Friday, May 8, 2015

संदुक आणि गाठोडे ...!

संदुक आणि गाठोडे ......!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------
पाण्यात साखर टाकली की ..ती हळुवारपणे विरघळून जाते..अगदी तसेच ..जुन्या  आठवणीत आपले मन अलगदपणे विरघळून जाते...ते हळवे क्षण , आठवणीत घट्ट रुतून बसलेली वर्ष ..त्या वर्षातले दिवस , हे सगळे आपण अगदी जीवापाड सांभाळून ठेवलेले असते ..मनाच्या संदुकात ..

.सन्दुक ...! जुन्या  पिढीने आणि आता जेष्ठ झालेल्या मंडळींनी पाहिलेली  एक उपयोगी वस्तू.. दर्शनी स्वरूप - धातूची एक मजबूत पेटी ..पण आपले मन यात इतके गुंतून गेलेले असते की ..या संदुकात ..असंख्य बहुमोल आठवणी ..साठवलेल्या असतात .कधी मोकळ्या तर कधी कुलुपबंद,कधी सगळ्यांशी शेअर करण्या सारख्या तर कधी एकांती - एकटयाने..हळुवार मनाने .डोळ्यातील थेंबांनी ,मनाशी साधलेला संवाद ...या आठवणीशी निगडीत असतो.

तसेच हे ओबडधोबड वाटणारे "गाठोडे ".. यात साठवलेले असते आपले व्याकूळ असे भावविश्व , आयुष्याचचे उन्हाळे-पावसाळे ..मोर पिसा सारखे या गाठोड्या तील .महावास्त्रात निगुतीने घडीत घडी करून ठेवलेल्या असतात. एकेक घडी म्हणजे आपल्या जीवन अनुभवाची कहाणी असते ..एकेक चिंधी .करून कहाणी असते, कधी ती कमावलेल्या क्षणांची असते तर कधी हातातून निसटून गेलेल्या संधीची असते..

निरुपयोगी झालेल्या गोष्टी "आपण टाकून देण्याची तयारी सहजतेने करतो ,पण या सन्दुक ला आणि या गाठोड्याला ", टाकून देण्याचा विचार सुद्धा मनात येणार नाही हे नक्की. काय ?, बरोबर ना ?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदुक आणि गाठोडे ......!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment