Thursday, May 24, 2018

मिशी -उपक्रमात प्रकाशित माझी कथा - तो दिसला की ..!

मिशी उपक्रमात प्रकाशित कथा -
धन्यवाद - संयोजक - मिशी 
---------------------------------------------------------


१.


कथा -
तो दिसला की ..
-अरुण वि.देशपांडे -पुणे.



मेघनाथ हे नाव होत , चांगल्या मोठ्या घरातली व्यक्ती अशी त्याला एक ओळख होती ..सगळं काही होत .सगळ्यांना तो जवळचा माणूस वाटायचा ,म्हणून त्याला सगळेच वाड्यातला नाथा “  असे म्हणायचे .
अरे तो नाथा नाही का .तो " 
.तो नाथा ..रे ...
असे म्हटले की त्याच्याशिवाय दुसरा कुणी नाथा नावाचा माणूस नाही याची ऐकणार्याची  खात्री पटायची 

हा "नाथा ", गावातील एका श्रीमंत घराण्याचा कुलदीपक होता , अफाट संपत्तीचा मालक होता ..त्याचा हातगुण आणि पायगुण दोन्ही नशीबवान माणसाचे आहेत “ हे - तो पाळण्यात असल्या पासून सर्वांनी पाहिले होते . आज ना उद्या तोच या घराचा मालक  गावातील मोठी असामी , असे सगळे काही होणार हे पक्के होते ,आता ..हे होण्यासाठी ..तो वयाने मोठा होण्याची वाट पाहणे सुरु होते .
राजयोग नशिबी घेऊन आलेला "नाथा  मोठा होऊ लागला ..

नाथा आमच्या पेक्षा थोडा वर्षांनी मोठा , , शाळेतला सगळ्यात श्रीमंत मुलगा “,आमच्या पुढच्या वर्गात होता तो . सगळ्यांशी बोलणारा हा मुलगा मित्र म्हणून खूप छान होता., श्रीमंतीचा अजिबात गर्व नव्हता त्याला . त्याच्या साठी स्वतन्त्र गाडी होती , तो एकटा कधीच येत नसे , रस्त्याने जो मित्र भेटेल त्याला गाडीत बसवून आणायचा , शाळा सुटल्यावर परत मुलांना बसवत असे गाडी मध्ये .
त्याचा वाढदिवस शाळेत आणि त्याच्या घरी ..मोठ्या वाड्यात साजरा होत असे , त्यादिवशी सगळ्या पोरांच्यासोबत आमची दोस्त कंपनी वाड्यावर जाऊन मज्जा करून यायची.

दिवस असेच मस्त चालले होते ..आणि अचानक .. नाथाची “आई “गेली , तीर्थयात्रेला गेलेल्या त्यांच्या बसला अपघात झाला आणि त्यात ..नाथाची आई त्यांच्या परिवारातील ,तसेच त्यांच्या वाड्यातील अनेकजन गेले ,
वाड्यावर , गावावर शोककळा पसरली, नाथाचे वडील तीर्थयात्रेला गेले नव्हते म्हणून ते बचावले ..हे त्यातल्या त्यात बरे म्हणयचे.

पुढे काही महिन्यात .. परिवारातील लोकांच्या सांगण्यावरून ..त्यांनी दुसरे लग्न केले , वाड्याला नव्या मालकीणबाई मिळाल्या , सामन्य घरातील त्या बाई वाड्यातील वैभवाने दिपून गेल्या ,अचानक लाभलेल्या अधिकाराने मालकीणबाई लगेच बदलून गेल्या ..आणि नाथाचे “ दिवस फिरले .. असेच सारेजण म्हणू लागले .
आज न उद्या नाथा “वारसदार म्हणून हे वैभव संभाळणार हे सर्वांना माहिती होते , सगळ्यांची याला संमती होती..नेमके हे एकमत आणि बहुमत“या दोन्ही गोष्टी नाथाच्या नव्या आईसाहेबंना खटकू लागल्या कारण त्यांच्या जवळच्या माणसांनी .हा .नाथा पुढे त्यांच्यासाठी किती अडचणीचा ठरणार आहे हे पटवून दिले , आणि हा काटा काढणे किती गरजेचे आहे हे नव्या मालकीणबाईंना पटले आणि समजले ..

एका रात्रीची गोष्ट आहे, आम्ही पोर पोर आमच्या गल्ली जवळच्या चौकात बोलत उभे होतो , समोरून जीवाच्या आकांताने ओरडत आमच्या दिशेने येणारा नाथा “ दिसला , आमच्या जवळ येऊन तो थांबला , धावत आल्यामुळे दम लागलेला नाथा बोलू शकत नव्हता , फक्त भेदरलेल्या नजरेने तो मागे वळून पाहत होता ,
एक गाडी आमच्या समोरून वेगाने निघून गेली , त्या बंद गाडीत अंधार होता, आत कोण आहेत ? हे कळाले नाही ..

आम्ही नाथाला पाणी दिले , शांत झाल्यावर त्याला विचारले ..
काय झाल नाथा ? कोण लोक होते हे ? का असे मागे लागले ? तुला मारणार होते की काय ?
नाथा सांगू लागला ..
तुम्हाला कसे सांगू ,काय सांगू ?
गेल्या काही महिन्या पासून ..वाड्यात आलेल्या नव्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली आहे ,
सगळ्या समोर गोड बोलतात , छान वागतात , आणि माझे बाबा बाहेगावी गेले की, मात्र माझा छळ करतात ,







---२---




नाथा मोठा होऊ लागला त्या दिवसात  ..त्याच्या पेक्षा आम्ही तसे लहान पोरं होतो ,..
आमच्या टोळीतील एकाने हुंगेगिरी करीत असतांना ऐकलेली बातमी ..एक दिवस आम्हाला सांगून टाकली ...त्याने आणलेली बातमी .आम्हाला धक्का देणारी होती ..
आमचा दोस्त  सांगू लागला अरे , तो  नाथा त्या वाड्यातला .. नाथा “ म्हणे ..पुरुष नाहीये ..!

सगळ्या पोरांनी दोस्ताला म्हटले.. 
काही पण .बोलत जाऊन ने बे असे कुणाबद्दल ..तुला काय माहिती रे ....
शप्पत बे .खरं सांगतोय .. तो " नाथा अगदी तसाच आहे ", हे त्याच्या जवळच्या माणसाने एकाला सांगतांना ऐकले मी ..
अन आलो की लगेच पळत तुम्हाला सांगायला .

असे ऐकल्या पासून  “नाथा “कडे पाहण्याची आमची नजर बदलून गेली ..त्याच्या जाण्या येण्याकडे , बोलण्याकडे ,दिसण्याकडे ..आम्ही बारीक नजरेने ,शोधक नजरेने पाहू लागलो ..तसे पाहिले  तर." .पुरुष नाहीये ", असा ठपका बसलेले अनेक जण गावात होते ..ते आम्हाला माहिती  होते ..पण अशा लोकांच्या कडे पाहिलं की  लगेचकळायचे ..अरे..कूच तो गडबड है,
अशी  माणसं आणि ,त्यांच्या बद्दल , समोर कमी ,माघारी मात्र नेहमीच मस्करीने बोलले जात होते , त्यातले शब्द , आमच्या सारख्या पोरांना पूर्ण समजत नसे..पण..हे नक्कीच चांगले बोलत नाहीत ..हे मात्र जाणवत असायचे.
आता यात "नाथाची  ची भर पडली ..असेच म्हणावे लागेल .

काय असते ..काही व्यक्ती ,काही माणसे ..अख्या गावाला माहिती  असतात .ती त्यांच्या समाजातील स्थानामुळे , करीत असलेल्या कार्यामुळे ..वगेरे वगेरे ..
असेच काहीसे नाथ बद्दल बद्दल येईल .
 दिसायला राजबिंडा , कोणता ही ड्रेस मध्ये तो खूप छान दिसायचा , आव्वाज एकदम भारदस्त ..फेमस फिल्मी हिरो सारखा , बोलायला लागला की ऐकत राहावे असे छान बोलायचा .थोडक्यात काय नाथा मध्ये काही प्रोब्लेम असेल अशी शंका सुद्धा कुणाला येत नसेल ..
आमच्या दोस्ताची बातमी खरी निघते की काय अशी भीती वाटू लागले ..कारण .."नाथाच्या वाड्यातून अश्या अर्थाच्या बातम्या ..पिल्लू सोडून दिल्या सारख्या .अधून मधून ..गावभर फिरू लागल्या ..


अलीकडे आमच्या गप्पात आम्ही नाथ " बद्दल बरेच बोलत होतो , कुणाला त्याच्याबद्दल काय वाटतंय याबद्दल आम्हाला काही देणे घेणे नव्हते , आमच्या मनात नाथा बद्दल एक प्रकारचा आपलेपणा  कसा काय वाटत होता ? ..हे आम्हालाच कळत नव्हते . म्हणतात ना ..एखादा आपला कुणी नसतो ..पण..त्याच्या बद्दल आपल्याला विनाकारण आपलेपणा  वाटत असतो , त्याचे कारण पण काही देता येत नसते ..बस,आम्हाला पण नाथ बद्दल अगदी असेच  वाटते म्हणजे वाटते.

त्या दिवशीची गोष्ट ..रात्रीची वेळ .. आमच्या घराच्या ओट्यावर .बाबा आणि त्यांचे मित्र बसले होते ..त्या दिवसात ..टी व्ही आणि सिरीयल चे दिवस अजून सुरु होण्यास खूप वर्ष उजडायचे होते , लोकांना वेळ होता ..गप्पांच्या निमित्ताने का होईन ..लोक एकत्र बसत,बोलत ..भले ही त्याला ही नावं ठेवली जायची .
.
तर त्या गप्पात .अचानक  नाथा चा उल्लेख माझ्या कानावर पडला ..आणि मी सावध होऊन ..बोलणे ऐकू लागलो ..
एक काका म्हणाले .. काय म्हणावे लोकांना ..किती नीच आणि कारस्थानी , अरे केवळ पैश्या साठी ..एखाद्याला आयुष्यातून उठवत आहेत हे लोक, बघा ना .. नाथा ला काही मिळू नये..त्याचा काटा काढला  पाहिजे , या हेतूने त्याच्या बद्दल मनाला येईल ते बोलतात , बातम्या पसरवित आहेत.. पण..लोकांना खरे काय हे चांगले माहिती असते ..
नाथाच कुणी काही बिघडवू शकत नाही .
















---३---




म्हणजे ..आम्हाला ज्याच्या बद्दल आपलेपणा वाटत होता ..तो" नाथा खरेच खूप छान माणूस आहे.
पण, आमचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही..

अशीच मध्यरात्रीची वेळ असेल.. बाहेर मोठ्यांने आवाज ऐकू आला , दरवाजे उघडून आम्ही बाहेर रस्त्यावर आलो .. जमलेल्या लोकांमध्ये बोलणे सुरु होते
त्यावरून समजले की .. थोड्यावेला पूर्वी .. एक गाडी आली, आणि आतल्या माणसांनी ..नाथाला गाडीतून बाहेर रस्त्यवर टाकून दिले आणि पळून गेले ,
नाथाला बराच मार लागलेला दिसत होता ,

लोकांनी त्याला बसवले , पाणी दिले , धीर देत म्हणाले ..छोटे मालक ..घाबरू नका ..तुम्ही आमच्या सोबत आहेत ..काय झालं ते सांगा आम्हाला ..

नाथा सांगू लागला ..
नेहमीचाच प्रकार ..मोठे मालक बाहेरगावी गेलेत ४-५- दिवसासाठी .. मग, सगळे मिळून माझा छळ करतात , मारझोड करतात ,
आईसाहेब पहात असतात सगळा प्रकार , त्यांची संमती असते या सगळ्या गोष्टींना ..
त्या नेहमी म्हणतात मला –
नाथा नीट समजून घे .
.. हे बघ .. तू माझा कुणीही नाहीस आणि होणार ही नाही , हे सर्व माझं आहे .तुला हे कधीच काही मिळणार नाही

आमचं हे वागणे तुझ्या बाबांना हे कधीच दिसू देणार नाही , त्यांच्या समोर आम्ही तुझ्याशी आम्ही इतके चांगले वागून दाखवतो की ..त्यांना आमच्या वाईट वागण्याची शंका कधीच येणार नाही.. कुणी कितीही सांगो आमच्या बद्दल ..त्यांचा विस्वास कधीच बसणार नाही, याची काळजी आम्ही घेत राहू.
तुला मारून आम्ही मोकळे होणार नाही ..कारण असे केले तर तुझ्या बाबांना सोडून इतर सगळ्यांना हे आम्ही केलें याची पक्की खात्री असेल.
म्हणून ..तुला मरू तर देणारच नाही आणि नीट जगू पण देणार नाही .. “

तुम्हाला तर माहितीच आहे.. मोठे मालक ..त्यांना धक्का बसेल असे काही कळता कामा नये , दोन ऑपरेशन झालीत त्यांची , काळजी घेतली नाही तर ,जीवाला मोठाच धोका आहे त्यांच्या . आणि मला या सगळ्या लोकांनी देत असलेल्या त्रासाबद्दल कळाले तर त्यांच्या मनाला खूपच मोठा धक्का बसेल या भीतीमुळे सहन करण्याशिवाय माझ्या हातात काही नाहीये.
नाथाच्या स्वभाचा आणि चांगले असण्याचा मोठाच गैरफायदा त्याचीच आई घेत होती . केवळ पैसा आणि संपत्तीच्या लोभापायी नाथाच्या वाट्यास हे दिवस आले होते .या कुटील हेतूने ..नाथा “पुरुषच “नाहीये ..ही गोष्ट सगळीकडे ठरवून पसरवली जात होती , ज्यामुळे नाथाचे लग्न होणार नाही “,आणि तो एकटाच असला की त्याला त्रास देणे ,सहज सोपे होते.

नाथाची गोष्ट ऐकून सर्वांना त्याच्याबद्दल सहानुभूती होती , त्याच्या मदतीला दरवेळी कुणीतरी येत होते , पण ,वाड्यात असतांना मात्र तो नेहमीच एकटा असायचा , इतर कुणाला प्रवेश नव्हता .


अचानक –एक दिवस ..
गावात बातमी येऊन धडकली की  काल-परवा ..नाथा  " सहजपणे  वाड्याच्या गच्ची वर गेला होता  , पायर्या उतरतांना ..त्याचा कसा काय तोल गेला .कळालेच नाही ..
तो . थेट खाली आला ..
आता नेलंय मोठ्या गावाच्या दवाखान्यात कळेल लवकरच.

ही बातमी ऐकून सारे गाव हळहळत होते , लोक आपसात कुजबुजत होते ..अरे आपला नाथा पडला नाही..त्याला नक्कीच ढकलून दिले असेल ..त्या शिवाय असे होणार नाही..
आमच्या सारख्यांच्या बोलण्याला काय आणि कोण किंमत देणार ..?













---४----




बरेच दिवस झाले होते आता या गोष्टीला पण या अपघातातून नाथा " कधीच बरा होणार नाही..याची पूर्ण काळजी घेतली जाते आहे .असेच लोकांना वाटू लागले ..आणि काही महिन्यात तसेच झाले ..
वाड्यातील लोकांनी गावातील लोकांना सांगण्यास सुरुवात केली ..
पडण्याच निम्मित्त झालं , बघा ना, काय होऊन बसलाय , मेंदूला इजा झाली म्हणतात नाथाच्या .
मोठे मालक स्वतहा लेकाचं निदान करून आलेत , खूप धक्का बसलाय त्यांना तर ..हाय खाली जणू त्यांनी.

 नाथा वेडा झालाय “,त्याला काहीच समजत नाही ,काही करता येत नाही
 डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या ", आता आम्हीच सांभाळू कसे तरी त्याला . 
वेडा झाला म्हणून सोडून कसे देता येईल , त्याचे दुश्मन नाहीत आम्ही ..
असे म्हणणारे कसे आहेत ?  हे सगळ्यांना माहिती होते ..

चार दिवस लोक बोलत होते ..काही दिवसांनी  आपोआप  तेही बंद झाले ..
वाड्या समोरून जातांना .नजर वर जातेच ...वरच्या माडीवर.ग्यालरीत ..बसलेला ..तो "दिसतो .. पंख छाटूनटाकलेला जायबंदी - दिमाखदार गरुड "..इकडे तिकडे भिरभिरत असते त्याची नजर ..पण त्यात भावनाच नाहीये असे वाटते .तसे तर जो कुणी या रस्त्याने जातो, तो क्षणभ थांबून वर पाहिल्या शिवाय पुढे जात नाही, ग्यालरीत बसून असलेला नाथा दिसतो , पाहणारा मनोमन पुटपुटत पुढे जातो..”पैश्या साठी माणूस काय काय करील,? भरवसा नाही उरला रे बाबा कुणाचाच

..तो " दिसला की ..त्याला पाहून घशात हुंदका अडकल्या सारखे वाटते .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा - तो दिसला की .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Monday, May 14, 2018

आठवणीतलं गाव परभणी - लेख क्र- २४ - लेखक - मित्र. प्रा.डॉ.प्रभाकर हरकळ

लेखमाला -
आठवणीतलं गाव परभणी -
 लेख क्र- २४ -
 लेखक - मित्र. प्रा.डॉ.प्रभाकर हरकळ
------------------------------------------------------------------------------
मित्र हो नमस्कार - परभणीच्या आठवणी लिहितांना खूप भारावून गेल्या सारखं होत असतं नेहमी , एखादा प्रसंग आठवतो , एखाद्या मित्राची आठवण होते , आणि मन पुन्हा त्या दिवसातला फेरफटका मारून येते .
आज जुन्या फायली पुन्हा एकदा संगतवार लावीत असतांना एक फायलीत मला माझे एम.ए. मराठी चे मार्क मेमो सापडले.आणि खूप छान आठवणी आठवल्या ..आज त्याच आठवणीचा हा आलेख तुमच्या साठी..
१९९८६ ते १९९६ या दरम्यान मी स्टेट बँके ऑफ हैद्राबाद च्या  नव्या मोंढा मध्ये  असलेल्या कृषी विकास शाखेत होतो .

मसाप परभणी शाखेच्या साहित्यिक उपक्रमामुळे , ग्रामीण कथा लेखक प्रा.आता (डॉ.) प्रभाकर हरकळ सर, तसेच प्रा.-कवी इंद्रजीत भालेराव सर, आणि सहर्द्य प्राध्यपक मित्र अशी ज्यांची ओळख आहे ते प्रा.अशोक खोत सर या सर्वांशी यांच्याशी माझे खूपच छान असे मैत्री -सूर जुळले होते . 
ज्ञानोपासक कोलेज नव्या मोंढ्यातील आमच्या बँके पासून तसे खूपच जवळ होते . प्रभाकर हरकळसर फावल्या वेळेत त्यांच्या स्कूटर वरून बँकेत येत ...त्यांची स्कूटर आली की .आमचा प्यून म्हणयचा ..साहेब ..तुमच्या या मित्राच्या स्कूटरचा नंबर एकच आहे. पहिल्यांदा हा योग पाहून खूप मजा वाटली.. बँकेचा फोन नंबर -२२९७  होता आणि हरकळ सरांच्या स्कूटरचा नंबर  MH-२२ - २२९७  असा होता . हरकळ सर येतांना दिसले की .कुणी तरी अगोदरच म्हणयचे .२२९७  चे सर आलेत बघा .

बँकिंग आणि कॉमर्स  विषयाचे प्राध्यापक असलेले हरकळसर बँकेत आले म्हणजे उपयुक्त संदर्भ आवर्जून माहिती करून घेत , नंतर बँकेच्या  समोर असलेल्या छोट्याश्या टपरीवर  (तेंव्हा )..धुम्रपान अधिक चहापान सेशन होत असे.

हरकळसरांचा लाभलेला सहवास साहित्यिक दृष्ट्या खूप काही देणारा असाच होता .  लेख्नाब्द्द्लची त्यांची  मत नेहमीच संयत आणि स्पष्ट असल्यामुळे साहित्य आणि लेखन याबद्दल एका अर्थाने गंभीर ऐकायला मिळत गेले " ते किती महत्वाचे आहे" हे आता समजले आणि हरकळसरा मधील जाणीवेच्या लेखकाचे दर्शन होते.
हरकल सरांनी साहित्यिक लेखन करीत असतांना शैक्षणिक ग्रंथ लेखन देखील दीर्घ काल केले . उद्योजक विकास संस्थे साठी एका वार्ता-पत्राचे   संपादन ते करीत असत 

एका  खूप छान ट्रीपची आठवण सांगतो-  मानवतला  प्रकाश मेदककरसर यांच्या मुलीचे लग्न होते , त्या लग्नाला साहित्य सम्मेलन वाटावे इतके लेखक-कवी आले होते ,  ही मंडळी येणार कारण मेदकसरांचा गोतावळा होताच खूप मोठा ,  परभणीहून अनेकजन मानवतला निघाले , अशा वेळी हरकळसर म्हणाले ..चला -अरुणराव .आपने गाडी पे जायंगे ..! 
आयडीया छानच होती ..मानवत अगदी जवळ असलेले गाव.. बँकेत रजा टाकणे वाचले . मेदककर सरांकडील कार्यास हजेरी लावून लगेच दुपारी वापीस ..असा प्लान ठरला .  २०-२५ वर्षापूर्वीचा उन्हाला आजच्या इतका भीषण नक्कीच नव्हता ..तरी त्या वर्षीच्या कडक उन्हात आम्ही मानवतला गेलो , लग्न समारंभ आणि साहित्यिक भेटी  दोन्ही खूप आनंद देणारे .प्रकाश मेदककर सरांनी केलेले आपलेपणाचे स्वागत ..हा प्रसंग मनात जशाचा तसा आहे.  त्या दिवशी दुपारी हरकळसरांना  कोलेजात ,आणि मला बँकेत येणे  आवश्यक होते 

 म्हणून लग्न घरच्या  मेजवानीचा आस्वाद  घेऊन आम्ही भरदुपारी तळपत्या उन्हात परभणीला परत निघालो , गप्पाच्या नादात ..उन्हाचे चटके बसत आहेत याचा आम्हाला विसर पडला होता , गाडी तापली म्हणून मध्येच एका ठिकाणी चहा साठी थांबून झाले .. .एरव्ही कमी आणि मोजकं बोलणारे हरकळसर नर्म -विनोदी पण बोलू शकतात याचा अनुभव मी मानवत -परभणी-मानवत या ट्रीप मध्ये घेतला ..आणि पुढे अनेक वेळा ,अनेक प्रसंगी घेतला आहे.

परभणीच्या त्यावेळच्या साहित्यिक मित्रांमध्ये कवी-मित्र बहुसंख्येने असायचे .अशा साहित्यिकात फक्त कथा लेखन करणारे  लेखक अशी ठळक ओळख हरकळसरांची होती . त्यांच्या ग्रामीण कथांनी समीक्षक आणि वाचक अशा दोघांची पसंतीची पावती मिळवलेली आहे . त्यांची नवी कादंबरी " पांगाडी " ,ग्रामीण साहित्यात लक्षवेधी ठरली आहे याचा मला खूप आनंद वाटतो.
अशीच एक आठवण - " जागतिक  कथा -शताब्दी वर्ष " होते त्या वर्षी . या निमित्ताने ..श्रीरामनगर मध्ये माझ्या घरी ..कथा लेखकांचा सहभाग असलेला एक विशेष कथा -चर्चा "असा कार्यक्रम झाला ..त्यात हरकळसरांनी कथे बद्दल खूप महत्वाचे विश्लेषक असे मनोगत व्यक्त केले होते.

एकदा हरकळसरांनी ज्ञानोपासक महाविद्यलयात .वाणिज्य विभगा तर्फे .बँक आणि कर्ज पुरवठा " या विषयावर चर्चा -सत्र आयोजित केले होते , या चर्चा सत्रात बँक -प्रतिनिधी " या स्वरूपात मी व्य्ख्यान दिले ",  माझ्या बँकेतील नोकरीत अगदी समर्पक वाटावा असा हा एकमेव योग हरकळसरां मुळे मी अनुभवला  आहे.

परभणीतील साहित्यिक उपक्रम असो ,मराठवाडा साहित्य संमेलन , परभणी जिल्हा साहित्य संमेलन .अशा सर्व उपक्रमात हरकळसर नेहमी सोबत असायचे ,एका अर्थाने त्यांच्या लेखकीय सोबतीची चांगलीच सवय झाली होती.
आता परभणी सोडून एक तप होते आहे ..पण परभणीत जे जे अनुभवले त्याला तोड नाही..
फेसबुक आणि इंटरनेटवर हरकळसर सक्रीय आहेत त्यामुळे अधून मधून भेट होते .

२०१५ -२०१६ मधली घटना .. चिरंजीवांनी फर्मान सोडले ..आपल्याला प्रत्येकाचे पासपोर्ट काढून रेडी ठेवायचे आहेत , त्या साठी शाळेचा किंवा कॉलेजचा टीसी आवश्यक आहे. माझी शाळा सुटून ५० वर्ष झालीत , शाळा हैदराबादची ,सरकारी हायस्कूल . तिथे आता मराठी मिडीयम अस्तित्वात तरी असेल की नाही ? 
मग अचानक आठवले ..आपण १९९५- १९९६ या वर्षात ज्ञानोपासक कोलेजात एम .ए .मराठी साठी विद्यार्थी म्हणून प्रवेस्च घेतला होता , या कोल्जेचा टीसी चालेल .

लगेच हरकळसरांना फोन लावला ..प्रोब्लेम  सांगितला ..आवश्यकता सांगितली ..सरांनी लगेच दुसरे दिवशी चौकशी करून पुन्हा फोन लावीत म्हटले ..या तुम्ही ..टीसी तयार असेल . तुमची सेल्फ सही आवश्यक आहे  म्हणून तुम्ही यायचे आहे.
मी ठरल्या प्रमाणे गेलो .दुपारच्या वेळी .सर वाटच पाहत होते , टीसी घेऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांचे सध्याचे नवे आणि मोठ्ठे घर पहिल्यांदाच पहिले , हरकळ सरांच्या मोठ्ठ्या मनाला शोभेल असेच हे घर आणि यातली माणसे आहेत , हे अगोदरही अनुभवले ,पुन्हा या नव्या घरात तेच अनुभवले .
सर, तुमच्या या मदतीने नव्या पिढीला एक उदाहरण देता आले की.. बघा पोरांनो ..अंतरीचा जिव्हाळा ..अंतरंगात सतत पाझरणारा जिवंत निर्मल झऱ्या अखंड वाहता असतो.".
प्रभाकर हरकळ सर - तुमच्या लेखनाला खूप खूप शुभेच्छा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखमाला -
आठवणीतलं गाव परभणी -
 लेख क्र- २४ -
 लेखक - मित्र. प्रा.डॉ.प्रभाकर हरकळ.
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------