Monday, July 29, 2013

लेख- काही असे काही तसे ...!

लेख- काहे असे काही तसे ....!

-अरुण वि.देशपांडे -पुणे
मो- ९८५०१७७३४२

-------------------------------------------------------------------------------------------
आपण ठरवलेल्या खूप गोष्टी  करता करता  त्या
पूर्ण होण्याचे राहून जाते, आणि मनाला चुटपूट
लागून राहते. पुष्कळदा हाती घेतलेले एखादे कार्य
अर्धवट सोडून द्य्यावे लागते, कारण "आपल्या
स्वभावातील  धरसोड -वृत्ती ".
आरम्भशूर व्यक्ती" आपल्या कार्याचा आरंभ मोठा
गाजावाजा करून करतात, यामुळे अल्पकालीन
प्रसिद्द्धीही मिळून जाते, हा कार्यभाग सिद्ध झाल्या
नंतर मात्र " हाती घेतलेल्या कार्याचे काय झाले ? "
हा प्रश्न कुणी विचारीत सुद्धा नाही. थोडक्यात "साध्य
एक कार्याचे असते", ते झाले की बाकी सोडून द्यायचे .
असा सोयीस्कर मामला असतो.
उजाडलेला दिवस मावल्तान्ना ,उद्या येणाऱ्या दिवशी
काय करायचे ", हे आपण खुपदा "नुसते ठरवत असतो",
प्रत्यक्ष्य कृत्ती करण्याचे आपण सहजतेने सोडून देतो",
थोडक्यात - या वाचून काही अडलेले नाहीये न !,
यामुळे "आपल्या हातून काही होऊ शकत नाही ", याला
आपण स्वतः जबाबदार आहोत."
मग लोकांनी यशाची शिखरे सर केली तर ", आपल्या
नाराज होण्यालां काहीच अर्थ नसतो.
थोडक्यात- "कार्यमग्न रहाणे सदैव हिताचे असते.
आपले जीवनानुभव समृध्द करणारे वाक्य-प्रचार आपण नित्य ऐकत असतो.
"पालथ्या घड्यावर पाणी -- म्हणजे आपल्या प्रय्त्न्यांना येणारे निराशाजनक फळ.
पुष्कळ वेळा आपल्यावर "कुणाला काही समजावून सांगण्याची वेळ येते ", यात
अपेक्षा अशी असते की -निदान समजावून सांगितले तर डोक्यात काही  प्रकाश पडेल..!",
पण बहुतेक वेळी वाट्याला निराशाच येते .
याचे कारण असे  की- "" ज्यांना आपण हे सांगत असतो, त्यांनी त्यांच्या
 "मनाचे कान बंद करून ठेव्लेलेले  असतात.
दर्शनी कानांवरती पडणारे शब्द मना- पर्यंत पोहचतच नाहीत .
बरे "पालथ्या घड्यावर पाणी "- हा अनुभव सगळ्या वयोगटातील व्यक्तीकडून येतो .
साहजिकच ' जे समजावून सांगण्यास तयार असतात, त्यांच्या वाट्याला कधी कधी
दुरुत्तरे ऐकण्याची ही वेळ येते." त्यामुळे 'ज्या व्यक्ती शांत स्वभावाच्या आहेत ,अशांना
"निदान तुम्ही तरी थोडे सांगून बघा .." अशी विनंती केली जाते.
आपण सकाळी खूप छान समजावून सांगतो, समोरचा ऐकून ऐकल्या सारखे करतो आणि,
थोड्या वेळाने जाणवते " या माणसात तर काहीच बदल झालेला नाहीये ..!
यालाच वैतागून आपण म्हणतो- "सारे पालथ्या घड्यावर पाणी ..!
शाळेला जाताना घाई, मुलांना तयार करतांना घाई, ऑफिसला जातांना घाई, किचन मध्ये
तर निव्वळ हातघाई ची चौफेर लढाई , आणि मग धांदल , गोंधळ, मन स्थिर नाही.
मग काही किरकोळ कारणा वरून चिडचिड , राग-राग , तो राग मुलांच्या पाठीत धपाटे
देण्या पर्यंत जातो. कारण फक्त ५ मिनिटे अगोदर निघाले तरी चालते या हिशोबात ,
"फक्त ५ मिनिटे लेट...! होऊन जातो आणि लेट -मार्क,ला सामोरे जावे लागते.
हे सगळे टाळणे आपल्याच हाती आहे, "" घड्याळ १५ मिनिटे नुसते पुढे करून काय उपयोग नाही !"
त्यसाठी सगळी कामे ५ मिनिटे अगोदर पूर्ण करून शांतपणे बाकीचे कामे नीटपणे करू शकतो.
हे  कळत नाही  ? असे कसे  म्हणू  ?
फक्त कार्याची इच्छा नाहे, मनाला जी सवय लागली आहे, ती बदलणे अवगढ असते.म्हणून
हे असे होते. यावर खरे आज फक्त ५ मिनिटे वेळ काढा आणि चिंतन करा ,विचार करा ,
आणि उद्या पासून वेळापत्रक सुधारित करा, बघा" वेळ साधल्या मुळे "- आपले किती श्रम
वाचतात ते......!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- काही असे काही तसे ...!

No comments:

Post a Comment