Thursday, December 28, 2017

लेखमाला - आठवणीतील गाव- परभणी - लेख-१२ वा - हैद्राबाद बँकेतील काही आठवणी ...!

लेखमाला - आठवणीतील गाव- परभणी -
लेख-१२ वा -
 हैद्राबाद बँकेतील काही आठवणी ...!
-------------------------------------------------------------------------
नमस्कार रसिक हो ,
या लेखमालेच्या निमित्ताने दर आठवड्याला तुमच्याशी लेखन-संवाद करण्याची छान सवय लागली आहे, तुम्ही माझ्यासाठी श्रोते आणि रसिक वाचक आहात ..तुमचा प्रतिसाद आहे म्हणून ..हे सारे खुलवून सांगण्यात मजा आहे ,

आजच्या लेखात .आता इतिहासात जमा झालेल्या हैद्राबाद बँकेतील माझ्या सहकारी मित्रांच्या आठवणी बद्दल सांगावे असे वाटते आहे..कारण ३३ वर्षे मी या हैद्राबाद बँकेत नोकरी केली .अनेक  गावी फिरलो ..अनेक शाखामधून काम केले ,त्या वेळी जे सहकारी लाभले ..त्यांची आठवण नेहमीच होते .,समक्ष भेटी भले ही होणे शक्य नाही ..पण, अंतरीच्या भेटी आठवणी स्वरूपाने होतच असतात ..ही अनुभूती आपण सारेजण घेतच असतो.

तसे म्हटले तर ..हैद्राबाद बँक ..माझ्या आयुष्यात ..माझ्या जन्मा पासूनच सोबत होती ..माझे वडील ..विठ्ठल हनुमंत देशपांडे -लोहगावकर , यांनी याच बँकेत माझ्या आठवणी प्रमाणे ..१९४८  ते १९८९ ..अशी ४०-४१ वर्षे नोकरी केली .आणि नंतर मी देखील १९७२ मध्ये बी.काम झालो आणि फेब्रुवारी -१९७३ ते जून -२००६ अशी ३३ वर्षे नोकरी करून स्वेच्छा -निवृत्ती घेतली..या दोन्ही कार्यकाला मुळे..हैद्राबाद बँक आणि आमचे एक भावनिक नातेबंध होते असे म्हणणे योग्य ठरेल.

या दरम्यान अनेक गावं फिरून झाली ..एका जागी स्थिर न राहणाऱ्या , आणि नोकरीत सतत बदली होत असलेल्या  माणसांची एक मनोवृत्ती तयार होऊन जाते , या भावनेला  "एक कोरडी तटस्थ -भाववृत्ती " म्हणू या ...अशी माणसे ज्या  गावात असतात .तोपर्यंत तिथले होऊन जातात ,पण, बदली झाली की ..अगदी निर्लेप मनाने त्यागावातून ..पुन्हा नव्या गावाकडे जाण्यास तयार असतात ..आमचे अगदी असेच होत असे ..बदली झाल्याच्या दिवशी ..हमखास हे गाणे आठवत असायचे ..चल उड जा रे पंछी..के अब ये देस हुवा बेगाना ..! 
आणि मग नव्या ठिकाणी नव्या उत्सहाने समरस व्हायचे ..हे शिकवण जणू वडिलांच्या बदलीच्या निमित्ताने मिळत गेली ..आणि पुढे माझ्या बदल्या होत गेल्या त्या वेळी हीच शिकवण मी आचरणात आणीत गेलो. असो.

निझाम राजवटीत ..हैद्राबाद बँकेत ..जे कर्मचारी नोकरीत असायचे त्यात मुस्लीम कर्मचारी मोठ्या प्रमाणात असणे स्वाभाविक  होते .. १९५५ ते १९६० ..माझ्या लहानपणीच्या दिवसात मला बँकेतील वडिलांचे सहकारी मित्र आठवतात ..ज्यांचा पोशाक ..शेरवानी , पायजमा , आणि डोक्यावर  लाल गोंडे असलेली मोठी टोपी ,असा होता  हे सगळेजण आपापसात उर्दू जबान मध्ये बोलत , बँकेतले कामकाज उर्दूमध्ये पाहिल्याचे मला आठवते ..शाई भरलेया दौती , मोठे टाक .आणि ब्लोतिंग पेपर चा झुलता स्टेंड.टेबला टेबलावर असे.अतिशय आद्बीची आणि कानाला मिठी मिठी वाटणारी उर्दू ..तेंव्हा पासून माझ्या मनात घर करून बसलेली आहे.
ईद-मुबारक आणि शीर-खुर्मा ", लजीज बिर्याणी ..यांची लज्जत लहानपणापासून घेत आलो आहे . ईद  की वो मुबारक -बाते आणि  " इत्र् की खुशबू " ..माहौल ..जैसे के वैसा .कायम है सरकार...

माझ्या नोकरीच्या वर्षात मला माझ्या अनेक मुस्लीम सहकारी मित्रांचा सहवास लाभत गेला ..यात काही माझे अधिकारी -आणि साहेब म्हणून होते ..तर यातले काहीजण .माझ्या सारखे कारकून श्रेणीतले आणि काही चपराशी  म्हणून कार्यरत होते .. आमची क्याटेगरी ..कोणतीही असो, आम्हे खूप छान मित्र म्हणून सोबत राहिलो ..हीच आठवण खूप आनंदाची आहे.

माझी सुरुवातीची शाखा - अंबाजोगाई .वर्ष - १९७३-१९७५ . इथे माझे हेड -बाबू होते ..महम्मद अफजल साहेब , यांनी माझ्या  उमेदवारीच्या काळात बँकेतील काम समजावून दिले ..ते परभणीचे .आणि मी पण परभणीचा ..हा आमच्या मैत्रीतला प्रेमळ धागा होता ..याच अफजल साहेबांच्या सोबत दोबारा काम करण्याचा योग पुढे अनेक वर्षांनी आला ..जेंव्हा आम्ही बँकेच्या कृषी विद्यापीठ शाखेत एकत्र काम केले ते १९९६ ते १९९९ या दरम्यान .

माझ्या वडिलांची बदली उदगीरला झाली आणि मी तिथून २० किलो मीटर अंतरावर असलेल्या .कमालनगर-जी.बिदर या गावी आलो .. तिथे मला मनेजर म्हणून जनाब -अहेमद मोहियुद्दिन हे गृहस्थ होते . कोहीर या गावचे हे मोठे श्रीमंत परिवारातील ..या साहेबांचा परिवार हैद्राबाद ला होता . साहेब एकटेच कमालनगर ला राहत असत. मोहिउद्दिन साहेबांना  एकदम शाही आणि जानदार व्यक्तिमत्व लाभलेले  होते .. सफाईदार इंग्रजी आणि नफीस उर्दू ..असे बोलायचे की ऐकत राहावे.  हैद्राबादी वातावरणात राहिलेले हे साहेब ..छोट्याश्या खेड्यात एकटेच राहायचे ..कधी त्यांना विचारले तर .. शांतपणे म्हणयचे ..देखो बाबू .तुम्हे  तो अभी सब सिखना है ..
याद रखो ....जिंदगी सब सिखा देती है ..भीड मे रहो ..या अकेले  रहो ..खुद को कभी अकेला न छोडो ..बस !.फिर क्या ..दिन तो निकल  ही जाते है ...

त्यावेळी बँकेचे वर्ष अखेर कामकाज ..डिसेंबर होते .. या महिन्याचे शेवटचे दिवस .आम्ही या मोहिउद्दिन साहेबांच्या सोबत बँकेतच मुकामी असायचो . अशा वेळी ..हे साहेब वडीलधार्या सारखी स्टाफची  खाण्या-पिण्याची काळजी घेत असत ..१९७६- ७८ दरम्यानचे हे दिवस असावेत ..आता चाळीस वर्ष झालीत या गावाला सोडून .. पण. या अह्मेद मोहिउद्दिन साहेबांनी स्वतःच्या हाताने तयार केलेली ..आणि मुहाब्ब्त्से खिलायी हुवी " मसूर दाल -और दुध " मे पकायी हुई वो लजीज बिर्याणी ,"आठवली की डोळ्यात पाणीच येते ..पुन्हा ऐसे होणे नाही.

पुढे कमालनगर या गावाहून ..माझी बदली  याच बिदर जिल्ह्यातील ..औराद -संतपुर ..या तालुक्याच्या गावी झाली.
इथे असतांना एक नवा क्लर्क  रुजू झाला .. त्याचे नाव ..फिरासत आली खान ..बिदरचा राहणारा .. एकदम हसतमुख नवयुवक ..खूप छान सूर जुळून आले होते , 
बिदरला त्याच्या घरी तो घेऊन जायचा ..तेंव्हा .आमची जी खातिरदारी होत असायची की काय सांगावे .अशा "मेहमान नवाजी " साठी तकदीर -वाले मेहमान असावे लागते . 
औराद्ला हा फिरसात अलीखान ..छोटासा कमरा किरायेपर ..घेऊन राहायचा . एखाद्या संध्याकाळी त्याच्या सोबत त्याच्या खोलीवर गेलो की .. साब ..दाल-चावल " पकाता हुं अबी .! फिर . टेस्ट कर के जायीएगा .आपको -  ना बोलणे की गुंजाईश नाही है असे समझो ...!
त्याचा आग्रह करण्याचा "अंदाज " इतका नजाकतदार असायचा ..की त्याला "नाही " म्हटले तर ? त्याच्या गोर्या पान चेहऱ्यावर नाराजी पाहूच शकणार नाही " असे वाटायचे. मग काय . फिरासात अली खान " या मित्राने बनवलेला ..दाल चावल " खाणे के बाद दिल खुश होता ही था.

कर्नाटक मधून माझी सुटका झाली १९७८ मध्ये ..आणि मी थेट माझ्या आजोळी - जिंतूर या गावी आलो. जिंतूरच्या शाखेत तर काय सगळेच ओळखीचे आणि घरचे वाटावे असे सहकारी मित्र होते .. या जिंतूर शाखेत ..शेख हुसेन ..हा तरुण मित्र लाभला ..होता चपरासी - पण प्यून " म्हणून त्याला कधी वागवले नाही . एकदम हजरजबाबी .आणि हर फन मी माहीर " असा हा उस्ताद मित्र होता . काही प्रोब्लेम येऊ द्या .. हुसेन ला सांगा .. पोर्ब्लेम फिणीस .
त्याचे बोलणे , हसणे , आणि त्याला शोभून दिसणारी ..काळी-भोर दाढी ...एकदम हिरो के माफिक राहायचा हा हुसेन मिया . मला तर त्याला पाहिले की ..हिरो झालेल्या मेहमूद ची ..आठवण व्हाव्यची ..टाईट पेंट, तसाच मस्त रंगीत शर्ट, या हुसेन ला सगळे "बाबू " या नावाने पण बोलत . 
छान आणि सरळ साध्या स्वभावाने वागणारा माणूस ..इतरांना नक्कीच आवडतो .. जिंतूर ला लाभलेला हा शेख हुसेन- बाबू .हा मित्र याचेच उदाहरण आहे.

जिंतूर हून माझी बदली छावणी शाखा -औरंगाबाद ला झाली .. या शाखेत हेड क्याशियार होते..याह्या अझीझोद्दिन ,
 ..शायराना तबियत असलेले  सिनियर सहकारी होते .. हिंदी फिम- आणि हिंदी गाणी ..या समान आवडीवर आमचा दोस्तांना एकदम गहिरा झाला होता. शनिवारी बँकेतून निघालो की .. एखादा पिच्चर ..हो जाये .असा हुकुम करीत ..त्यांच्या फर्माईश की तामील..करणारे आम्ही तीन चार दोस्त लगेच हो म्हणत असुत 
याह्या अझीझोद्दिन ..रिटायर झाल्यावर ..आम्हाला याद करायचे ..औरंगाबाद ला रॉक्सी तोकीज च्या जवळ त्यांच्या मुलाचे छोटेसे दुकान होते .. तिथे त्यांना भेटायचो .. हातात हात घेऊन ते ..म्हणायचे "शुक्रिया ..आप आये तो ..!
त्यांच्या चेहेर्यावर जे हसू उमटायचे ..बस ..भेटीचे सार्थक व्हायचे.

१९८६ मध्ये परभणीला आल्यावर अगोदर पासून परिचित असलेल्या अनेक मित्रांच्या सोबत प्रत्यक्ष्य काम करण्याचा योग आला .. अफजल साहेब . मेहेबुब ,  अमीर अली, अब्दुल हादी , सैद अहेमद , हकीम फारुकी , महमद अब्दुल कादर , 
यांच्या सोबत अनेक वर्ष काम केले , या सर्वांनी वेळो वेळो त्यांच्या पारिवारिक समारंभात मोठ्या प्रेमाने मेहमान म्हणून बोलावले .यांच्याकडील .ईद-मुबारक आणि मेजवानी कधीच चुकली नाही ..किती आठवणी आहेत या सर्वांच्या..!
या सर्व मित्रातले  एक खास नाव आहे.. कॉमरेड - एम ए गफार . गफार साहेब आमच्या ए आय बी ई ए " या बँक कर्मचारी संघटनेचे मोठे पदाधिकारी होते . त्यांच्या लोकप्रिय असण्यात आमच्या या युनियनचा मोठाच वाट आहे . सर्वांना सोबत घेऊन काम करणारे .गफार साहेब .म्हणजे ..हर दिल अजीज -अशी शाख्य्सियत आहे.
आमची युनियन आणि बँक .या दोन गोष्टी शिवाय गफार साहेब आमचे दोस्त झाले ते ..फिल्म आणि फिल्म संगीत या आवडीमुळे . 
परभणीला स्टेडीयम मध्ये त्यांच्या मुलाचे नॉव्हेल्टी" हे व्हिडीओ-पार्लर आहे.. माझ्या वास्तव्यात या दुकानाचे आम्ही प्रमुख कस्टमर होतो .. किती पिक्चर पाहिले याची गणतीच नाही  . व्हीसीपी आणि पिक्चर कॅसेट "आमच्या साठी नेहमीच तयार असायची.  संध्याकाळी ..गफार साहेब सोबत ..चहा आणि सिगरेट ..आणि आवडती फिल्मी गाणी ..क्या माहौल होता होगा . 
गफार साहेब ..तुमसा नही देखा . "ये लम्हे .यादगार है हमेशा .आपका शुकर गुजार हुं.
 बहोत शुक्रिया परभणीवाले  दोस्तो.  जवाब नही आपका 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखमाला - आठवणीतील गाव- परभणी -
लेख-१२ वा -
 हैद्राबाद बँकेतील काही आठवणी ...!
-अरुण वि.देशपांडे .
मो- ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------

Monday, December 18, 2017

लेखमाला - आठवणीतलं गाव- परभणी . लेख-११ . परभणी -माझे मुख्यालय

लेखमाला - आठवणीतलं गाव- परभणी . 
लेख-११ . परभणी -माझे मुख्यालय 
----------------------------------------------------------------------

नमस्कार मित्र हो , माझ्या आठवणी तुम्हाला सांगत असतांना  आज पुन्हा ते दिवस जसेच्या तसे आठवून मन खूपच भारावून जाते आहे. 
परभणीच्या वास्तव्याने माझ्या आयुष्यात विविध रंग भरले आणि एक सुंदर असे भावविश्व उभारले यात शंकाच नाही. या आठवणी म्हणजे मन- मोराचा सुंदर पिसरा आहे असेच म्हणावे लागेल.

४१ - वरदान -श्रीराम नगर -, कारेगाव रोड -परभणी " हा माझा वास्तव्य पत्ता सर्वपरिचित होण्याचे श्रेय माझ्यातील साहित्यिकास देतो ,कारण कॉलनीत पोस्टमन येत असे तो माझे टपाल आहे म्हणून ..एरव्ही ..त्याला अधून मधून आले असते तरी चालले असते .पण तसी संधी  फार कमी वेळा मिळाली असेल..कारण रोज माझे साहित्य विषयक टपाल असायचे .पत्र , मासिक , पेपरचा अंक .कधी चक्क मनी ओर्डेर- मानधन म्हणून येत असे ..त्यामुळे .आज टपाल काय येते ? याची उत्सुकता मला कायम उत्तेजित ठेवीत असे .गावाला जरी गेलेलो असलो तरी ..आलेले टपाल हा पोस्टमन सांभाळून ठेवीत असे,आल्यावर ..आठवणीने माझ्या हवाली करीत असे .. .गेल्या काही वर्षात ..ई-मासिक - ई-पेपर साठी लेखन करीत असल्यामुळे ..पोस्टमन "या जिवलग मित्राच्या सहवासाला दुरावलो आहे ..एक मात्र नक्की ..परभणीच्या "त्या पोस्टमन मित्राची -आठवण .नित्य नेमाने होत असते .

पारिवारिक कुलाचार मध्ये ..श्री महालक्ष्मी पूजन " हा सण खूप मोठ आणि महत्वाचा ..परभणीला या सणाचे महत्व घरोघरी आहेच आहे ..त्यामुळे एक छान वातावरण या दरम्यान असते ..३०-३५ वर्षापूर्वीच्या दिवसात तर हे सण आणि कुलाचार अगदी यथासांग आणि सार्ग-संगीत पार पाडायची पद्धतच होती ..गृहिणींना यात कुठलीच तडजोड करणे मंजूर नसायचे ..त्यामुळे .श्री गणेश उत्सव ,, महालक्ष्मी ,नवरात्र , दिवाळी ,  मकर -संक्रांत , रथ सप्तमी , श्रावण महिना ..हे महिने म्हणजे परभणीचा परिसर भक्तीरसपूर्ण आणि संस्कारशील होऊन जात असे ..आता पण यात फारसा फरक पडला नसेलच .
परभणीत माझा पारिवारिक परिसर खूप मोठा होता ..हे या अगोदरच्या लेखातून मी तुम्हास सांगितले आहे , सन- -सुदीच्या निमित्ताने या सगळ्याकडे आमचे जाणे -येणे होत असायचे .थोडक्यात आमचे वेळापत्रक तसे कायमच व्यस्त असायचे ..मुळात या सगळ्यांची आवड असल्याने.याचा आनंद घेणे सोडीत नसे.

माझे आई-वडील आणि धाकटे बंधू त्यावेळी औरंगाबादला होते ..एकदा सर्वानुमते ठराव पास झाला ..की "आपल्या महालक्ष्म्या .या पुढे ..परभणीच्या घरी - श्रीराम नगर -वरदान " मध्ये होतील .. आणि या निर्णयाने  पुढे अनेक वर्ष ..श्री महालक्ष्मीचा सण..आमच्या परिवारातील सर्वांच्या सहभागाने मोठ्या थाटामाटात पार पडला .. ..असे सर्वांनी एकत्र येऊन ..एकमेका साह्य करू ..या उक्ती प्रमाणे ..श्रम -सहकार्य करून ..आनंद अनुभवणे ..कसे असते ..हे या अनेक वर्षात आम्ही सर्वांनी तर अनुभवले .हाच अनुभव त्यावेळी माझ्या अनेक स्नेही -आणि मित्रांनी पण घेतला .
या सणामुले ..एका अर्थाने - परभणी - हे आमच्या साठी माझे मुख्यालय " झाले असेच म्हणता येईल.

परभणी - हे  रेल्वे  आणि बस ..दोन्ही मार्गांनी ये-जा करण्यासाठी खूपच सोयीचे असणारे आणि वाटणारे गाव आहे ..
मी परभणीला होतो त्या काळात मोजक्या रेल्वे -गाड्या होत्या ..अगदी चार-पाच ..म्हटले तरी चालेल,.आणि नुकतेच पाहिले -..अबब...!  ..किती रेल्वे ये-जा करतात . .किती आहे हे तर मोजता आले नाही ..उलट रेल्वे गाड्यांची नावं वाचू शकलो नाही ..अर्थात ..हा मोठा बदल सुखद वाटावा असाच आहे.

हायकोर्ट ट्रेन सुरु झाली .त्याचे अप्रूप खूप होते ..त्यानंतर तपोवन आली .. एलोरा आणि अजिंठा ..यातर होत्याच ,वेगवान होतानाची परभणी अनुभवतांना खूप छान वाटत असे ..मी खूप रेल्वे स्टेशन पाहिली ..पण.. परभणी जंक्शन ची मजा कुठेच नाही .. स्टेशनवर मिळणारी पुरी-भाजी , बाहेर असलेल्या कुंजबिहारी हॉटेलचे भजे .." मेजवानी दिल्याच्या रुबाबात मी माझ्या दूर दूर गावाहून आलेल्या मित्रांना आवर्जून खिलवले आहेत.

आम्ही राहायचो तो श्रीराम नगर हा परिसर .सुरुवातीला ..गावापासून खूप दूर आहे असे वाटायचे ,पण जस जसे दिवस जाऊ लागले ..आणि मनाने अम्हे रमत गेलो .तसे तसे ..या परिसराबद्दल खूप आत्मीयता वाटत गेली ..ती इतकी की ..परभणी -आणि श्रीराम नगर ..याशिवाय इतर ठिकाणी फार वेळ राहणे नको वाटू लागले.

बँकेच्या कामकाजात कम्प्युटर येण्यास अजून वर्षे होती ..बँकेचे कामकाज ..हाताने होत असे .. आणि परभणीच्या सगळ्या हैद्राबाद बँकेच्या शाखेत भरपूर काम असायचे .. त्यामुळे ..कॉलोनितले सगळेच तसे बिझी असायचे ..संध्याकाळी .बँकेतून आले की ..मोगलाई वेळापत्रक ..दुसरे दिवशी सकाळ पर्यंत अमलात असायचे .
आमच्या सोयी प्रमाणे घड्याळे  देखील आरामशीरपणे घंटा-घंटाभर फिरत ..असे वाटायचे.

असा हा सुखद काळ परभणीत अनुभवला .या आठवणींची उबदार रजई लपेटून घेतली की थंडीचा हिवाळा सुखकर वाटू लागतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, December 15, 2017

माझ्या प्रकाशित कविता संग्रहाबद्दल

माझ्या प्रकाशित कविता संग्रहाबद्दल
-------------------------------------------------
नमस्कार-मित्रहो
माझे प्रकाशित झालेले कविता संग्रह खालील प्रमाणे-
माझे इ-बुक ओनलाईन वाचवीत ..गुगल सर्च वर..
अरुण वि.देशपांडे  आणि  Arun V.Deshpande 
या नावावर क्लिक करावे.
--------------------------------
कविता संग्रह-
---------------------------------
१.गाणेदिवाणे, २००३,
२.मन डाेह - २०११
३ शरण समर्था जाऊ- २०११,
ई- कविता संग्रह.
--------------------------
१..मनभावन- ई- कविता संग्रह, २०१४
२. स्नेहबंध - ई- चारोळी संग्रह- २०१५,
३. स्वप्न हे नाजुकसे ई-कविता संग्रह -२०१६  
४. मानसपूजा - ई-कविता संग्रह - २०१६ 
५. सहेलीच्या कविता - ई- कविता संग्रह-२०१७ 
---------------------------------------------------------
माझे प्रकाशित बालकविता संग्रह
------------------------------------------------
१.गोड गाेड चिकोबा- २००३
२.माझा तिरंगा प्यारा- २००५,
३.धांगडधिंगा माैजमस्ती- २००९,
४.आली आली परीराणी- २०१४,
ई- बाल कविता संग्रह.
------------------------------------
१..पियुचे स्वप्न - ई- कविता संग्रह- २०१३,
२.टिनु- मिनुच्या कविता- ई-कविता संग्रह- २०१४
३ - गाेड गाेड गाणी - कविता ई- कविता संग्रह-२०१६
----------------------------------------------------
स्नेहांकित -
अरुण वि.देशपांडे .

हितगुज लेखमाला - लेख क्र.२० लेख- कामाची माणसं ...!

हितगुज लेखमाला -
लेख क्र.२० 
लेख-
कामाची माणसं ...!
----------------------------
एखाद्याच्या हाताला ,कामाला असलेला उरक " पाहून लोक त्याच्या कार्य-क्षमतेबद्दल मत व्यक्त करीत असतात ,त्यामुळे "कामाचा माणूस -इतके कौतुक पुरेसे नसते ,याला जोड पाहिजे असते  ती. काळ-काम-आणि वेग ..यांचे गणित अचूकपणे सोडवणार्या कार्य- कुशलतेचे .
काहीजण खूप काम करणारी असतात , पण ,ते कधी,कसे ,किती वेळात संपवायचे ? या टाईम-टेबलशी त्यांना  देणे-घेणे नसते ,कारण काही कार्य-प्रकल्प असे असतात की, ते निरंतर स्वरूपात ते कार्य चालू रहाणारे असतात, त्या कामात काम करणारी येतात आणि जातात .त्यांचा कार्यभाग संपला की.त्यातून ते बाहेर पडतात .अशा ठिकाणी तुमच्या कामाचा उरक कसा आहे ते फारसे पाहिले जात नसते , काम चालू असणे महत्वाचे समजले जाते.

पण सर्वच कामाच्या बद्दल आपल्याला असे म्हणता येत नाही ..दिलेल्या वेळेत , ठरलेल्या दिवशी , ठराविक मुदतीत जी काम करायची असतात , तिथे काम करणाऱ्या माणसांची ,त्यांच्या काम संपवण्याच्या कुशलतेची कसोटी असते..
अशा ठिकाणी "काळ -काम आणि वेग " असे  कठीण आणि अवघड गणित सोडवायचे असते ..अशा ठिकणी होणार्या परीक्षेत जे पास होऊन दाखवतात ..ते अर्थातच .नजरेत भरणारी ,लक्षवेधी कामगिरी करणारे ,आणि सगळ्यांना सोबत घेऊन कार्यपूर्ती करणारी .अशी नेतृत्व -गुण असणारी "नायक-मंडळी" असतात .

कामच्या माणसांना  ..नेहमीच कामचुकार आणि काम-चोर माणसांशी एक छुपी लढाई लढावी  लागत असते .कारण "कामाची माणसे ..फक्त काम-एके -काम "अशा समर्पित वृत्तीने काम करीत असतात ..पण कामचुकार आणि काम-चोर "ही चतुर आणि बेरकी माणसे .फक्त कामाचा देखावा करून .साहेब-लोकांच्या नजरेत कसे भरता येईल ..या खटपटीत असतात ,त्यांची  नाटकं सगळ्यांना काळात नाहीत असे थोडेच असते , पण साहेबलोक -सोयीस्करपणे त्यांना बाजू करून ..अगोदर काम करून घेऊ .मग यांचा हिशेब .करू असे करतात , , अशा धरसोड -धोरणामुळे खूपवेळा ..खूप मरमर करून काम करीत रहाणार्या .कामाच्या माणासावर .अशा संधी-साधू कामचुकार माणसांमुळे अन्याय होतो ..हे निमुटपणे पहावे लागते.

कामाच्या माणसांचे दोन प्रकार - एक असतात ..कोणतीही तडजोड न करता ..इमाने-इतबारे काम पूर्ण करून नामा-निराळे होऊन जात बाजूला रहाणे , आणि दुसरे असतात ते..साहेबांच्या मर्जीतले खास .कामाची माणसे - ज्यांच्याकडे नेहमीच विशेष कामगिरी असते ..या कामाचे स्वरूपच असते की ..कशी ही , किती ही .तोड-जोड , जोडा-जोड  करावी लागली तरी ती करा ..पण, हे काम आपल्या हातून जाता कामा नये ..अशा पद्धतीने काम फत्ते करून दाखवणारी "कामाची माणसं ..ज्यांना "कार्य-मुत्सदी ", डिप्लोमसी-तज्ञ " , अशा भारी-भारी नावाने ओळखले जाते ,
 पडद्यामागे असो वा बाहेर खुलेआम ..सूत्रं यांनाच  हलवायची असतात .आणि जितके जोखीम -भरी कामगिरी .तितकी यांची कसोटी , अर्थात हे एक प्रकारे आर्थिक-मिशन असते  , त्यामुळे इथे फक्त ..यश आणि यश "अपेक्षित असते , ही कामाची माणसं .. वेगळ्याच मनोवृत्तीची असतात ..सामन्या माणसाशी यांची तुलना होऊ शकत नाही.

कामाच्या माणसांची कदर केली जातेच ..फरक इतकाच आहे की .कधी ती वेळेवर होते, कधी वेळ पाहून होते , 
एक मात्र नक्की ..कामच्या माणसांना कामाशिवाय इतर गोष्टींचा विचार करण्यासाठी वेळ नसतो ..!
वर्क इज वरशीप " ..असे म्हणात ते या वृत्ती मुळेच.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------लेख -कामाची माणसं 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७४२ 
------------------------------------------------------------------------------------------------------

लेखमाला -हितगुज लेख क्र-१९ दसरा सण मोठा ...!

लेखमाला -हितगुज 
लेख क्र-१९ 
दसरा सण मोठा ...!
----------------------------------------------
नमस्कार मित्र हो - 
नवरात्रीची जागरणं, आरती ,गरबा ,सांस्कृतिक कार्यक्रम ..घरात नवरात्रीचे  पवित्र -मंगलमय वातावरण , एक माहौल बन गया हर तरफ ", असेच म्हणवे वाटत असेल नाही ! , बघा ना , गणेश उत्सव , महालक्ष्मी पूजन ,नवरात्र -घट-स्थापना ,आणि विजयादशमी ..दिवस कसे आले आणि कसे गेले ..एकदम .भारलेले आणि झपाटलेले .! बरोबर ना ?

आपल्या दैनंदिन जीवनातल्या एक सारख्या वेळा -पत्रका प्रमाणे वागून आपले मन एकसुरी आयुष्य जगात असते , आणि मन ,ते देखील सवयीने डोळ्यावर झापडं बांधून वागत असते ..अशा वेळी ..आपले हे सणवारांचे दिवस आणि महिने सुरु होतात ..जादूच घडते ..सगळीकडे एक चैतन्य येते ..भक्तीभाव .एक चेतना निर्माण करतो .आणि मनाला उत्साहाचे उधाण येते , आपल्या सांस्कृतिक जीवनात आपण हे सण घरगुती स्वरूपात .परिवारात साजरे तर करीतच असतो , त्या पेक्षा जास्त  हे सगळे सण- उत्सवी स्वरूपात .सामुहिक स्वरूपात साजरी केली जाण्याची जे आपली परंपरा गेल्या शेकडो -हजारो वर्षापासूनची आहे ..त्यात आपल्या विशाल अशा सामुहिक समाज-जीवनाचे प्रतिबिंब दिसून येत असते .
दरवर्षी भारतीय महिना -अश्विन -शुध्द -प्रतिपदा -या दिवशी ..शारदीय नवरात्र आरंभ होते - आणि पुढे १० दिवस हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो अश्विन शुद्ध -दशमी .म्हणजेच ..विजया दशमी- दसरा ..हा मोठा सण असतो .दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा " अस बहुमान या दिवसाला प्राप्त झालेला आहे.

विजयादशमी .म्हणजे अनेक अर्थाने यशोगाथा आहे..आपल्या सांस्कृतिक ठेव्यातून .विजयादशमीच्या विजयी -गाथा आपल्याला वाचायला मिळतात ..सुष्ट -आणि दुष्ट यांच्यातील युद्धात .नेहमीच दुष्ट प्रवृतीचा नाश होतो .असा संदेश या दसरा -सणातून मिळतो ..राम-रावण युद्ध त्यातील श्रीरामाचा विजय ,  आणि आपल्या भक्तांना त्रास देणाऱ्या महिषासुर नामक राक्षसाचा -दैत्याचा ,दुर्गा -मातेने केलेला  वध "  या घटना विजयादशमीच्या दिवशी झालेल्या म्हणून हा दिवस विजय साजरा आणि आनंद साजरा करण्याचा . नवरात्री -विजयादशमी -दसरा " हे पर्व आपल्या देशभरात साजरे केले जाते , नवरात्र अर्थात -दुर्गापूजन -देवी पूजन असते 
प.बंगाल मध्ये दुर्गा -पूजा मोहोत्सव , उत्तर भारतात .रामलीला -उत्सव .असे या नवरात्रीचे स्वरूप असते ,
म्हैसूरचा दसरा "तर जगभर प्रसिद्ध आहे. या दिवशीची दसरा -महोत्सव मिरवणूक पहाण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक म्हैसूर येथे येत असतात. असो.

नवरात्र-आरंभ होते आणि आपण सारे आतुरतेने वाट पाहू लागतो -विजयादशमी -ची ..लहानपणापासून आपण एक प्रसिध्द हाक ऐकत आलो आहोत .. "मोरूचा बाप मोरुस म्हणाला - मोरू उठ - नवरात्र सरले ..दसरा उजाडला ...!
दसरा -पहाट-उजाडते आणि आपण सगळे मोठ्या आनंदाने दसरा सण साजरा करण्याची तयारी करू लागतो ..
शुभ-कार्य आणि शुभ-योग म्हणून असलेल्या "साडेतीन मुहूर्त पैकी - दसरा -हा पूर्ण असा अत्यंत जनप्रिय असा शुभ-मुहूर्त आहे. या निमित्ताने -हर एक जण- त्याच्या योजनेप्रमाणे - संकल्पने प्रमाणे  नवे उद्योग, नवे व्यवसाय , नवे घर, नवे वाहन .नवे दागिने ..नव्या गोष्टीं, यांचा शुभारंभ ..करीत असतो ..आणि दसरा मुहूर्त - भरभराटीचा - यशाचा -भाग्याचा आहे " अशी श्रद्धा आपल्या सर्वांच्या मनात असते 
आपल्या गावाच्या सीमा उल्लघन करून .तिथे असलेल्या मंदिरात देव-दर्शन घेऊन , शमी पूजन करून एकमेकांना .आपट्याची -शमीची पाने देऊन शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला जातो . 
आताच्या नवीन परिभाषेत आपण असेही म्हणू या की ..नव्या नव्या कार्य क्षेत्रात सीमा ओलांडून कार्य-पुरती करून यश मिळवत नवी क्षितिजे  काबीज करीत पुढे जात राहायचे ..हे असे सीमा-उल्लघन आपल्या साठी विजयाची कहाणी असेल ..याला आपण विजयादशमी म्हणू शकतो की.
आपणा सर्वांना दसरा -विजया दशमीच्या खूप खूप शुभेच्छा .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - हितगुज ,
लेख-क्र-१९ 
दसरा सण मोठा !
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 

लेखमाला -हितगुज - लेख क्र- १८ " सूर जुळणे ...!

लेखमाला -हितगुज -
लेख क्र- १८ 
" सूर जुळणे ...!
----------------------------------------
एक व्यक्ती म्हणून , एक माणूस म्हणून आपण सतत अनेकांच्या संपर्कात येत असतो ,दोन व्यक्तींचे भेटणे असो, की , अनेक व्यक्तींशी एकाच वेळी बोलणे असो ..या प्रसंगी .कधी मनापासून बोलायचे असते , काही ठिकाणी .सहभाग आहे म्हणून काही व्यक्त करायचे असते , तर काही वेळा ..अत्यंत महत्वाच्या गोष्टी बद्दल चर्चा करून ..निर्णय घेण्याची जबाबदारी पार पडायची असते. हे सगळे प्रसंग ..आपली परीक्षा पाहणारे असतात ,यात  आपली कसोटी असते ...साहजिकच .आपली मानसिक अवस्था चमत्कारिक असणे वावगे समजले जाणार नाही . अशा वेळी समोरच्या माणसाशी ,व्यक्तीशी .कसे बोलायचे , काय काय बोलायचे ? याची कितीही तयारी  केली तरी ..आतून कुठे तरी धाकधूक वाटत असते .की.समोरचा बाबा .कसा असेल ? ..काहीच अंदाज करता येत नाही शेवटी आपणच  ठरवतो- जे होईल ते होईल, आर या पार .., !

आणि मग समक्ष संवाद होतांना ,चर्चा करतांना ..हळू हळू जाणवत रहाते की ..अरेच्च्या .आपण समजलो तितके काही हे अवघड नाहीये ..आपल्या अपेक्षे  पेक्षा समोरचा माणूस खूपच रिझनेबल आहे ", किती शांतपणे ऐकून घेतोय , आणि चेहेरा किती प्रसन्ना आणि बोलका आहे.पाहून वाटतंय की ..याला आपल्या मनातील समजलंय .." वा - पहिल्याच भेटीत झकास सूर जमलेत की ...!

मित्र हो - अगोदरचे  टेन्शन किती सहजपणे कमी झाले ..याचे सगळे श्रेय .त्या समोरच्या व्यक्तीचे आहे .त्याच्यातील .स्वभाव-गुणांचे आहे. आणि ...समजा , असे नसते .तर काय झाले असते .?
. चर्चा -आरंभ होण्याआधीच वातावरण गंभीर झाले असते , आपण काय बोलतो,याकडे जर त्या व्यक्तीने ."मी ऐकतोय असे दाखवून .थंड आणि मक्ख चेहेर्याने बसून राहिला असता तर काय झाले असते ..? अर्थातच ..निरास आणि बेसूर अशा या भेटी ने  ..आपल्या पदरात .काही पडले नसते .कारण .इथे .संवाद झाला नसता ..सूर जुळूनच आले नाहीत ...तर .काय होणार ? नाही का .
हे तर तद्दन व्यावहारिक उदाहरण झाले ..त्यासाठी आपल्या पारिवारिक आणि दैनदिन जीवनातीलच उदाहरण घेऊ या ..

जसे ..आपल्याला खूप मित्र असतात .पण, या मित्रांपैकी  ..खास मित्र , सख्हे मित्र , जिवलग मित्र ,.असे उप-प्रकार असतातच ना ? का बरं असे ? .मित्रच आपलेच आहेत तरी पण यात असा भेदभाव का  करतो आपण ?
याचे उत्तर पुन्हा हेच ..ज्याश्याशी मनाचे सूर जुळले ..त्याच्याशी हृदयाची तार जुळते ...नाते मधुर होऊन जाते ..
कुणी कोणत्याही वयोगटातील असुद्या , हे असेच चालू असते .कारण .जो मनाला भावतो ..ज्याच्याशी आपण मनमोकळे करून त्याला आपल्या मनातल्या गोष्टी , आपली गुपितं सांगत असतो ..अस माणूस .साधासुधा कस असेल ? तो तर व्हेरी-व्हेरी स्पेशल  असतो ..कारण त्याच्याशी ..आपले आंतरिक सूर जुळून  आलेले असतात .
पती - पत्नी -.नवरा-बायको " हे नाते बेसूर  झाले असेल तर ते किती असह्य असते..याची उदाहरणे आपल्याला बघायला मिळत असतात , असे असूनही ..ही नाती आपण निभावून नेतोच ना. यालाच तडजोड असे म्हणायचे असते या उलट ..सामंजस्य आणि सहकार्य हे ज्य्नाच्या स्वभावाचे भाग असतात  अशा कुणाही स्त्री आणि पुरुष यादोघांच्या आयुष्याला जुळून आलेल्या मनांची साथ लाभते .अर्थातच त्याचे सहजीवन म्हणजे एक सुरेल आणि मधुर असे युगल-गीत होणारच.
संगीत -सूर आणि शब्द ..हा सगळा संयोग सुरेल होण्यासाठी ..शब्दांची रचना करणारा , त्याला संगीत साज देणारा ,आणि त्या रचनेला आपल्या मधुर आवाजातून सादर करणारा " अशा  वेगवेगळ्या कलावंतांचे  सूर जुळून येतात ..त्यावेळी .रसिकांच्या समोर नाद्ब्र्हम " साकारून येणारच .
एखाद्या संगीत मैफिलीत आपण अनुभवतो ..अचानकच एखाद्या गायकाची मैफिल बेसूर होते आहे असे रसिकांना जाणवते ..गायक गात असतो, वादक  वाजवत असतात , त्यांची साथ-सांगत नेहमी सारखीच असते .तरी पण हे त्या दिवशी तरी ..त्यावेळे पुरते तरी यांत्रिक वाटू लागते ..." पता नही आज क्यू मूड नही ..! असे म्हणून सगळेच ,"सूर न जुळल्याचे एक प्रकारे कबूल  करीत असतात "..असे नेहमी नसते होत ..पण, कधी तरी असे होतच असते ,
सगळं काही सुरात असतांना एकदम ..सूर -बेसूर होतात ..
आपले आयुष्य भरभरून जगण्याची इच्छा सगळ्यांची असते ..पण अश्या बहारदार जगण्यातले .सूर नेहमी जुळून आलेले असावे लागतात ..आणि आपल्याला सोबत अशीच माणसे असायला हवीत ..ज्यांच्याशी आपले सूर जुळून आलेले असतात.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला -हितगुज .
लेख क्र- १८ 
सूर जुळणे "!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 

लेखमाला - हितगुज - लेख-क्र-१७ आपले बोलणे .



लेखमाला -
हितगुज -
लेख-क्र-१७ 
आपले बोलणे 
------------------------------------------
आपले बोलणे नेहमीच महत्वाचे असते , याचे बरे-वाईट परिणाम होत असतात  , त्याचे  परिणाम वाईट झाले की निमुटपणे  ते आपल्याला स्वतहाला भोगावे लागतात . आपल्यातल्या  .."मी " .यावर जर आपले  नियंत्रण नसले तर केवळ बोलण्याने किती परिणाम होतात हे आपण सर्वांनी अनुभवलेले ,पाहिलेले आणि ऐकलेले असते.

 "बोलणे आणि ऐकणे "यांचा अतिशय जवळचा संबंध  आहे ..  बहुतेक वेळा ."कुणी सांगितलेले , कुणाकडून कळालेले ". कधी कधी तर ,निव्वळ अफवा ऐकून बोललेले  सुद्धा .आपण खातरजमा न करता विचार न करता मत देतो ..ते व्यक्त करतो .जे वाटले ते बोलून टाकतो ..अर्थातच स्वतःला "गोत्यात आणून टाकतो .
म्हणूनच एखादी गोष्ट कोण सांगतोय..बोलतोय याला अतिशय महत्व दिले जाते ..कारण बोलणाऱ्याच्या शब्दावर विस्वास ठेवायचा की नाही ? हे कोण बोलतो आहे यावर अवलंबून आहे.

बोलणे .हे जसे दोन वक्ती मध्ये असते, तसेच ते सामूहिक स्वरूपाचे असते ..दोन्ही प्रकारात ..बोलण्याचे परिणाम होतच असतात .किंबहुना .."बोलणाऱ्याच्या बोलण्याचे अनुकूल व प्रतिकूल ..असे दोन्ही ही परिणाम इथे अपेक्षित असतात , म्हणूनच ..सर्वांना रुचेल, पचेल आणि पटेल .असे बोलणारी व्यक्ती .आपल्या बोलण्याने प्रभाव पाडून ..कित्येकदा ..विरोधात गेलेली परिस्थिती पुन्हा फेवर" मध्ये आणू शकते .

आपल्या मनाचे आणि विचारांचे संतुलन ढळू न देता ..आपल्या  बोलण्यावर ठाम असणारे " नक्कीच कौतुकास्पद वाटावेत अशी माणसे असतात . ही माणसे कुणाला खुश करण्यासाठी किंवा कुणाला वाईट वाटेल म्हणून कसे बोलायचे ? असा विचार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत ..कारण  त्यांच्या बोलण्याने-सांगण्याने ..एखादी जनहिताची गोष्ट पूर्ण व्हावे असा प्रयत्न असतो .

काही माणसे स्वतहाचे मत सांगतांना .असे बोलत असतात की त्यांचे बोलणे ऐकल्यावर महाशय .- नम्र -जाणकार कमी ."  आणि ते  "उद्धट फटकळच  जास्त " वाटू लागतात , त्यांच्या  बोलण्यातून  अचूक व माहितीपूर्ण असे काही आलेले नसते   , या उलट .काही न करता .मी यंव केले असते त्यंव केले असते .अशी   स्वतःची टिमकी वाजवून -काम करणार्यांबद्दल कौतुकाने बोलण्या ऐवजी  तुच्छतेने बोलत बसणार त्यामुळे  तर ..असे  बोलणे अहं- चा दर्प "जाणवणारे असते.व या  बोलण्याला काहीच किंमत देत नाहीत.

इतकेच कशाला .आपल्या पारिवारिक - कौटुंबिक जीवनातील काही उदाहरणे घेऊ या ..म्हणजे ..माणसं आणि त्यांचे बोलणे " दोन्ही बद्दल अधिक जाणवू लागेल. बोलण्याच्या प्रकारची ,शैलीची इतके प्रकार आहेत की. बस रे बस.. आपणच म्हणू .व्यक्ती तितके बोलण्याचे प्रकार आहेत की आजूबाजूला .

उदा- निर्मल -स्वच्छ हेतूने प्रांजल बोलणे , सहज आणि आडपडदा न ठेवता मोकळे बोलणे , ओठावर एक आणि मनात दुसरे असे कावेबाज बोलणे ", स्वार्थी हेतूने .-कामापुरते गोड गोड- मधाळ बोलणे,लेकी बोले सुने लागे " ,अशा पद्धतीने कार्यभाग साधण्य साठीचे बोलणे , कुजके आणि मनाला दुखावणारे मुद्दाम घालून पाडून बोलणे , चार-चौघात एखादयाची मानहानी व्हावी  या हेतूने मस्करीचे बोलणे . टिंगल-टवाळी  करून एखदयाला अपमानकारक वागणूक देणारे बोलणे हे तर इतके  कॉमन आहे की ..त्याचे कुणाला काहीच वाटत नाहीये " अशी परिस्थती आहे.

जुन्या काळातील दिवस लक्षात असणार्या आजच्या मोठ्या माणसांना आजही अशी माणसे कायमची लक्षात असतील , एकमेकांना पाण्यात पहाणे , कुणाचे सुख न पहावणे ", मीच तो काय मोठा ", मीच एक लायक .बाकिंच्याची काय लायकी हो ? , असे वाक्य आणि उद्गार ..बोलण्यातून सहज येत असे. आता हे वाचून असेहे वाटू लागेल की. खरचं - धड बोलणारी माणसे नव्हती की काय ?  नव्हती असे नाही ..पण.. त्यावेळी खूप नसायची आणि आता तरी कुठे फारशी आहेत का ?  

बहुतेक वेळा तर समोरचा मूर्ख आहे, त्याला अक्कल नाही , त्याची काय लायकी ?मी ओळखून आहे " अशा थाटात माणसे समोरच्याला गृहीत धरून त्याला वाटेल तसे बोलत असतात . आपण किती ही म्हणू- जीभ गोड तर सगळे गोड " पण वास्तवात असे नाहीये म्हणून  तर ..आपल्या बोलण्यावर संस्कार झाले पाहिजेत " असा भावर्थ असणारे सुविचार आणि वाक्य -प्रचार आपल्याला शिकवावे लागतात ..हे किती वाईट आहे 

जिभेवर ताबा असावा .., या जिभेचा आपल्या चवीशी आणि खाण्याशी जितका संबंध आहे ,तितकाच आपल्या बोलण्याशी आहे .. गोड खाणाऱ्या जिभेला - गोड बोलण्याची  का अलर्जी असते ? हे एक न उमजणारे कोडेच आहे.
तीळ-गुळ घेऊन क्षणापुरते गोड हसले के कोटा संपला .पुन्हा जिभेचा पट्टा सुरु .

आपण कितीक जनाब्द्द्ल आपले मत एका शब्दात सांगून मोकळे होत असतो .. माणूस तसा चांगला आहे ..पण, बोलू लागला की खैर नाही , सगळं घालवून बसतो बघा केवळ बोलण्यापायी " ,असे अनुभव येऊन ही आपल्यात बदल व्हावा असे माणसांना कधीच वाटत नाही.. त्याचे समर्थन  असे केले जाते ..आता या वयात काय अपेक्षा करायची याच्या कडून चांगल्या बोलण्याची ?  लोक चांगले म्हणून निभावलं याचं .

पती-पत्नी , नवरा-बायको - स्त्री-पुरुष .. यांच्यातील बोलणे , त्यांचे संवाद , आणि ते एकमेकांशी कसे बोलत असतात आठवून पाहावे  त्यात .किती दुरावे , किती असमंजसपणा , किती कोरडेपणा ,बापरे.. तरी यालाच सह-जीवन "म्हणायचे असते . ..ज्यात सहजपणा नाही  त्याला काय म्हणावे ...सांगा बारा आता 

मित्रांनो  तुम्ही आम्ही मग ते ..माणूस आणि व्यक्ती म्हणून असो की  -.मग ती स्त्री असो वा पुरुष , तरुण असो वा -तरुणी, मुलगा-असो वा मुलगी , मोठी पिढी  असो की नवी पिढी .. शब्द आणि परस्पर बोलणे हे मना मनाला सांधणारे सेतू असावे " अशी साधी अपेक्षा सुद्धा कधी पूर्ण होईल का ? असे विचारावे वाटते.
तरी पण निराश होण्या पेक्षा सगळे काही छान होईल अशी अशा करणेच योग्य.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हितगुज 
लेख- १७ वा -
आपले बोलणे 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
---------------------------------------------------------------------------------------

लेखमाला - हितगुज लेख - १६ वा श्री गणेश उत्सव - एक सार्वजनिक महोत्सव .

लेखमाला - हितगुज 
लेख - १६ वा 
श्री गणेश उत्सव -
एक सार्वजनिक महोत्सव -
------------------------------------------------------------

गणपतीबाप्पा मोरया " या जयघोषात श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी " मंगलमूर्ती श्री गणनायक " .विघ्नहर्ता-गणराया " यांची प्रतिष्ठापना करण्यात येते . आणि मग पुढे  .."अनंत चतुर्दशी -पर्यंत  विविध कार्यक्रमांच्या आयोजनात लहान -मोठ्या आणि भव्य ते अतिभव्य "अशा सार्वजनिक स्वरूपात साजरा होणारा ,..कलावंतांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा हा सार्वजनिक उत्सव धमाल उत्साहात साजरा करण्यात येतो.
आपल्या मराठमोळ्या -सांस्कृतिक जीवनात .या गणेश-उत्सवास फार मोठे मनाचे स्थान आहे. सार्वजनिक स्वरूपात साजरा होणारा गणेश उत्सव  शतकोत्तर -रौप्य -महोत्सव वर्षात तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरा होतो आहे .हे एक फार मोठी अशी सामाजिक आणि सांस्कृतिक अशी घटना आहे.
श्री गणेश देवता ६४ कलांची देवता म्हणून -कलावंतांचे आराध्य दैवत आहे ..गणेश -उत्सवामुले  .कलावंतांना प्रोत्साहित करणारे एक महत्वाचे व्यासपीठ मिळते आणि यातूनच अनेक कलावंत  आपली ओळख निर्माण करून जातात 
सार्वजनिक स्वरूपात  गणेश उत्सव .साजरा करतांना त्यामागचा .प्रमुख  उद्देश जो ..होता आणि तोच अजूनही आहे ..तो म्हणजे .
समाज-प्रबोधन करणे आणि समाजिक उपक्रम करून -समाजसेवेचे कार्य  करणे ". या दोन्ही उद्देशांची पुरती होते आहे " हे आपण सर्व पाहतो आहोत.
कालामानानुसार या उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे ..समाजातील बदलत्या रुचीचे  -संकल्पनांचे प्रतिबिंब या उत्सवात पाहण्यास मिळते ...
जुन्या काळात गणेश-उत्सवात ."सादर होणारे मेळे" हे प्रमुख आकर्षण होते , त्याशिवाय .शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि सर्व-प्रिय फिल्मी-संगीत ..विषयक कार्यक्रम सादर करणाऱ्या गायक -कलावंतांना या महोत्सवाने फार मोठी ओळख निर्माण करून दिली ..फिल्मी-गाणी सादर करणारे -संगीत -समूह -ग्रुप.
ऑर्केस्ट्रा " गावोगावी कमालीचे लोकप्रिय झाले होते , नाटकवेड्या -रसिकांना .नामवंत नट-संचातल्या नाटकांची मेजवानीअसे, लोक-संगीत कार्यक्रम धडाक्यात होत असत  यावरून महोत्सवात फक्त ..मनोरंजन आणि करमणूक "  साधले जात असे असे मात्र मुळीच नाही,
अनेक गणेश -मंडळातून .."बौद्धिक -खुराक देणारे , आध्यत्मिक आणि वैचारिक वृद्धी करणारे , धार्मिक- आख्याने-आणि कीर्तन .असे प्रभोधन आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम आवर्जून सादर केले जायचे ..
सार्वजनिक गणेश उत्सवाचे हे स्वरूप ..पुणे-मुंबई .या शहरापुरते होते ..असे नही. महाराष्ट्राच्या लहान -मोठ्या सर्व गावातून गणेश-उत्सव म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम " हीच ओळख समाज मनावर  पक्की ठसलेली आहे 
या झाल्या जुन्या काळातील गणेश-उत्सवाच्या आठवणी ..
आता गेल्या काही वर्षात ..सार्वजनिक गणेश उत्सव ",मंडळ " या नावालाच ..वेगळा अर्थ निर्माण होत जातोय ,समाज-प्रबोधन " हा उद्देश ..बाजूला राहून जातोय की काय.अशी चिंता .सामान्य जनाच्या मनात आहे. कारण .या उत्सवाचे दर्शनी रूप दिवसे दिवस अधाकिक .भव्य , आणि खर्चिक स्वरूपाचा उत्सव "असे दिसू लागले आहे. आर्थिक आणि राजकीय .आश्रय " यामुळे"या उत्सवाचे "अर्थ-कारण " हे कुतूहलाचा विषय आहे.
नव्या सार्वजनिक मंडळांचे हे उत्सव ..कला-संगीत -सांस्कृतिक 'कार्यक्रमास प्राधन्य देण्या पेक्षा दिमाखदार सजावट , आणि ध्वनी -वर्धक यंत्रांच्या गराड्यात हे उत्सव साजरे होऊ लागले आहेत , या उत्सवातून अल्प प्रमाणात दृक-श्र्व्या .माध्यमातून काही सांस्कृतिक  कार्यक्रम सादर केले जातात असे दिसते  . 
सार्वजनिक उत्सवातून सांस्कृतिक कार्यक्रम फार कमी झाले असतील .तरी.. मोठ मोठ्या सोसायट्या मधून .आपल्या आठवणीत असलेल्या गणेश उत्सवाचे स्वरूप आणि ते कार्यक्रम ' सोबतीला आधुनिक तंत्र-ज्ञाच्या मदतीने होणारे खेळ आणि सपर्धा " यामुळे गणेश-उत्सवाचे उत्साही वातावरण अनुभवता येते.
असो, गणेश-उत्सव म्हणजे आपले सांस्कृतिक जीवन संपन्न करणारा कला-उत्सव आहे ..इतक्या वर्षांची संपन्न परंपरा लाभलेला हा उत्सव .बदलत्या स्वरूपात का होईना .साजरा होतो आहे ..ही त्या -गणाधिपती -कलाधिपती -गणरायांची कृपाच आहे .आपण याचा आनंद घेत राहू या .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख--
श्री गणेश उत्सव -
एक सार्वजनिक महोत्सव 
अरुण वि.देशपांडे .
-----------------------------------------------------------------------------------------

लेखमाला -हितगुज लेख-क्र- १५ लेख- बदल हवाच असतो ..! ले- अरुण वि.देशपांडे .

लेखमाला -हितगुज 
लेख-क्र- १५ 
-----------------------------------------
लेख-
बदल हवाच असतो  ..!
ले- अरुण वि.देशपांडे 
---------------------------------------------------
रोजच्या दैनंदिन वेळापत्रकाच्या ताब्यात राहून आपण सारेजण अतिशय कंटाळून गेलेलो असतो ,घर ते कार्यालय  आणि परत कार्यालय ते घर " या येण्याजाण्याच्या रस्त्यावरून कधी काळी आरामात आणि रमत-गमत जाता येत होते " असे म्हणायची वेळ फक्त मोठ्या शहरातील लोकांच्यावर आहे असे मुळीच नाही , लहान मोठ्या शहरातील, गावातील स्थिती फारशी वेगळी नाही " तिथल्या मानाने आता तिथेही "गर्दी आणि गोंधळ " आहेच आहे . जुन्या खाणखुणा नाहीशा होऊन ,त्या ऐवजी अनेक नव्या गोष्टी येणे "हे टाळता येण्याची गोष्ट नाही .कारण  कालानुरूप बदल होतच असतात ..आणि बदल हा हवाच असतो ..कारण यातच उद्याच्या बदलत्या युगाची चाहूल लागत असते .

आधुनिक सुख-सोयी "नेहमीच उपयुक्त असतात ..त्यांच्या येण्यामुळे सवयीच्या झालेल्या अनेक जुन्या झालेल्या सुख-सोयी कालबाह्य झाल्या म्हणून त्या निरोपयोगी होत नाहीत ,पण,नव्या कार्य पद्धतीत त्यांचे असणे अनेक दृष्टीने अडचणीचे ठरणारे असते " अशावेळी "जुन्याच्या प्रेमात असणारी मंडळी- नव्याच स्वागत मोठ्या अनिच्छेने करीत असते ", खरे तर "होणारा बदल आवश्यक आहे" हे त्यांना मनातून मान्यच असते " पण वरकरणी विरोध दर्शवित रहातात हे मात्र खरे..
कोणते ही बदल "सुचवले जातात -त्यावेळी आपोआपच दोन गट तयार असतात ..बाजूने बोलणारे आणि विरोधात बोलणारे " हे दोघे आपल्या मतांचे कितीही समर्थन करू देत ..सार्वजनिक आणि बहुजन हितार्थ .."नव्या गोष्टी , नवे उपाय " नव्या पद्धती " अशा अनेक स्वरूपात "बदल होतच असतो ",
यात आणखी एक गंमत आहे .."बदल हवाच असतो ..म्हणून "बदल होत असतो " असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरावे.
आपण आपल्या वैयक्तिक-आयुष्यातील गोष्टींची उदाहरणे घेऊन पाहू या .म्हणजे यावर अधिक प्रकाश पडू शकेल.
हे खालील दृश्य आठवून पहा -

१.शाळेत जाणऱ्या मुलांना .डबा न्यावा लागतो .रोज तेच तेच काय ग आई ..! 
जरा बदलून दे ना .छान काही तरी ..! 
२. मोठ्या माणसांना डबे देतांना याच सुचना ऐकाव्या लागतात 
३. सकाळ-संध्यकाळ एकच एक स्वयंपाक नाही चालत आमच्या घरी कुणाला ,
   दोन्ही वेळा ताजा आणि दर वेळी बदलून लागतात भाज्या ..ही तक्रार आस्ते  आणि त्याला कौतुकाची किनार पण असते .मोठा गम्मतशीर मामला असतो हा .
 ४. महिन्यातून एकदा तरी .घरी जेवण न बनवता .बाहेर मस्त कुठे तरी जाऊन हॉटेलिंग करणे " म्हणजे सर्वंना आवडणारा बदल असतो ज्यामुळे रुची-पालट " साधला जातो .

५. कधी कधी आपला एखादा मित्र , कुणी परिचित ..भेटो आणि भरभरून बोलू लागतो -
काय सांगावं राव  -सध्या आपल्या सर्वांचाच  -रुटीन इतका बोरिंग झालय की .यातून बाहेर पडण्यासाठी ..बदल हवाच .म्हणून आम्ही तर दोन-तीन महिन्याला मस्त निसर्ग-रम्य ठिकाणी जाऊन येतो ..किती सुखद बदल अस्तोम्हणून सांगू , 
तुला सांगतो मित्र -तू पण असेच ठरव आणि ठरवून कर  कारण   , हा असा बदल "म्हणजे आजच्या काळाची गरज आहे "
आता मला सांगा- मित्राचे हे  तळमळीचे सांगणे .आणि त्यातीली भावना .दुर्लक्ष करण्याइतकी किरकोळ आहे का ?

घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्या गृहिणीची कार्यतत्परता .हे तिच्या "योग्य वेळी योग्य ते बदल करण्याच्या कार्यशैलीत "दिसून येत असते .
घराची सजावट , फर्निचरची मांडणी , खिडक्या -आणि घरातील पडदे , त्यांची रंग-संगती , किचन आणि त्यातील सोयी ,या सगळ्या गोष्टी .वेळोवेळी आवश्यकते प्रमाणे .कमी-जास्त केल्या जातात , त्यांच्या जागा बदलतात , हे काम सोपे नाहीये , उलट चिकाटीचे आणि परिश्रमपूर्वक करण्याचे काम असते.,ज्या वेळी हे काम केले जाते, त्यानंतर पहाणार्याला .आपल्याच घरचे बदललेले स्वरूप  थक्क करून टाकणारे असते. "जादूची कांडी " फिरवावी ,तसे होऊन जाते .असा हा बदल हवाच असतो .मोठा सुखद .

चालू असलेल्या गोष्टी न बदलता तशाच चालू राहिल्या तर .त्यात एक साचलेपणा येतो ..आणि साचलेपण म्हणजे त्यातली स्थिरता " ,अशा शैलीला माणूस फार काल सहन करू शकत नाही ..कारण गतिशीलता .हा आपल्या कृतीशील जीवनशैलीचा एक भाग असतो , त्यामुळे "एकच एक गोष्ट ..परत परत तशीच पुन्हा ? कित्दा ?,मग यातूनच ,
आलेले साचलेपण ,  मरगळ झटकून टाकण्यासाठी .नवे बदल ..येणे हे क्रमप्राप्त असते ,म्हणूनच " संभाव्य -बदल होणार " हा सूचक संदेश देखील खूप परिणामकारक असतो.

चाकोरीबद्ध -जगणे कुणालाच आवडत नसते , तेच तेच वातवरण .त्यात काही बदल नाही .असे जर कार्यालयीन वातावरण असेल तर .अशा ठिकाणी कार्यरत कर्मचारी यांत्रिकपणे येतात आणि जातात ..असे वातवरण मुळीच उपयुक्त नसते  " हे आता सर्वमान्य झाले आहे .अर्थातच .कार्यालयीन वातवरण नित्य-नूतन ",बदलते असावे .या दृष्टीकोनातून .नित्य-नवे बदल सुचवले जातात आणि त्याची त्वरित अंमलबजावणी देखील केली जाते ".याचे कारण काय ? याचे उत्तर पुन्हा तेच.. "बदल हवाच असतो "..म्हणून बदल केला जातो.."

कोणते ही क्षेत्र असू द्या . सर्व ठिकाणी .बदल अपेक्षित असतो, आणि तो ठरवून केला जात असतो .कधी सर्व संमतीने , कधी विरोध असतांना , कधी हे निर्णय अप्रिय असतात -तरी ते घ्यावे लागतात .कारण या बदलाने  प्रतिकूलता जाऊन अनुकूल परिस्थती येणार असते .म्हणून बदल हवाच असतो.
पिढी दर पिढी .हे चक्र चालूच रहाणे आहे .आपण ही आपल्या मनाच्या ठायी लवचिकता ठेवयला शिकले पाहिजे , नव्या गोष्टींच्या स्वागतासाठी मनाची तयारी केली पाहिजे, प्रसंगी ती दाखवली सुद्धा पाहिजे .कारण यामुळे ..होणारे बदल .संघर्ष न होता केले जातील हे नक्की.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------लेखमाला -हितगुज 
लेख-क्र- १५ 
-----------------------------------------
लेख-
बदल हवाच असतो  ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे 
मो-९८५०१७७३४२ 
---------------------------------------------------

Wednesday, December 13, 2017

लेखमाला -लेख १० वा आठवणीतील गाव-परभणी - लेखन पर्वास आरंभ .

लेखमाला -लेख १० वा 
आठवणीतील गाव-परभणी - 
लेखन पर्वास आरंभ
----------------------------------------------------

१९८६ मध्ये   आगमन झाले त्यावेळी ..मी एक होतकरू लेखक. माझ्यालेखन - वाटचालीस आरंभ झालेला होता . त्यावेळी मी कथा लेखन करीत असे . कविता लेखन करण्यासाठीची कवीमनाची मानसिक अवस्था त्याकाळात तरी मला अजिबात लाभलेली नव्हती  त्यामुळे कथा लेखन , अधून मधून ललित लेख लिहिणे असे काही चालू होते.

१९८० - ९० च्या दशकात साहित्यिक वर्तुळात परभणीचा मोठाच बोलबाला होता ..लिहित्या लेखक कवी- यांच्या कामगिरीने सर्वत्र नावलौकिक मिळवलेला असल्यामुळे ..परभणीकर साहित्यिकांचा दबदबा जाणवेल असाच होता.
साहजिकच माझ्या सारखा नवोदित लेखकू -माणूस .इथल्या वातावरणात कसा रुळतो ? हा प्रश्न माझ्या मनात काय असायचा .

त्यावेळी ज्यांनी आपल्या लेखनाने परभणीचे नाव दुमदुमते ठेवले होते .अशा साहित्यिकात उत्तोमात्त्म कवी-मंडळी आघाडीवर होती.. उदा- रेणू पाचपोर , इंद्रजीत भालेराव ,श्रीकांत उमरिकर ,  मोहन मु.कुलकर्णी , डॉ.धुंडीराज कहाळेकर .प्र.द. जोशी , शिवाजी मरगीळ, 
आणि देविदास कुलकर्णी , अविनाश सालापुरीकार ,  ,केशव बा.वसेकर , रमेश चिल्ले , तुकाराम खिल्लारे , आणि कृषी विद्यापीठात असलेले रावसाहेब चोले,  सूर्यभान नागभिडे , मनोहर नलावडे , काव्य रजनीचे -रमेश पारवेकर , 

तसेच कवयित्री - कमलताई कुलकर्णी , वसुधा देव , मंदा वळसंगकर , प्रणिता देशपांडे , ही नावे प्रातिनिधिक स्वरूपात आठवली तितकी लिहिली ..
त्यावेळी कविता लेखनात कवी म्हणून नारायण बोरुलकर ,रे.रा. सनपुरकर , श्रीकांत सदावर्ते , .,या कवींचे स्मरण व त्यांच्या लेखनाचा उल्लेख करणे उचित आहे.

या तुलनेत गद्य लेखन तसे कमी प्रमाणत होत असे .. यात मंगेश उदगीरकर , प्रभाकर हरकल ,डॉ.आनंद देशपांडे ,दिवाकर खोडवे , शरद देऊळगावकर , गणेश घांडगे , बाबा कोटंबे ,अशे नावे आठवतात ..
या निमित्ताने जेष्ठ विनोदी लेखक- प्रा.भास्कर कुलकर्णी यांची आठवण आवर्जून होते आहे.

अशा या मान्यवरांच्या मांदियाळीत माझा वावर आणि लेखन सहभाग सुरु झाला .. याच सुमारास म्हणजे १९८७-८८ च्या दरम्यान ..मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी -या संस्थेचा सभासद झालो आणि साहित्य सम्मेलन " हा नवा अवकाश माझ्यासाठी  खुला झाला .

परभणीच्या लेखक-कवींच्या सहवासात .माझ्यातील साहित्यिकाची जडण घडण झाली ..याचा फार मोठा प्रभाव माझ्यावर एकच झाला ..तो म्हणजे ..सातत्याने लिहिणे ..आणि वाचकांच्या पर्यंत पोन्च्ने ..सुरुवातीचा हा धडा .मी आज ही गिरवतो आहे..
त्यामुळे ..इंटरनेट वरील इ-पेपर , ई-मासिके आणि ई- दिवाळी अंकातून -कथा - कविता , ललित लेख, आणि बाल-साहित्य असे माझे विविध लेखन प्रसिद्ध होत असते , यामुळेच .ई-बुक स्वरूपात देखील माझे विपुल साहित्य ओनलाईन उपलब्ध झाले आहे..
मी अगदी नव्या  मासिक-पेपर पासून ते नामवंत पेपर आणि मासिक, दिवाळी अंकासाठी लिहित गेलो .आज पण असेच चालू असते.यामुळे मराठवाड्यात आणि मराठीतल्या दूर दूर ठिकाणहून प्रकशित होत असलेल्या नियतकालिकातून माझे साहित्य  आरंभापासून प्रसिध्द होत आले आहे.

परभणीच्या - दिलीप वसमतकर यांनी  दीपप्रभा -साप्ताहिकात माझे साहित्य आवर्जून प्रकाशित केले , सुरेशचंद्र गुप्ता यांच्या -साप्ता.लोक्व्यथा अंका साठी मी नियमित लिहित असे , हेमाताई रसाळ आणि डॉ.रवींद्र रसाळ यांनी त्यांच्या गोदातीर समाचार साठी लिहित रहा -असे म्हणून ..मला वेळोवेळी संधी दिली ...अशीच संधी ..मित्र -मल्हारीकांत देशमुख यांनी ..लोकमत - त्रिधारा "साठी लेख लिहा ..असे सांगून माझे ललित लेख प्रकाशित केले ..
या सगळ्या लेखनामुळे ..नियतकालिक -लेखन " हा प्रकार शिकण्यास मिळाला .ज्यात ..मुद्देसूद लेखन, विषयानुरूप लेखन ,आटोपशीर लेखन , वाचनीय लेखन " याचे कृती -ज्ञान मिळत गेले असे म्हणेन .. म्हणून माला लेखन संधी दिलेल्या वरील सर्व स्नेहीजनांची मला नित्य-नियमित आठवण होत असते 

 काळात - लोकल परभणी शिवाय ..मराठवाड्यातील सर्वच पेपर आणि  दिवाळी अंकासाठी मी लिहिले आहे..
रविवार पुरवणीतून माझे साहित्य येत असे त्यात - दै.मराठवाडा , दै.अजिंठा , सामना , देवगिरी तरुण भारत 
 लोकमत ,आणि  सकाळ , हे औरंगाबाद चे पेपर  , त्याच बरोबर - एकमत-लातूर ,नांदेड येथील - लोकपत्र , प्रजावाणी , गोदातीर समाचार , सप्ता.सत्याप्रभा  या काही महत्वाच्या नावांचा उल्लेख करावा लागेल 

माझे लेखन-पर्व जोमाने आणि  उत्साहाने चालू असण्याचे आणखी एक महत्वाचे कारण आहे .परभणीला होत असणारे अनेकानेक साहित्यिक उपक्रम ..यात आपला सहभाग असलाच पाहिजे ..हे निखळ भावना मनात असायची ,शिवाय सोबतच्या सृजनशील अशा कवी-लेखक मित्रांच्या समोर आपले लेखन सदर करण्यात एक वेगळाच आनंद होता ..
वाचक आणि श्रोते म्हणून दर्दी आणि जाणकार असायचे..त्यांची दाद देखील मोठी प्रेरक आणि लेखन प्रेरणा देणारी होती. वकीलसाहेब - वसंतराव पाटील , वि.शं. गौतम ,रवींद्र गंगाखेडकर  यांची आठवण होते ,

वकीलसाहेब -अनंतराव उमरीकर , शरद देऊळगावकर , पद्माकर पेडगावकर ,लक्ष्मणराव वाईकर , गोविंद कात्नेश्वारकर , अशोक खोत , श्री व.सौ. मंगेश उदगीरकर ....असे अनेक मान्यवर माझे प्रेरक म्हणून लाभले.

परभणीचे माझे वास्तव्य होते त्या वर्षात  ..परभणी -सम्मेलन नगरी  म्हणून विख्यात झालेली होती ..मसाप परभणी , आणि अ.भा.मराठी साहित्य सम्मेलन भरवणारी अक्षर-प्रतिष्ठा ..या दोन संथांनी अनेक सम्मेलने परभणीत आयोजित केली .. हे प्रत्येक सम्मेलन ..एका लेखाचा विषय आहे , तसेच .परभणी जिल्हा साहित्य सम्मेलन ,मराठवाडा साथिय सम्मेलन ..या बद्दलही खूप छान आठवणी आहेत ..
यापुढील लेखात ते येणारच आहे..

माझ्या लेखन प्रवासात ..१९८६ ते २००६ या कालखंडास  अतिशय महत्वाचे स्थान आहे.. मसाप परभणी आणि अक्षर -प्रतिष्ठा आणि जेष्ठ मित्र- प्रभाकर पाठक काका आणि मित्र देविदास कुलकर्णी यांनी मला कायम गुंतवून ठेवीत . अनेक उपक्रम करण्याची संन्धी दिली , जबाबदार्या सोपविल्या ..त्या मी माझ्या कुवतीप्रमाणे पार पाडल्या  .याचे समाधान खूप मोठे आहे ..
पुढच्या लेखात असेच काही.....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - 
लेख १० वा -
आठवणीतील गाव-परभणी - लेख- लेखन पर्वास आरंभ
-अरुण वि.देशपांडे 
मो- 9850177342 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, December 6, 2017

लेखमाला -हितगुज लेख-क्र- १५ - लेख- बदल हवाच असतो ..!

लेखमाला -हितगुज 
लेख-क्र- १५ 
-----------------------------------------
लेख-
बदल हवाच असतो  ..!
ले- अरुण वि.देशपांडे 
---------------------------------------------------
रोजच्या दैनंदिन वेळापत्रकाच्या ताब्यात राहून आपण सारेजण अतिशय कंटाळून गेलेलो असतो ,घर ते कार्यालय  आणि परत कार्यालय ते घर " या येण्याजाण्याच्या रस्त्यावरून कधी काळी आरामात आणि रमत-गमत जाता येत होते " असे म्हणायची वेळ फक्त मोठ्या शहरातील लोकांच्यावर आहे असे मुळीच नाही , लहान मोठ्या शहरातील, गावातील स्थिती फारशी वेगळी नाही " तिथल्या मानाने आता तिथेही "गर्दी आणि गोंधळ " आहेच आहे . जुन्या खाणखुणा नाहीशा होऊन ,त्या ऐवजी अनेक नव्या गोष्टी येणे "हे टाळता येण्याची गोष्ट नाही .कारण  कालानुरूप बदल होतच असतात ..आणि बदल हा हवाच असतो ..कारण यातच उद्याच्या बदलत्या युगाची चाहूल लागत असते .

आधुनिक सुख-सोयी "नेहमीच उपयुक्त असतात ..त्यांच्या येण्यामुळे सवयीच्या झालेल्या अनेक जुन्या झालेल्या सुख-सोयी कालबाह्य झाल्या म्हणून त्या निरोपयोगी होत नाहीत ,पण,नव्या कार्य पद्धतीत त्यांचे असणे अनेक दृष्टीने अडचणीचे ठरणारे असते " अशावेळी "जुन्याच्या प्रेमात असणारी मंडळी- नव्याच स्वागत मोठ्या अनिच्छेने करीत असते ", खरे तर "होणारा बदल आवश्यक आहे" हे त्यांना मनातून मान्यच असते " पण वरकरणी विरोध दर्शवित रहातात हे मात्र खरे..
कोणते ही बदल "सुचवले जातात -त्यावेळी आपोआपच दोन गट तयार असतात ..बाजूने बोलणारे आणि विरोधात बोलणारे " हे दोघे आपल्या मतांचे कितीही समर्थन करू देत ..सार्वजनिक आणि बहुजन हितार्थ .."नव्या गोष्टी , नवे उपाय " नव्या पद्धती " अशा अनेक स्वरूपात "बदल होतच असतो ",
यात आणखी एक गंमत आहे .."बदल हवाच असतो ..म्हणून "बदल होत असतो " असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरावे.
आपण आपल्या वैयक्तिक-आयुष्यातील गोष्टींची उदाहरणे घेऊन पाहू या .म्हणजे यावर अधिक प्रकाश पडू शकेल.
हे खालील दृश्य आठवून पहा -

१.शाळेत जाणऱ्या मुलांना .डबा न्यावा लागतो .रोज तेच तेच काय ग आई ..! 
जरा बदलून दे ना .छान काही तरी ..! 
२. मोठ्या माणसांना डबे देतांना याच सुचना ऐकाव्या लागतात 
३. सकाळ-संध्यकाळ एकच एक स्वयंपाक नाही चालत आमच्या घरी कुणाला ,
   दोन्ही वेळा ताजा आणि दर वेळी बदलून लागतात भाज्या ..ही तक्रार आस्ते  आणि त्याला कौतुकाची किनार पण असते .मोठा गम्मतशीर मामला असतो हा .
 ४. महिन्यातून एकदा तरी .घरी जेवण न बनवता .बाहेर मस्त कुठे तरी जाऊन हॉटेलिंग करणे " म्हणजे सर्वंना आवडणारा बदल असतो ज्यामुळे रुची-पालट " साधला जातो .

५. कधी कधी आपला एखादा मित्र , कुणी परिचित ..भेटो आणि भरभरून बोलू लागतो -
काय सांगावं राव  -सध्या आपल्या सर्वांचाच  -रुटीन इतका बोरिंग झालय की .यातून बाहेर पडण्यासाठी ..बदल हवाच .म्हणून आम्ही तर दोन-तीन महिन्याला मस्त निसर्ग-रम्य ठिकाणी जाऊन येतो ..किती सुखद बदल अस्तोम्हणून सांगू , 
तुला सांगतो मित्र -तू पण असेच ठरव आणि ठरवून कर  कारण   , हा असा बदल "म्हणजे आजच्या काळाची गरज आहे "
आता मला सांगा- मित्राचे हे  तळमळीचे सांगणे .आणि त्यातीली भावना .दुर्लक्ष करण्याइतकी किरकोळ आहे का ?

घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्या गृहिणीची कार्यतत्परता .हे तिच्या "योग्य वेळी योग्य ते बदल करण्याच्या कार्यशैलीत "दिसून येत असते .
घराची सजावट , फर्निचरची मांडणी , खिडक्या -आणि घरातील पडदे , त्यांची रंग-संगती , किचन आणि त्यातील सोयी ,या सगळ्या गोष्टी .वेळोवेळी आवश्यकते प्रमाणे .कमी-जास्त केल्या जातात , त्यांच्या जागा बदलतात , हे काम सोपे नाहीये , उलट चिकाटीचे आणि परिश्रमपूर्वक करण्याचे काम असते.,ज्या वेळी हे काम केले जाते, त्यानंतर पहाणार्याला .आपल्याच घरचे बदललेले स्वरूप  थक्क करून टाकणारे असते. "जादूची कांडी " फिरवावी ,तसे होऊन जाते .असा हा बदल हवाच असतो .मोठा सुखद .

चालू असलेल्या गोष्टी न बदलता तशाच चालू राहिल्या तर .त्यात एक साचलेपणा येतो ..आणि साचलेपण म्हणजे त्यातली स्थिरता " ,अशा शैलीला माणूस फार काल सहन करू शकत नाही ..कारण गतिशीलता .हा आपल्या कृतीशील जीवनशैलीचा एक भाग असतो , त्यामुळे "एकच एक गोष्ट ..परत परत तशीच पुन्हा ? कित्दा ?,मग यातूनच ,
आलेले साचलेपण ,  मरगळ झटकून टाकण्यासाठी .नवे बदल ..येणे हे क्रमप्राप्त असते ,म्हणूनच " संभाव्य -बदल होणार " हा सूचक संदेश देखील खूप परिणामकारक असतो.

चाकोरीबद्ध -जगणे कुणालाच आवडत नसते , तेच तेच वातवरण .त्यात काही बदल नाही .असे जर कार्यालयीन वातावरण असेल तर .अशा ठिकाणी कार्यरत कर्मचारी यांत्रिकपणे येतात आणि जातात ..असे वातवरण मुळीच उपयुक्त नसते  " हे आता सर्वमान्य झाले आहे .अर्थातच .कार्यालयीन वातवरण नित्य-नूतन ",बदलते असावे .या दृष्टीकोनातून .नित्य-नवे बदल सुचवले जातात आणि त्याची त्वरित अंमलबजावणी देखील केली जाते ".याचे कारण काय ? याचे उत्तर पुन्हा तेच.. "बदल हवाच असतो "..म्हणून बदल केला जातो.."

कोणते ही क्षेत्र असू द्या . सर्व ठिकाणी .बदल अपेक्षित असतो, आणि तो ठरवून केला जात असतो .कधी सर्व संमतीने , कधी विरोध असतांना , कधी हे निर्णय अप्रिय असतात -तरी ते घ्यावे लागतात .कारण या बदलाने  प्रतिकूलता जाऊन अनुकूल परिस्थती येणार असते .म्हणून बदल हवाच असतो.
पिढी दर पिढी .हे चक्र चालूच रहाणे आहे .आपण ही आपल्या मनाच्या ठायी लवचिकता ठेवयला शिकले पाहिजे , नव्या गोष्टींच्या स्वागतासाठी मनाची तयारी केली पाहिजे, प्रसंगी ती दाखवली सुद्धा पाहिजे .कारण यामुळे ..होणारे बदल .संघर्ष न होता केले जातील हे नक्की.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------लेखमाला -हितगुज 
लेख-क्र- १५ 
-----------------------------------------
लेख-
बदल हवाच असतो  ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे 
मो-९८५०१७७३४२ 

लेख-क्र-१४ - लेखमाला- हितगुज - लेख- क्रोध आणि राग ..!

लेख-क्र-१४ 
--------------------------------
लेखमाला- हितगुज - 
लेख- क्रोध आणि राग ..! 
ले- अरुण वि.देशपांडे 
-----------------------------------------------------
क्रोध आणि राग  या दोन्ही वर कंट्रोल करायचा ? ...बाप रे ! किती अवगढ काम आहे न हे ? कारण आपल्या बहुतेकांना चटकन राग येतो , या रागाचा पारा देखील कमालीच्या वेगात चढतो ..अशा रागावर कसा ताबा मिळवायचा ? ,लोक म्हणतात "आलेला राग गिळून टाकायचा असतो ", आणि शांतपणे काम करायचे असते ". असे करता  येत असते का कुठे ? ,थोडक्यात .."रागाने बिथरलेल्या मनासा पासून सारेजण दूर दूर असणेच पसंद करतात .
या माथे भडकावून टाकणाऱ्या रागाच्या भडक्यात चांगल्या चांगल्या गोष्टी बेचिराख होऊन जातात .म्हणूनच रागाला " क्रोधाग्नी " असे म्हणतात ते  उगाचच नाही क्रोधाच्या या अग्नीला वेळीच शांत  करावे नसता या क्रोधाचे वडवानल म्हणजे- अग्निप्रलय समजावा .

जाणती माणसे नेहमीच म्हणतात की बाबा रे.. रागावणे सगळ्यात सोपे असते पण आलेल्या रागावर शांतपणे नियंत्रण ठेवणे आणि वागणे ज्याला जमते ..तो खरा संयम बाळगणारा माणूस समजावा.
या सांगण्यात नक्कीच खूप तथ्य आहे..जरा नजरे समोर रागीट माणसं आणून पहा ..त्यांच्या रुद्रावतार " पाहूनच आजूबाजूचे सारेजण " त्राही माम " असा देवाचा धावा करतात . कारण रागाच्या भरात असलेला माणूस काय करेल ?
याचा भरवसा नसतो ..रागाच्या भरात माणसाचा "तोल आणि ताल " दोन्ही बिघडलेले असतात , ज्यामुळे , आपल्या रागाचे परिणाम काय होतील  ? हा विचार देखील क्रोधीत व्यक्ती करू शकत नाही ..इतकी त्याची अवस्था ..बेभान -बेफाम होऊन गेलेली असते ..

घरातील मोठी व्यक्ती - जसे वडील , आजोबा , किंवा ज्याच्या हातात घराचा सगळा कारभार आहे, या पैकी कोणतीही व्यक्ती ..लहरी आणि चिडक्या स्वभावाची असेल, संशयी स्वभावाची असेल, "हलक्या कानाची असेल - म्हणजे.कुणी काही सांगितले की- याचे मत लगेच  त्याप्रमाणे बदलते असणार " त्यातच  भर म्हणजे यांच्या स्वभावाला किनार असते ती अधीर आणि अशांत अशा मनाची .. अशा व्यक्तींच्या थोडेसुद्धा मना-प्रमाणे झाले नाही तर ..यांचा राग अनावर होतो .आणि " मग त्या रागाच्या तडाख्यात घरातली माणसे विनाकरण होरपळून जातात" .
माझ्या अनुभवावरून   एक मत निरीक्षणातून मांडू इच्छितो  की..गेल्या पिढीत आणि आताच्या पिढीतल्या जेष्ठ मंडळींनी "अशा रागीट माणसांचा पुरेपूर अनुभव घेतलेला आहे ".

मनाच्या आततायीपणामुळे-येणाऱ्या रागाचे परिणाम तत्कालीन कमी आणि दूरगामी जास्त असतात .कारण ..ज्या व्यक्तीवर "राग काढला जातो ..ती तर नेहमीसाठी खूप दुखावली जाते ", केवळ .त्याने त्याला आलेला राग " कंट्रोल मध्ये ठेवला म्हणून होणारा अनर्थ टाळला गेला ".
काही वेळा नंतर मन शांत होऊन जाते आणि आलेला राग ओसरून जातो ..त्यावेळी ..राग राग केलेलेया व्यक्तीने कितीही  क्षमा याचना केली तरी .दुखरा मनाच्या वेदना शमल्या जात नसतात " आणि नेमकी हीच  गोष्ट "रागीट माणसं -लक्षात ठेवत नाहीत..

मन प्रसन्न असले म्हणजे .सर्व गोष्टी आनंदाने सिध्द होत असतात " हे माहिती असून सुद्धा ..अनेक वेळा आपले मन आतून कोणत्या न कोणत्या कारणाने जर धुमसत असेल तर..आपल्या हातून होणार्या गोष्टीला आपल्या मनातल्या रागाचा -त्या कटू भावनेचा स्पर्श नक्कीच होतो .मग निर्जीव आणि कळाहीन कामाला काय अर्थ येणार.
याचे एक सर्वपरिचित उदाहरण दिले जाते - " गृहिणी जर  रागात असेल, तिच्या मनात धुसफूस चालू असेल तर त्या दिवशी तिच्या स्वयंपाकाला सुद्धा चव येत नसते ".,

असे म्हणतात की "राग आला की ..मनातल्या मनात - १ ते १०० आकडे मोजावेत " .असे कसे होईल ? कारण "राग -ही अशी भावना आहे की ती लगेच आपल्या मनाचा ताबा घेते आणि सगळी चक्र जणू उलटी फिरू लागतात ", मग कशाचा आलाय सारासार विचार ? 

माझ्यामते रागीट माणसांचा स्वतःच्या कार्यक्षमतेवर पक्का विस्वास नसतो -त्यातच त्याच्या वाट्याला अपयश येते ,पदरी अपमान पडतो , त्याच्या मनात सतत आपण एक अन्याय -ग्रस्त आहोत अशी भावना असते , त्याला कुठे तरी याची जाणीव होत असते ,अशावेळी , समोरच्या माणसाने केलेले काम , त्याचे यश , त्याचे कौतुक हे सहन होणारे रहात नाही.  परिणामी आतली खदखद  साचून रागाच्या रुपात बाहेर पडते ...आणि मग,हा आलेला राग " सोयीस्करपणे आपल्याच माणसावर काढणे त्याला सर्वात सोयीचे असते तेही बाहेरच्या नाही ,तर घरातल्या -परिवारातील कुणाही हक्काच्या आपल्या माणसावर .

पण म्हणतात न - रागीट माणसाला शांत करणारी कुणीतरी एक व्यक्ती नक्कीच  आजू बाजूला असते.अशा व्यक्तीच्या जवळ असणारी समजुतीच्या शब्दांची मलमपट्टी चांगलीच गुणकारी ठरत असते , हे काम करणारी व्यक्ती वयाने आणि अनुभवाने अर्थातच मोठी असते ..कारण अनुभवाच्या आधारे त्याला माहिती असते की "याचा राग कसा शांत करायचा . 
आता पर्यंत आपण राग आणि रागीट माणसा  बद्दलच बोलतो आहोत , पण त्याला कंट्रोल करू शकणारी ही शांत माणसे म्हणजे नेमकी कशी असतात ? हे पण आपल्याला माहित करून घ्यावे लागेल .कारण कधी न कधी आपल्याला सुद्धा एखाद्याचा राग शांत करण्याची जोखीमभरे काम करावे लागू शकते...

शांत माणसे - कधी ही मन तोडून टाकणारी प्रतिक्रिया देत नाहीत ,की तसे शब्द वापरत नाहीत  समोरच्या माणसाचे ऐकून घेण्याची त्यांच्या मनाची जबरदस्त तयारी असते . शांतपणा "स्वभावातील हा  गुण मेहनतीने आणि अनुभवातून  कमवावा लागतो , समोरचा कितीही रागात बोलो , गोंधळ घालो ..ही शांत माणसे आपल्या भावना काबूत ठेवून रागाने बेभान झालेल्या माणसाचा धिंगाणा चालू देतात ..
आपण जर म्हणालो .अहो .असे इतके शांत राहून पाहू कसे शकता तुम्ही ?
द्या ना त्याच्या मुस्काडीत .येईल जाग्यावर .
आपल्या या सूचनेला शांतपणे ऐकून घेत ते म्हणतील .
.त्याने काही होणार नाही , रागा ने राग वाढेल ,शब्दाने शब्द वाढेल  ", त्यापेक्षा .आपण .शांत राहावे.. याने एक होईल ..राग राग करून, गोंधळ करून ..हाच माणूस थकून जाईल ,आणि शांत होईल..सो, आपण वाट पहायची ..!

आहे की नाही ग्रेट क्वालिटी ..!
म्हणून आपण आलेला राग आवरून शांत कसे होता येईल याचा विचार तरी करावा ,आणि तसे केले  तर त्यात आपलेच भले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- क्र- १४ .
लेखमाला- हितगुज - 
लेख- क्रोध आणि राग ..! 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
---------------------------------------------------------------------------------------