कथा -
गजाभाउंचा नाराजी-नामा "
ले- अरुण वि.देशपांडे
-----------------------------------------------------------
माझे परम मित्र - गजाभाऊ नुकतेच सेवानिवृत्त झाले .मोकळा वेळ हाताशी असल्यामुळे " आता मी काय काय करू गड्या ? " अशा गोंधळात ते सापडले आहेत . वास्तविक गोष्ट अशी आहे की - हे महोदय यापुढे आता दिवसभर घरातच असणार आहेत " या कल्पनेने मिसेस -गजाभाऊ आणि कुटुंबीय हबकून गेले आहेत.
वाहिनी मला म्हणाल्या सुद्धा - भाऊसाहेब - आता तुमचे मित्र रिटायर्ड झालेत , पण, घरात त्यांनी सोडलेल्या आर्डरी ऐकून आम्ही टायर्ड होणार " याचे तुम्हाला काहीच वाटत नाही का हो ?
वाहिनीचा प्रश्न अगदी रास्त असाच होता - कारण माझा समावेश गजाभाऊच्या "निकटच्या सूत्रात " असायचा . त्यामुळे "गजाभाऊ ही असामी कशी आणि किती बिकट आहे" महे माझ्या इतके कुणालाच माहिती असणे शक्य नव्हते
त्यामुळे "निकटच्या सूत्रातील माणसाने नाटकीय ढंगात माहिती दिली पाहिजे " एवढी माफक माहिती मला होती.
वाहिनीना धीर देत मी म्हणालो - काळजी करू नका वाहिनी, गजाभाऊ घरात लुडबुड करतात हे खरे आहे , आता यापुढे तुम्हाला त्यांच्या नको इतक्या बारीक नजरेचा " त्रास होणार आहे. तेव्न्हा यापुढे तुम्हीच तुमचा एक्शन-प्लान" बदलणे गरजेचा आहे.
त्यासाठी गजाभाऊ च्या नकळत आपण इतर सगळ्यांच्या सहभागाचे "चिंतन -शिबीर " आयोजित करू या .गजाभाऊ ला आपल्या पेक्षा नवी जनरेशन जास्त चांगल्या प्रकारे मेनेज करू शकेल असे मला वाटते आहे.
माझे ऐकून घेत वाहिनी मला म्हणाल्या - भाऊसाहेब , गजाभाऊ काय "चीज " आहे, ही तुमच्या पेक्षा जास्त मला माहिती आहे. तुम्ही असाल त्यांचे "जानी दोस्त ", मी प्रत्याक्ष्य त्यांची बायको आहे ."मला जास्त कळत ? की तुम्हाला ?
मी मनापासून म्हणालो - अर्थातच तुम्हाला जास्त माहिती आहे वाहिनी.
वाहिनी आपले बोलणे चालूच ठेवीत म्हणाल्या - आमचे हे ", आत्तापर्यंत आफिसात गुण्यागोविंदाने नांदत होते , घरापेक्षा इथे त्यांना जास्त आनंद मिळत असे. " या पुढे माझीच कठीण-परीक्षा आही. घरात आमच्या सोबत हे कसे नांदतात ? कल्पनेनेच नुसता घोर लागलाय बाई माझ्या जीवाला ."
वहिनींना धीर देणे आवश्यक आहे हे जाणवून मी म्हणलो-
वाहिनी - अहो , हे घरगुती राज्य तुमचेच आहे . बिनपगारी असलात तरी -फुल अधिकारी तुम्हीच आहात घरतल्या.
तुम्ही मन भक्कम करा तुमचे .
माझे बोलणे मध्येच थांबवीत वाहिनी म्हणाल्या -
भाऊसाहेब - का उगीच फिरकी घेताय ?, आमच्या मनाचे काही करण्याची हिम्मत आहे का आमच्यात ?,
तुमच्या दोस्ताचे लक्ष आफिसात जितके जास्त होते , त्यापेक्षा दुप्पट लक्ष घरात असे . त्यांचे मन घरातच भिरीभिरी फिरते आहे असे भास आम्हाला होतात .
आम्हाला शिस्त लावण्याचे त्यांचे प्रयत्न " तुम्हाला माहितीच आहे, नवे काय सांगावे तुम्हाला .
त्यांच्या सोबत कायम असणारे तुम्ही - आठवा जरा - गजाभाऊनी आफिसातला फोन - तिथल्या कामा पेक्षा , घरी आमच्या चवकशी साठी जास्त वापरलाय , खर की नाही ?
वहिनींची फायरिंग अचूक होती - एरव्ही आमच्या या वाहिनी "मित-भाषी आहेत .फारसे न बोलणाऱ्या "वाहिनी "आणि नको तितके बोलणारे गजाभाऊ ..!", हे मी पाहिलेले नेहमीचे दृश्य ,
पण,आज वाहिनीचा हा आवेश पाहून " त्यांच्याकडे ऐनवेळी टाकण्या साठी "बॉम्ब-गोळे " आहेत ,याची झलक पाहून मला तर बेस्ट वाटले. मी म्हणालो-
अरे वा - वाहिनी - तुमची तर जय्यत तयारी आहे "पलटवार करण्याची ",गजाभाऊचे काही खरे नाही आता.
वहिनींच्या चेहेर्यावर छानसे स्मित उमटले .
वहिनीसाहेब - मानलं बुवा तुम्हाला . गजाभाऊचा बंदोबस्त -करण्याच्या कार्यात माझे पूर्ण सहकार्य असेल . यासाठी माझी एक अट आहे - गरीबाची रसद तोडू नका .
वाहिनी लगेच समजल्या - काळजी करू नका भाऊसाहेब . घ्या गरमागरम चकल्या - आत्ताच करून ठेवल्यात .गजाभाऊ आणि तुम्हाला आवडतात , म्हणून आठवणीने केल्यात .
क्या बात है वाहिनी- तुमच्या प्रेमळ स्वभावास खरेच तोड नाही, चकल्या बेस्टच झाल्या आहेत" हे सांगण्यास विसरलो नाही.
अहो वाहिनी -इतका वेळ झालाय मला येऊन- आणि गजाभाऊ आहेत कुठे ? माझ्या प्रश्नाचा खुलासा करण्यासाठी वाहिनी म्हणाल्या -
अहो, सकाळी उठल्यावर ते मला म्हणाले - जरा गावाकडे जाऊन येतोय , संध्याकाळ पर्यंत येईल वापस . तोपर्यंत
काही करून ठेवा छानसं खमंग काहीतरी..आमची गिरणी " चालू राहायला पाहिजे . कळाले ना ?"
" आमच्या ह्यांच्या बोलण्याच्या टोन मध्ये "विनंती" चा स्वर नसतो ,असते फक्त ऑर्डर , जी आम्ही पाळायची .
वाहिनीच्या बोलण्यात काही चूक नव्हते . गजाभाऊ आज गावाकडे गेले , तिथे गेल्यावर .वावटळ "आल्या सारखेच वाटत असेल सर्वांना , नुसता धुराळा उडवत असतील गजाभाऊ आपल्या बोलण्याने ."गजाभाऊ कधी कुणावर खुश झाले आहेत ", असे कधीच होत नसे. करणार्याने किती जीव तोडून काम केले तरी. त्या कामात गजाभाऊ काही तरी चुका काढणारच ." यामुळे समोरचा म्हणयचा - "शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो...!"
आफिसात "साहेब असणारी व्यक्ती -आपल्या साठी महत्वाची असणे सहाजिकच आहे. "साहेबास खुश ठेवण्यासाठी अंगात उपजत कौशल्य" असणारी माणसं आपल्या भवताली असतात. आमच्या आफिसात याच्या बरोब्बर उलटे चित्र होते. "गजाभाऊ नाराज होऊ नये म्हणून आमचे "बिचारे साहेब ".अथक परिश्रम घेत असत.
कारण एकच - सर्वांच्या पगाराची कामं ", मंथली रिपोर्ट्स , मोठ्या कस्टमर-लोकांची मर्जी सांभाळायची ", अशा अनेक कठीण आणि कसरतीचे कामात गजाभाऊ एकदम तरबेज -.सराईत आणि सफाईदार "श्रेणीतले कुशल कारागीर- कर्मचारी --म्हणून लौकिकास प्राप्त झालेले .यामुळे गजाभाऊ कायम डिमांड मध्ये असणारी असामी होती .
मंथ -एंड ला " गजाभाऊ आफिसात असणे म्हणजे -साहेबांचे बीपी नॉर्मल राहण्याची ग्यारंटी समजावी. गजाभाऊच्या तोंडून -र- रजेचा " शब्द आला तरी साहेबांना हूड-हुडी भरायची . याचा फायदा गजाभाऊ चलाखीने घेत असत . एकूणच काय तर- "साहेबाचा जीव गजाभाऊत आणि गजाभाऊ दुसऱ्या कशात ..!
त्यामुळे - एखाद्याचा राजीनामा परवडला , पण- गजाभाऊचा "नाराजी -नामा "? नो वे ..!
डायरेक्ट साहेबच खिशात म्हटल्यावर - गजाभाऊ जरा शेफारून गेले होते .मोठ्या नंबरच्या चष्म्यातून -बारीक-बारीक चुका शोधणारी त्यांची नजर .आणि सोबतीला "फटाकडी -जीभ" ,या दोन अस्त्रा मुळे अनेक रथी-महारथी ", धारातीर्थी पडायचे .एकूण जबरदस्त असा "भीतीयुक्त -आदर "असणारे गजाभाऊ आफिसात मोठ्या आनंदाने दिवस घालवत असत.