Sunday, July 28, 2013

लेख- यशाचे वाटेकरी ....!

लेख- यशाचे वाटेकरी .!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
--------------------------------------------------------------------
 यश हे यशच असते ", यशाची धुंदी भल्या -भल्यांना चढत जाते , ती इतकी की-
 त्यांचे हात गगनाला भिडतात आणि पाय जमिनीवर टेकत नसतात . तुम्ही टीम-लीडर ", असतांना
जे यश मिळते , त्यात  तुमच्या नेतृत्व- कौशल्याचा वाटा निश्चितच असतो .
 जी लढाई तुम्ही जिंकलेली असते , संघ- नायक ", म्हणून जे यश मिळवता ,ते निर्भेळ असतेच ,
पण या यशाची गोडी चाखत अस्तन्ना  , जर - :या यशाचे श्रेय माझ्या एकट्याचेच आहे", असे सांगत
मिरुवू लागलात तर, मात्र या यशाचे गोडी नक्कीच कमी होऊन जाईल .
, कारण आपण एकद्त्याने
काहीच करू शकत नाही.तसेच आपल्या उणीवा आणि मर्यादा यांची भान ठेवून, जे आपल्या कार्यात
सहभागी होऊन  - "यशाचे माप आपल्या पदरात टाकतात ", ते देखील  या "यशाचे वाटेकरी
आहेत,हे विसरून कसे चालेल.?
आपल्या मना सारखे झाले तर ", ,या यशाचे शिल्पकार
आपण स्वत:च असतो. आणि या सोबत -
- आपली बुद्धिमत्ता , आपले कौशल्य ,क्षमता -
-पात्रता , अष्टपैलुत्व ,व्यासंग -,अभ्यास ,परिश्रम ,इतके  गुण-
-विशेष ", आपल्या व्यक्तिमत्वात ठासून भरलेले आहेत", असे
अगदी मुक्तकंठाने सांगितले जाते.अशा वेळी "मदत करणार्या आपल्या
माणसांचा सुद्धा आपल्याला विसर पडतो.
 अशा यशाच्या
प्रसंगी -आपण स्वतहा-शिवाय ", इतर काही लक्षात ही ठेवत नाहीत.
खर म्हणजे आपल्या यशात अनेकजण प्रत्यक्ष्य -अप्रत्यक्ष्य रूपाने सहभागी असतात.
त्यांच्या मदती शिवाय आपण हाती घेतलेले कार्य पार पाडू शकलो नसतो ," ही जाणीव
ठवून - आपण यशचे श्रेय मन्- मोकळेपनाणे  सर्वांना  द्यायला हवे आहे.
आणि  या उलट  "मनाजोगते नाही झाले तर ?-
, मग मात्र   या  अपयशाचे खापर सोयीस्करपणे  स्वतःला सोडून ,
इतर सर्वांच्या माथी फोडून  आपण मोकळे  होतो.
त्यावेळी आपले सगळे गुण-विशेष "नाही-से ",होतात . एखादे  वेळी ,यश मिळण्या ऐवजी
अपयश पडते .आणि पराकोटीचे दुखः सहन करावे लागते
आपण  "अपयशाचे मानकरी " झालो आहोत ही कल्पना सुद्धा अगदी
असह्य  होऊन जाते .आणि मग अनेकविध कारणे सांगून "हे अपयश"
का आले ही सांगण्यात शक्ती खर्च करावी लागते.
अर्थातच सभोवतालचे घटक या अपयशाचे कारण ठरतात
,मुख्य म्हणजे-- प्रतिकूल परिस्थिती ", ही खलनायिका असते.
 वाशिलेबाजी, कम्पुगिरी , प्रामाणिक माणसांची कदर इथे होत नाही",
 असे असेल तर "माझ्या सारख्याला इथे यश मिळेल ?, आशा करणे म्हणजे
 वेडेपण ", असा स्व- साक्ष्त्कार होतो.
 आपला तो बाब्या -दुसर्याचे कार्टे ", हा सुलभ -न्याय आपण या वेळी लावतो.
 तरी पण लोकाना -पब्लिकला "तुम्ही नेमके कसे आहात ", याची पूर्ण कल्पना
असते. तुमचे यश कसे,? आणि  तुम्हाला अपयश का? आले , हे त्यानी पूर्ण जोखलेले असते.
म्हणूनच मना सारखे झाले "-म्हणून हुरळून  जाउन नये. आपया यशात सहभागी असलेल्या
सर्वांप्रती ऋणी  असावे.
आणि मना सारखे झाले नाही ", या साठी स्वतहाच्या कमीपणाला जबादार ठरवून ,नव्याने
सुरुवात करावी.
आपल्या यशाचे श्रेय कधीच एकट्याचे नसते. त्याचे वाटेकरी असतात ,मुक्तमनाने ते त्यांना जरूर द्यावे..
मग, बघा ,तुमच्या मागे उभे रहाणारे "तुमचे दोस्त"..खूप आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख-  यशाचे वाटेकरी .....!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२

No comments:

Post a Comment