Wednesday, October 25, 2017

लेखमाला - आठवणीतील गाव -परभणी . भाग - ३ रा

लेखमाला - 
आठवणीतील गाव- परभणी -
 भाग-३ रा . 
ले- अरुण वि.देशपांडे 
----------------------------------------------------------------------
मित्र हो नमस्कार ,
या लेखनास आपल्या प्रतिक्रिया खूप प्रोत्साहन देणाऱ्या आहेत ,या बळावर हे लेखन करणे खूप आनंददायक आहे. 
सध्या दिवाळी चालू आहे .या निमित्ताने आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
परभणीकर असूनही तसा दूर दूर राहिल्यामुळे असल्यामुळे लहानपणापासून पाहिलेल्या परभणीच्या आठवणीत एक सलगपणा असा नाहीये .तरीपण मला लख्खपणे आठवतात अशा काही आठवणी आठवून तुमच्याशी शेअर करणे खूप छान वाटणारे असेच आहे.

मी ८-१० वर्षे वयाचा होतो ती वर्ष आहेत १९५८ -१९६०  या दरम्यानची ,जवळपास पन्नस वर्षापूर्वीचे हे दिवस आहेत.,
१९५० ते १९६० अशी दहा वर्ष माझे वडील .मानवत च्या हैद्राबाद बँकेत हेड-कॅशियर  होते. या दिवसात परभणीला येणे असायचे ,पण इतक्या लहानपणच्या दिवसातील आठवणी आता फार अंधुकशा झाल्या आहेत , एक मात्र आठवते क्रांतीचौकात -,रंगराव देशपांडे आजोबांच्या  घराला दोन बाजूंनी पायर्या चढून येण्याचा रस्ता होता. संध्यकाळी या इथे बसून रस्त्यावरची घाई-गडबड पाहत असे , या समोरच्या रस्त्यावर मध्यभागी एक उंच खांब होता.त्यवर एक मोठा लोखंडी -दिवा , संध्यकाळ झाली की कुणी एक कर्मचारी येत असे, त्याच्या सोबत एक उंच शिडी असायची ,त्यावर चढून मग तो मोठा दिवा लावून जायचा ,क्रांतीचौकातल्या त्या मोठ्या मोकळ्या जागेत तो दिवा पाहून .समुद्रातल्य उजेड देणाऱ्या दीप-स्तंभाची आठवण होते , 

आता जिथे मोठे मार्केट ,भाजी मंडी आहे ,त्या जागी जुन्या काळी एका रांगेतली छोटी छोटी घरे होती ,यातली सगळी घरे आणि त्यातली माणसे आपसात स्नेह-संबंध असलेली ,२-४ दिवसाचा आमचा मुकाम या घरातील माणसांनी दिलेल्या एक-कप चहाने सुद्धा सार्थकी लागायचा .
त्या काळी परभणीहून जिंतूरला जाण्यासाठी प्रायव्हेट -सर्व्हिस बस-गाड्या होत्या ..आणि आताच्या रघुवीर टाकीज च्या समोरचा परिसर आहे .मार्केटचा .त्या जागेत झाडाखाली या सर्व्हिस बस थांबत, सर्व्हिसवाली माणसं ओरडून ,आवाज देऊन बोलावीत .चलो ..झरी -बोरी - जित्तूर...,या गाडीने जिंतूरला गेल्याचे स्पष्ट आठवते.

 औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे १९६० ते १९६४ येथे होतो  ..या गावात चौथी ते आठवी असे माझे शिक्षण झाले..या गावाहून वडिलांची बदली परभणीला झाली ..तिथून ही लगेच धर्माबाद ला बदली झाली .पण ऐन शैक्षणिक वर्षात असे मध्येच सोडून जाणे शक्य नव्हते ..मग आम्ही परभणीला राहिलो .

या वर्षी जिंतूर रोडवर असलेल्या मोठ्या नूतन विद्या मंदिर मध्ये -९ वीच्या वर्गातील एक विद्यार्थी म्हणून मी प्रवेश घेतला , तसे पाहिले तर माझे एकंच शिक्षण सलगपणे एका ठिकाणी कुठेच झाले नाही .अनेक गाव- अनेक शाळा "असा आमचा शिक्षण-प्रवास आहे. 
क्रांती-चौकातील आमच्या खानदानी घरात  पहिल्यांदाच राहण्याचा योग याच १ वर्षीय वास्तव्याने आम्हाला लाभला .
क्रांतीचौक ,गांधी-पार्क , शिवाजी चौक ,करीत सरकारी दवाखान्य समोरील रस्त्याने जिंतूर रोड ओलांडला की समोर आमची मोठी नूतन शाळा दिसत  असे, रोज पदयात्रा करीत रमत-गमत शाळेला जाणे-येणे .खूप छान वाटायचे .
मी ज्या वर्षी नूतन विद्या मंदिरचा विद्यार्थी होतो .त्या वर्षी मुख्याध्यापक होते ..गोपाळराव काळे सर , कडक शिस्तीचे सर .त्यांच्या हातून मिळालेला छ्डी-प्रसाद .खाऊन आम्ही घडलो याचा अभिमान वाटतो कारण खूप नंतरच्या काळात कळाले आणि जाणवले की गोपालराव काळे सर  एक उत्तम साहित्यिक आणि कवी असलेले व्यक्तिमत्व होते .
आज हे आठवले की वाटते अजाणतेपणी आपण एक मोठ्या साहित्यिकाच्या सहवासाला मुकलो ,

मोठ्या नूतन शाळेचे सर्वप्रिय मुख्यध्यापक म्हणून प्रसिध्द झालेले म.म. शर्मासर  ..१९६४ साली एक शिक्षक म्हणून रुजू झाले .  ", आम्ही ज्या नववी -च्या वर्गात होतो , त्या वर्गात त्यांनी त्यांच्या करिअर मधला त्यांचा पहिला तास घेतला , पुढे १९९७ साली मी माझ्या "चंदर " या पहिल्या किशोर कादंबरीचे प्रकाशन .शिक्षक -दिनी -५ सप्टेंबर ला ,नूतन विद्यामंदिर चे मुख्याध्पक झालेले - म.म.शर्मा सर यांचे हस्ते करून खूप मोठा आनंद मिळवला , हे गुरु-ऋण -आणि त्याची आठवण झाली की मन भारावून जाते.

माझ्या या वर्गातील सर्वच वर्गमित्रांची नावं मला आठवत नाहीत .कारण मी  नववी पास झालो आणि आमची बदली हैद्राबादला झाली आणि मला नूतन विद्यामंदिर सोडावे लागले ..  मोजक्या मित्रांची नावं जरूर आठवतात कारण पुढे अनेक वेळा त्यांच्या भेटी बँकेत आणि परभणीच्या साहित्यिक कार्यक्रमात होत असत.
हे वर्गमित्र  - माझा आतेभाऊ - रविकांत चौधरी , तसेच अंबादास कुलकर्णी , दिलीप वैद्य , भास्कर सरदेशपांडे , अनिल कुलकर्णी -शेल्गावकर , शिवाजी जाधव , रेणुकादास टाकळकर , दत्ता पत्तेवार  , 
असे अनेक वर्ग मित्र  आठवतात.
रविकांत, भास्कर , अंबादास ,दिलीप ,आणि मी .असे ट्युशन साठी सकाळी जायचो .आम्हाला शिकवणारे गुरुजी होते वी,भा .पाठक गुरुजी, गांधी पार्क समोर असलेल्या  पाठक गुरुजींच्या माडीवर आमची शिकवणी चालत असे.


नूतन विद्यामंदिर मध्ये कृष्णराव जामकर सर , भगवानराव मास्तर अजून ही आठवतात . या शाळेत झालेल्या ..निंबंध लेखन, भाषण करणे अशा कार्यक्रमात मी सहभागी असे, लेखनाच्या आरंभीच्या खाणखुणा मला माझ्या या शालेय वर्षात जाणवू लागल्या कारण निंबंध आणि भाषण ..यांची माझी तयार्री वेगळी आहे ,छान आहे..असे गुरुजन आवर्जून सांगत असत , शाबासकी  देतांना सर म्हणत की - जितके वाचन चांगले तितके लेखन चांगले  होत असते ",
हा संस्कार करणारे आदरणीय गुरुजन आणि नूतन विद्या मंदिर .दोन्हीना आदरपूर्वक अभिवादन करतो.

घर ते शाळा आणि शाळा ते घर करीत असतांना .मी नुसता पायी चालत येत असे नाही , तर ..चालतांना आजुबाजू दिसणाऱ्या अनेक गोष्टी पाहून त्या मना मध्ये साठवून ठेवण्याचा मला छंद होता ..
शिवाजी चौकातून डाव्या बाजूला वळाले की तो रस्ता जिंतूर रोड कडेघेऊन जातो , या वळणावर सुरुवातीला .एक प्रिंटींग प्रेस होता .सरस्वती प्रिंटींग प्रेस .असे नाव असावे .(चूक भूल माफी असावी ) , या प्रेसच्या बाजूला नागभिडे आर्ट्स ",हे छोटसे दुकान होते .पेंटर नागभिडे ..ज्याला आजच्या भाषेत "आर्टस्- स्टुडिओ " म्हणतात , या ठिकाणी अनेक सुंदर सुंदर आखीव -रेखीव रंग-संगती साधलेले बोर्ड्स दिसायचे , 
दरवेळी मी तिथे काही क्षण थांबून त्या कलाकृती डोळ्यात साठवत असे . त्यावेळी परभणी शहरातील बहुतेक सर्व नामंकित दुकानं ,संस्था यांचे नाम-दर्शक बोर्ड .जे अतिशय सुरेख होते .त्यवर रेखीव अक्षरातले नाव पहाणे मला आवडायचे ..नागभिडे आर्ट्स ..
.इंग्रजी आणि मराठी दोन्ही एकदम बढीया .मोठी बम्बाट-अशी स्टाईल.. त्या वर्षी "एक हिंदी पिचर रिलीज झाले .हिट पण झाले ..त्याचे नाव होते - शहनाई " या पिक्चरची नायिका होती .राजश्री .या हिरोईनचे अतिशय सुरेख पोर्ट्रेट नागभिडे पेंटरनी काढलेले .जे अजून माझ्या आठवणीत तितकेच टवटवीत आहे.
पुढे साहित्यिक उपक्रमात आणि परभणीच्या वास्तव्यात ..माझ्या शालेय जीवनातले हे कसबी -कुशल चित्रकार .नागभिडे ..माझे खूप छान मित्र झाले - कवी- गझलगायक -सूर्यभान नागभिडे .त्यांचे हे कलावंत व्यक्तिमत्व मला प्रभावित करून टाकणारे असेच आहे.
परभणीच्या या एक वर्षाच्या वास्तव्यात मी सिनेमे मात्र खूप पाहिले ..नाज मध्ये -संगम ,आणि रघुवीर मध्ये -आई मिलन की बेला .हे दोन हिट सिनेमे एकाचवेळी चालू होते ..संगम -सात आठवडे आणि आई मिलन की बेला -नऊ आठवडे चालला होता ..तुफान गर्दीतले हे सिनेमे गाण्यामुळे आठवतात .
नाझ मधला पहिला पिक्चर .शिव-पार्वती असावा .असे थोडे थोडे आठवते .. आणि महावीर टाकीज पूर्ण टीन-शेड असलेली होती ...या टोकीजमध्ये  सिनेमा सुरु होण्याच्या आधी पैगाम पिक्चर  मधले "मै क्यू ना नाचू ..हे गाणे लागत असे .
तर कम सप्टेंबर ची  फेमस धून रघुवीर मध्ये लागायची .मग बुकीन खिडकी उघडली की तिकीट घेऊन मस्त पिक्चर  पहायचे. मेरे मेहेबुब , कश्मीर की कली , दोस्ती ,दूर की आव्वाज , , सती सावित्री ,शहनाई, सगाई , एप्रिल फुल . दारासिंगचे आया तुफान , सामसन, रुस्त्मे रोम , अजित हिरो असलेला शिकारी ,आवारा बादल ....कित्ती ते पिक्च .आजचे  सदाबहार नगमे असलेले हे पिक्चर मी परभणीच्या .फेरोज महल,महावीर, रघुवीर आणि नाझ .या चार ही थिएटर मधल्या ..जमीन , बेंच आणि खुची .,  तीन ही प्रकारच्या क्लास मध्ये बसून मी हे पिक्चर एन्जोय केलेत.
असे मस्त होते हे दिवस आणि हे वर्ष ..१९६४ ..
पुढच्या लेखात .असेच खूप काही...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - 
आठवणीतील गाव- परभणी -
 भाग-३ रा . 
ले- अरुण वि.देशपांडे 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, October 13, 2017

लेख- कल्पना आणि अंदाज

लेखमाला -
हितगुज -
लेख- 
कल्पना आणि अंदाज ...!
------------------------------------------------------------------------
 दैनंदिन कार्यक्रमात अनेक वेळा आपण सगळेजण आयोजकाची भूमिका कधी न कधी पार पाडीत असतो..आणि अशा समारंभाचे व्यवस्थित पार पडणे , .  बरेचदा " .अनेक गोष्टींची आपल्याला कल्पना असणे आणि कल्पना नसणे , तसेच आपल्याला  "  एखाद्या गोष्टीचा अंदाज करता न  येणे आणि अंदाज चुकणे .." या दोन गोष्टीवर अवलंबून असते . याचे आणखी एक कारण असते ते म्हणजे - आपल्याला व्यावहारिक अनुभवाची आणि ज्ञानाची असलेली कमतरता ".हे कुणी मुद्दाम करत नसते ,हे ही तितकेच खरे .

आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू, जिन्नस अशा अनेक गोष्टींची कल्पना नसते की ,हे सगळे "की हे कुठे मिळते, कसे मिळते ? कितीला मिळते ? आणि मग कित्येकदा गरज नसतांना "केवळ कल्पना नसल्यामुळे ,माहितीच्या अभावी" आपल्याला आर्थिक नुकसान सोसावे लागते , यात पुन्हा एक गम्मत अशी असते की .आपण कुणाला विचारायला जावे तर .समोरचा खांदे उडवीत म्हणतो .."काय की बुवा ,काही कल्पना नाही ..! " कदाचित असे म्हण्यामागे .अशी एक वृत्ती असू शकते ..जाऊ द्या .कशाला उगीच मागे काही जबाबदारी लावून घ्या ?.

अंदाज असणे आणि अंदाज नसणे ..या दोन्ही गोष्टी या प्रत्यक्ष्य अनुभवावर  आधारित आहेत. अंदाज हा नेहमीच अचूक असयला हवा असा आग्रह नसतो .म्हणून आपण लगेच म्हणतो ..निदान ढोबळमानाने-"  तरी अंदाज करू या ..!
आपल्याला असे अंदाज आपल्याला करायला लागतात- केंव्हा ? जेंव्हा नियोजित कार्यक्रम वा समारंभ हे मोठ्या स्वरूपाचे असतात ,आणि यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या खूप जास्त संख्येची असते.
एवढेच कशाला ..आपण कित्येकदा "घरच्या घरीच कार्यक्रम .ठरवतो  यात अतिशय मर्यादित संख्या असलेले पाहुणे 
येणार असतात " अशा वेळी ..सर्व गोष्टींचे प्रमाण घरातील अनुभवी याक्ती  सांगेल त्याप्रमाणे ..त्याच्या अनुभवी अंदाजानुसार केल्या जातात .ही व्यक्ती सल्ला देते की - " हे बघा ...१०० पाहुणे येणार असतील तर ..७५ मानासंना लागेल इतका केले तरी ..निभून जाईल हो..!
कारण सगळेच्या सगळे पाहुणे येतीलच असे होत नसते " त्याचा हा अंदाज जवळपास अचूक ठरणारा असतो..कारण अनुभवातून त्या व्यक्तीला असलेली नियोजनाची कल्पना आणि त्याला असलेले अंदाज -कौशल्य .

अंदाज करता येणे " तो न चुकणे " या गोष्टी निर्णयक्षमतेवर अवलंबून आहे ..निर्णयक्षमता नसणाऱ्या व्यक्तीने ,काही कल्पना नसतांना त्याच्या अंदाजा प्रमाणे केले तर आणि कार्यक्रमाचा पचका झाला तर  ..त्याला बोलणे खावी लागतील तुला आधीच म्हणालो होतो ..नको करू करूस .तुला न कल्पना आणि  कशाचा अंदाज ! ..अरे बाबा .असे ...अंदाजे पंचे दाहो दर्शे..केल्याने कुठे जमतं असते का ?

एखाद्या विषयाची काहीही माहिती नाही ,तर कल्पना तरी कशी करता येईल ? या साठी प्राथमिक माहिती, जुजबी माहिती , कामापुरती माहिती ,सगळी माहिती , परिपूर्ण माहिती ..एव्हढे सगळे किंवा या पैकी थोडे तरी आपल्याजवळ असेल तर ..काम पूर्ण होईल की नाही ? आपण हे काम करू शकू की नाही ? याची पूर्वकल्पना करता येते आणि मग त्या अनुषंगाने .अंदाज बांधता येणे , थोडाफार अंदाज करणे , असे करीत करीत पुढच्या पायऱ्या चढून जाणे जमायला लागते .

चार माणसाच्या घरात सुद्धा हे तितकेच आवश्यक आहे ..गृहिणी व्यवहार -कशल आहे " असे जर कुणी म्हणत असेल तर खुशाल समजावे की या घरातील गृहिणीला सगळ्या गोष्टींची माहिती आहे , कुठून ,कशी खरेदी करायची याची कल्पना आहे ...तिच्या या सवयीमुळे ..घराचे आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता फारच कमी असते ,

आणि अनुभव हा श्रेष्ठ गुरु"लाभला की ..त्या पाठोपाठ आपल्या व्यक्तीमत्वात अनेक चांगले गुण येऊ लागतात .
सगळी सोंगं करता येतात पण..पैश्याचे सोंग नाही करता येतं ..हे एक सर्वपरिचित सिध्द अशी म्हण प्रचीलीत आहे.
आणि पैश्याचे नियोजन ..हे नेहमीच ..अनुभवी..अंदाजातून तयार करायचे असते ..म्हणून तर याला .."वार्षिक  अंदाज पत्रक " असे ठळक नाव प्राप्त झाले आहे ते किती अचूक आणि संपर्क आहे हे जाणवते .

अंदाज "म्हणजे तरी नेमके काय ? भविष्यात नेमके असेच घडेल ..याची कल्पना आपल्याला नसतेच ..त्यामुळे काय घडू शकेल ? याचा अर्थातच अंदाज करता येत नाही .." असे आहे म्हणून .भविष्यकालीन नियोजन न करून कसे चालेल ? मग, केवळ स्व-अनुभव ,इतरांचे अनुभव ,आणि क्षमता ..यांच्या बळावर आपण ..अनेक गोष्टी ठरवतो ..त्यात आपली कल्पना आणि अंदाज .या दोन्ही गोष्टींची  परीक्षा होत असते .

जीवनाच्या या कठीण परीक्षेत ..ज्याचे ठोकताळे , अंदाज ..अचूक ठरतात ,ज्यांचे अंदाज खूप बरोबर नाही ठरले तरी फार चुकीचे ठरत नाहीत , अशा व्यक्ती ..अपयशी होण्याचे दुखः टाळण्यात नक्कीच यशवी होत असतात. याची कल्पना आपल्याला असयला हवी .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हितगुज-
लेख- कल्पना आणि अंदाज .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Sunday, October 8, 2017

लेख- लेख-आठवणीतली गावं - लेख- क्र-१ अदुगर -परभणी –मग-जर्मनी ..!




लेख-आठवणीतली गावं –
लेख- क्र-१
अदुगर -परभणी –मग-जर्मनी ..!
मित्रहो नमस्कार ,
दैनिक दिलासा ,आणि आदरणीय विजय जोशीसर यांच्याशी अक्षर –नातेबंध जुळून आता ३५ वर्षे होऊन गेली आहेत १९८३-१९८४ साल असावे मी त्यावेळी हैद्राबाद बँकेत गंगाखेडला होतो .१५ ऑगस्ट विशेष अंकात माझी “ काचेचे हिरे “ ही कथा विजय जोशी सरांनी प्रकशित केली प्रकाशित झालेली हे माझे पहिले वाहिले प्रकाशित झालेले साहित्य.  तेंव्हा पासून सुरु झालेला माझा लेखन प्रवास आजही अखंडपणे चालू आहे , आज ही अगदी आपलेपणाने दिलासा साठी मी आनंदाने लेखन करीत असतो.
संपादक आणि मित्र –संतोष धारासूरकर यांच्याशी संवाद –भेटी नेमाने होत असतात .अशाच एका भेटीत ..आठवणीतली गावं “हा माझा लेखन-संकल्प यावर आमचे बोलणे झाले .आणि ते म्हणाले परभणीत तुम्ही खूप वर्ष होता –मग परभणी –आठवणीतले गावं .ही लेखमाला सुरु करा ,रविवार –साहित्य पुरवणीतून क्रमश ..येऊ द्या .
या रविवारपासून आपण नियमित भेटणार आहोत .त्यासाठी आरंभीच दिलासा टीमचे आभार मानतो.
माझ्या आयुष्य- प्रवासातील सर्वात मोठा पर्व-काल मी. परभणीत घालवला  ..,१९८६ ते २००६ अशी वीस वर्ष- दोन दशकं मी फेमस परभणीत होतो . मी तसा ही मुळचा परभणीकर आहे .एक लेखक म्हणून, एक बँक-कर्मचारी म्हणून आणि एक व्यक्ती –एक माणूस म्हणून मी परभणीत वावरलो ..खूप देऊ शकलो तर नाकीच नाही पण पर्भानीने सवयीप्रमाणे भभरभरून दिले आहे ..ते सर्व या लेखमालेतून येईल .ते दिवस, ती वर्षं ती माणसे या सर्वांच्या आठवणींचा –पेमाचा अक्षर जागर तुम्हाला आवडणारा ठरावा हे अपेक्षा करतो .

आजच्या लेखाच्या पहिल्या लेखातून परभणीकर म्हणून माझी पारिवारिक ओळख करून देणे योग्य राहील
१९८६ ते २००६ ही २० वर्ष मी परभणीला होतो . या काळात माझा परिचय गंगाखेडहून आलेला .हैद्राबाद बँकेतील एक कर्मचारी असा होता . माझे वास्तव्य त्यावेळी आरंभी वसमतरोडवरील रामकृष्ण नगर पेट्रोल पंप च्या मागे असलेल्या बँक कॉलनीत होता , नंतर कारेगाव रोड ला –पाण्याच्या टाकी जवळ ..श्रीराम नगरला आमची आणखी एक बँक कोलोनी झाली ,आणि या कॉलोनीत मी माझे घर बांधले ..
४१ - वरदान “ श्रीराम नगर परभणी या वास्तूने मला खूप भरभरून दिले , माझे साहित्य लेखन या वास्तूत झाले आहे .यामुळे एक झाले ..बाहेरगावाहून आलेला मी –परभणीच्या क्रांतीचौकातला आहे ही माझी ओळख नव्या पिढीला झालीच नाही , म्हणून देखील आज हा लेख लिहिवसा वाटला
परभणीच्या वास्तव्यात माझी ओळख लेखन –धडपड करू पाहणारा आणि .मराठवाडा साहित्य परिषद परभणी , अक्षर –प्रतिष्ठा –परभणी .या संस्थेचा एक कार्यकर्ता अशीच होती .. या दोन्ही संस्थात नियमित वावरत असतांना मला अनेक साहित्यिक आणि मित्र –लाभले –या सर्वांच्या सहवासात माझी साहित्यिक म्हणून जडणघडण झाली  साहित्य-नगरी –सम्मेलन नगरीची महती आज मी सर्वत्र मोठ्या अभिमानाने आनंदाने सांगत असतो..

आता परभणी सोडून मला अकरा वर्षे होत आहेत ..सध्या पुण्यात रहात असलो तरी ..मनाने फुल –टू-परभणीत असतो.
आजच्या लेखाचे प्रयोजन .साहित्यिक आठवणीचे नसून.माझ्या पारिवारिक –परभणीकर म्हणून तुमच्याशी शेअर करणे हे आहे. आमची पारिवारिक ओळख – लोहगावकर देशपांडे – क्रांती चौक –परभणी . ज्यांचा सहवास मला लाभला अशा माझ्या परभणीकर-पारिवारिक सदस्यांचा या लेखात उल्लेख करण्याचा प्रयत्न केलाय , अनेक माझ्या माणसांचा उल्लेख स्मरणा -अभावी होणे कठीण आहे .त्यांनी मोठ्या मनाने माझ्या विस्मरण –बुद्धीला क्षमा करावी.
आम्ही लोहगावकर देशपांडे –तसेच ताडलिंबेकर –देशपांडे ,महातपुरीकर –देशपांडे , परभणीकर –देशपांडे ,हे सर्व मंडळी क्रांतीचौकातच वास्तव्यास आहे ..सगळे आडनावंबंधू आणि तसे नातेवाईकच .
परभणीच्या क्रांतीचौकात रंगराव देशपांडे –हे संकुल आहे ते रंगराव गंगाधरराव देशपांडे –लोहगावकर हे माझे चुलत आजोबा ..या संकुलाच्या जागी रंगराव आजोबांचे वास्तव्य असलेला वाडा होता –त्यालाच “गढी “असे म्हटले जात असे रंगराव देशपांडेच्या वाड्यातच मराठीचे श्रेष्ठ –साहित्यकार बी.रघुनाथ शेजारी म्हणून राहत असत .माझे काका श्रीधर देशपांडे ..यांनी बी.रघुनाथ यांच्या अनेक आठवणी गप्पांच्या ओघात सांगितल्या.
रंगराव आजोबांच्या वाड्यात अलीकडच्या काळात –माझे काका श्रीधरराव देशपांडे राहत असत .त्यांच्या परिवारात सामील झालेला किशोर ब्रम्ह्नाथकर –आणि आता माझा बंधू झालेला किशोर देशपांडे –त्याची पत्नी संध्या औरंगाबाद येथे असतात ,शेतीविषय प्रयोगशीलता हा या बंधूचा विशेष आहे.
.त्याच्या बाजूला आहे ते आमच्या परिवाराचे मोठ्ठे घर ..व्यंकटराव उर्फ बालासाहेब काका यांचा वाडा ,या काकांचे चिरंजीव ..सखाराम देशपांडे –लोहगावकर –माझ्या या चुलत बंधूचे अकाली जाणे- आम्हा सर्वासाठी मोठी दुर्दैवी घटना ठरली आहे.आता या घरात आनंदी देशपांडे –लोहगावकर यांचे वास्तव्य असते
या वाड्याच्या मागच्या गल्लीत आमच्या लोहगावकर –देशपांडेच्या मोठ्ठ्या घराचा भाग आहे ,या वाड्यात १९६४ साली परभणीला वडिलांची बदली झाली तेंव्हा आम्ही आमच्या या खानदानी घरात राहिलो. मी त्या वर्षी जिंतूर रोडवरच्या मोठ्या नूतन शाळेत नववीच्या वर्गाचा विद्यार्थी होतो .माझ्या शालेय जीवनाचे एकच वर्ष परभणीला झाले.
माझ्या वडिलांचे नाव. विठ्ठल हनुमंत देशपांडे –लोहगावकर ..माझे वडील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये होते , १९८९ मध्ये ते परभणी मुख्य शाखेत मनेजर होते .माझ्या वडिलांचे लहानपण परभणीतच गेलेले , मला आठवते दीप -प्रभाचे विठ्ठलराव पाठक , राजाभाऊ सुभेदार श्रीनिवासराव राजेंद्र “हे वडिलांचे अतिशय जिवलग मित्र होते
हनुमंतराव देशपांडे -माझे आजोबा “पांडेपण करायचे ..फुलकळस- या गावी त्यांचे वास्तव्य असायचे.या गावी आमचा वाडा आणि शेती होती .
..या गावात माझ्या बळवंत गंगाधरराव देशपांडे या आजोबांनी .श्री बजरंगबली –मारुती ची स्थापना केली ..आज पंचक्रोशीत हे मंदिर – पांड्याचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. देशपांडे परिवारातील नवी पिढी मोठ्या श्रद्धेने फुलकळसला मारुती दर्शनास येत असतात . या गावासाठी बळवंतराव आजोबांचा नातू – नितीन मुरलीधर देशपांडे अनेक सामाजिक स्वरूपाच्या योजना राबवतो आहे
बळवंतराव आजोबांचे थोरले चिरंजीव म्हणजे जुन्या पिढीतील कीर्तिवंत प्राध्यापक – डॉ.के.बी .देशपांडे –केशव बलवंत देशपांडे .उस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद मध्ये कार्यरत असतांना के.बी काकांना .औरंगाबाद  येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापनेच्या वेळी बोलावले गेले ..हे केबी काका –बॉटनी  या विषयाचे प्राध्यापक होते ,मला आठवते शाळेत असतांना आम्हाला .वनस्पती शास्त्र “हे त्यांचे पुस्तक अभ्यासक्रमात होते .हे मोठे लेखक आपले काका आहेत” हे खूप सुखद वाटायचे .
केबी काकांची मोठी कन्या माझी मोठी चुलत बहिण मंगलताई ही -–मराठवाड्यातील पहिली महिला इंजिनियर आहे “ हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
केबी काका परभणीला अगदी नियमित येत असत ,जुनी परभणी त्यांना फार प्रिय होती.

काळाच्या ओघात आता खूप बदल झालेत .जुन्या पिढीतील जेष्ठ-पिढी आता हयात नाहीये . निसर्ग-नियमानुसार होणारी ही गोष्ट आहे...
माझे मोठे काका – दत्तात्रय हनुमंत देशपांडे –लोहगावकर ..यांची आजची पिढी परभणीला आहे- श्री. गुंडेराव दत्तात्रय देशपांडे हे माझे मोठे चुलत बंधू – त्यांच्या परिवारातील दिनेश व त्याची पत्नी. आणि  धाकटे –चिरंजीव -.राजेश देशपांडे –संध्या देशपांडे हे दोघेजण –परभणीतील सार्वजनिक जीवनात सर्व-परिचित जोडपे आहे ..लोहगावकर देशपांडे ही ओळख त्यांनी दमदारपणे चालू ठेवली आहे .याचे मला खूप कौतुक आहे.
दुसरे मोठे चुलतबंधू भीमराव दत्तात्रय देशपांडे .जयश्री हेमाद्री –देशपांडे ,हे जोडपे -
भीमराव देशपांडे यांचे चिरंजीव – राहुल –अरुणा हे जोडपे पुण्यात असते आणि धाकटे चिरंजीव प्रसाद –- अदिती हे जोडपे बडोदा येथे असते.हा प्रसाद उर्फ पप्पू देशपांडे .आता प्रसाद भि.देशपांडे “या नावाने लेखन करणारा इंटरनेट-वरील अतिशय लोकप्रिय असा कथाकार आणि कवी आहे .अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन –मध्ये निमंत्रित कवी “म्हणून त्याचा सहभाग अभिनंदनीय असाच आहे.
भीमरावची कन्या –सौ.रसिका रमण संगमकर –नांदेडला असते
मधुकर देशपांडे- मोहिनी , यांची मुलं -राहुल आणि आरती - म्हणजे क्रांतीचौकातील आमच्या लोहगावकर देशपांडेच्या खानदानी वाड्यात राहणारे आमचे घर एक घर आहे.
भीमराव देशपांडे यांचे साडू –बंधू आणि प्रसिद्ध साहित्यिक-वक्ते – श्री .अनिल रामदासी –विद्या हेमाद्री –रामदासी –माझे पारिवारिक स्नेही आहेत ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
सर्वात मोठे चुलत बंधू लक्ष्मीकांत दत्तत्रय देशपांडे – यांचे चिरंजीव विलास नोकरी निमित्ताने औरंगबादला आहे ..त्याची पत्नी –सौ.संगीता देशपांडे ही उत्तम लेखिका आहे .परभणी-हिंगोली –नांदेड आणि आता औरंगाबाद अशा विविध ठिकाणी राहून ती विविध नियतकालिकातून नियमित लेखन करीत असते , लेखन आता इंटरनेटवर सुद्धा ती एक उत्तम वाचक आणि लेखिका म्हणून कार्यरत आहे.
माझ्या या मोठ्या बंधूंचे जावाई आहेत प्रसिध्द नाट्यकलावंत –श्री किशोर विश्वामित्रे .


माझ्या सर्वात मोठ्या चुलत भगिनी सुशीला –देशपांडे –देशमुख यांचा परिवार – सुधीर-विनोद –बाळू –(आकाशवाणी मधील )ही भाचे मंडळी आणि त्यांचा परिवार परभणीतील सार्वजनिक कार्यात परिचित आहे.
माझी धाकटी चुलत बहिण सौ.विमल –आणि श्री.चंद्रकांतराव सरदेशपांडे –हा परिवार परभणीत असतो .श्री.चंद्रकांतराव सरदेशपांडे –हे वसमतरोड परिसरातील एक सर्वप्रिय व्यक्तिमत्व आहे.
माझ्या वडिलांची मावशी –सुभेदार परिवारातील ..बबनराव सुभेदार हे माझ्या वडिलांचे मावसभाऊ ..या बबनकाकांची नवी पिढी .त्यातला मनोज सुभेदार ..इंटरनेटवर परिचित असलेला एक लोकप्रिय मित्र आहे.
रेणुकादासराव चौधरी –सावरगावकर –हा परिवार म्हणजे वडिलांच्या बहिणीचे –वेणू-आत्याचे घर.
मोठा आतेभाऊ म्हणजे यशवंत चौधरी – म्हणजे य.रे -सर.त्यांची पत्नी –मंगला –पावडे-चौधरी आणि बाल विद्या मंदिर ,उभयतांची अशीच ओळख विद्यार्थ्यात होती . यशवंत चौधरी –माझा मोठा आतेभाऊ ..पण माझ्यासाठी अत्यंत आदरणीय य.रे –सर म्हणूनच अधिक जवळचा होता ..
पुढे निवृत्त झाल्यावर यशवंत चौधरी ..पुण्यात आल्यावर आमच्या नियमित भेटी होत असत ..
..त्याचे बाल-मित्र असलेले सुधाकर पाठक ,गोविंद कात्नेश्वारकर –हे माझे पारिवारिक मित्र म्हणून आज ही माझ्या संपर्कात असलेले परभणीकर मित्र आहेत .यशवंतचा  मुलगा –गणेश चौधरी पुण्याच्या संगीत क्षेत्रात उत्तम तबला –पटू म्हणून परिचित आहे.
माझा धाकटा आतेभाऊ , रविकांत चौधरी – याने आपल्या बहारीच्या काळात रवी टेलर्स “या नावाने परभणी आणि परिसरात आपल्या कार्याची ठळक अशी मुद्रा उमटवली होती...
रवी टेलर्स –कडे शिवलेले कपडे न वापरणारा परभणीकर –आणि कोणत्याही क्षेत्रातील नोकरदार व्यक्ती असो , १९७५- ते २००० अशा जवळपास पंचवीस वर्षांच्या काळात शोधून सापडले नसते ..इतका हा रवी-टेलर्स “चा प्रभाव होता .

आज या चौधरी परीवारतील बहुतेक सदस्य आता परभणीला नाहीत .स्वतः रविकांत चौधरी –सौ.अलका आणि त्याचा मुलगा हरीश , विवाहित मुली –रचना ,आणि रश्मी त्यांच्या परिवारासहित औरंगाबादला आहेत.माझ्या आतेबहिणी–  सौ.शोभा अशोकराव पार्डीकर , सौ.प्रभा सुधाकर जोशी ,या पुण्यातच असतात ,
सौ.सुनिता –कळंब- देशमुख परिवारात ,आणि सौ.मीना –प्रज्ञा प्रशांत आजेगावकर –नवी मुंबई ला असते.
सर्वात धाकटी आतेबहीण – सौ.ज्योती विलास आंबेकर परभणीकर झाली आहे. तिच्या सोबतच परभणीकर असलेली माझी मोठी आतेबहीण –सौ.ताई रमेश मंगरूळकर हा परिवार परभणीला असतो.
भला मोठा असा हा माझा परिवार आहे..आणि असा आहे मी परभणीकर
..बाकी पुढच्या लेखात .....
(क्रमशा ......)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------