Wednesday, December 6, 2017

लेखमाला -हितगुज लेख-क्र- १५ - लेख- बदल हवाच असतो ..!

लेखमाला -हितगुज 
लेख-क्र- १५ 
-----------------------------------------
लेख-
बदल हवाच असतो  ..!
ले- अरुण वि.देशपांडे 
---------------------------------------------------
रोजच्या दैनंदिन वेळापत्रकाच्या ताब्यात राहून आपण सारेजण अतिशय कंटाळून गेलेलो असतो ,घर ते कार्यालय  आणि परत कार्यालय ते घर " या येण्याजाण्याच्या रस्त्यावरून कधी काळी आरामात आणि रमत-गमत जाता येत होते " असे म्हणायची वेळ फक्त मोठ्या शहरातील लोकांच्यावर आहे असे मुळीच नाही , लहान मोठ्या शहरातील, गावातील स्थिती फारशी वेगळी नाही " तिथल्या मानाने आता तिथेही "गर्दी आणि गोंधळ " आहेच आहे . जुन्या खाणखुणा नाहीशा होऊन ,त्या ऐवजी अनेक नव्या गोष्टी येणे "हे टाळता येण्याची गोष्ट नाही .कारण  कालानुरूप बदल होतच असतात ..आणि बदल हा हवाच असतो ..कारण यातच उद्याच्या बदलत्या युगाची चाहूल लागत असते .

आधुनिक सुख-सोयी "नेहमीच उपयुक्त असतात ..त्यांच्या येण्यामुळे सवयीच्या झालेल्या अनेक जुन्या झालेल्या सुख-सोयी कालबाह्य झाल्या म्हणून त्या निरोपयोगी होत नाहीत ,पण,नव्या कार्य पद्धतीत त्यांचे असणे अनेक दृष्टीने अडचणीचे ठरणारे असते " अशावेळी "जुन्याच्या प्रेमात असणारी मंडळी- नव्याच स्वागत मोठ्या अनिच्छेने करीत असते ", खरे तर "होणारा बदल आवश्यक आहे" हे त्यांना मनातून मान्यच असते " पण वरकरणी विरोध दर्शवित रहातात हे मात्र खरे..
कोणते ही बदल "सुचवले जातात -त्यावेळी आपोआपच दोन गट तयार असतात ..बाजूने बोलणारे आणि विरोधात बोलणारे " हे दोघे आपल्या मतांचे कितीही समर्थन करू देत ..सार्वजनिक आणि बहुजन हितार्थ .."नव्या गोष्टी , नवे उपाय " नव्या पद्धती " अशा अनेक स्वरूपात "बदल होतच असतो ",
यात आणखी एक गंमत आहे .."बदल हवाच असतो ..म्हणून "बदल होत असतो " असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरावे.
आपण आपल्या वैयक्तिक-आयुष्यातील गोष्टींची उदाहरणे घेऊन पाहू या .म्हणजे यावर अधिक प्रकाश पडू शकेल.
हे खालील दृश्य आठवून पहा -

१.शाळेत जाणऱ्या मुलांना .डबा न्यावा लागतो .रोज तेच तेच काय ग आई ..! 
जरा बदलून दे ना .छान काही तरी ..! 
२. मोठ्या माणसांना डबे देतांना याच सुचना ऐकाव्या लागतात 
३. सकाळ-संध्यकाळ एकच एक स्वयंपाक नाही चालत आमच्या घरी कुणाला ,
   दोन्ही वेळा ताजा आणि दर वेळी बदलून लागतात भाज्या ..ही तक्रार आस्ते  आणि त्याला कौतुकाची किनार पण असते .मोठा गम्मतशीर मामला असतो हा .
 ४. महिन्यातून एकदा तरी .घरी जेवण न बनवता .बाहेर मस्त कुठे तरी जाऊन हॉटेलिंग करणे " म्हणजे सर्वंना आवडणारा बदल असतो ज्यामुळे रुची-पालट " साधला जातो .

५. कधी कधी आपला एखादा मित्र , कुणी परिचित ..भेटो आणि भरभरून बोलू लागतो -
काय सांगावं राव  -सध्या आपल्या सर्वांचाच  -रुटीन इतका बोरिंग झालय की .यातून बाहेर पडण्यासाठी ..बदल हवाच .म्हणून आम्ही तर दोन-तीन महिन्याला मस्त निसर्ग-रम्य ठिकाणी जाऊन येतो ..किती सुखद बदल अस्तोम्हणून सांगू , 
तुला सांगतो मित्र -तू पण असेच ठरव आणि ठरवून कर  कारण   , हा असा बदल "म्हणजे आजच्या काळाची गरज आहे "
आता मला सांगा- मित्राचे हे  तळमळीचे सांगणे .आणि त्यातीली भावना .दुर्लक्ष करण्याइतकी किरकोळ आहे का ?

घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्या गृहिणीची कार्यतत्परता .हे तिच्या "योग्य वेळी योग्य ते बदल करण्याच्या कार्यशैलीत "दिसून येत असते .
घराची सजावट , फर्निचरची मांडणी , खिडक्या -आणि घरातील पडदे , त्यांची रंग-संगती , किचन आणि त्यातील सोयी ,या सगळ्या गोष्टी .वेळोवेळी आवश्यकते प्रमाणे .कमी-जास्त केल्या जातात , त्यांच्या जागा बदलतात , हे काम सोपे नाहीये , उलट चिकाटीचे आणि परिश्रमपूर्वक करण्याचे काम असते.,ज्या वेळी हे काम केले जाते, त्यानंतर पहाणार्याला .आपल्याच घरचे बदललेले स्वरूप  थक्क करून टाकणारे असते. "जादूची कांडी " फिरवावी ,तसे होऊन जाते .असा हा बदल हवाच असतो .मोठा सुखद .

चालू असलेल्या गोष्टी न बदलता तशाच चालू राहिल्या तर .त्यात एक साचलेपणा येतो ..आणि साचलेपण म्हणजे त्यातली स्थिरता " ,अशा शैलीला माणूस फार काल सहन करू शकत नाही ..कारण गतिशीलता .हा आपल्या कृतीशील जीवनशैलीचा एक भाग असतो , त्यामुळे "एकच एक गोष्ट ..परत परत तशीच पुन्हा ? कित्दा ?,मग यातूनच ,
आलेले साचलेपण ,  मरगळ झटकून टाकण्यासाठी .नवे बदल ..येणे हे क्रमप्राप्त असते ,म्हणूनच " संभाव्य -बदल होणार " हा सूचक संदेश देखील खूप परिणामकारक असतो.

चाकोरीबद्ध -जगणे कुणालाच आवडत नसते , तेच तेच वातवरण .त्यात काही बदल नाही .असे जर कार्यालयीन वातावरण असेल तर .अशा ठिकाणी कार्यरत कर्मचारी यांत्रिकपणे येतात आणि जातात ..असे वातवरण मुळीच उपयुक्त नसते  " हे आता सर्वमान्य झाले आहे .अर्थातच .कार्यालयीन वातवरण नित्य-नूतन ",बदलते असावे .या दृष्टीकोनातून .नित्य-नवे बदल सुचवले जातात आणि त्याची त्वरित अंमलबजावणी देखील केली जाते ".याचे कारण काय ? याचे उत्तर पुन्हा तेच.. "बदल हवाच असतो "..म्हणून बदल केला जातो.."

कोणते ही क्षेत्र असू द्या . सर्व ठिकाणी .बदल अपेक्षित असतो, आणि तो ठरवून केला जात असतो .कधी सर्व संमतीने , कधी विरोध असतांना , कधी हे निर्णय अप्रिय असतात -तरी ते घ्यावे लागतात .कारण या बदलाने  प्रतिकूलता जाऊन अनुकूल परिस्थती येणार असते .म्हणून बदल हवाच असतो.
पिढी दर पिढी .हे चक्र चालूच रहाणे आहे .आपण ही आपल्या मनाच्या ठायी लवचिकता ठेवयला शिकले पाहिजे , नव्या गोष्टींच्या स्वागतासाठी मनाची तयारी केली पाहिजे, प्रसंगी ती दाखवली सुद्धा पाहिजे .कारण यामुळे ..होणारे बदल .संघर्ष न होता केले जातील हे नक्की.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------लेखमाला -हितगुज 
लेख-क्र- १५ 
-----------------------------------------
लेख-
बदल हवाच असतो  ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे 
मो-९८५०१७७३४२ 

No comments:

Post a Comment