Sunday, July 30, 2017

कविता- ओ मनमीत

कविता-
ओ मनमीत ।।
-----------------
हर पल गया बीत
यादोंमे तेरे
ओ मेरे मनमीत ..!

मिलना हमारा
कितना मीठा
सपना प्यारा जैसे
मधुरतम प्रेम गीत...

चांदतारे भी
ऊदाससे
हम भी वैसे
तेरे बिना मेरे मीत..
---------------------------------
कविता- ओ मनमीत ।।
-अरूण वि.देशपांडे- पुणे
---------------------------------

Sunday, July 23, 2017

लेख-४ - कौतुक आणि शाबासकी ..!

लेख क्र-४ 
----------------------------------------

लेख-
कौतुक -शाबासकी ..!
-अरुण वि.देशपांडे 
----------------------------------------------------------------
आपण केलेल्या कामाचे कौतुक केले जावे , त्यासंबंधी काही प्रोत्साहन देणारे शब्द बोलवे अशी अपेक्षा करणे "यात  गैर मुळीच नाही . आपल्या डोळ्यासमोर एखाद्याने मोठ्या मेहनतीने पूर्ण  केलेले काम दिसत असते , हे काम पूर्ण करतांना त्या व्यक्तीने घेतलेले परिश्रम आणि केलेली मेहनत आपण पाहिलेली असते ..आणि आपण पहाणारे या कामाचे एक निरीक्षक असतो  ,अशा वेळी तर .आपल्या कौतुकाला , शब्दांना एक किंमत देखील असते ..सहाजिकच आपण या वेळी कसे आणि किती कौतुक करतो  याकडे लक्ष असणार.हे उघड आहे..

मित्र हो - इथेच अनेकजण कौतुक करण्याचे टाळतात , किंवा .तोंडावर कुणाविषयी चांगले बोलायचे नाही ", अशाने ज्याचे कौतुक करू तो शेफारून जातो " असे यांचे "स्व-मत "असते.त्यामुळे  कौतुक करणे राहून जाते.
कौतुक कुणी कुणाचे करावे ? असा प्रश्न पडू देऊ नका - कारण "आपले कौतुक केले जावे" असे सगळ्यांनाच  वाटत असते ,काहीजण तर आपण कौतुकाचे हक्कदार आहोत असे गृहीत धरून चालतात ..आणि त्याच भावनेतून "हाती घेतलेले कार्य  पूर्ण करीत असतात..निखळ कौतुक "हे मनास स्पर्श करून जाणारे असते. 

कारण याच्या उलट  "तोंड देखले कौतुक " हा प्रकार म्हणजे बनावट आणि देखाव्याच्या कौतुकाचा प्रकार आपण एरव्ही सर्वत्र घडतांना पाहतच असतो.
"कौतुक करवून घेणे ", आणि कौतुक होणे " हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. आणि अशा कौतुकाची ठिकाणे व्यक्तिपरत्वे वेग-वेगळी असतात.
उदा - आपण आपल्या साहेबांच्या घरी -किंवा एखाद्या बडया घरच्या  पार्टीला गेलेलो आहोत - अशा ठिकाणी .जे जे कुणी निमंत्रित आलेलेल असतात त्यांच्यात " पार्टी -होस्ट बद्दल -त्यांच्या फमिली बद्दल कौतुकाचे शब्द बोलण्याची जणू चढाओढ लागलेली असते ", अशा बोलघेवड्या कौतुक-बहाद्दरांच्या सोबत मितभाषी  आणि अबोल स्वभावाची माणसे कौतुक करण्यात कमी पडलीत " हे लगेच पार्टी -होस्ट "यांच्या लक्षात तत्परतेने आणून देणारी मंडळी असतातच.असे व्यावहारिक हिशेबाचे कौतुक "केवळ स्वर्थापोटी केलेले असते..

आपल्या रोजच्या रुटीन -लाईफ मध्ये पावलो पावली कुणाचे ना कुणाचे कौतुक करावे असे प्रसंग नित्य घडत असतात .अशा वेळी प्रसंगोचित कातुक करण्यात आपण कमी पडू नये ", असा प्रयत्न केल्यास .आपल्यामुळे ,आपल्या कौतुकाच्या शब्दांनी , पाठीवर दिलेल्या शबासकीने अनेकंना खूप मोठी प्रेरणा मिळू शकते " हे अत्यंत महत्वाचे लक्षात ठेवता आले तर खूप छान होईल.

जो अगोदरच निपुण आहे, हुशार आहे, कामाचा उरक आहे, समज आहे-उमज आहे" अशा व्यक्तीने केलेले काम हे उत्तमच होणार हे वेगळेपणाने सांगायची गरज नाही ..तरी सुद्धा .अशा व्यक्तीच्या कामाची प्रशंसा करणे , कौतुकभरे शब्द बोलून त्याला शाबासकी देणे "यामुळे एक छान काम होते ते म्हणजे "अश्या व्यक्तींच्या कामाची योग्य दखल योग्य वेळी  घेतली गेली "अशी भावना त्याच्या मनात निर्माण  होते..

होतकरू उमेदवार नेहमीच कठीण परिस्थितीतून मार्ग काढून हाती घेतलेले काम पूर्ण करीत असतात , अशा व्यक्तीच्या कामाबद्दल ,त्याच्या यशाबद्दल जाणीव ठेवून त्याचे योग्य कौतुक करणे "हे मनाच्या मोठेपणाचे निदर्शक असते. असे पुष्कळदा होत असते की -अनपेक्षितपणे जबाबदारी घ्यावी लागते ,अशावेळी इतरांची मदत घेत हे काम पूर्ण करू शकणारा ..आपल्याला त्याच्यातील अनेक नेतृत्व -गुणांची झलकच दाखवून देत यशस्वी कामगिरी करून दाखवीत असतो.अशा वेळी वरिष्ठांनी दिलेली शाबासकी आणि सहकारी-मित्रांनी केलेले कौतुक "या दोन गोष्टी फार मोठा भावनिक चमत्कार करून जाणार्या असतात.

मोठ्यांना नेहमीच आपले कौतुक  करवून घेणे मनापासून आवडत असते ..गृहिणींना -त्यांच्या कला-गुणांचे कौतुक व्हावे वाटते, पालकांना वाटते- आपल्या मुलांच्या कलागुणांचे आल्या-गेल्यांनी भरभरून कौतुक केले पाहिजे ,आपणहून केलेले कौतुक नक्कीच आनंद देणारे असते ,परंतु ..कौतुक करणार्याने सुद्धा आपले कौतुक हे खोटे वा कृत्रिम वाटणारे नाहीये " याची काळजी घेतलीच पाहिजे ,असे केले तरच आपली शाबासकीची थाप खरी वाटेल , कौतुकांच्या शब्दांना ऐकून मन आनंदाने भरून येईल.  "कौतुक करणे ,गोष्ट जरी मामुली ,लहान वाटत असली तरी "त्याचे परिणाम फार सुखद आणि मोठे असतात हे विसरून  कसे चालेल.

आपल्या परिवारातील बाल-मित्र- मैत्रिणींचे आपण आवर्जून कौतुक केले पाहिजे ..त्यांच्या भावविश्वात तर रोज अनेक गोष्टी घडत असतात ,त्यांच्या हुशारीस वाव देणारे ,त्यांच्या कलागुणांना दर्शवणारे अनेक कार्यक्रम नित्य होत असतात ..अशा कार्यक्रमात .पहिला -दुसरा नंबर आला तरच कौतक ,एरव्ही नाराजी " याचे भान न बाळगणारे वडील माणसे, आणि पालक ..यांनी वेळीच आपल्या वागण्यात बदल करयला हवा.  चिमुकल्या मनांना कौतुकांच्या शब्दंनी खूप आनंद मिळतो  ..तो आपण देण्यात कमी पडू नये.

आपल्या सहवासात कलावंत ,लेखक-कवी ,खेळाडू , अशी विविध व्यक्तिरेखा असतात.. या सर्व मंडळींना "कौतुकाचे शब्द "हवे असतात , पाठीवरती शाबासकी हवी असते ", अशा सर्वांना -आपण त्यांचे जवळचे आहोत " या भावनेपोटी  न चुकता या सर्वांना वेळोवेळी कौतुक-शब्दांचे गुच्छे देत राहावे . बघा आपल्या अशा करण्याने आणि वागण्याने आनंदाचे वातावरण आपोआपच  तयार होऊन जाते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख-
कौतुक -शाबासकी ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
साभार - साप्ता -पथदर्शनी  दि.१० जून २०१७ -अंकात  प्रकाशित लेख.

Sunday, July 16, 2017

म.टा- पुणे टाईम्स मध्ये प्रकाशित लेख - आम्ही अचानक भेटलो आणि ...!

पुणे टाईम्स मध्ये - प्रकाशित लेख
आम्ही अचानक भेटलो आणि ...
--------------------------------------------------------
१९६५ सालातील -- हैद्राबाद मधील --काचीगुडातील सरकारी हायस्कूलमधील -हैद्राबाद - मराठी माध्यमाच्या १० वी - ड "च्या वर्गातील आणि ११ वीच्या (एच.एस.सी )वर्गातील विद्यार्थी ..आता २०१७ साली कुठे असतील ..? याची कल्पना देता येणं अवघड आहे. ..पण.आमच्या त्यावर्षीच्या या वर्गातील आम्ही सात जण- २०१२ साली - ४५ वर्षानंतर अचानकपणे पुन्हा संपर्कात आलोत ..आणि बालगंधर्व नाट्यगृह परिसरात ..एकमेकांच्या समोर उभे राहिलोत ..आणि २०१२ पासून आम्ही पुण्यातल्या विविध भागात असूनही - २-४-महिन्यांनी भेटून दिवसभर जुन्या आठवणीत रमतो
आमच्या पैकी तिघे डिफेन्स -मध्ये -अकौंटं- विभागात कार्यरत होते ,आणि अधिकारीपदावरून सेवानिवृत्त झाले.
रवी जोशी -,प्रदीप तुंगार, ,आणि हरीश काशिकर, पद्माकर धाट- , अशोक दळवी सुभाष काळे- आणि मी असे आम्ही सात मित्र .
.हैद्राबाद सोडल्यावर सुद्धा सुभाष काळे आणि मी -कायम संपर्कात होतो .सोबत होतो .त्याचे कारण- आम्ही दोघे ही स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये नोकरीस होतो .२०१२ मध्ये -मुलुंड-मुंबई- ब्रांच-मनेजर असतांना सुभाष काळे निवृत्त झाला .मी २००६ मध्येच स्वेच्छा -निवृत्ती घेऊन परभणीहून पुण्यात आलो .
आता आमच्यापैकी कुणाला भेटीची इच्छा झाली -की , त्यादिवशी फोनाफोनी होते .लगेच -दुपारच्या निवांत वेळी आम्ही सारे "...
फर्ग्युसन कॉलेजरस्त्यावरील . " गुडलक -मध्ये जमतो . मग काय ...आमची हैद्राबादी मैफल जमते ..
शाळेच्या दिवसात .काचीगुडा परिसरात अनेक इराणी हॉटेल होती. ..बन-मस्का ,आणि सोबत हैद्राबाद्दी चहा -कटिंग .ज्याला .तिकडे चाय -पवना " म्हणत असत . मनात रेंगाळणारी , " ती चव अजून पुन्हा एकदा ", पुण्यात गुडलक मध्ये बसून अनुभवणे अतिशय आनंदाचं असतं
हिंदी फिल्म्स आणि त्यातील गाणी हा आमचा सर्वांचा आवडीचा विषय आहे - त्यामुळे मनाने आम्ही अजून ही हैदराबादच्या आमच्या लाडक्या थियेटर मध्ये असतो- दिलशाद ,रॉयल ,अशोक ,नवरंग ,बसंत , प्रभात , लिबर्टी ,जमरुद मेहल ,प्यालेस..या आणि अशा अनेक थियेटर ची नावं मनात रुंजी घालतात ..आणि ती वर्ष .हिंदी सिने -संगीताचा सुवर्णकाळ होता.
आता आम्ही मित्र ६५ -६७ या वर्षांच्या वयोगटात आहोत. कौटुंबिक जीवनात .आजोबा-आजीच्या भूमिकेत रमून गेलो आहोत ..कर्तबगार-मुलांच्या -लेकी-सुनांच्या संसारात लुडबुड न करता त्याना सोबत करत .निवृतीच जगणं आनंदाने जगत आहोत ..हा आमच्या मैत्री-जीवनातील आनंदाचा समान धागा आहे..
नुकतेच आम्ही काही मित्र सुभाषच्या घरी म्हणजे -डहाणूकर कॉलोनीत जमलो होतो ..मस्त गप्पा झाल्या .आमच्या मैत्रीबद्दल मला कायमच असं वाटतं की.- ये दोस्ताना .कभी ना होगा पुराना .
----------------------------------------------------------
लेख- आम्ही अचानक भेटलो आणि ....
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------------
(फोटोतील मित्र- डावीकडून ... पद्माकर धाट , अरुण वि.देशपांडे , सुभाष काळे , हरीश काशीकर )
Comment

Wednesday, July 12, 2017

लेखमाला -हितगुज - लेख- जिद्द -कठोर -परिश्रम ..वगेरे ..

साप्ता-पथदर्शन अंकात प्रकाशित लेख-( मे- २०१७ )



लेखमाला - हितगुज
लेख-
जिद्द ,कठोर परिश्रम . वगेरे .....!
-------------------------------------------------------------------
मित्र हो- नमस्कार..
तसे पाहिले तर आपण सामान्य माणसे आहोत ,साधे सरळ असे जगणे आपल्या वाट्याला आलेले  असते, ते स्वीकारून आपल्या जीवनाचे रहाट-गाडगे अगदी सामन्या -पणे चालू असते ,अशा परिस्थतीत सगळेच एकाच भावनेने जगत असतात असे मात्र मुळीच नसते ,कारण सगळेच काही सामान्यपणे जगणारे नसतात ,
असे खुपजण असतात की त्यांच्या मनात नव्या नव्या कल्पनांचे अंकुर रुजत असतात ,  मनात खोल रुजून बसलेल्या स्वप्नांचे  निखारे धगधगत असतात . अशा जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी मनाच्या व्यक्तींना गरज असते ती योग्य वेळी योग्य दिशा देणाऱ्या जाणत्या आणि जबादार अशा मार्गदर्शकाची.

आपल्याकडे खुपजण असे आहेत की ..त्यांच्या मनात स्वप्नवत कल्पना असतात ..पण..त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी परिश्रम करायचे असतात ",हे त्यांच्या गावी नसते ..सगळ्या गोष्टी आयत्या मिळाव्यात अशी यांची धारणा असते.
आता तुम्हीच सांगा.."दे रे हरी पलंगावरी "..असे वागून काही मिळवता येईल का.
जो मेहनत करतो ..आणि अशी मेहनत करतांना अपयश आले तरी .त्याने अजिबात खचून न जाता ..नव्या दमाने ,नव्या उमेदीने हाती घेतलेल्या कार्याची पूर्ती होई पर्यंत परिश्रमात कमी पडत नाही.." त्याला त्याच्या कठोर परिश्रमाचे रसाळ असे फल मिळणारच .

मनात जिद्द " नसेल तर .मिळणारे यश सतत हुलकावणी देत असते .कारण..कार्यपूर्ती साठीची वाट पहाणे , त्याची प्रतीक्षा करण्याची तयारी नसणे , या अधीर -वृत्तीमुळे कित्येकजण हाती घेतलेले कार्य पूर्ण न करता मध्येच सोडून परत फिरतात ..अशावेळी धीर देणारे , खचून  गेलेल्या मनास उभारी देणारे मित्र भेटणे फार गरजेचे असते दुर्दैवाने नेमक्या उलट स्वभावाचे मित्र भेटले तर ..कार्य होणे तर दूरच .ते पूर्णपणे भरकटून ..भलतेच काही घडण्याची वेळ येऊ शकते.

जिद्द आणि कणखर मनाच्या जोरावर कठीण कार्य सुद्धा यशस्वीपणे पूर्ण करता येते ..या साठी हाती घेतलेल्या कार्याप्रती मनात आस्था असावी लागते ,त्यात गोडी असेल तरच कामात मन लागेल ना !  इतकेच असून चालणार नाही ..स्वतःच्या कार्यक्षमतेवर विस्वास पण असावा लागतो. आपल्या मर्यादा आपण नेहमीच जाणल्या पाहिजे.
शक्तीच्या बाहेर आणि कुवतीला न झेपणारे काम विचार न करता करणे ..यात हाती निराशा  लागण्याची शक्यता अधिक असते.

मोठी स्वप्ने जरूर पहावीत ..पण ती सत्यात येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीची ,परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे , या ठिकाणी फक्त "स्वप्नाळू -वृत्ती "असून काही उपयोगाचे नाही..तर.. मनाच्या ठायी जिद्द असावी लागते, परिस्थती अनुकूल असो वा प्रतिकूल असो ..यातून मार्ग काढणारा तो खर्या अर्थाने "बाजीगर "असतो, त्याची ओळख "मुकद्दर का सिकंदर "अशी आपोआपच होते.
मनगटाच्या बळावर काय काय करता येते "हे गोष्ट मनात असलेल्या जिद्दीच्या जोरावर या जगाला दाखवून देणारे अनेक जांबाज " आपल्या अवतीभवती असतात . अशा सक्सेसफुल व्यक्तींच्या कहाण्या "आपल्या साठी अचूक अशा मार्गदर्शक असतात.
जीवनात यशस्वी असणार्या व्यक्तींचा मूलमंत्र असतो..परिश्रमाला पर्याय नाही.
------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - हितगुज ....
लेख-
जिद्द ,कठोर परिश्रम . वगेरे .....!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------------

Tuesday, July 11, 2017

लेख- दशकपुर्ती निवृत्त जीवनाची ..

साप्ता.पथदर्शन मध्ये प्रकाशित लेख..

लेखमाला - हितगुज ",
दशकपूर्ती निवृत्त -जीवनाची
---------------------------------------------------
निवृत्ती "एक वृत्ती असते असे म्हटलेले सहजतेने पटेलच असे नाही., मित्र हो- निवृत्ती  नंतरचे जीवन मी माझ्या मते -अगदी आनंदात,सुखात आणि समाधानी मनो- अवस्थेत  घालवतो आहे , मला सेवा-निवृत्त  होऊन थोडेथोडके नाही तर तब्बल ११ वर्षा झालेली आहेत ..थोडक्यात निवृत्तीची दशकपूर्ती माझ्या खात्यात जमा झालेली आहे.या दशक-पूर्तीचे अनुभव मी आवर्जून तुमच्याशी शेअर करतो आहे.

 मी बँकेच्या नोकरीतून सेवानिवृत्त झालो ते वर्ष होते २००६ ..आणि मी व्हीआरेस घेतले ..कोणतीही आर्थिक-लाभ योजना नसतांना . मनाची इच्छा झाली आणि मी एका अर्थाने स्वेच्छा-निवृत्ती घेतली. मुलीचे लग्न झाले , मुलाचे लग्न झाले , लौकिक अर्थाने जबाबदारीतून मी मुक्त झालो होतो ,.

नोकरी निमित्ताने मुलांचे वास्तव्य आता  नेहमी  साठी पुण्यातच असणार हे निश्चित होते .
.आमच्या पारिवारिक चर्चेत असा ही एक मुद्दा होता की - रिटायर झाल्यावर  तुम्ही दोघांनी गावाकडे राहण्याचा उगीचच हट्ट करू नये .आणि इथेच पुण्याला शिफ्ट व्हावे ,
तुम्ही इथ आलात म्हणजे .सगळे सण-वार, कुलाचार ,आणि सगळा घरगुती उपक्रम इथे व्यवस्थित होतील असे नाही केले  तर ..या पुढे प्रत्येक लहान सणआणि उत्सव - ,समारंभ  यासाठी आम्ही तिकडे यावे असे तुम्हाला वाटत रहाणार ,आणि या साठी म्हणून दरवेळी सुट्टी काढून येणे आम्हाला बिलकुल शक्य होणार नाही
दरवेळी , १२-१५ तासांचा प्रवास करणे , या  प्रवासा साठीचा खर्च होणार तो वेगळाच .या सर्व गोष्टीने सर्वांनाच शारीरिक आणि मानसिक त्याच बरोबर आर्थिक बाबीचा ताण हा येणार ,हे सर्व टाळणे आपल्या हिताचे असेल.

मुलांचे सांगणे आम्हा दोघांनही पटले आणि त्यावर्षातले सगळे सण गावाकडे साजरे करून .डिसेम्बर -२००६ ला सगळे सामान-सुमान घेऊन .. पुण्यास कायमचे रहाण्यास आलो. तुम्हाला खरेच सांगतो .या एका निर्णयाने  .आमच्या .सगळ्यांच्या मनावरचा एक मोठा ताण नाहीस झाला
 

गेल्या दहा-अकरा वर्षात .लहान-मोठे सगळे सण-आणि-समारंभ आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे साजरे केले आहेत..
एक व्यक्ती आणि एक माणूस म्हणून मी माझ्यापुरते ..आपण सगळ्यांशी कसे वागायचे ? याबद्दल थोडे फार ठरवले होते ..त्याप्रमाणे गेली दहा -अकरा वर्ष झालीत  या फार्मुल्या प्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करतो..यापुढे ही हे प्रयत्न चालूच रहातील.
निवृत्ती नंतर घरातल्या गोष्टींचे निर्णय घेण्याची जबाबदारी " कर्ता-पुरुष म्हणून-मुलावर  सोपवली आहे.
   त्याच्या बरोबरीने सुनबाई या कामात लक्ष घालते ..मार्गदर्शनासाठी जेष्ठाच्या भूमिकेत माझी पत्नी मुलांच्या सोबत प्रत्येक निर्णय-प्रक्रियेत असते. तिच्या अनुभवाचा फायदा या तरुण जोडप्याला निश्चित होत असतो. नंतर , मी काय आणि कसे ठरले ?या बाबतचे अपडेट्स घेत असतो..

या पुढे मुलांनी घरातले बदल कसे करायचे ,, हे मला विचारात घेऊनच केले पाहिजे असे नाही ,फक्त करण्या अगोदर सांगत जावे-कल्पना देत जावे ..म्हणजे या बद्दल कमी-जास्त, चांगले वाईट "काय असेल हे सांगता येते.
सगळ्या गोष्टी मी सांगेल तशा पद्धतीने झाल्या पाहिजेत , मी जसे ठरवलेल्या  वेळेत सगळ्या गोष्टी करीत असे ,अगदी तसेच टाईम-टेबल यापढे पाळला गेला पाहिजे " हा हट्ट मी करीत नाही ,कधी तसा  आग्रह सुद्धा करायचा  नाही असे ठरवले आहे ..त्या प्रमाणे वागण्याचा यथाशक्ती प्रयत्न करीत असतो...

माझ्या कारकिर्दीत मी काय काय "तीर मारले " याचे सुरस कहाण्या ऐकवणे टाळावे असे माझे मत.,त्याऐवजी आता धडपड करणार्या कार्यरत पिढीचे कौतुक करणे ,त्यांना प्रोत्साहन देणे "हे मी आवर्जून करीत असतो.
मी,माझे ,मुझे गिनो ", इतरांना त्रासदायक वाटणारे असे माझे वागणे नाहीये ना ? हे मी स्वतःला तपासून घेत असतो..आपल्यामुळे इतरांच्या दैनदिन जीवनात -वेळा-पत्रकात बदल नाही झाला पाहिजे " असा मी आटोकाट प्रयत्न करीत असतो.
आपल्या आवडीचे छंद - साहित्य -संगीत -कला .मनापासून जोपासावेत .. ताण-तणाव या पासून मुक्त राहू शकतो.

वयपरत्वे .शारीरिक आजार तर होणारच ..ते आटोक्यात राहवेत यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन मनापासून करावे ..तरच आपले जगणे सुसह्य होते आणि आपल्याला होणार्या त्रासाचा घरातील इतरांना त्रास होणार नाही .हे महत्वाचे लक्षात असणे गरजेचे आहे.
मित्र हो .मी  एक सामन्य व्यक्ती आहे.,वयपरत्वे काही अनुभव नक्कीच आलेले आहेत ,त्यातून जे काही सुचले त्या प्रमाणे जगतो आहे .अगदी आनंदाने -समाधानाने हे मात्र नक्की.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - हितगुज ",
दशकपूर्ती निवृत्त -जीवनाची .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------------------

Monday, July 3, 2017

लेखमाला - हितगुज - ले- पथ हा चालतांना ..!

वाचक मित्र हो -
साप्ता.हितगुज अंकामध्ये दि.२० मे- २०१७ पासून दर शनिवारी -माझी लेखमाला - हितगुज "सुरु झाली आहे.
ही लेखमाला सुरु करून माझ्या लेखनास वाचकांच्या पर्यंत पोन्च्ण्याची संधी दिल्या बद्दल ..
संपादक -सौ.उज्वला शेट्ये  व संपादक टीम यांचे मन:पूर्वक आभार..
या लेखमालेतील पहिला लेख -आपल्या अभिप्रायार्थ
------------------------------------------------------------------------------------------------
लेख-१
लेखमाला -
"हितगुज "
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------


लेख-
पथ हा चालतांना ...!
-------------------------------------------------------------------
मित्रांनो, आपल्याला लाभलेले आयुष्य हाच एक प्रवास आहे..प्रत्येकजण आपल्या क्षमतेप्रमाणे  हा प्रवास करीत असतो,या प्रवसात अनेक पाउल -वाटा असतात ,काही पायवाटा असतात ,असतात  रुळलेले रस्ते ,,जे समोर येईल ते स्वीकारून पुढे चालायचे असते हे स्वीकारले की मग पथ कुठला चालणे  आहे ",हे महत्वाचे  नाही.तर आपल्या मनाच्या ठायी असलेला निर्धार महत्वाचा असतो.,स्वतःवर असणारा  विस्वास पथ-क्रमणेस बळ देत असतो.,मग ही मार्गक्रमणा किती खडतर असो..आपण ती पूर्णपणे करू शकतो .

आपली -पथ -यात्रा ,चालणे आपल्या हातात असते ,पण, चालतंना आपल्या मार्गातले रस्ते कसे लागावेत ?हे कुठे आपल्या हातात असते ...कारण ..
"कधी सरळ कधी फाकडा
 कधी तिरका कधी वाकडा
असा हा रस्ता असतो
,आपण सगळा प्रवास एकट्याने करायचा नसतो ,कुणी सोबती असला म्हणजे "काटेरी पथ "चालणे फुलांच्या पायघड्यावरून गेल्या सारखे वाटणारे होईल
 साथ सावली सोबत मिळता
 सुखकर झाला सारा रस्ता ...||
अशी साथ मिळाली तर..कितीही लांबची मजल गाठणे शक्य आहे .

आपल्या आयुष्य-प्रवसात अनेक चढ-उतार ,खांच-खळगे , भूल-भुलावे असतात , अशावेळी पथ-दर्शक लाभणे "यासारखी सुदैवी गोष्ट नाही.कारण मार्ग-दर्शवणारा तो मार्गदर्शक ",  "पथ -कसा आहे.."..त्यातील बारीक-सारीक धोके सांगणारा " तो पथ-दर्शक " ,अशा अनुभवी माणसांनी आयुष्य आणि त्यातील जगणे अनुभवलेले असते , म्हणूनच त्यांचे बोलणे ,त्यांचे सांगणे म्हणजे एक यथार्थ असा जीवनानुभव असतो.

पण असे ही म्हणतात की...ज्याचे डोळे उघडे असून तो पाहू शकत नाही, ज्याला कान आहेत पण त्यात सांगितलेले काही शिरत नाही ,तोंड आहे पण, तो चांगले बोलत नाही " अशा माणसाच्या आयुष्याची वाटचाल किती खडबडीत रस्त्यावरून होणारी असेल .. त्यासाठी आपण आपल्याला बदलायला हवे आहे.

याच्या उलट ,सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा जो असतो तो म्हणतो ..
"बस यही अपराध मै हर बार करता हुं
 आदमी हुं आदमीसे प्यार करता हुं...!
असे असणार्या माणसांना मदत करणार्या सोबत्यांची कधीच कमी पडणार नाही.

प्रवास सारेच करीत असतात ,यात तुम्ही आम्ही सगळेच सामील आहोत ".पथिक "म्हणून आपण हे पथ चालत असतो ..हा प्रवास करीत असतांना आपल्याला पुढचा मार्ग सांगणारे अनेक फलक असतात ..त्यावर अनेक सूचना असतात..आपण बहुसंख्य लोक त्याकडे सर्रास दुर्लक्ष करून पुढे जातात ,हे आपले वागणे किती बेजबाबदापणाचे आहे ", हे कळत  असूनही वळत नाही",हे फार वाईट आहे. पथ-दर्शिका समोर असून आपण त्याकडे लक्षच देत नाही ..मग, या सर्वांचा काय उपयोग ?यातून एकच गोष्ट होते..ती म्हणजे जीवनात असे काही अपघात घडून जातात की,नंतर पश्चाताप करून ही काही उपयोग नसतो  .

आपण सारेजण प्रवासी ..प्रचंड संख्येने आहोत..पण.आपल्याला योग्य ते मार्गदर्शक ,दिशादर्शक , पथ -दर्शक ..सहजासहजी मिळत नसतात ..अगदी दुर्मिळ असते यांचे असणे .आणि म्हणूनच यांचे आपल्या जीवनात असणारे महत्व ओळखता आले पाहिजे , आपण असे करू शकलो तर आपलाच जीवन प्रवास करतांना .आपण कधी भरकटणार नाहीत हे निश्चित .

आपले आयुष्य अनिश्चितपाणाचे असले तरी..आपण निश्चितपणे आपल्या इच्छित गोष्टी साध्य करू शकतो..हे किती छान आहे.
या साठी सकारात्मकता असलेले आपले स्नेहीजन ,गुरुजन ,हे आपले पथ-दर्शक ,मार्गदर्शक आहेत हे लक्षात असू द्यावे.आणि असे ही म्हणतात की .जीवनानुभव हे सुद्धा एक उत्तम मार्गदर्शक असतात ..आपल्यासाठी काय भले आणि काय बुरे ..हे अनुभाव्तून शिकत शिकत आपल्याला हा जीव्नपथ चालायचा असतो.

शेवटीं एकच ..
जीने का अगर अंदाज आये
तो कितनी हसीन है जिंदगी
मरने के लिये जीना है अगर
तो कुछ भी नही है जिंदगी ...!

आपण एक करावे ..माहिती असेल  तेच मार्ग-दर्शन करावे.. माहिती नसेल तर अंदाजे काही बाही सांगून दिशाभूल करणे "असे कधीच करू नये....!
------------------------------------------------------------------------------------------
लेख- पथ हा चालतांना ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------------------