लेख -६ वा -
ले- अरुण वि.देशपांडे
------------------------------ लेख- समारंभ आणि कार्यक्रम ..! ------------------------------ प्रसंगानुसार आपण अनेक ठिकाणी जातो. अशावेळी एक गोष्ट हमखास अनुभवावी लागते ..जी अगदी कॉमन आहे. मी घेतलेला हा अनुभव .तुम्ही सुद्धा अनेकदा घेतला असेल. एखद्या समारंभाच्या ठिकाणी फक्त यजमान आपल्याला परिचित असतात, किंवा त्या परिवारातील एखादाच मेम्बर आपल्या मित्रपरिवारातील असल्यामुळे आपण समारंभाला आलेलो असतो , बाकी त्यांच्या परिवारातील इतरांशी आपला परिचय नसतो, ओळख तर नसतेच , केवळ एक -परिचित -म्हणून निमंत्रित "तरीही अनोळखी " असे आपले त्या ठिकाणी स्थान असते . हे असे समारंभ ,कार्यक्रम ..जास्त करून पारिवारिक - असतात , आपल्या परिचितांच्या -स्नेहीजानाच्या -आणि नातेवाईक या अशा -वर्तुळातील एखाद्या महत्वाच्या व्यक्ती कडून ,नातेवाइका कडून अगदी आग्रहाचे निमंत्रण दिले जाते ,आणि आपल्यालाअशा कार्यक्रमांना जावे लागते , अशा कार्यक्रमांचे उदाहरणे घायची झाली तर. हे पारवारिक स्वरूपाचे समारंभ कधी मोठ्या स्वरूपाच्या समारंभाचे असते तर ,कधी निवडक पाहुण्यांच्या उपस्थित होणारे कार्यक्रम .असे .यांचे स्वरूप असते - उदा- बारसे , मुंज ,, मुलांचे वाढदिवस, तरुणांचे वाढदिवस, जोडप्यांचे लग्नाचे वाढदिवस, एकसष्ठी ,अमृतमहोत्सव , सहस्त्रचंद्र -दर्शन , आणि साखरपुडा आणि विवाह-समारंभ ,,या शिवाय यश-प्राप्तीचे ,अभिनंदनाचे -कौतुक सोहाळे " असे विवध समारंभ असतात . आजकाल जवळ जवळ सर्वच फमिली .आपले कार्यक्रम आणि समारंभ दणक्यात साजरे करीत असतात हे आपण पाहत असतो. अशा ठिकाणी जाण्यासाठी आपण निघतो खरे -पण त्या क्षणा - पासून आपण अस्थिर मन:स्थित असतो , निमंत्रण आले आहे, जावेच लागणार , नाही गेलो तर उद्या समक्ष भेटीत मित्र नाराजी व्यक्त करणार ..त्या पेक्षा हजेरी तर लावून येऊ ",न गेल्या पेक्षा हे खूप बरे.अशी मानसिक तडजोड करून आपण समारंभाच्या ठिकाणी जातो , तिथे उपस्थित पाहुण्याच्या गर्दीत -कुणी परिचित दिसतो का ?, भेटतो का ? हे अधिरतेने शोधण्यास सुरुवात करतो .कुणी भेटलाच तर .व्वा -बरं झाल बाबा ! ,आहे कुणी तरी सोबतीला ! असा आधाराचा निश्वास टाकतो , पण कधी-कधी कुणीच भेटत नाही, दिसत सुद्धा नाही..मग मात्र , फारच परकेपणाचे फिलिंग मनावर दबाव आणीत असते , मग काय, समोरच्या रांगेत नको रे बाबा ..! आणि खूप मागच्या रांगेत पण नको ..त्या पेक्षा आधल्या-मधल्या रांगेतील खुची पकडून बसले की अर्धे काम होते. मध्येच अचानक स्वतहा यजमान कोण कोण पाहुणे आले आहेत हे पहातंना प्रत्येक खुर्चीजवळ येऊन हसतमुखाने स्वागत करतात ,आपल्या जवळ त्यांचे थांबणे ,चार शब्द बोलून ..जेवण केल्याशिवाय जायचे नाही बरं का ? अशी प्रेमळ दटावणी -कम आग्रहाची विनंती करणे -हे दृश्य "..आजूबाजूचे पाहुणे पहात आहेत ना ? याची खात्री झाली की मग ..परकेपणा आणि अनोळखीपानाचे दडपण कमी झाल्या सारखे वाटू लागते .. काही काही ठिकाणी तर "आमची इतकी माणसे आहेत " हे दाखवण्यासाठी निमंत्रण देऊन मान्यवर पाहुण्याची संख्या लक्षणीय अशी वाढवली जाते ..सहाजिकच अशा ठिकाणी ..कुणीच कुणाच्या परिचयाचा नाहीये " हे पाहून तिथे आलेला प्रत्येकजण मनातल्या मनात अपसेट " झालेला असतो "अशा ठिकाणी आपली हजेरी असेल तर अवघडलेपण आपल्या वाट्याला येते " आणि मग नको ते कार्यक्रम आणि नको ते जाणे अशा ठिकाणी " असे विचार मनात येऊ शकतात. एख्द्यदा कार्यक्रमाचे चित्र नजरेसमोर आणून पहा -, मांडवात खुच्या टाकून बसलेले पाहुणे मग तसेच मुकाटपणे बसून इकडे तिकडे पहात .कधी हा कार्यक्रम संपतो रे बाबा ! असे मनातल्या मनात नक्कीच म्हणत असतो." हे दृश्य नेमके उभे राहील . कारण कार्याक्रमचे यजमान -आयोजक -संयोजक .यापैकी कुणीही आलेल्या पाहुण्याचा त्यांचा एकमेकांशी परिचय करून देत नाहीत ,की ओळख सुद्धा करून देत नाहीत थोडक्यात असे म्हणता येईल की- आलेल्या व्यक्तींचा परिचय असला काय ..नसला काय ..याने काही फरक पडत नाही ..येणारा येतो..हजेरी लावतो ..बुफे लाईनीत उभे राहून आवडेल ते खाऊन त्यानंतरच जातो "हे सर्वांनाच माहितीचे आहे. हे असे होण्याचे कारण -आपल्या स्वतःच्या वागण्यात आहे, स्वताच्या "स्व: " कोंडून ठेवण्यात आहे. कारण ,पूर्वी सारखे मोकळे वातावरण नाही, एकमेकांचा सहवास नाही, कुणी आपणहून परिचय करून घेतोय ..असे जाणवले तरी .लगेच समोरचा माणूस अलर्ट " होऊन स्वताच्या कोशात बंद होऊन जातो . तसे म्हटले तर काही जन ग्रुप जमवून बोलत बसलेले आपल्या दिसत असतात ..असे लोकं ....इतर कुणाला खुची ओढून -या हो .बसा ..असे " म्हणत नाहीत " ..जणू आगंतुक आणि विना-परिचयाच्या व्यक्तींना सुरक्षित अंतरावर ठेवणे बरे असते " असा विचार ते करीत असतात.. अपडेट असलेली माणसे -अपटुडेट दिसणारी माणसे ".आजूबाजूच्या इतर सगळीकडे सफैदारपणे दुर्लक्ष करून ..स्वतःकडे सगळ्यांचे लक्ष वेधून कसे घेता येईल ? या प्रयत्नात असतात , सहाजिकच ..अशा ठीकांनी असलेल्या इतर सामान्य जनतेच्या दृष्टीने अशी माणसे -आउट आफ रेंज " असतात अशा वातावरणाचा एकत्रित परिणाम शेवटी - हे असे समारंभ , कार्यक्रम ..आलेल्या कुणालाही आनंद देऊ शकत नाही ना समाधान .अगदी निर्जीव आणि बेजान वाटतात हे असे कार्यक्रम याचे यजमान ते तर ..त्यांच्या प्लानिंग प्रमाणे सोपस्कार पार पडत आहेत ना .मग,बाकी काळजी करण्याचे कारण नाही.अशा मनोवस्थेत असतात.त्यांनी त्यांचा आनंद मिळवलेला असतो ..कारण, त्यांनी दिलेल्या आमंत्रण -प्रमाणे सगळेजण तिथे आलेले असतात ..हे एव्हढे आणि इतकेच समाधान त्यांना मोठा आनंद देणारे असते. हे सगळा वाचून तुमच्या मनात प्रश्ना येऊ शकेल -की - हे असे होत असते हे खरेच आहे ..मग, यावर काय उपाय आहे,? यावर उपाय आहे -हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर . आणि हा उपाय एकट्याने करावयाचा नसून मिळून करायचा आहे,प्रतिसाद देऊन करायचा आहे. यासाठी आपण स्वतःच्या कोशातून बाहेर पडायला हवे आहे. मोकळेपणाने बोलून सर्वात मिसळून बोलायला काय हरकत आहे ? सुरुवात केल्यावर -काही बोलणार नाहीत, काही थोडावेळ बोलून थांबतील , काहीजण ओळख झाली या आनंदात ..लगेच मोकळेपणाने बोलायला लागतील ..कारण "कुणीतरी पुढे व्हावे , त्याने लीड घ्यावा ..,मी कशाला उगीच ..! अशा विचाराने खूपजण न बोलता एका ठिकाणी तास न तास तसेच बसून रहातात..पण आपणहून कुणाशी बोलणार नाहीत की ओळख करून घेणार नाहीत. हे असे आहे पहा ..पुढच्या वेळी बघा ट्राय करून ...! ------------------------------ लेख- समारंभ आणि कार्यक्रम ..! ले- अरुण वि.देशपांडे -पुणे. मो- ९८५०१७७३४२ ------------------------------
साभार - साप्ता- पथदर्शनी - दि..१७ जून -२०१७ -अंकात प्रकाशित लेख .
|
Tuesday, August 1, 2017
लेख-क्र-६ - समारंभ आणि कार्यक्रम .
Subscribe to:
Post Comments (Atom)
अच्छा सवाल
ReplyDelete