लेख- एक प्रवास -आठवणीतला "....!
-अरुण वी.देशपांडे -पुणे.
--------------------------------------------------------------------------------
माझ्या आठवणीतला एक प्रवास -त्यातील ही आठवण, ,
नोकरीच्या निमित्ताने करीत असलेल्या "ये-जा - daily -up -down " या
प्रकारच्या प्रवासातील आहे. त्याला आता सुमारे ३५ वर्षे होऊन गेली आहेत ,
१९७८ मधील हा प्रसंग आहे- त्या वेळी मी स्टेट बँक आफ हैद्राबाद मधल नोकरीच्या
निमित्ताने काही वर्ष कर्नाटक -प्रांतात होतो.
बीदर जिल्ह्यातील "औराद -संतपुर किव्ना औराद बार्हाली ,या गावी मी होतो.
दर शनिवारी -रविवारी , आम्ही सुट्टी साठी म्हणून उदगीर मुकामी असायचो.
औराद हे मुख्य रस्त्यावरचे गाव नव्हते. अगदी आतल्या बाजूला असलेले एक तालुकावजा
छोटसे गाव. सुमारे ४२ कि.मी अंतरावर चारी दिशांना अस्लेली मोठी गावे म्हणजे,
बीदर, देगलूर, आणि उदगीर ,
या ठिकाण हून आड रस्त्याने जाणाऱ्या महाराष्ट्र एसटी बस,
या आड -वळणाच्या गावाला घेऊन जायच्या . एकम्बा हे गाव " महाराष्ट्र एकीकरण समितीचे ",
कार्यकर्ते असलेले गाव, आणि औराद गावात सुद्धा मराठी बोलणारे खूप लोक होते. त्यामुळे
मला कानडी भाषा येत नाही", हे सांगण्याचे कधीच गरज पडली नाही.
उद्गीर् हून सकाळी एक बस औराद साठी -"उदगीर मार्गे -एकम्बा -औराद " अशी ही बस होती. दुसरी बस ,
त्यानंतर एकदम दुपारीच बस असे ,
दर सोमवारी
हे बस मला औराद्ला घेऊन जायची.
त्यावेळी बिदर जिल्ह्यातील शाळांचे पगार बँके मार्फत होत असायचे. सहाजिकच या बस मध्ये
आजूबाजूच्या खेड्यातील शिक्षक हमखास असायचे , नावानिशी ओलख नसली तरी "हे सर" व इतर अनेक प्रवासी
अनोळखी नसायचे. आणि त्यंना ही मी म्हणजे हैद्राबाद -"बँकेतले साहेब - ", हे माहितीचे होते.
कारण त्यांचे पेमेंट दरमहा आमच्या बँकेतून होत असायचे ,आणि पगाराच्या दिवसात मी हंगामी -हेड- क्लार्क असे, व,
माझ्या हातून पेमेंट पास होत असायचे.सहाजिकच चेहेरे ओलख नक्कीच होती.
दिवाळीच्या सणासुदीचे दिवस असावेत ते, पगार जमा होण्याचा दिवस होता. आणि आम्ही ज्या
बसने प्रवास करीत होतो, त्या रस्त्याने जात असणारी ती एकमेव बस होती, पाठी मागून येणारी नाही,
आणि साम्रोरून सुद्धा बस येण्याची त्या वेळी अजिबात श्यक्यता नव्हती.
प्रवासी भर-भरून असलेली ही बस नेमकी त्यादिवशी पक्न्चर झाली, आणि नंतर यांत्रिक -कारणाने
बिघडून बंद पडली. अशा वेळी मदत मिळण्याची काही एक श्यक्यता नव्हती .
काय करावे सुचेना , मला ११ वाजेपर्यंत बँकेत असणे आवश्यक होते, पगराचा दिवस", किती गर्दी असेल?
आणि नियमित बडे बाबू असतांना ही, पगाराच्या आठवड्यात मेनेजर साहेब मला टेम्प - हेड-क्लार्क -करायचे.
,,नेमक्या आजच्या दिवशी मी वेळेवर आलेलो नाही. गर्दीच्या दिवशी कामाच्या दिवशी दांडी मारली "!
अशी सोयीस्कर कल्पना करून घेतली असेल सर्वांनी. त्यामुळे मी अधिक खजील होऊन गेलो होतो.
इकडे रस्त्यात बंद पडलेल्या आमच्या बसच्या बाबतीत दुपारचे १२ वाजून गेले तरी काही घडले नव्हते,
आणि घडणार ही नव्हते.
अशा वेळी सर्वांच्या मनात एकच विचार -आपण जाई पर्यंत बँक बंद होणार ,मग
दिवाळीच्या सणाचा पगार कसा उचलणार ?, सन साजरा कसा करणार. जणू आनंद मावळून गेला होता.
माझ्या
सोबत असलेले अनेक जन मला ही म्हणाले " साहेब, आपल्याला आता पायी चालत
जाण्या शिवाय दुसरा पर्याय नाही.कारण या वेळी समोरून कोणती गाडी येणारी
नाही, ना पाठी मागून कोणती गाडी . तेव्न्हा निघा पायी पायीच.
असून असून हे ...!, १४ कि.मी अंतर आहे, चला चालत जाऊ या ,!
एकम्बा पाटी वरून पुढे देगलूर-औराद ही बस ही मिळू शकेल . आणि आपण , लवकरात लवकर औराद्ला पोन्चुत .,
आणि मग,
बँकेत जाउन पगार उचलू. आपले सोबत बेन्केचे साहेब आहेत, ते सांगतील मेनेजर साहेबाला आणि केशियर
साहेबाला , मग दिवाळीचा पगार नक्की मिळेल आपल्याला .
आणि खरेच की....
बस मधील पायी चालू शकणारे आम्ही ३०-४० जन पायी-पायी निघालो, १४ किलो मीटर चे अंतर आम्ही पार
केले , एकम्बा पातीवर एस ती च्या साहेबांना -" बस खराब झाली ,घेऊन या ,असा निरोप दिला"
, आणि पाटी वर उभ्या असलेल्या
एका ट्रक मध्ये बसून आम्ही २.३० च्या सुमरास औराद ला पोंचलो,
आमचा घोळका बँकेत शिरला ,माझ्या सोबत आणखी खूपजन आलेले पाहून , आमचा स्टाफ आणि साहेब
परेशान झाले.
शांत झाल्यावर मी आणि माझ्या सोबतच्या शिक्षक -मंडळीनी काय प्रकार झाला , आम्ही १४ किमी सलग
पायी चलत आलोत हे ही सांगितले. आणि हे केवळ दिवाळी जवळ आहे, सणाचा पगार मिळावा ",
म्हणून आम्ही विनंती करतो की, पेमेंट ची वेळ संपून गेली असली तरी, आजचे कारण लक्षात घेऊन ,
आम्हाला मदत करावी.,आमचा पगार जमा करून -लगेच पैसे द्यावेत, कारण उद्या पासून शाळांना सुट्या आहेत.
एव्हाना बँकेतील कामे आटोपली होती.,रोख -रकमांचे व्यवहार बंद झाले होते ,अशा वेळी हे अचानक आलेले काम
पाहून -
" एकट्याने एवढे काम कसे करणार ?, काशियर साहेब म्हणाले"
, मी त्यांना म्हटले, तुम्ही आणि
मोठे साहेब दोघे पैसे द्या, बाकीची पोस्टिंग -पासिंग मी एकटा करतो, काही लोड नाही होणार या कामाचा .
नेमक्या कामाच्या दिवशी आणि कामाच्या वेळी ",माझ्या कडून उशीर झाल्याची भरपाई मी करण्याचा प्रयत्न केला .
" सगळी गडबड पाहून इतर स्टाफ ही पुढे आला ," आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सर्व शिक्षक -वृंदाचे पगार
त्यांच्या खात्यात जमा केले ,आणि नंतर त्यांचे चेक पोस्त करून पेमेंट करून "कुणालाच निराश
केले नाही",
बँकेतील आम्ही सर्व स्टाफ ने केलेल्या सामुदायिक मदत कार्यामुळे डोंगरा एवढी हे अचानक करावे लागणारे काम
अगदी सह्जेतेने
पार पडले. मनेजर साहेब. हेड -केशियार साहेब, दोघांना ही समाधान वाटले. योग्य वेळी कस्टमर खुश झालेत या गोष्टीचे.
खिशात पगाराचे पैसे पडल्यावर ", चालून थकलेल्या त्या माणसांच्या चेहेर्यावर आता समाधानाचे हसू पसरले होते.
जातांना ते म्हणाले" बडे बाबू आज तुम्ही बस मध्ये आमच्या सोबत होतात ,हे बरेच झाले म्हणायचे.
तुम्ही खरेच बडे काम केले आहे", उद्या पासून आम्हाला सुट्या ,आपापल्या गावी जाणार आता .
आमच्या घरात दिवाळी साजरी होईल, केवळ तुमच्या आजच्या योग्य वेळी केलेल्या मदतीमुळे."
मित्रांनी , दर दिवाळीला मला हा प्रवास आणि तो प्रसंग आठवतो, आणि आमच्या मदतीमुळे
त्यांच्या चेहेर्यावर उमटलेले समाधानाचे हसू आठवते.
आज २०१३ साली सुद्धा ही आठवन ,
मला एका प्रवासाने दिलेल्या अनुभवाचे समाधान देऊन जाते.
----------------------------------------------------------------------------------------------------------
-अरुण वी.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२.
--------------------------------------------------------------------------------------------------------------