Tuesday, December 5, 2017

लेखमाला -आठवणीतील गावं -परभणी . लेख -७ - आकाशवाणी -परभणी - माझी लेखन -कार्यशाळा

लेखमाला -आठवणीतील गावं -परभणी . 
लेख -७ - आकाशवाणी -परभणी - माझी लेखन -कार्यशाळा 
---------------------------------------------------------------------------------
१९८४ हे वर्ष असावे , मी त्यावेळी गंगाखेडला होतो. लेखनास नुकतीच सुरुवात झालेली होती, तिथे लेखन करणार्यांचा एक छान ग्रुप जमून आला होता , सर्वश्री .दिनानाथ फुवाडकर सर , प्रा.मधुकर देशपांडे सर , दिलीप शिरपुरकर , अनिल रामदासी , कधी कधी कवी शिवाजी मरगीळ, iइंडिया बकेतील शरदराव कुलकर्णी मांगलेकर , असे अनेकजण एकत्र येऊन लेखन-चर्चा करायचो ,
या उपक्रमात नेहमीच " कथा लेखन प्राधान्याने होत असे, " लिहिलेली कथा पुणे-मुंबई हून प्रकाशित होणार्यांना मासिकांना पाठवली की ती कधी प्रकाशित होते ? " ..ही प्रतीक्षा फार अधीरतेने भरलेली असे , श्री.मधुकर देशपांडे सर मासिकं सुचवत आम्ही त्या मासिकांना कथा पाठवू लागलो , आणि या कथा मासिकातून प्रकाशित होऊ लागल्या .बघता बघता मासिकातून कथा प्रकाशित झालेला एक नवा लेखक म्हणून माझी थोडी थोडी ओळख होऊ लागली याचे श्रेय गंगाखेड ला चालवलेल्या "कथानाद मंडळ "या लेखन उपक्रमाचे आहे. असो.

कथा लेखन जोमाने सुरु असतांना ..एकदा आकाशवाणी " ला कथा पाठवून तर बघू .असा विचार करून मी "सुखाची वाट" ही कुटुंब -नियोजन "संदेस देणारी कथा आकाशवाणी केंद्र -परभणी ला पोस्टाने पाठवली , माझ्या सारख्या नवख्या लेखकाचा काय नंबर लागणार ?, तिथे कुणी ओळखीचे आहे", हा पण आधार नव्हता , कथा पाठवून निवांत बसलो, आली तर छान नाही आली तर ?..त्याहून छान " असा स्वतहाला धीर दिला .

पण ,निराशा वाट्याला आली नाही , आणि आकाशवाणी परभणीचे पत्र मिळाले ..त्यात रेकोर्डिंग साठी येण्याची तारीख होती . मला खूप आनंद झाला , एक नवा अनुभव घेण्याची उत्सुकता होती .
श्रोता म्हणून आकशवाणीशी खूप जवळचे नाते होते ..पण, सादरकर्ता म्हणून पहिल्यांदा माझा आवाज आकाशवाणी वरून इतर श्रोते ऐकणार " ही कल्पना रोमांचकारी वाटणारी होती.
गंगाखेडहून मी परभणीला आलो ..आकाशवाणी केंद्र कसे आहे, कुठे आहे ? कैच माहिती नव्हती , नवा मोंढा रस्ता आहे तिकडे गेलात की सांगेल कुणी पण " या प्रमाणे मी आकशवाणी केंद्रात पोंचलो ..मला आलेले करार-पत्र दाख्य्वले ,
त्यावेळी कार्यरत असलेले कर्मचारी - ज्यांनी माझ्या कथेचे रेकोर्डिंग केले .आता त्यांची नावं नेमकी आठवणार नाही "
आकशवाणीचे कार्यालय आणि स्टुडीओ दोन मजली बिल्डींग मध्ये होता असे आठवते .. रेकोरिंग रूम मध्ये मी बसलो , पण, समोर माईक ,क्षणभर घश्याला कोरड पडली " असे जाणवले ,

माझी अवस्था पाहून -समोर उभ्या असलेल्या साहेबांनी "धीर "दिला , आणि त्यांनी "हं..करा सुरु वाचन .असे खुणावले .."पुढचे २० मिनिटे मी व्यवस्थितपणे माझी कथा वाचन केली ",वाचन करतांना आवाजात योग्य ते चढ-उतार "जमले हो" असे पावती मिळाली ..प्रसारणाची तारीख आणि वेळ सांगितली गेली .."सुखाची वाट " या माझ्या कथेने मला साहित्याची मोठी सुखद अशी नवी वाट मिळवून दिली ..

कारण पुढच्या अनेक वर्षात ..अगदी परभणी सोडे पर्यंत ..सलग २४ वर्षे आकाशवाणी -परभणी साठी मी विविध आणि विपुल असे लेखन करीत राहिलो . सुरुवातीला श्री.कुरील साहेब यांच्याशी परिचय झाला ,त्यानंतर अनेक अधिकारी परिचित होत गेले ..

पुढे काही वर्षांनी आकाशवाणी केंद्र ..स्वतःच्या अद्यावत बिल्डींग मध्ये सुरु झाले .त्या काळात मी देखील परभणीला बदलून आलेलो  होतो , या दरम्यान एक लेखक म्हणून आकाशवाणीत  अनेक वेळा मला जाण्याचा योग येत गेला.
सर्वश्री .प्रभाकर कानडखेडकर , विजय रणदिवे , खासनीस , हे कार्यक्रम अधिकारी दर भेटीत अगदी आपलेपणाने बोलत ,लेखन विषयक चर्चा व्हायच्या.

महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या गुरुवारी .संध्याकाळी प्रसारित होणार्या .."राम राम मंडळी .या कार्यक्रमात सादर होणार्या "श्रुतिका -साठी मी भरपूर आणि नियमित लेखन केले ..या श्रुतीकेत चार पात्र - तात्या , शांताक्का , अनुताई  आणि गुरुजी .असायची ..दिनविशेष आणि सांस्कृतिक ,सामाजिक घटना यांची माहिती देणाऱ्या या कार्यक्रमा साठी लेखन "खूप मोठा अनुभव होता .
संजीवन पारटकर , सतीश जोशी , विजय रणदिवे , जयश्री लांबडे ..या श्रुतीकेत सहभागी असत ..
माझ्या सवांद- लेखनाला  माझ्या या कलावंत -मित्रांनी जनमानसात अतिशय प्रभावीपणे पोन्च्वले ", याची प्रचीती 
श्रोत्यांची पत्र येत असत ..त्यातील माझ्या श्रुतिका लेखनास खूप छान अभिप्राय आलेले असत.

ग्रामीण परिसरातील बाल-मित्रांसाठी मी खूप गोष्टी लिहिल्या आणि मुलांसाठीच्या कार्यक्रमातून सदर केल्या ,
या गोष्टी मुलांना खूप आवडत ..आकशवाणी -परभणी केंद्राने माझ्या या  बाल-कथा नंतर  अनेक वेळा पुनर:प्रसारित 
केल्यात ..ही माझ्या साठी आनंदाची गोष्ट आहे. सुश्री - जयश्री लांबडे बालमित्रांसाठीचा कार्यक्रम सदर करीत , माझ्या कथांना खूप छान प्रतिसाद मिळतो .हे त्यांच्या कडून ऐकणे म्हणजे लेखनास प्रोत्साहन देणारे असे.

आकशवाणी केंद्रातला रेकॉर्डिंग स्टुडीओ..खूपच छान आहे ,याचा आरंभ "माझ्या कथा सादर करण्याने झाला आहे" ही आठवण या निमित्ताने सांगावीशी वाटते.
मी आमच्या बँकेच्या विद्यापीठ शाखेत कार्यरत असतांना म्हणजे ..१९९६ ते २००३ .या ६-७ वर्षांच्या काळात मला आकशवाणी साठी लेखन करण्याची संधी मिळाली ..,परभणी -केंद्रावरून प्रसारित होणार्या त्या काळातील बहुतेक सर्व कार्यक्रमातून मी माझे लेखन सदर केले  जे -  कथा , बाल-कथा , श्रुतिका , भाषण , कविता ..अशा विविध स्वरूपाचे होते..
रेकॉर्डींगच्या दिवशी आकाशवाणीत आले की ..सतीश जोशी , संजीवन पारटकर यांच्या भेटी व्हायच्याच  ,  त्यातून आकशवाणी साठीचे लेखन ,लेखन -स्वरूप .आणि इतर लेखन याबद्दल खूप उपयुक्त अशे बोलणे व्हाव्यचे ...आज या मित्रांच्या सहवासाचा ,त्यांनी आपलेपणाने केलेल्या  चर्चेचे महत्व जाणवते ..कारण या मित्रांशी केलेल्या चर्चेने आणि  आकशवाणी साठीच्या केलेल्या लेखनाने ..मला काही महत्वाचे शिकण्यास मिळाले ..

जसे ..विषयानुरूप नेमके आणि मुद्देसूद लेखन करणे , शब्दरचना सुबोध ,वाक्य समजण्यास सोपी असली पाहिजे., मनोरंजन हा उद्देश प्राथमिक आणि प्रबोधन प्राधान्याने करीत अस्तंना ..जे श्रोते ऐकणारे आहेत ..त्यांना हे त्यांच्या भाव्तालीचे ,त्यांच्या सबंध असलेले वाटले पाहिजे .."
माझ्या लेखनावर या सर्व सूचनांचा प्रभाव नेहमीच राहिलेला आहे.  माझ्या कथा-संग्रहात आणि बाल-साहित्याच्या पुस्तकात .आकशवाणी वरून प्रसारित झालेल्या कथांचा आणि गोष्टींचा समावेश केला होता. आज ही पुस्तके प्रती रुपात उपलब्ध नाहीत .
मित्रानो - तुमचे आभार मानवे तेवढे कमीच आहेत .

आकाशवाणी परभणी केंद्रातील सर्वच सहकारी आमच्या सारख्या साहित्यिक मंडळींशी आस्थेने बोलत, स्वागत करीत ..त्यांच्या मनाच्या मोठेपणा मनात कायमस्वरूपी आहे.
माझ्या  दोन मित्रांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ  शकत नाही..

(स्व.) -कवी मित्र - प्रकाश ताडले ..कार्यक्रम अधिकारी असतांना ..कविता विषयक खूप छान कार्यक्रम सादर झाल्याचे आठवते त्यावेळी ..अनेक नामवंत कवी आवर्जून आकाशवाणी केंद्रात येत.. या सर्वांच्या भेटी अजून स्मरणात आहेत.

पारिवारिक स्नेही आणि मित्र .(स्व.) नीलकंठ कोठेकर - याच्या कार्यकालात लेखन विषयक ,कार्यक्रम विषयक सविस्तर अशी चर्चा होत असे .

लेखक आणि कवी -बाल-साहित्यिक म्हणून माझ्या वाटचालीत या सर्व मित्रांचा आणि आकशवाणी- परभणी केंद्राचा खूप महत्वाचा वाटा आहे.. एका  अर्थाने ..आकशवाणी परभणी  म्हणजे- माझी लेखन-कार्यशाळा "आहे.
मित्र हो आपल्या विषयी माझ्या मनात सदैव कृतद्न्य -भावना आहे.
वाचक मित्रहो ..पुढच्या लेखात ...परभणी बद्दल असेच काही ...!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला -आठवणीतील गावं -परभणी . 
लेख -७ - आकाशवाणी -परभणी - माझी लेखन -कार्यशाळा 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment