Tuesday, December 5, 2017

आठवणीतील गावं - परभणी - लेख-८ वा- आयुष्याचा बोनस देणारे - डॉ.रत्नाकर लोंढे ----------------------------------------------------------

आठवणीतील गावं - परभणी - 
लेख-८ वा- 
आयुष्याचा बोनस देणारे  - डॉ.रत्नाकर लोंढे 
-----------------------------------------------------------------
आपल्या आयुष्यात मित्रांचे स्थान नेहमीच महत्वाचे असते , व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि जितके मित्र तितके त्यांचे वेगवेगळ स्वभाव ,असे असले  तरी  कुठे तरी स्वभाव आणि आवडीनिवडीचे सूर जुळून येत असतात ,अशा व्यक्तीशी आपले मैत्रीचे नाते जुळत असते   त्यात आंतरिक जिव्हाळा अधिक जोडला जातो तो सहवासाने .
परभणीच्या वास्तव्यात हे मी खूप अनुभवले , हे अनुभव आणि आठवणीं मनाच्या खजिन्यातील कधीही कमी न होणारा असा मौल्वान ठेवा आहे.

अनेक वळणे घेत घेत आपल्या आयुष्य प्रवासाची वाटचाल सुरु असते ,आणि प्रत्येक वळण एक प्रताय्कारक  असा जीवन-अनुभव देणारे असते ..या कठीण आणि वेड्या वाकड्या रस्त्यावरून योग्यवेळी हिताच्या आणि कल्याणच्या राज-रस्तावर आणून सोडणारा पथ -दर्शक मित्र मिळणे ..माझ्या मते तरी आपले पूर्वसंचीत असले पाहिजे.

आजच्या लेखात मी माझ्या वैयक्तिक जीवनातील अनुभव तुमच्याशी शेअर करतो आहे .हा अनुभव माझ्यासाठी ,ज्यांना हे माहिती आहे त्यांच्यासाठी सर्वार्थाने चमत्कार आहे अशी माझी भावना आहे ..आणि हा चमत्कार ज्यांनी केवळ मैत्री-भावनेच्या तळमळीतून घडवला ..त्या .माझ्या मित्रांचे तुमच्या समोर मला आभार मानायचे आहेत ..
 .पंचक्रोशीत ..(५०० मैलांचा परिसर इथे गृहीत धरला आहे ) सर्वपरिचित असलेले हे व्यक्तिमत्व आहे ..डॉ.रत्नाकर लोंढे .-म्हणजेच लोंढे डॉक्टर .

गेली २५ वर्षे या मित्राचा सहवास मला लाभत आलेला आहे..  आमच्या मैत्रीची, परिचयाची सुरुवात ..एक पेशंट आणि एक डॉक्टर या स्वरूपात झालेली नाही हे अगोदर सांगतो.  .. माझे जिवलग मित्र आणि साहित्यक्षेत्रातील मान्यवर श्री.देविदास कुलकर्णी ..यांचे हे डॉ.रत्नाकर लोंढे मेहुणे  ,
परभणीच्या साहित्यिक उपक्रमात  आवर्जून येणारे लोंढे डॉक्टर ,साहित्य बाबत त्यांचे समरसून बोलणे , कवी-लेखक मंडळीशी त्यांचे परिचय ,आपुलकीचे वागणे-बोलणे ..माझ्या सारख्या नव्याने लेखन करीत असलेल्या एक होतकरू लेखक-कवीला मोठाच मानसिक आधार देणारे वाटू लागले ,आणि मग माझे साहित्य कुठे प्रकाशित होऊन आले की डॉक्टर लोंढे यांना ते दाखवण्यात आणि सांगण्यात मला आनंद वाटू लागला , कधी कधी त्यांचा फोन यायचा आणि ..त्यांचे आपलेपणाचे बोलणे कानावर पडायचे..अरुण राव आज तुमची कविता ..सामना " रविवार वाचली बरं का ....या एका अभिप्रायावर तो रविवार खूप आनंदात जाणारा असायचा .

लोंढे डॉक्टर यांच्या  व्यक्तीमत्वात ..सहृदयता हा गुण इतक्या सहजपणे आलेला आहे की ..त्यांना समोरच्या माणसाशी चांगले बोलण्या साठी, त्यला आधाराचे चार शब्द बोलण्यासाठी वेगळे असे प्रयत्न मुळीच करावे लागत नाहीत .."इतक्या सहज-स्वाभाविकपणे  सर्वत्र संचार असणार्या लोंढे डॉक्टरच्या मित्र-परिवारातला मी एक मित्र आहे .याचा मला नेहमीच आनंद वाटत असतो.

सोनपेठ -हे परभणी जिल्ह्यातील सांकृतिक परंपरा असलेले एक महत्वाचे गाव ..लोंढे डॉक्टर यांचे हे सोनपेठ गाव मला पाहण्याचा योग आला ..निमित होते ..मराठवाडा साहित्य सम्मेलन .. सोनपेठला २-३ दिवस मुक्काम करण्याचा योग या  सम्मेलनामुले आला .. आजचे प्रसिध्द कवी - प्रभाकर साळगावकर , साक्षात चे -रमेश राउत , आणि इतर नामवंत कवींच्या सोबत मी हे साहित्य सम्मेलन अनुभवले ...
प्रभाकर साळेगावकर  यांची आता ही जेंव्हा भेट होते त्या गप्पात .आमच्या पहिल्या भेट - म्हणजेच सोनपेठ सम्मेलन  ही आठवण असतेच ..
माझ्या  आठवणी प्रमाणे ..आम्ही लेखक -कवी मंडळी ..सोनपेठच्या या भेटीत  लोंढे डॉक्टरच्या  घरी खूप वेळ होतो .त्यांच्या घरचा .खूप आपुलकीचा ..मराठवाडी पाहुणचार ..अजून ही माझ्या आठवणीत आहे...मित्र देविदास कुलकर्णी मुळे हा योग आमच्या वाट्याला आला .

माझी  पुस्तके प्रकाशित झाली की माझ्या या पुस्तकांना .डॉक्टर लोंढे यांच्या पुस्तक-संग्रहात  सन्मानाने जागा मिळते ..उत्तम वाचक असलेल्या लोंढे डॉक्टर यांचे कडून ही पावती मिळणे माझ्या साठी प्रेरक- आणि प्रेरणा वर्धक गुटी आहे..असो.

आजच्या लेखाचे शीर्षक आहे .. निरामय आयुष्याचा बोनस देणारे .डॉक्टर लोंढे .. आता या बद्दल सांगतो..
मित्र म्हणून आमचा सहवास होताच .. हळू हळू .त्यांचे पेशंट म्हणून आमची नोंद होत गेली ..पारिवारिक -काळजीवाहू ..डॉक्टर ..म्हणून त्यांच्या कडे आमचे औषधोपचार घेणे सुरु झाले ..

त्या काळात म्हणजे १९९५ ते १९९९ या ५-६ वर्षात माझ्या "सिगारेट ओढण्याच्या .प्रमाणात इतकी वाढ होत गेली की ..त्याचे विपरीत परिणाम सुरु होतील ही भीती मनात पक्की बसली ..आणि मनाच्या ठायी प्रचंड अस्वथता निर्माण झाली ..मानगुटीवर विविध शंका-आणि कुशंकांचे भूत स्वार झाले ..त्याच्या परिणाम ..काल्पनिक आणि वास्तवात .केव्न्हाही भीतीनी घाम फुटू लागला .. शारीरिक त्रास तसा अजिबात नव्हता .पण, मनाला मात्र काल्पनिक आजाराने पुरते घेरून टाकले ..
लौकिक अर्थाने ..ज्याला व्यसन " म्हणतात अशा गोष्टी पैकी .."स्मोकिंग - धुम्रपान .हे माझे व्यसन झाले होते.
बँकेत काम करीत अस्तंना .माझे काम किती झाले ? हे पहायचे असेल तर टेबला खाली जमा झालेली थोटके मोजावी " असे साहेब लोक म्हणयचे .. 

घरी आल्यावर .लेखन करीत अस्तंना ..ग्लास भरून चहा .आणि लिहितांना अखंडपणे सिगरेट ..हे असे चालू होते ..
नोकरीला लागल्यावर ..१९७३ साली .पगाराच्या पैशातून सिगरेट ओढायला सुरुवात केली ....ही ऐत्बाजी कमी झाली नाही .उलट कमालीच्या वेगाने वाढत गेली ..
हायपर टेन्शन " चा त्रास सुरु झाला .. माझे हे सगळे "नखरे " लोंढे डॉक्टर शांतपणे पाहत असत ..एक चेकाप च्या वेळी  त्यांनी माझ्या खांद्य्वर हात ठेवीत म्हटले.. आज जरा बोलूच द्या तुमच्याशी ,
अरुणराव ..आता १९९८ चालू आहे ..तुम्ही ४८ वर्षांचे आहात .आताच सूचना देतो .. 
तसे पाहिले तर - काळजीचे अजिबात कारण नाही ..सगळं बेस्ट आहे ..पण ..तुम्ही सिगारेट सोडली तर बरं होईल ,
हटवादी -पणा करून नाही सोडत म्हटला !  तरी  ठीक आहे , .काळजी नाही .

पण .फक्त एक नक्की सांगतो ..तुमचा मित्र म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून ते लक्षात ठेवा 
 ..अजून दोन-तीन वर्षांनी काही झालं तर ?,आणि जर त्यावेळी आपल्याला  काहीच करता नाही आलं तर कसं ? 
फक्त याचाच विचार करा ..बाकी बिलकुल घाबर्यचं नाही ..माझ्यावर सोडा सगळं ,
 तुम्ही लगेच - सिगरेट सोडा असे म्हणत नाही ..ती सोडून देण्याचा प्रयत्न केला तर तुमचं भलं !इतकाच म्हणायचे आहे  मला .
मित्र हो .लोंढे डॉक्टरचे  ते समजावणे, ते सांगणे ..त्यांच्या शब्दातील ती काळजी .तो .आपलेपणा , त्यातला सच्चा सूर ..त्या सांगण्याने मला पुरते भयमुक्त केले .. व्यसन - विळख्यातून कधीच सुटका नसते " या भीतीचा मनावरील ताण कमी झाला ..

१९९९ हे वर्ष - महिना डिसेम्बर चालू होता .."संतकवी श्रीदासगणु वांग्मय दर्शन " या पुस्तकाचे लेखन पूर्ण झाले होते ,जानेवारी -२००० मध्ये गोरठे येथे प.पु .वरदानंद भारती यांचे हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन ठरले होते ,त्याची तयारी चालू होती , आदरणीय माधवराव आजेगावकर , श्रीराम नगर मधील श्री अरविंद गिरगावकर यांच्या सूचनेप्रमाणे आणि मार्गदर्शन- प्रमाणे  हा अक्षर सेवा योग माझ्या वाट्याला आलेला होता ..

हे लेखन चालू असतांना माझे सिगरेट ओढणे अगदी टोकाचे झाले   होते .रात्री लेखन करीत असतांना २०-२० सिगरेट ओढीत असे ..दिवसभर पुन्हा तितक्याच ..शिवाय नेहमीच लागते म्हणून डझनभर पाकिटे कायम टेबलावर समोर दिसली पाहिजे असा माझा स्वतःचा नियम ( ?) होता..

पण लोंढे डॉक्टरनी चेतावणी दिल्या पासून .दटावणी -सुनावणी केल्या पासून ..प्रत्येक सिगरेट ओढतांना अपराधी भावना वाढू लागली , तरी पण माझे निर्ढावलेले मन शांतपणे दुसरी सिगरेट ओढू लागे..
मग त्या दिवशी ..गुरुवार ..९ डिसेंबर - १९९९..सकाळी पूजा करून झाल्यावर ..सद्गुरू चरणी मनोमन अपराध कबूल करीत  संकल्प सोडला ..
"हे सद्गुरू .. तुमच्या  साक्षीने - आजपासून  मी सिगरेट कायमची सोडीत आहे ", हा संकल्प तुम्हीच पूर्ण करा.

मित्रहो , त्या क्षण पासून ..आणि त्या दिवसानंतर मी सिगरेटला पुन्हा कधीच स्पर्श केला नाही.या चमत्काराला आता १८ वर्षे होत आहेत .. कधी वाटते .डॉक्टर लोंढे यांचे आपण ऐकलेच नसते तर ?
 मित्रांनो ..कोणते ही भीषण चित्र डोळ्या समोर आणा ..अगदी तशी माझी जर्जर अवस्था झाली असती..
पण तसे विपरीत काही घडू न देण्याची किमया ..माझ्या या डॉक्टर मित्रांने करून दाखवली आहे ..
या सर्व घटना क्रमाच्या प्रत्यक्षदर्शी आहेत लोंढे डॉक्टर यांच्या तितक्याच निष्णात डॉक्टर पत्नी -सौ.अनुसया लोंढे ,

 " व्यसन-मुक्त होता येते ..त्या साठी स्व-निर्धार हवा " हा धडा त्यांनी  मला शिकवला ..
लोंढे डॉक्टर ..तुम्ही दिलेल्या बोनसने  माझ्या जगण्याला आणि आयुष्याला खूप अर्थपूर्ण बनवले आहे ,तुम्हा  उभयतांच्या कायम ऋणात  राहू द्या मला .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------आठवणीतील गावं - परभणी - 
लेख-८ वा- 
आयुष्याचा बोनस देणारे  - डॉ.रत्नाकर लोंढे .
ले-
अरुण वि.देशपांडे -पुणे.

No comments:

Post a Comment