिक -क्षेत्री म्हणजे परभणीला ..मी माझा लेखन प्रवास सुरु केला , एक कथा लेखक म्हणून मी  लेखन करीत होतो , माझ्या नव्या कथा नियमितपणे विविध मासिकातून आणि रविवार साहित्य पुरवणीतून येऊ लागल्या , तसे .परभणीतील लेखक -कवी ..माझ्या लेखनाची थोडी थोडी का होईना दाखल ग्फ्हेत आहेत " ही जाणीव माझ्यातील लेखकाला लेखन -बळ देण्यास पुरेशी होती.

मी नवीन होतो ,अश्या त्या ८०- ९० च्या दशकातील परभणीच्या साहित्य-जगतातील जेष्ठ -साहित्यिकांची पिढी निष्ठेने लेखन करीत होती , त्यांचा लेखन-प्रवास , लेखन -क्षेत्रातील त्यांचे कार्य, त्यांचा नाव-लौकिक ..हे सर्व काही माझ्या सारख्या नवख्या लेखकासाठी  अप्रूप होते , आदरयुक्त भीती आणि दरारा " दोन्ही भावना मनात असायच्या .असे असले तरी ..सहवासाने हे दडपण कमी होते गेले , भीड चेपत गेली .." हे सगळे होण्याचे कारण माझ्यात लेखन -गुण " आहेत याची खात्री पटल्यावर ..मात्र नंतर मला या जेष्ठ पिढीने कायम प्रोत्साहन दिले.
आजच्या या लेखात मला लेखन प्रोत्साहन देणाऱ्या वडीलधार्यांची स्मरण-भेट करून देतो आहे.

डॉ.धुंडिराज कहाळेकर - शंकर महाराज सदन -नानलपेठ -परभणी .. हा पत्ता माझ्यासाठी "साहित्य-सल्ला -केंद्र झाले ",
निष्णात वैद्यराज " इतकीच त्यांची ओळख  नाहीये , ते काव्य शास्त्र प्रवीण असे रसिक -लेखक-कवी - बाल-साहित्यकार आहेत ..हे हळू हळू त्यांच्या भेटीतून उमजत गेले .. . ""अचूक नाडी-निदान  " हे त्यांचे वैद्यकीय कौशल्य साहित्यात ही उपयोगी पडत असे  कारण माझ्या लेखनातील दोष ..त्यांनी अचूकपणे दाखवत मला कायम "गुणकारी सल्ले देत " चांगल्या लेख्नासाठीच्या  "शुगर कोटेड - गोळ्या ..अगदी निर्व्याज्ज्य प्रेमापोटी दिल्या आहेत ,
एक अर्थाने माझा चालू असलेला लेखन प्रवास डॉक्टर - कहाळेकर यांनी दिलेल्या आरोग्य-रसपूर्ण गुणकारी गुटी "चा मोठा औषधी -प्रयोगाने सिद्ध होतो आहे.
शनिवारी -दुपारी अडीच पर्यंत बँक असे .. त्यामुळे ..बहुदा शनिवारी त्यांच्या दवाखान्यात ..आमची भेट ..म्हणजे साहित्य गप्पा , लेखन दुरुस्ती -चर्चा ..होत असे ..त्यांनी केलेल्या सूचना , लेखनासाठी सुचवलेले विषय ..या मध्ये वेळ सत्कारणी लागला "याचेच मोठे समाधान मिळत असे.
त्यांच्याकडे रविवारचे बहुतेक सर्व पेपर येत असत ( सध्या कोल्हापूरला सुद्धा असेच असणार ), आणि रविवार साहित्य पुरवणीत  परभणीतील किमान ४-५ लेखक-कवीचे साहित्य प्रकाशित होत असे ..या ४-५- जनातलं मी एक होतो ..ही आठवण आज सुद्धा खूप सुखद वाटणारी आहे. तर..ज्याचे साहित्य आले असेल त्या त्या कवीला -लेखकाला आवर्जून फोन येणार तो असा असायचा ..
डॉ. कहाळेकर बोलतोय , त्रास देतोय तुम्हाला ,,
तुमची कविता , लेख ..आज वाचलीय या पेपरमध्ये , 
छान , आनंद वाटला ...शुभेच्छा ...
त्यांची ही प्रशंसा -पावती आली की खूप छान वाटे ...
परिवर्तन प्रकाशन "वसमत नगर - या त्यांच्या प्रकाशनाकडून अनेक साहित्यिकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केलीत , साधी -सुबक स्वरूपातली ही छान पुस्तके ..त्यातील "वाचनीय साहित्यामुळे "आज ही लक्षात आहेत.
कहाळेकर यांचे कडे साहित्यिक -उपक्रमांचे आयोजन होत असे .. मराठवाड्यातील अनेक साहित्यिक यासाठी परभणीला येत , 
प्रसिध्द लेखिका -रेखा बैजल  यांची साहित्यिक भेट अशाच एक निमीतने डॉ.कहाळेकर यांनी आयोजित केली होती 
साहित्य सम्मेलन -आणि डॉ.कहाळेकर  म्हणजे  पंढरी आणि वारकरी " असे भक्तिरूप नाते आहे , समेलन स्थळी डॉकटर असणार ,त्यांची भेट होणार " हा क्रम कधीच चुकलेला नाही.
पुस्तक -प्रकाशन 'समारंभ ..यात प्रकाशित पुस्तकाची पहिली प्रत -  पैसे देऊन लेखकाच्या हातून खरेदी करणारे डॉक्टर -कहाळेकर ..एक दुर्मिळ वाचक आहेत ..त्याच्या या भाव-वृत्तीस मनोमन कायम सलाम .
२००३ साली परभणीला रौप्य महोत्सवी मराठवाडा साहित्य सम्मेलन झाले , याच सम्मेलनात माझा पहिला कविता संग्रह - गाणे दिवाणे प्रकाशित झाला ,
यातील प्रेम-कविता वाचून त्यांनी माझ्या कविता संग्रहात  शुभेच्छा -कविता दिली ..
ती आठवण म्हणून देतो आहे..

"स्वागत रसिकांचे -
शृंगार साज अवघा , लेवून सखी आली 
गाणे असे दिवाणे, नव गातसे  सहेली 
उधळित रंग नवखे , ही अरुणप्रभागाली
सांभाळ हृद्य रसिका , प्रतिभा स्वये प्रगटली 
                     
                   -धुंडीराज कहाळेकर 
-------------------------------------------------------------

माझ्या बाल-साहित्य लेखनाकडे देखील त्यांचे बारीक लक्ष असते , कथा, ललित लेख या स्वरूपातील माझ्या लेखनास तर त्यांची पावती मिळते , कविता "त्यांच्या समोर आली की मात्र त्यांच्यातील "आग्रही कवी जागृत होतो "आणि मग कविता आणि स्वरूप यावर त्यांच्याकडून खर्या अर्थाने .बुस्टर-डोस " मिळतो .
आजच्या मुक्तछंद लेखनाच्या प्रव्हात असतांना ..मन अजून ही ओढ घेत असते  ते कवितेच्या ..गेय आणि लयबद्ध ,आलंकृत अशा सुबक रेखीव रुपाकडे . याचे श्रेय मी डॉ.कहाळेकर यांनाच देईल त्यांच्या सांगण्यामुळे या कवितेचा मनातून मोह होत असतो.

डॉक्टरकडे होणाऱ्या साहित्यिक चर्चात ..अधून मधून ..येणारे साहित्यिक व त्यांची भेट म्हणजे आमच्या साठी बोनस असायचा .. मला आठवते की..
वि. शं.गौतम , गंगाधर जयपूरकर , रे.रा.सनपूरकर , हे जेष्ठ साहित्यिक हजेरी लावीत असत ,

दिवाळी अंक ..आणि त्यातील प्रसिद्ध झालेल्या साहित्याचा आढावा अशा चर्चा करण्यासाठी .. दिवाकर खोडवे , हमखास असायचे , त्यांच्या सोबत विनोदी कविता , चारोळ्या ,किस्से ..यांची मेजवानी असे.
जुन्या पिढीचा आणि नव्या पिढीचा असा मनोहर संगम ...दोन्हीतील साहित्यिक -संवाद , असे विधायक कार्य " हे माझ्या दृष्टीनी डॉ.कहाळेकर यांनी माझ्यासाठी  आणि  त्यावेळच्या साहित्यिकांच्या नव्या पिढीसाठी केलेले बह्मोल असे वाण्ग्मयीन संस्कार -कार्य ठरावे.

परभणी -साहित्यिक नगरीत आता डॉ.कहाळेकर नाहीत , आणि मी पण नाहीये ..पण ..गेल्या अनेक वर्षा पासूनचा आमचा  स्नेह आणि संपर्क कायम आहे , गेल्या  २-३- वर्ष मध्येच त्यांचे पुण्यास येणे कमी झाले , त्या अगोदर ..किमान ५-६ वर्ष तरी  ते कोथरूडलात्यांच्या लेकीकडे (वर्षा कडे ) येत, त्यावेळी त्यांचा फोन आला की ..आमची भेट व्हायची   परभणीच्या आठवणीत गप्पा निघायच्या आणि मन भरून यायचे .

सध्या डॉ.कहाळेकर कोल्हापूरला त्यांच्या मुलाकडे असतात , दूर राहून ही त्यांचे लक्ष त्यांच्या मित्र परिवारातील साहित्यिकाकडे असते .
 मधूनच फोन येतो ..
डॉ.कहाळेकर त्रास देत आहेत ...आज तुमची कविता वाचली..छान .
, प्रेमाने- मायेने भरलेले त्यांचे कौतुक शब्द "कानावर पडतात आणि लेखनास नवे बल मिळते 
डॉक्टर साहेब ..तुमच्या या शब्दांचे पाठबळ आशीर्वाद म्हणून नेहमीच लाभू द्या . 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - आठवणीतलं गाव -परभणी - 
लेख- १८ वा -  - डॉ. धुंडीराज कहाळेकर - वडिलधारे माणूस .
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------------------------------------